विषय «इतर»

ज्ञानाची बहुलता

या चळवळींतून व विकासाच्या समीक्षेतून आजवरच्या वर्चस्ववादी ज्ञानविज्ञानावरही सवाल केले गेले आहेत व ज्ञानविज्ञानांचे बहुलवादी अस्तित्व ठसवले गेले. एका वर्गाचे ज्ञान किंवा अमुक प्रकारचेच विज्ञान यांना एकमेवाद्वितीय, प्रमाण मानण्याऐवजी प्रत्येक समाजघटकाचे व विभिन्न देशकालातील अनुभव व प्रयोगांनी सिद्ध होत आलेले ज्ञान-विज्ञान देखील महत्त्वाचे आहे, प्रमाण आहे, जी जाणीव अनेक चळवळी रुजवत आहेत. एखाद्याच वर्गाच्या, एकाच विशिष्ट कालातील वा भूभागातील व एकाच पद्धतीच्या ज्ञानाचे प्रमाण्य व त्याची मक्तेदारी असणे हे सुद्धा वर्चस्वाचे व शोषणाचे एक मुख्य कारण आहे. साधारण जनसमूह सुद्धा शेकडो वर्षे आपली बुद्धी, सर्जनक्षमता व परंपरेने शेती, पाणी, आरोग्य, तंत्रविज्ञान विकसित करत आले आहेत.

पुढे वाचा

अमेरिकेचे राष्ट्रगीत

‘सूर्याच्या पहिल्या किरणांसवे, धुक्याच्या पडद्याआड ज्याचे दर्शन होत आहे तो ध्वज कालच्या काळरात्रीनंतर अजूनही दिमाखाने झळाळतो आहे. अग्निबाण आणि बारुदी गोळ्यांच्या माऱ्यात आणि लालतांबड्या आगीच्या लोळातही आमचा राष्ट्रध्वज खंबीरपणे झळाळतो आहे. जोपर्यंत युद्धभूमीवर आमच्या राष्ट्रध्वजाचे दर्शन होत राहील तोपर्यंत ह्या वीरांच्या आणि स्वातंत्र्याच्या भूमीसाठी आम्ही लढा देत राहू. (अमेरिकन राष्ट्रगीताच्या सुरुवातीच्या कडव्याचा स्वैर भावार्थ)

एखाद्या देशाचे राष्ट्रगीत हे जणू त्याच्या इतिहासाचे प्रतिबिंबच असते. देशासाठी आत्यंतिक महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींचा उल्लेख राष्ट्रगीतात केला जातो. राष्ट्रगीतांत जाणते- अजाणतेपणे ज्या घटकांचा उल्लेख केला जात नाही ते घटकही महत्त्वाचे असतात, नाही असे नाही.

पुढे वाचा

अनश्व रथ, पुष्पक विमान व आपण सर्व लेखांक दोन

(मागील लेखात आपण पहिले की नरेंद्र मोदी ह्यांच्या ऐतिहासिक विजयाचे श्रेय जितके हिंदुत्ववाद्यांच्या अथक परिश्रमाला आहे, तितकेच ते भारतीय परंपरेचा अन्वयार्थ लावू न शकलेल्या पुरोगाम्यांच्या अविचारीपणाला व दुराग्रहालाही आहे. हिंदू राष्ट्रवादाचा व राहदूराष्ट्रवादी व गांधी दोघेही परंपरेचे समर्थक होते; पण हिंदू धर्मातील अनाग्रही, सहिष्णु वृत्ती हाच हिंदुधर्माचा गाभा आहे, त्याचे शक्तिस्थान आहे, अशी गांधींची श्रद्धा होती. ह्याउलट हिंदुराष्ट्रवाद्यांनाहा हिंदूंचा दुबळेपणा आहे असे वाटत आले आहे. हिंदुराष्ट्रवादाचामुख्य आधार ‘हिंदू’ विरुद्ध ‘इतर’ असे द्वंद्व उभे करणे हा आहे. म्हणूनच भारतीय इतिहासातील भव्यता, उदात्तता ही फक्त हिंदूंमुळे, व त्यातील त्याज्य भाग परधर्मीयांमुळे आहे, असे सांगून त्यांना इतिहासाची मोडतोड करावी लागते.

पुढे वाचा

औरस- अनौरसत्व, जनुकशास्त्र वगैरे…

(औरस-अनौरसाचा जगाच्या प्रारंभापासून नसला तरी तो खूप खूप जुना आहे. आणि फक्त भारतातच नाही, तर जगात सर्वत्र आहे. हा गुण करणाऱ्यांना चिकटत नाही, निरागस, नवजात अर्भकाला मात्र चिकटतो. एका नोबेल विजेत्याने आपल्या जन्माची कहाणी कशी उघड करून सांगितली आहे, ते पहा. अशी गोष्ट एखाद्याच्या बाबतीत घडावी ह्यात काहीच आश्चर्य नाही. वर म्हटल्याप्रमाणे असे खूप खूप पूर्वीपासून होतच आले आहे. आश्चर्य आहे ते त्याने ती एवढी मोकळेपणाने सांगावी ह्याचे. पॉल नर्स ह्यांना त्यांच्या जन्माची गोष्ट तशी कर्मधर्मसंयोगानेच कळली. तेव्हा तर त्यांना धक्का बसलाच.

पुढे वाचा

दुष्काळ – पाण्याचा की विचारांचा?

(थोर पर्यावरणतज्ज्ञ अनुपम मिश्र ह्यांचा हा लेख काश्मीरमधील प्रलयाच्या पार्श्वभूमीवर ह्या अंकात प्रकाशित करीत आहोत. डॉ राजेन्द्रप्रसाद ह्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे हे विचार प्रथम आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात आले होते. प्रस्तुत लेखात, समुद्रकिनाऱ्यावरील खारफुटीची जंगले नष्ट केल्यामुळे त्या प्रदेशात किंवा मुद्दाम उंचावरून रस्ते काढल्यामुळे सखल प्रदेशात पूर आल्याची उदाहरणे देऊन त्यांनी एक महत्त्वाचा सिध्दान्त मांडला आहे, तो असा की दुष्काळ किंवा पुरासारख्या आपत्ती अचानक कधीच येत नाहीत. त्यांच्या आधी चांगल्या विचारांचा दुष्काळ आलेला असतो. ‘ज्ञानोदय’ मासिकाच्या जून २०१४ च्या अंकातून अनुवादित, संपादित, साभार.

पुढे वाचा

सम्यक जीवनशैली

या सर्वांना जोडून सामाजिक व व्यक्तिगत जीवनशैलीबद्दल आखणी करणे व धोरण असणे आवश्यक बनले आहे. जीवनशैलीचा मुद्दा उपभोगाशी, वस्तू व साधनसंपदेच्या वापराशी निगडित आहे. उपभोगवाद किंवा चंगळवाद हा मुद्दा व्यक्तिवादी नैतिकतेबरोबरच सामाजिक नीतीचा (सोशल मॉरॅलिटी), आपल्याशिवाय इतरांच्या लोकशाही हक्कांचा व साधनसंपत्तीविषयक धोरणांचा आहे. प्रत्येकाने किती पाणी, वीज, जंगल, नैसर्गिक साधनसपंत्ती वापरावी, इथपासून किती धन व वस्तूसंग्रह करावा येथपर्यंत अनेक बाबी वापरण्यावर कमाल मर्यादा येतील. अमेरिका-युरोपप्रमाणे दरमाणशी वीजवापराचे व अन्य उपभोगाचे उद्दिष्ट प्रमाण मानले तर भारतातल्या सर्व नद्यांवर अगडबंब धरणे बांधून सर्व जंगले, जमीन, पैसा वापरूनही त्याची पूर्तता होणार नाही.

पुढे वाचा

महाभारत आणि कॉस्मॉस

माझी अगदी लहानपणाची टीव्ही पाहायची पहिलीवहिली आठवण म्हणजे महाभारतमालिका. त्याकाळात रंगीत टीव्ही खूप कमी असायचे. आमच्या घरी रंगीत टीव्ही असल्यामुळे शेजारीपण महाभारत पाहायला घरी यायचे. आमची बैठकखोली लोकांनी भरून जायची. महाभारतमालिकेच्या आधी आलेली रामायणमालिका मला फारशी आठवत नाही तेव्ही मी वयाने फार लहान होतो पण महाभारत मात्र मी आवर्जून पाहात असे. नवरससंपूर्ण पौराणिक कथा, अप्रतिम अभिनय आणि त्याच्या जोडीस असलेले भव्यदिव्य सादरीकरण, लोकांना टीव्हीला खिळवून ठेवायला लागणारे सगळेच पैलू त्यामध्ये होते. साहजिकच रामायण आणि महाभारत ह्या दोन्ही मालिका अत्यंत लोकप्रिय झाल्या आणि नकळत लोकांच्या आयुष्याच्या अविभाज्य घटक बनल्या.

पुढे वाचा

युटोपियन सोशालिस्ट; रॉबर्ट ओवन

एकोणविसाव्या शतकात युरोपातील स्थिती अत्यंत दयनीय झाली होती. नेपोलियनसोबत नुकत्याच झालेल्या युद्धाची झळ सर्वदूर पोहोचली होती. सामान्य नागरिक अत्यंत हलाखीचे दिवस जगत होते. त्यातच माल्थसने भाकीत केलेली जागतिक आर्थिक मंदी खरोखरच सुरू झाली. बेरोजगारी प्रचंड वाढली आणि त्यासोबत हिंसाचाराच्या घटनासुद्धा. औद्योगिक क्रांतीची नुकतीच सुरुवात झाली होती. त्यादरम्यानच भांडवलदारांनी स्वतःचा फायदा वाढविण्याकरिता नवनवे कायदे आणले ज्यामुळे कामगारांचे जगणे अधिकच दयनीय बनले. अगदी १० वर्षांची लहान मुले- मुली सुद्धा या कामात गुंतवली जात होती. आणि मग अशांवर मानसिक, शारीरिक आणि लैंगिक अत्याचाराचे कधीही न संपणारे सत्र सुरू व्हायचे.

पुढे वाचा

अनश्व-रथ, पुष्पक विमान आणि आपण सर्व लेखांक पहिला

नव्या केन्द्र सरकारचे शंभर दिवस उलटून गेले आहेत. ह्या शंभर दिवसांत कोणताही चमत्कार घडून आलेला नाही. स्विस बँकेत लपवलेला काळा पैसा भारतात येईल व त्यामुळे भारताची आर्थिक विवंचना संपेल असे मानणाऱ्यांची निराशा झाली आहे. सरकारी कचेऱ्या, बाजार कोठेही परिवर्तनाच्या खाणाखुणा दिसत नाहीत. परराष्ट्रधोरणाच्या बाबतीतही नवे सरकार (इस्रायलच्या निषेधास दिलेल्या नकाराचा अपवाद वगळता) पूर्वीचेच धोरण पुढे चालवील अशी चिह्ने दिसत आहेत. निवडणुकीपूर्वी राणा भीमदेवी थाटात जगातील सर्व विषयांवर भाष्य करणारे पंतप्रधान आता बोलण्याच्या बाबतीत मनमोहनसिंगांचा वारसा चालवीत असल्याचा भास होतो. त्यांची अलीकडील भाषणे ऐकून तर ते रोज सकाळी उठल्यावर ते ‘मथ्था टेकायला’ राजघाटावर जात असावेत, अशीही शंका येते.

पुढे वाचा

झाली जीत इंग्रजीची

काही वर्षांपूर्वीची गोष्ट. एका नामांकित भारतीय बुद्धिवादी महिलेशी माझी गाठ पडली. सहज संभाषण सुरू झाले. मी तिला सांगत होतो की मी हिंदी व इंग्रजीतूनही लिहितो. शिक्षणशास्त्राच्या दृष्टीने हिंदी आवश्यक असल्याचे तिने मान्य केले. परंतु मी माझे काही लेख मुळातूनच हिंदीत लिहितो हे ऐकून मात्र तिला धक्का बसला. हिंदी वा तमिळसारख्या भाषा ह्या रस्त्यावरचे संभाषण करायला बऱ्या असतात. परंतु इंग्रजी किंवा फ्रेंचप्रमाणे त्यांच्यामध्ये संकल्पनांचा विचार करणे शक्य नाही असे तिचे म्हणणे होते.

हे संभाषण कायम माझ्या मनात रुतून बसले आहे. कारण आपण सर्वजण जे काही गृहीत धरतो, त्याचे ते निदर्शक आहे.

पुढे वाचा