राष्ट्रीयतेचा प्रश्न

‘राष्ट्र’ या संकल्पनेचा उगम ‘मातृभूमी व तिजबाबतचे ममत्व यांपासून झालेला असावा. कारण, असे ममत्व जगभरात प्रत्येकासच आपापल्या मातृभूमी’बाबत वाटत असल्याचे दिसते. मायभूमीसाठी जीव ओवाळून टाकणारे असामान्य लोक तर जगात असतातच. पण, वंश-धर्म-भाषाभेद मानणारा व आयुष्यभर परदेशी राहिलेला सामान्यांतला सामान्य माणूस देखील ‘मातृभूमी’चे एकदा तरी दर्शन घडावे म्हणून तडफडत असतो आणि किमान अंत्यविधी तरी ‘मायभूमीतच व्हावा असा ध्यास धरतो. तसेच राष्ट्र-प्रांत-धर्म इत्यादी भिंतींना झुगारणारे बुद्धिप्रामाण्यवादीदेखील तसाच ध्यास धरतात आणि त्यामुळे त्यांनी सकृद्दर्शनी नाकारलेले ‘मायभूमी’बाबतचे ममत्व प्रकट होतेच. म्हणजेच, पूर्वीच्या टोळी’ किंवा ‘राज्य’ या संकल्पनांच्या कक्षा रुंदावत जाऊन आता राष्ट्र ही संकल्पना साकारली आहे.

पुढे वाचा

विवेकवादी विचारसरणी व जीवनपद्धती

[कॅनडामधील एकतच्या जानेवारी १९९९ अंकामध्ये ‘सुधारकाची सात वर्षे’ हा प्राध्यापक प्र. ब. कुलकर्णी यांचा लेख प्रसिद्ध झाला होता. प्रा. प्र.ब. कुळकर्णी ‘आजचा सुधारक’ या मासिकाचे सहसंपादक असून संस्थापक प्रा. दि. य. देशपांडे यांचे पहिल्यापासूनचे सहकारी आहेत. आजचा सुधारक’ मासिक विवेकवाद किंवा बुद्धिवादी विचारसरणी इंग्रजीत “रॅशनॅलिझम” म्हणून ओळखली जाते, जिच्यात व्यक्तिस्वातंत्र्य, समतावादी दृष्टिकोन आहे). प्रा. प्र. ब. कुळकर्णी यांचा लेख, तसेच आजचा सुधारक’ चे काही अंक वाचनात आले. प्रा. प्र. ब. कुळकर्णी कामानिमित्त अमेरिकेत आले असताना त्यांच्याशी या विषयावर चर्चात्मक गप्पा करायची संधी मिळाली.

पुढे वाचा

संपादकीय

या महिन्यापासून एक लहानसा खांदेपालट होत आहे. श्री. दिवाकर मोहनींनी गेले दीड वर्ष आजचा सुधारकचा मार्ग पुष्कळच प्रशस्त केला आहे. त्यांना थोडी मोकळीक मिळावी ह्यासाठी संपादकीय कामापुरता हा बदल आहे.
आ. सु. बद्दल अनेकांच्या अपेक्षा अनेक प्रकारांनी वाढत आहेत, हे त्याच्या प्रगतीचेच लक्षण आम्ही समजतो. उदाहरणार्थ आ. सु. ने नुसते वैचारिक लिखाण प्रसिद्ध करून न थांबता काहीतरी ठोस करून दाखवावे म्हणजे – शाळांमधून प्रवेश देताना देणग्या उकळणाच्या संस्थामध्ये जाऊन निषेध, घोषणा, धरणे असे उपाय योजावेत. लग्नाकार्यात हुंडा घेणारे, प्रचंड उधळपट्टी आणि श्रीमंती प्रदर्शन करणारे पक्ष असतील त्यांनाही वरील मार्गांनी विरोध करावा इत्यादी.

पुढे वाचा

संपादकीय

गेल्या दोन-तीन महिन्यांत काही आम्ही लिहिलेल्या व काही आम्ही प्रकाशित केलेल्या लेखांमुळे पुष्कळ पत्रे आली आहेत. त्या पत्रांना सविस्तर उत्तरे देण्याची गरज निर्माण झाली आहे. इतकेच नव्हे तर काही पत्रांवर ताबडतोब काही ना काही कृती करण्याची गरज आहे अशा पत्रांमध्ये श्री. देवदत्त दाभोलकर ह्यांचा क्रम पहिला लागतो. श्री. भ. पां. पाटणकर (ऑगस्ट ९९ अंक पाहावा), श्री. ग. के. केळकर, श्री. प्रभाकर गोखले, ह्या आमच्या वाचकांनी पाठविलेल्या पत्रांना (चालू अंकात अन्यत्र प्रकाशित) क्रमशः उत्तरे पुढे दिली आहेत. मराठी भाषाप्रेमींना लिहिलेल्या अनावृत पत्राला आलेल्या उत्तरांपैकी काही या महिन्यात प्रसिद्ध करीत आहोत, बाकीची ऑक्टोबरमध्ये व त्यांचा समारोप शक्यतोवर नोव्हेंबरमध्ये करावा असा इरादा आहे.

पुढे वाचा

सर्वांना शुद्धलेखनाचे प्रशिक्षण हवे

संपादक, आजचा सुधारक यांस,
आपल्या अनावृत पत्रात आपण उपस्थित केलेले सर्वच मुद्दे महत्त्वाचे व विचारांना चालना देणारे आहेत. त्या सर्वांचा समग्र विचार करून ऐकमत्य साधणे नितांत आवश्यक झाले आहे. ही प्रक्रिया लवकर व्हावयास हवी. उशीर झाल्यास मराठीची अवस्था आणखी दयनीय होईल आणि मग तिच्यात चैतन्य आणणे आणखी कठीण होईल, असे आपल्याप्रमाणे मलाही वाटत आले आहे. आपल्या अनेक वर्षांच्या व्यावसायिक अनुभवामुळे आपण लिखित मराठीचे दुखणे बरोबर हेरले आहे. समग्र महाराष्ट्रात आणि अन्यत्र प्रमाण मराठीची जाण वाढणे याची आज नितान्त
आवश्यकता आहे.
मराठीच्या अनेक प्रादेशिक बोलीही महाराप्ट्रात विखुरल्या आहेत.

पुढे वाचा

विवेकवाद म्हणजेच आप्तवाक्यप्रामाण्यनिषेध?

संपादक, आजचा सुधारक यांस,
मी आपले सर्व अंक पुरेसे काळजीपूर्वक वाचतो. प्रतिक्रियाही निर्माण होतात. त्यांची तपशीलवार मांडणी करण्यापेक्षा काही निष्कर्प फक्त नोदवीत आहे.
१. आपल्या वहुताश लेखकांचा त्यांच्या मनावद्दलचा शागही आत्मावश्वास अजव वाटतो. विश्वातील संपूर्ण व अंतिम सत्य आपणास समजले आहे असा अविर्भाव त्यात मला दिसतो.
२. जुलै ९९ च्या संपादकीयांतील पान १०० परिच्छेद – २ चा शेवट व पान १०१ परिच्छेद १ चा शेवट यांत ‘अन्याय दूर करण्याचा’ व ‘वास्तव बदलण्याचा तुमचा संकल्प हा फारच महत्त्वाकांक्षी वाटतो. आपले ग्राहक / वाचक यांची संख्या २५०० ते ३००० च्या पुढे नसावी.

पुढे वाचा

चर्चा – पंतप्रधान कोणी व्हावे?

संपादक, आजचा सुधारक यांस,
जून ९९ च्या अंक वाचला. यावेळी नेहमीची तर्कसंगती व विचारांची सुसूत्रता त्यात जाणवली नाही. म्हणून त्याविषयी काही विचार मांडीत आहे.
१) भारतातील सुशिक्षित व अशिक्षित असे दोन्ही प्रकारचे मतदार लोकशाही प्रक्रियेस कसे अयोग्य आहेत यावर दोन परिच्छेद लिहिल्यावर पुढे एके ठिकाणी आपण म्हणता की पंतप्रधान कोणी व्हावे हा जनतेचा प्रश्न नसून जो पक्ष निवडून येईल त्याची ती डोकेदुखी आहे. निवडून आलेला पक्ष हा मतदारांनीच निवडून दिलेला असतो. तेव्हा अशा “अयोग्य” (म्हणजेच आपल्या म्हणण्याप्रमाणे अप्रबुद्ध) मतदारांनी निवडलेल्या पक्षाने सर्व देशावर एखादी व्यक्ती पंदप्रधान म्हणून लादावी हे योग्य कसे?

पुढे वाचा

नसलेल्या परमेश्वराशी भांडण

आजचा सुधारकचा मी नियमित वाचक आहे. निखळ विवेकवादाचा पुरस्कार करणारे हे मासिक विचारी वाचकांच्या पसंतीस उतरावे यात तिळमात्र शंका नाही.
पण मला खटकणारी एक गोष्ट म्हणजे ऊठसूठ परमेश्वराची कुरापत काढण्याची थोडीही संधी हे मासिक वाया जाऊ देत नाही.
“अध्यात्म:” एक प्रचंड गोंधळ’ हा मे, ९९ च्या अंकातील लेख हा त्याच पठडीतला म्हणावा लागेल.
माझ्याही मनात त्याने गोंधळ होतो. त्याची कारणे अशी –
१. नसलेल्या परमेश्वराची चर्चा कशाला करायची? त्याला महत्त्व देऊन ‘तो नाही’ हे सिद्ध करायला ‘आजचा सुधारक’ मधील बहुमूल्य पाने का खर्चायची?

पुढे वाचा

धर्म आणि श्रद्धा

धर्मचिकित्सा करणा-या विद्वानांचे, ढोबळ मानाने, दोन वर्ग आहेत. एक वर्ग आहे – धर्म मानणा-या आस्तिकांचा, तर दुसरा आहे-धर्म न मानणा-या नास्तिकांचा. आस्तिक धर्मचिकित्सक हे सिद्ध करू पाहतो की धर्म ही अत्यंत कल्याणकर (किंबहुना, एकमेव कल्याणकर) बाब आहे. उलट, नास्तिक धर्मचिकित्सक हे दाखवू पाहतो की धर्म ही अत्यंत घातक आणि मानवाला सर्वस्वी अशोभनीय बाब आहे. धर्मचिकित्सकांच्या या दोन वर्षांनी काढलेले धर्मासंबंधीचे निष्कर्ष भिन्न (किंबहुना, एकमेकांविरुद्ध) असले, तरी त्या दोहोंमध्ये एका बाबतीत मतैक्य असल्याचे आढळते. नास्तिक आणि आस्तिक या दोन्ही प्रकारचे बहुतेक धर्मचिकित्सक असे मानतात की धर्माचा आधार श्रद्धा हा आहे.

पुढे वाचा

मनाचा जो व्यापार चालतो तो सारा इंग्रजी भाषेत

इंग्लिश भाषेचे सामान्य ज्ञान तर आतांशा बहुधा प्रत्येक मनुष्यास जरूर झालें आहे. दिवसेंदिवस तर तींत निपुण होणे हा जीवनाचाच एक उपाय होऊ पहात आहे. चोहोंकडे प्रतिष्ठा मिरविण्याचे तर यासारखे सध्यां दुसरें साधनच नाहीं. तेव्हा तिचा जो हल्ली फैलावा झाला आहे, व होत चालला आहे, त्यापुढे वर सांगितलेल्या भाषांची गोष्ट काय बोलावी? इंग्लिश लोक आपल्या उत्कृष्ट भाषेचा साया भूमंडळावर प्रसार होत चालला आहे याचा अतिशयित गर्व वहातात, व तो त्यांचा गर्व यथार्थ आहे. आमच्या नुसत्या हिंदुस्थानांतच पाहिले तर आमच्या तरुण विद्वानांस तिने इतके वेडावून टाकले आहे की, त्यांस आपल्या आईबापांशी, बायकांशीं, बहिणीशीं, चाकरांशीं सुद्धां शुद्ध व सरळ बोलण्याची मारामार पडते!

पुढे वाचा