हा देश तुमची मालमत्ता आहे
की आमच्यापेक्षा अधिक घाम-रक्त वाहवलंय तुम्ही
तुमच्या श्वासात आमच्यापेक्षा अधिक विरघळली आहे इथली हवा
तुमच्या मातीत इथला सुवास अधिक आहे
की नसांतून जरा जास्तच दौडतय इथलं पाणी
नाही ना, मग आम्ही का जावं पाकिस्तानात?
ज्यांना जायचं होतं, ते गेले निघून पाकिस्तानात
त्यांना तुमच्या पाकिस्तानची भीती वाटत होती
म्हणून त्यांनी बनवला त्यांचा त्यांचा पाकिस्तान
पण काय झालं ?
धोक्यात आहे त्यांचे अस्तित्त्व
आपल्याच पाकिस्तानात भयग्रस्त आहेत ते,
खरं तर सर्वांनाच माहित आहे
की प्रत्येक पाकिस्तानचा शेवट सारखाच असतो
म्हणून आम्ही पाकिस्तानात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.