विषय «इतर»

धर्म, धर्मनिरपेक्षता आणि त्यामधून उद्भवणारे काही प्रश्न – ३

प्रस्तुत लेखाच्या प्रारंभी हिन्दू कोण नाही असा प्रश्न मी उपस्थित केला आहे. कारण हिन्दू कोण नाही हे नक्की ठरल्याशिवाय अल्पसंख्याक कोण व बहुसंख्याक कोण याचा, त्याचप्रमाणे कोण कोणाचा अपमान करीत आहे ह्याही प्रश्नांचा उलगडा होत नाही. माझ्या मते कोणीच बहुसंख्याक नाहीत व त्यांचा अपमानही होत नाही. ‘ तुमचा. तुम्ही बहुसंख्याक असून अपमान होत आहे’ अशी एक हूल उठवून दिली गेली आहे व त्या आवईला आमचे भाबडे देशबान्धव बळी पडत आहेत.

हिन्दू कोण नाही
हिन्द कोण नाही असा मला पडलेला प्रश्न मी पुढे एका पद्धतीने सोडवून दाखवीत आहे.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

पत्रव्यवहार
श्री. संपादक ‘आजचा सुधारक’ यांस,
प्रा. स. ह. देशपांडे यांचे एप्रिल (?) १९९१ च्या अंकातील पत्र वाचले. कळविण्यास खेद वाटतो की सावरकसांचे एकही पान उघडावयाचे नाही’ हा (स. रा. च्या म्हणण्यानुसारचा)’ पुरोगामी’ दंडक मी पाळलेली नाही. सावरकराचे समग्र लेखन अभ्यासले असल्याचा दावा मी करीत नाही, पण प्रसंगोपात्त त्यांचे लेखन जरुरीपुरते मी वाचले आहे. त्यांची चरित्रेही वाचली आहेत.
हिंदुत्वाची सावरकरांनी केलेली व्याख्या सुप्रसिद्ध आहे. धर्मनिष्ठ मुसलमान वा ईसाई यांची भारत ही पितृभू असली तरी पुण्यभू होऊ शकत नाही : ‘पुण्यभू’चा संदर्भ holy places या अनि आहे ही गोष्ट स्पष्ट आहे.

पुढे वाचा

आम्ही स्वतंत्र आहों

आम्ही स्वतंत्र आहों
हल्ली स्त्रियांची स्थिती पाहिली तर त्यांच्यांत कित्येक दुर्गुण शिरले आहेत. त्या सासुरवासांत असल्यामुळे खोटे बोलण्याची त्यांस संवय लागते व मग ती संवय मुलांस लागते. अशा रीतीने देशांतील लोक सत्य, तेज व साहसहीन होतात. आपण सर्वांनी सत्याचे व्रत धरले पाहिजे व तें आमरण चालविले पाहिजे. कोणास वाटेल की, आम्ही स्त्रियांनी काय सुधारणा करावी. आम्ही पडलों परतंत्र. तर मी त्यांस असें सांगते की, आम्ही स्वतंत्र आहों, आम्ही आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण मात्र केले पाहिजे, आमच्यापेक्षा पुरुषर्षास जास्त हक्क अगर स्वातंत्र्य असण्याची काहीएक जरूरी नाही.

पुढे वाचा

भारताची सध्याची आर्थिक दुःस्थिती

भारताच्या पंतप्रधानांनी सत्ता ग्रहण केल्यानंतर राष्ट्राला उद्देशून केलेल्या पहिल्याच भाषणात आपले सरकार देशापुढील गंभीर आर्थिक प्रश्न सोडविण्याला अग्रक्रम देईल असे जाहीर केले होते. गेल्या जूनमध्ये झालेल्या निवडनुकीनंतर पक्षोपक्षांच्या जाहीर चर्चेत देशापुढील आर्थिक संकटातून बाहेर येण्याकरिता कोणते उपाय करावयास पाहिजेत यासंबंधीच्या मुद्द्यांवरच अधिक भर देण्यात आला होता. या संदर्भात आन्तरराष्ट्रीय मुद्रा निधीच्या कर्जाचा प्रश्न प्रामुख्याने चचिला गेला. तेव्हा या आर्थिक पेचप्रसंगाचे नेमके स्वरूप काय आहे आणि ह्याचे निराकरण करण्याकरिता कोणते उपाय योजणे आवश्यक आहे, इत्यादि प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे.

पुढे वाचा

धर्म, धर्मनिरपेक्षता, आणि त्यातून उद्भवणारे काही प्रश्न – २

मागच्या लेखात धर्म आणि धर्मनिरपेक्षता ह्यांविषयी हिन्दुनेतृत्व काय म्हणते आणि त्यांनी केलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येमुळे हिन्दुनेतृत्वाच्या उक्तीमध्ये आणि कृतीमध्ये कशी विसंगती निर्माण होते ते आपण पाहिले. हा लेखामध्ये त्यांच्या व्याख्येमध्ये मला बुचकळ्यात पाडणारे आणखी अनेक शब्द आहेत त्यांचा विचार करावयाचा आहे, तसेच पूर्वीच्या लेखात ज्यांचा परामर्श घेता आला नाही असे मुद्दे विचारार्थ घ्यावयाचे आहेत, व थोडे मागच्या लेखातील मुद्यांचे स्पष्टीकरणही करावयाचे आहे.

मला वाटते, हिन्दुनेतृत्वाच्या हिन्दूंच्या व्याख्येमुळे हिन्दू कोण आहेते पुष्कळसे स्पष्ट होते, पण हिन्दू कोण नाही हा प्रश्न थोडा संदिग्ध राहतो.

पुढे वाचा

पुस्तक-परिचय

स्त्री उवाच : वार्षिक १९९१ मूल्य रु. पंचवीस,
संयुक्त राष्ट्रसभेने १९७५ हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून जाहीर केले आणि स्त्रियांना आणि पुरुषांनाही, स्त्रियांच्या अस्तित्वाची जाणीव व्हायला लागली. स्त्रियांना आपला चेहरा गवसू लागला आणि माणूस म्हणून स्वतःची ओळख पटू लागली. आजतागायत त्यांच्यावर लादलेले वस्तुत्व’ नाकारून त्या व्यक्तित्व जोपासू लागल्या. समाजाच्या मानसिक गुलामगिरीतून मुक्त होताना स्त्रीमुक्तीची चळवळ आकार घेऊ लागली, स्त्रीला अभिव्यक्तीची जी गरज भासली त्यातून स्त्री उवाच गटाची स्थापना झाली, हा गट गेल्या ५ वर्षांपासून स्त्री उवाच’ याच नावाने चळवळीचे वार्षिक मुखपत्र काढीत आहे.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

संपादक
मार्च १९९१ च्या अंकात डॉ. साळुखे यांनी लिहिलेल्या ‘चार्वाक दर्शन ‘ या पुस्तकाचे परीक्षण वाचले. योगायोगाने पाठोपाठ ते पुस्तक वाचण्याची संधी मिळाली, वाचनानंतर माझ्या मनात काही शंका निर्माण झाल्या. त्यांचे निरसन झाल्यास मी आपला आभारी होईन. अर्थात् परीक्षणकत्यनिच निरसन करावे अशी अपेक्षा नाही.
माझ्या शंका पुढील तीन मुद्याबाबत आहेत. (१) पूर्वपक्ष शब्दाचा अर्थ, (२) चार्वाक हे आस्तिक मत आहे का 7(३) चार्वाकाचे ग्रंथ जाळले व त्यामुळे ते नष्ट झाले का?
पूर्वपक्ष :- डॉ. साळुखे यांच्या मते चार्वाकाचे मत सर्वत्र पूर्वपक्ष म्हणूनच मांडण्यात आले आहे हे त्या मतावर अन्याय करणारे किंवा त्याविषयी गैरसमज पसरविणारे आहे.

पुढे वाचा

विवेकवाद – १३

उपयोगितावाद -२
गेल्या तीन-चार लेखांकांत जे नीतीचे विवेकवादी विवेचन केले गेले आहे त्यामुळे अनेक वाचक बुचकळ्यात पडले आहेत. त्यांची अशी समजूत आहे की विवेकवादी नीतीच असू शकत नाही. ‘Rationaltion’ या शब्दाचा पर्याय म्हणून आम्ही वापरलेला ‘विवेकवाद’ हा शब्द ते वापरत नाही. या क्षेत्रात रूढ असलेला दुसरा एक शब्द, म्हणजे ‘बुद्धिवाद ‘ किंवा ‘बुद्धिप्रामाण्यवाद, हा शब्द ते वापरतात. आणि तसे केल्यावर त्यांच्यापुढे बुद्धीचा नीतीशी काय संबंध आहे? हा प्रश्न उपस्थित होतो असे त्यांचे म्हणणे. ते म्हणतात की बुद्धी ज्ञानांत यथार्थ आणि अयथार्थ, किंवा अनुमानांत वैध (निर्दोष) आणि अवैध (सदोप) असा भेद करते; पण बुद्धीला कर्मात नीति आणि अनीती असा विवेक कसा करता येईल?

पुढे वाचा

विवाह आणि नीती (भाग १३)

कुटुंब आणि वैयक्तिक मानसशास्त्र
या प्रकरणात मी व्यक्तीच्या शीलावर (character) कौटुंबिक संबंधांचा काय परिणाम होतो याचा विचार करणार आहे. या विषयाचे तीन स्वाभाविक भाग पडतातः मुलांवर होणारे परिणाम, मातेवर होणारे परिणाम, आणि पित्यावर होणारे परिणाम. हे तीन परिणाम वेगळे करणे अर्थातच कठीण आहे, कारण कुटुंब हे एक सुसंहत एकक (closely – knit unit) असते, आणि त्यामुळे ज्या गोष्टीचा परिणाम माता-पित्यावर होईल, त्याचा मुलावरही परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु तरीही मी ही चर्चा तीन भागात विभागणार आहे. चर्चेचा आरंभ मुलापासून करणे स्वाभाविक होईल, कारण कोणीही माता किंवा पिता बनण्यापूर्वी आधी मूल असतो.

पुढे वाचा

विवेकवाद – १२

उपयोगितावाद (Utilitarianism)

‘आजचा सुधारक’च्या डिसेंबर-जानेवारी अंकात ‘नीतिविचार धर्मविचाराहून निळा’ या लेखात नीतीचे धडे विवेचन केले होते. आज ते विवेचन अधिक विस्ताराने करण्याचा विचार आहे.

पाश्चात्य नीतिशास्त्राच्या इतिहासात पहिल्यापासूनच दोन परस्परविरुद्ध विचारसरणी किंवा संप्रदाय दिसून येतात. एवढेच नव्हे तर या दोन विचारसरणी परस्परांच्या शेजारी शतकानुशतके चालत आलेल्या आहेत. ह्या दोन संप्रदायांना आपण तापसवादी आणि तृप्तिवादी अशी नावे देऊ शकतो. यापैकी पहिल्या संप्रदायाचे प्रतिपादन असे आहे की वासना किंवा इच्छा हे सर्व दुःखांचे मूळ आहे, म्हणून वासना जिंकणे, किंवा वासनाक्षय हा मानवाच्या हिताचा मार्ग आहे; तर दुसर्‍याचे प्रतिपादन असे आहे की जास्तीत जास्त इच्छची जास्तीत जास्त पूर्ती करणे यात मानवाचे हित आहे.

पुढे वाचा