सहिष्णुतेची खरी कसोटी

समाजात जर खरोखरी स्वातंत्र्य रूजवायचे असेल तर ती दुहेरी प्रक्रीया असते. एक तर इतरांच्या बाबतीत आपण सहिष्णू असावे लागते. आमच्या सहिष्णुतेच्या मर्यादा आपल्यापेक्षा वेगळा विचार करणाऱ्याच्या बाबतीत उदासीनता इतक्याच आहेत. सहिष्णुतेची खरी कसोटी आपल्या श्रध्दांच्यावर आघात करणाऱ्या लिखाणांच्या विषयी आपण किती सहिष्णुता दाखवतो या ठिकाणी लागते. कुणी कुणाची मने दुखवायची नाहीत, सर्वांनी एकमेकांच्या अंधश्रध्दा जपायच्या या दिशेने आपल्या सहिष्णुतेचा प्रवास चालू असते मुळात ही दिशाच चूक आहे. सर्वांनीच सर्व बाबींची चिकित्सा करायची आणि या चिकित्सेबाबत श्रध्दा कितीही दुखावली तरीही सहिष्णुतेने वागायचे, या दिशेने आपल्याला प्रवास केला पाहिजे. देशातील धार्मिक अंधश्रध्दा असणाऱ्यांच्या कोणत्याही श्रध्देय भूमिकेची चिकित्सा होताच जिथे निषेध होतात तिचे फारसे स्वातंत्र्य अस्तित्वात असू शकत नाही.

नरहर कुरुंदकर
‘अभयआरण्य’

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.