एप्रिलचा अंक एका नव्या आवाहनासोबत प्रकाशित करतो आहोत.
शालेय वयापासूनच अनेक व्यक्तींच्या गुणगौरवाचे धडे आपल्याकडून गिरवून घेतले जातात. रामायण-महाभारतातील काल्पनिक पात्रांपासून, मोघल-इंग्रजांच्या विरोधात लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांपर्यंत, सामाजिक कार्यात अमूल्य योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांपासून ते नाटक-सिनेमावाल्यांपर्यंत! वेगवेगळ्या क्षेत्रात काही भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचा गुणगौरव समाज करतोच. परंतु, गुणगौरव आणि व्यक्तिपूजा ह्या दोन संपूर्ण वेगळ्या छटा आहेत की एकमेकींत मिसळलेल्या भावना आहेत, हे समजणे तसे कठीणच.
महानतेचे अनेक निकष असतात. कोणत्याही एका क्षेत्रात उत्तम कामगिरी करणारी व्यक्ती लवकरच सर्वगुणसंपन्न मानली जाऊन तिचे व्यक्तिपूजन सुरू होते.