विषय «जात-धर्म»

देवाच्या नावावर राजकारण नको

ख्रिश्चन धर्म, डावा विचार, समाजपरिवर्तन, भांडवलशाही

—————————————————————————
अमेरिकेत डाव्यांनी उदारमतवादी धर्माच्या बाजूचे राजकारण करावे असे सुचविणाऱ्या मताचा प्रतिवाद करणारी ही मांडणी
—————————————————————————

दोन हजार तेरा सालची गोष्ट. टेक्सास राज्यात गर्भपाताची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर कमी करण्यासाठी विधिमंडळात मांडण्यात आलेल्या एका विधेयकावर चर्चा सुरू होती. (ते विधेयक नंतर संमतही झाले.) त्या चर्चेत भाग घेताना सिनेटर डॅन पॅट्रिक अन्य सदस्यांना उद्देशून म्हणाले – “जर तुम्ही ईश्वराला मानता, तर देव इथे असता तर त्याने कोणाच्या बाजूने मत दिले असते ह्याचा विचार करा.”
हेच महाशय नंतर (देवाच्या कृपेने नव्हे, तर मानवी निवडणुकीच्या माध्यमातून) लेफ्टनंट गव्हर्नरपदी निवडले गेले.

पुढे वाचा

गोमांस आणि पाच प्रकरणे

गोमांस, पोर्क, गांधी, सावरकर, जिना
—————————————————————————
गोमांस ह्या सध्याच्या वादग्रस्त प्रश्नाशी संबंधित इतिहासाची काही महत्त्वाची पाने कोणत्याही टिप्पणीविना उलगडून दाखवत आहेत आधुनिक भारताच्या इतिहासाचे एक तरुण अभ्यासक
——————————————————————–
प्रकरण 1: 10 डिसेंबर 2015 जागतिक मानवाधिकारदिनी तेलंगणातील ओस्मानिया विद्यापीठाचा परिसर युद्धभूमी बनला होता. निमित्त होते गोमांस विरुद्ध वराहमांस विवाद. गोमांसबंदी व त्यासंदर्भात देशभर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ डेमोक्रॅटिक कल्चरल फोरम या डाव्या विचारांच्या विद्यार्थीसंघटनेने उच्च न्यायालयाच्या स्थगितीला न जुमानता विद्यापीठपरिसरात गोमांसउत्सव साजरा करण्याचे ठरविले. यास प्रतिक्रिया म्हणून ओ.यु.जॅाईंट अॅक्शन कमिटी या दुसऱ्या संघटनेने वराहमांस उत्सवाचे आयोजन करण्याचे जाहीर केले.

पुढे वाचा

जाफर आणि मी

जाफरच्या घरी रमजानचं शरबत प्यालो
त्याच्या निकाहला शाही बिर्याणी
त्याची आई माझ्याच आईसारखी
घरासाठी खपताना चेहऱ्यावरचे छिलके निघालेली
त्याच्या घराच्या भिंती माझ्याच घराच्या भिंताडासारख्या
कुठे कुठे पोपडे निघालेल्या
त्याचे बाबा हळहळतात माझ्याच बाबांसारखं
फाळणीच्या दिवसांबद्दल बोलताना
त्याच्या भाजणीतलं मीठ
माझ्याच घरातल्या डब्यातल्या मिठासारखं
त्याच्या आमटीतलं पाणी एकाच जमिनीतून आलेलं
माझ्या तुळशीवर पडलेला सूर्यप्रकाश
त्याच्या मशिदीच्या आवारातल्या
नीमच्या सळसळीतून मावळलेला
तोहि तिरुपतीला एकदोनदा व देहूला जाऊन आलेला
मीही कितीतरी वेळा खजूर व चादर ओढून आलेलो
पिराच्या दर्ग्यावर बायकोबरोबर
त्याला मला समकालीन वाटत आलेला
गालिब व तुकाराम
आपल्याच जगण्यातलं वाटत राह्यलं
मंटो व भाऊ पाध्येच्या कथेतलं विश्व
दारूच्या नशेतही वंटास बोललो नाही
कि एकमेकांच्या कौमबद्दल कधी अपशब्द

कितीतरी दिवस आतड्यातल्या अल्सरसारखी-
छळत राहिली मला
त्याच्या आईला कॅन्सर झाल्याची बातमी
आम्ही अफवा नव्हतो
आम्ही संप्रदायाची लेबलं नव्हतो
आम्ही होतो दोनवेळच्या दाल चावलची
सोय लावताना चालवलेली तंगडतोड
एकवेळची शांत झोप मिळवण्यासाठी चालवलेला
दिवसभरातला आकांत
काय माहीत मात्र काही दिवसांपासून
कोणीतरी फिरवतंय गल्लीमोहोल्ल्यांतून
जाफर व माझ्यातल्या वेगळेपणाची पत्रकं

दस्तावेज: स्वामी विवेकानंद ह्यांचे मित्रास पत्र

विवेकानंद, हिंदूधर्म, इस्लाम
—————————————————————————

माझ्या प्रिय मित्रा,

मला तुम्ही पाठवलेले पत्र अतिशय भावले आणि आपल्या मातृभूमीसाठी ईश्वर शांतपणे किती अद्भुत गोष्टी रचतो आहे हे कळल्यामुळे मला अत्यंत आनंद झाला. आपण त्याला वेदान्त म्हणा किंवा अन्य कोणतेही नाव द्या, पण सत्य हे आहे की धर्म आणि चिंतनाच्या क्षेत्रातील अखेरचा शब्द आणि ज्या स्थानावरून आपणास सर्व धर्म व पंथांचे प्रेमाने अवलोकन करता येईल  त्याचे नाव आहे अद्वैतवाद. मला विश्वास आहे की भविष्यातील प्रबुद्ध मानवतेचा धर्म हाच असेल. हिब्रू आणि अरबांच्या पूर्वीचा वंश असल्यामुळे हिंदूंना ह्या मुक्कामावर इतरांपूर्वी पोहचण्याचे श्रेय घेता येऊ शकेल; परंतु वास्तवातील अद्वैतवाद, जो सर्व मानवजातीला स्वतःच्या आत्म्याप्रमाणे बघतो व तसा आचारही करतो, सर्व हिंदूंमध्ये कधीही प्रस्थापित झाला नाही.

पुढे वाचा

धर्म आणि मैत्री…

धर्म, मैत्री

तिच्या वडिलांबरोबर ती प्रथमच माझ्या बँकेच्या शाखेत आली होती. तिचे वडील नेहमीच माझ्याकडे येत, त्यांना मी एक एकाकी वृद्ध प्रोफेसर म्हणून ओळखत होते. या सधन वस्तीतील एका श्रीमंत स्टायलिश मुलांनी गजबजलेल्या कॉलेजमध्ये ते उर्दू शिकवत तेव्हापासून मी त्यांना पाहात होते.
प्रोफेसर मुस्लिम होते. अत्यंत देखणे रूप, गोरापान रंग, खानदानी वावर, देहबोली. या वार्धक्यात अधिकच गहिरलेली डोळ्यातली निळाई. सर उर्दूतले प्रसिद्ध शायर-साहित्यकारही होते.
आणि जिभेवर उर्दू शेरोशायरीबरोबरच फर्मास इंग्लिश भाषेची साखरपेरणी. त्यातच रंगतदार आठवणी. कधी कॉलेजचे किस्से, कधी फिल्म इंडस्ट्रीतल्या खमंग कहाण्या, सरांची दिलीपकुमार वगैरे फिल्मी दिग्गजांशी अंतरंग मैत्री होती.

पुढे वाचा

महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या निमित्ताने…

महाराष्ट्रातील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात ‘बाबासाहेब पुरंदरे’ यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि त्यानिमित्ताने नुकताच झालेला प्रचंड वाद हा महत्वाचा आहे.
पुरोगामी चळवळ सांस्कृतिक राजकारण कसे करते, आपले डावपेच कसे मांडते- प्रतिपक्षाचे डावपेच कसे जोखते, वादंगाच्या आपल्या व्याख्या कितपत जोरकसपणे लोकांपुढे मांडते या सगळ्या परीप्रेक्ष्यामध्ये काही मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत – तसे ते घेतले नाहीत तर आपल्या विरोधाची दिशाच चुकते चुकत आली आहे असे मला वाटते. त्यासाठी हे छोटे टिपण.
जातीचा प्रश्न
एकूण या वादामध्ये ब्राह्मणी छावणी (ब्राह्मण नाही) हुशारीने ‘मूळ प्रश्न ‘जातीचा आहे’, ‘पुरंदरेंच्या जातीमुळे त्यांना विरोध’ असे ‘तांडव’ करून आपण किती ‘सोवळे’, ‘जात पात विसरून पुढारलेले’ अशी मुद्द्याला बगल देत आहे.

पुढे वाचा

इस्लामवादी दहशतवाद: पडद्यामागचे राजकारण

 इस्लामच्या नावावर गेल्या अनेक वर्षांपासून जगाने हिंसा आणि दहशतवादाच्या असंख्य घटना झेलल्या आहेत. यातील अनेक इतक्या क्रूर आणि माथेफिरूपणाच्या आहेत की, ना त्या विसरल्या जाऊ शकतात, ना त्यांना माफ करता येते. ओसामा-बिन-लादेनने योग्य ठरविलेल्या 9/11च्या हल्ल्यात 3000 निरपराधी व्यक्तींचे मृत्यू, पेशावरमधील शालेय मुलांवरील हल्ला, बोकोहरमद्वारे केलेले शाळेतील मुलांचे अपहरण, चार्ली हेब्दोवरील हल्ला आणि आयसिसद्वारे केल्या गेलेल्या घृणास्पद हत्या इत्यादी हल्ले यात सामील आहेत. या सर्व घटना घोर निंदा करण्यास पात्र आहेत आणि त्या साऱ्या सभ्य समाजाला शरमेने मान झुकविण्यास बाध्य करणाऱ्या आहेत.

पुढे वाचा

संघ बदलला की दलित विचारवंत?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांना राज्यातील काही दलित साहित्यिकांनी उपस्थिती लावली. अशा कार्यक्रमांमुळे, भाजप-संघ परिवाराची हिंदू राष्ट्रनिर्मितीची संकल्पना स्पष्ट असताना, तेथे जाऊन दलित विचारवंत कुणाचे नि कसले प्रबोधन करतात? दलित लेखक, विचारवंत, वा कवी सांगत असलेला आंबेडकरवाद संघ परिवार स्वीकारतो काय? असे प्रश्न उपस्थित होतात.
केंद्रात आणि राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारे सत्तारूढ झाल्यानंतर संघ आणि संघ परिवाराशी संलग्न असणाऱ्या संघटनांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेमाचा पान्हा फुटलेला पाहावयास मिळतो आहे. उदाहरणार्थ संघ परिवाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची साजरी केलेली जयंती, संघाचे मुखपत्र असलेल्या ‘पांचजन्य’ व ‘ऑर्गनायझर’ने आंबेडकर जयंतीनिमित्त प्रसिद्ध केलेले विशेषांक, ‘ऑर्गनायझर’ व ‘पांचजन्य’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमास; तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या व्याख्यानमालेस दलित समाजातील एक विचारवंत डॉ.

पुढे वाचा

अजून एका पुरोगामी विचारवंताची हत्या

कर्नाटकातील हंपी विश्वविद्यालयाचे माजी उपकुलगुरू, डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची धारवाड येथील त्यांच्या राहत्या घरी 30 ऑगस्ट 2015 रोजी सकाळी 8.40 वाजता 2 अज्ञात इसमांकडून गोळी घालून हत्या करण्यात आली. कुठल्याही उपचारापूर्वीच त्यांचा जीव गेला होता. मृत्यु समयी त्यांचे वय 77 वर्षाचे होते. डॉ. एम. एम. कलबुर्गी हे ख्यातनाम साहित्य संशोधक, विमर्शक व जुन्या कन्नड लिपीचे अभ्यासक होते. कन्नड संस्कृती, कन्नड इतिहास, लोकगीत (जानपद) साहित्य, व्याकरण, ग्रंथ संपादन शास्त्र, इत्यादी विषयात त्यांनी संशोधन पर प्रबंध लिहिलेले होते. त्यांनी 41 प्राचीन ग्रंथांचे संपादन केले व शंभराहून जास्त संशोधित लेख लिहिले.

पुढे वाचा

पटेलांच्या आंदोलनातून निर्माण होणारे धोके

गेल्या महिन्यात गुजराथमधील पटेल समाजाने खांद्यावर बंदूक घेउन वावरणाऱ्या 22 वर्षीय हार्दिक पटेलच्या नेतृत्त्वाखाली मुख्यमंत्री आनंदीबेन पटेलच्या नेतृत्त्वाला आव्हान देत सरकारविरोधात आरक्षणाच्या मुद्यावर जोरदार धुमश्चक्री केली. आजही भाजपचा पाठीराखा असलेला, जमीनजुमल्यावर बऱ्यापैकी मालकी असलेला, देशांतर्गत व्यापारउदीमावर वर्चस्व असलेला, विदेशातही बळकट आर्थिक स्थान मिळवलेला, राज्य व केंद्र सरकारात मोठा सहभाग असलेला, सामाजिकदृष्ट्याही अस्पृश्य नसल्याने ब्राम्हणाखालोखाल वरचढ असलेला, खाजगी क्षेत्रात एस.सी,एस.टी व ओ.बी.सीं.ना आरक्षण नसल्याने त्या क्षेत्रातील 100 टक्के नोकऱ्या बळकावलेल्या, हिरे,मोती, जडजवाहिर व सुवर्णालंकार देशात विकणाऱ्या आणि विदेशात निर्यात करणाऱ्या या समाजाला आपण मागासवर्गीय असल्याचा शोध लागला आहे.

पुढे वाचा