भारतीय सेक्युलॅरिझम निधार्मिकता नाही की नास्तिकता
भारताची राज्यघटना १९ नोव्हेंबर १९४९ रोजी प्रथमतः स्वीकृत करण्यात आली. तिच्या उपोद्घातात (झीशरालश्रश) भारताच्या सेक्युलरपणाचा उल्लेख नाही. सेक्युलर हा शब्द ४२ व्या घटनादुरुस्तीने घातला गेला. ही दुरुस्ती १ सप्टेंबर १९७६ पासून अमलात आली. दुरुस्ती बिलासोबत जेथे उद्दिष्टे आणि कारणे ह्यांचे विधान असते तेथेही हा शब्द समाविष्ट करण्याचे प्रयोजन काय ह्याचा काही खुलासा नाही. किंवा ह्याचे …