विषय «संघटना-व्यक्ती विशेष»

बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य : विचार आणि संघटन

बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य : जगाला प्रभावित करू शकणाऱ्या अलौकिक शक्तीचे, व्यक्तीचे वा वस्तूचे अस्तित्व बुद्धिगम्य नाही म्हणून ते स्पष्टपणे नाकारणे. परंतु ज्यावेळी आपण ‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’ ठळकपणे उद्धृत करत आहोत त्यावेळी अलौकिक शक्तीसहीत धर्म/पंथ/धम्म/दीन/रिलिजन (religion) अशा धर्माधीष्ठित जीवनपद्धतीसुद्धा नाकारत आहोत आणि म्हणूनच हिंदू-नास्तिक, मुस्लिम-नास्तिक, बौद्ध-नास्तिक, ख्रिश्चन-नास्तिक इत्यादी संभ्रमात टाकणारे शब्द आणि ‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’ ही संज्ञा यातील फरक स्पष्ट करता येईल. धर्माचे अस्तित्व स्वीकारून फक्त ईश्वर नाकारणे हे अपुरे आहे. ‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’ हे अलौकिक शक्तीपुरते मर्यादित नसून मानवी जीवनातील इतर घटकांनासुद्धा लागू होते अशी पूर्ण आणि स्पष्ट मांडणी बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्यात अपेक्षित आहे.

पुढे वाचा

रॅशनल जावेद अख्तर

जावेद अख्तर यांना ‘रिचर्ड डॉकिन्स अवॉर्ड’ देण्यात येणार असल्याची घोषणा नुकतीच जून महिन्यात ‘सेंटर फॉर एन्क्वायरी’ या संस्थेने केली. विज्ञान, धर्मनिरपेक्षता आणि बुद्धिप्रामाण्यवाद या मूल्यांसाठी त्यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळणार आहे.

एक गीतकार, पटकथाकार म्हणून जावेद अख्तर यांची ओळख प्रत्येक भारतीयाला आहेच. त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या तार्किक अंगाची ओळख या ठिकाणी करून देण्याचा माझा प्रयत्न आहे.

जावेद अख्तर यांचा जन्म एका अशा कुटुंबात झाला ज्या घराला साहित्य, कला यांची परंपरा तर होतीच पण शिवाय देशप्रेमाचीही मोठी परंपरा होती. त्यांचे आजोबा फ़जल-हक़-खैरबादी यांनी १८५७च्या उठावात मुस्लिमांनी सहभाग घ्यावा म्हणून फतवा काढला होता.

पुढे वाचा

आटपाट नगर?

चेंबूर – ट्रॉंबेच्या वस्त्यांमधून प्रौढ साक्षरता प्रसाराच्या निमित्ताने सुरू झालेल्या कामामध्ये मी 1989 पासून सहभागी आहे. ‘कोरोसाक्षरता समिती’ हे आमच्या संघटनेचे नाव. ह्या कामात मी अधिकाधिक गुंतत चालले त्यावेळी माझ्या अनेक मित्र मैत्रिणींना, नातेवाईकांनी भेटून, फोनवर माझ्याबद्दल, कामाबद्दल चौकशी केली, अगदी आस्थेने चौकशी केली. ‘‘काम कसं चाललंय?”, ‘‘कसं वाटतं”?, ‘‘झोपडपट्टीतली लोक कामाला प्रतिसाद देतात का?’‘ अशा उत्सुक प्रश्र्नांबरोबर ‘‘सुरक्षित आहेस ना? काळजी घे,’‘ ‘‘यांना हाकलून द्यायला पाहिजे. यांनी मुंबई बकाल केली. तू यांना जाऊन कशाला शिकवतेस?”, ‘‘कसे राहतात ग हे लोक?”,

पुढे वाचा

दाटून येते सारे..

आयुष्याचा मार्ग हा अनेक वळणे घेतच पुढे जात असतो. ज्यापर्यंत पोहोचायचे असते, ती ‘मंजिल’ अनेकदा एकच नसते. अनेक व बदलत्या ध्येयांच्या क्षितिजाकडे आपण लक्ष केंद्रित करत असेल तरच आपलीही वळणांवरची कसरत तोल न जाऊ देता, चालत राहायला हरकत नसते. माझेच नव्हे, प्रत्येकाचेच आयुष्य असे वळणवाटांनी भरलेले व भारलेले असते. त्यांच्याकडे मागे वळून पाहिल्यास सुखदु:खाची चढाओढ तर जाणवतेच परंतु त्या पल्याड आपली पावले धावत राहिल्याचे मोलही उमजते. एखाद्या वळणावर काही निसटलेले जाणवते तर काही वेळा एखादी झेप पहाड चढून जाणारी ठरली आहे, असे मिश्र संकेत मिळतात.

पुढे वाचा

मजेत

पद्मजा फाटक वारल्या. अनेक व्याधी, ‘रोपण’ केलेले मूत्रपिंड, त्या मूत्रपिंडाला शरीराने स्वीकारावे यासाठीची औषधयोजना, त्या औषधांचे दुष्परिणाम टाळायला (किंवा सौम्य करायला) आणखी औषधयोजना; अशा साऱ्यांशी बावीस-तेवीस वर्षे झगडून सत्तरच्या वयात ६ डिसेंबर २०१४ ला पद्मजांनी ‘देह ठेवला’
‘आजचा सुधारक’चा आणि त्यांचा जुना स्नेह. दि. य. देशपांडे, प्र. ब. कुलकर्णी, मी, साऱ्यांशी तसाच जुना स्नेह.
शिक्षणाने समाजशास्त्रज्ञ असलेल्या पद्मजांना खरे तर कोणताच विषय वज्र्य नव्हता. ‘शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक’ आणि (माधव नेरूरकरांसोबतचे) ‘बाराला दहा कमी’ ही त्यांच्या ग्रंथसंपदेतली रत्ने.
ताराबाई मोडक पद्मजांच्या आजी.

पुढे वाचा

स्वच्छतेची घडी

दक्षिण भारतातील एक साधासा मुलगा. शाळा सोडलेला. त्याने ग्रामीण महिलांसाठी पाळीच्या दिवसांतील स्वच्छता व आरोग्य ह्यासाठी चांगला प्रयत्न केला. अरुणाचलम मुरुगनंतम् ह्यांनी पाळीची घडी (सॅनिटरी पॅड) तयार करण्याचे यंत्र बनविले, त्याची गोष्ट.

सन 1998 मध्ये त्यांचे नवीन नवीन लग्न झाले होते, तेव्हाची गोष्ट.त्यांची पत्नी शांती त्यांच्यापासून काहीतरी लपवीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या कसल्यातरी चिंध्या होत्या. ती त्यांना घाणेरडा फडका म्हणत होती. पाळीसाठी बाजारू पॅड का वापरीत नाहीस असे विचारल्यावर ती म्हणाली, मी जर ते वापरले तर आपल्याला घरात दूध आणता येणार नाही.

पुढे वाचा

डॉ. दप्तरींचा अभिनव सुखवाद : अहो, धर्म ऐहिक सुखासाठीच

विद्वद्रत्न डॉ. केशव लक्ष्मण दप्तरी (१८८०-१९५६) हे गेल्या पिढीतले मोठे विचारवंत होते. मुख्य म्हणजे ते बुद्धिप्रामाण्यवादी होते. आमच्या अर्थाने विवेकवादी होते का? याचे उत्तर एका शब्दात देता येणार नाही.

१. डॉ. दप्तरी थोर धर्मज्ञ होते, आणि जनसामान्यांसाठी धर्माची आवश्यकता मानणारे होते. मात्र धर्म काय किंवा धर्मग्रंथ काय अपौरुषेय नाहीत, पूर्णपणे बुद्धिगम्य आहेत, असा त्यांचा सिद्धान्त होता.

आता प्रश्न असा की, ते आधी बुद्धिवादी, आणि मग धार्मिक म्हणजे लोकशिक्षणाकरिता म्हणून धर्माचा आश्रय घेणारे होते की, मुळात धर्मभिमानी पण बुद्धिवादाचा आश्रय घेऊन धर्म विवेकवाद्यांना स्वीकार्य व्हावा अशा रीतीने सांगणारे धर्मसुधारक होते?

पुढे वाचा

इलाबेन आणि स्त्रीमुक्ती

विकासाची धोरणे आणि राजकारण यांचा संबंध असल्याने स्त्रियासुद्धा राजकीय क्षेत्रात आपला सहभाग असावा म्हणून आग्रह धरीत आहेत. संसदेत व विधिमंडळात महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण असावे अशी त्यांची जोरदार मागणी आहे. देशातील विकासधोरणे व त्याचबरोबर स्त्री-विकास, स्त्री-मुक्ती व पुरुषवर्गाबरोबर समानता प्राप्त होण्यासाठी राजकीय निर्णयप्रक्रियेत स्त्रियांचा सहभाग आवश्यक आहे असे अनेक महिलांना मनापासून वाटते. काही महिला तर लोकसंख्येच्या प्रमाणात ५० टक्के आरक्षण जरूर आहे असा दावा करतात. ३३ टक्के आरक्षणाच्या मागणीचा उच्चार सध्या अनेक कक्षावर केला जात आहे.

महिलांच्या ३३ टक्के आरक्षणाचे विधेयक अकराव्या व बाराव्या लोकसभेत मांडले गेले, त्यावर खूप चर्वितचर्वण झाले व होतही आहे.

पुढे वाचा

कालचे सुधारक

गुणग्राहक
आदि शंकराचार्यांनी बादरायण व्यासांच्या ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहिले. त्या शांकरभाष्यामधले तर्कदोष दाखवून व्यासांतर्फे शंकराचार्यांवर फिर्याद लावणारे केशव लक्ष्मण दप्तरी (१८८०-१९५६) हे एक लोकविलक्षण पुरुष नागपुरात होऊन गेले. हा थोर तत्त्वज्ञ पूर्णतया इहवादी असूनसुद्धा जीवनाच्या ऐहिक बाजूबद्दल अत्यंत उदासीन होता. दप्तरींचे कपडे घालण्याचे काही ठराविक नियम होते. उन्हाळ्यात अमक्या तिथीपासून तमक्या तिथीपर्यंत खादीचा सुती सदरा आणि गांधी टोपी ते घालीत आणि बाकीच्या (हिवाळ्याच्या) दिवसांत घोंगड्याचा उनी सदरा आणि तसल्याच कापडाची काळी टोपी ते वापरीत. मग उन्हाळ्यातल्या किंवा हिवाळ्यातल्या त्या त्या दिवशी हवामान प्रत्यक्षात कितीही थंड किंवा गरम असो.

पुढे वाचा

विज्ञानवादिनी कमला सोहोनी

ब्रह्मवादिनी स्त्रियांबद्दल पुष्कळ ऐकले आहे. मुंबईच्या या खेपेत एका विज्ञानवादिनीचा वार्तालाप ऐकायला मिळाला. ब्रह्मवादिनींनी कोणाचे काय भले केले ते ठाऊक नाही. पण या विज्ञानवादिनीने मात्र लक्षावधी बालकांना मातेचे दूध, म्हशीच्या दुधावर प्रक्रिया करून उपलब्ध करून दिले. असंख्य कुटुंबांना निर्भेळ अन्न मिळण्याची सोय हाताशी ठेवून त्यांचे ऐहिक जीवन सुरक्षित करायचा प्रयत्न केला. भारतातील पहिल्या महिला वैज्ञानिक आपल्या मोठ्या बहिणीबरोबर जाहीर गप्पा मारतील अशी बातमी म.टा.मध्ये वाचली. २५ डिसेंबर हा ग्रंथालीचा वाचकदिन असतो. त्यानिमित्त ग्रंथालीने प्रकाशित केलेली पुस्तके ५० टक्के सवलतीत विक्रीला ठेवलेली आणि जोडीला ह्या दोघी बहिणींच्या गप्पा असे जबर आकर्षण होते.

पुढे वाचा