आमचा देवा-धर्माला विरोध नाही – अखिल भारतीय अंधश्रद्धा-निर्मूलन समिती

का हो तुम्ही देवाच्या धर्माच्या का विरुद्ध आहात? अंधश्रद्धांच्या नावाखाली तुम्ही देवाविषयीची श्रद्धा व आमचा धर्मच उखडवायला निघाला आहात का? तुम्ही समाजातील देव, धर्म घालवून सारी अनीती माजवणार आहात काय? असे प्रश्न १९८२ पासून सातत्याने आम्हाला विचारले जात आहेत. कधी केवळ कुतूहलाने तर अनेकदा गर्भित धमकीसह, कधी व्यक्तिगत पातळीवर असे प्रश्न विचारले जातात. कधी धार्मिक संघटनांर्फत विचारले जातात. प्रश्न कसाही विचारला जावो, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीशी या प्रश्नाचे एक अतूट नाते निर्माण झाले एवढे मात्र खरे. का हो, तुम्ही तर देव-धर्म यांना मुळीच हात लावत नाही. देवावर व धर्मावर कठोर हल्ला केल्याशिवाय समाजातील अंधश्रद्धा कशा दूर होणार ? मूळ सोडून काय फांद्या झोडपत बसला आहात? या पद्धतीने तर प्रश्न अधिकच कडवटपणे विचारले जातात. प्रामुख्याने पुरोगामी चळवळीत वावरणारे लोक तर अक्षरशः आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करूनच अशा प्रश्नांचा भडिमार करतात. एवढेच नव्हे तर तुम्ही कसे बेअक्कल, घाबरट, तडजोडवादी आहात, असे सांगण्याचाही यामागे अट्टाहास असतो.

खरे म्हणजे १९८२ पासून या दोन्ही प्रकारच्या प्रश्नांना आम्ही समर्थपणे उत्तरे देत आलो आहे. एवढेच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या लोणावळा येथील एका शिबिरात “अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची देव व धर्मविषयक भूमिका’ या विषयावर तब्बल अडीच दिवस प्रदीर्घ चर्चा झाली. वादावादी झाली आणि नंतर एकमताने एक निर्णय घेण्यात आला. “अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ ही देवाच्या व धर्माच्या विरुद्ध नाही. लोक ज्याला उघड अंधश्रद्धा समजतात त्या बाबा, बुवाबाजी, चमत्कार, नशीब, फलज्योतिष,भूत, भानामती, जादूटोणा, मंत्रतंत्र, अंगात येणे, आरोग्यविषयक गैरसमजुती यांविरुद्ध जनप्रबोधन करणे आणि देवाच्या नावावर सर्वसामान्य जनतेला लुबाडणाऱ्या दलालांविरुद्ध उभे ठाकून त्यांचा भंडाफोड करणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट ही चळवळ मानते.” समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यास कटिबद्ध असणाऱ्या या चळवळीत ज्यांना अंधश्रद्धा दूर व्हाव्यात असे वाटते, त्या सगळ्यांना – अगदी देव व धर्म मानणाऱ्यांनासुद्धा – प्रवेश आहे. समान प्रतिष्ठा आहे. याचा अर्थ या चळवळीच्या मंचावरून देव आणि धर्माचा प्रसार करण्याचे स्वातंत्र आहे, असा कुणी घेऊ नये. अर्थात देव व धर्म या विषयावर संघटनांतर्गत वा बाह्य व्यासपीठावर या विषयावर आपापली मते मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार राहील. देव व धर्म न मानणाऱ्यांना आपली मते जेवढ्या ताकदीने मांडण्याची मुभा राहील; तेवढीच संधी देव व धर्म मानणाऱ्यांनाही राहील. पण,ही मते व्यक्तिगत समजली जातील. ती संघटनेची अधिकृत मते मानली जाणार नाहीत. असा एकमुखी निर्णय संघटनेनं घेतला आहे. यात काही नवे नसले तरी अधिकृतपणे ही संघटनेची भूमिका आहे. कारण या चळवळीत अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते देव न मानणारे आहेत. धर्माची उघडपणे चिकित्सा करणारे आहेत. त्या सर्वांना ही भूगिका रवीकारणे म्हणजे ‘आजवर गांडत आलेल्या आपल्याच म्हणण्याला गुरड घालणे होय.’ असे वाटणे रवाभाविकही होते. तरी पण त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ हे एक व्यासपीठ आहे, हे लक्षात घेऊन ही भूमिका स्वीकारली आहे.

येथे वारंवार ‘भूमिका’ हा शब्द वापरत आहे. कारण वरील निर्णय हा रणनीती अथवा सोईची तडजोड नाही तर एक स्वतंत्र विचार आहे. हा मुद्दा व्यवस्थितरीत्या समजावून घेतला पाहिजे. “देव व धर्मविषयक ही केवळ रणनीती असती तर त्याचा अर्थ असा झाला असता की, मुळात संघटना देव व धर्माच्या विरुद्ध आहे, या समाजात देव व धर्म राहता कामा नये असे आम्हाला प्रामाणिकपणे वाटते. पण, सध्या असे सांगण्यात धोका आहे म्हणून आम्ही हा मुद्दा मांडत नाही, त्याविषयी मूग गिळून राहतो. पुढे सवड मिळताच आम्ही धर्म व देव यावर कडाडून हल्ला करू” असे मत आमचे नाही म्हणूनच ही रणनीती नाही. केवळ चळवळवाढीसाठी स्वीकारलेली सोयीची तडजोडही नाही. मग अशी भूमिका संघटनेने का स्वीकारली? आमचे मुख्य उद्दिष्ट समाजातल्या अंधश्रद्धा दूर करणे हे आहे आणि ज्यांच्या अंधश्रद्धा दूर करावयाच्या, तो समाज धर्म मानणारा आहे, एवढेच नव्हे तर हे दोन्ही मुद्दे त्यांच्या दृष्टीने अगदी प्राणप्रिय आहेत. ते सर्वसामान्य माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग बनले आहेत. देव व धर्म मानणाऱ्या व अगदी घट्ट कवटाळणाऱ्या समाजाच्या अंधश्रद्धा दूर करावयाच्या असतील तर आपल्या देव व धर्मविषयक कल्पनांना धक्का लागणार नाही, असा विशास त्याला वाटला तरच तो अंधश्रद्धा म्हणजे काय ते समजून येईल, त्या सोडण्यास प्रवृत्त होईल. हा भाग मुळातूनच समजून घेण्यासाठी आपण आधी अंधश्रद्धा व देव, धर्माचे नाते तपासून पाहू.

अनेक पुरोगामी विचार करणाऱ्यांना त्यांच्या अभ्यासाधारे प्रामाणिकपणाने वाटते की देव-धर्मा ळेच समाजात अंधश्रद्धा टिकून आहेत. देव व धर्म ही कल्पनाच अंधश्रद्धांचे खरे मूळ आहे. हे खरे आहे का? अंधश्रद्धा म्हणजे काय?

एखादी गोष्ट मुळात खरी नसतानाही तिच्यावर विशास ठेवणे, ती मानणे म्हणजे अंधश्रद्धा. अंधश्रद्धा केवळ अज्ञान नाही तर ती एक प्रक्रिया आहे. म्हणूनच देवा-धर्माशी तिचे नाते एवढे सरळ आणि सोपे नाही. खरे म्हणजे हा मुद्दा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर प्रयोग करून समर्थपणे तपासून पाहण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देव व धर्म नाकारणारा बुद्ध धर्म १९५६ साली स्वीकारला. तेव्हापासून त्यांच्या चळवळीतील बहुसंख्य समाज खरेच देव मानत नाही. बहुसंख्यांकांचा (हिंदू) धर्मही मानत नाहीत. म्हणून त्यांच्यातल्या अंधश्रद्धा दूर झाल्यात का? दीक्षाभू ीवर जाणाऱ्या जनतेपैकी किमान एक-चतुर्थांश लोक तरी विक्तुबाबासारख्या एका पागल माणसाच्या देवस्थानाला व गजानन महाराजांच्या शेगावला मोठ्या भक्तिभावाने भेटी देतात, भूत-प्रेत मानतात. म्हणजे देव सुटला तरी बाकीच्या अंधश्रद्धा बहुसंख्य लोकांना तशाच गोचिडीसारख्या चिकटून राहिल्या आहेत. ही वस्तुस्थिती आहे. म्हणूनच देव व धर्म नाकारणारेही अंधश्रद्धा असू शकतात. त्याचे कारण एवढेच आहे की अंधश्रद्धांचे मूळ देव व धर्म या कल्पनेत नाही, तर अंधश्रद्धेच्या प्रक्रियेत आहे. ज्याला आपण श्रद्धेची वा शब्दप्रामाण्याची प्रक्रिया म्हणतो ती ही प्रक्रिया. अमूक-अमूक सांगतो, म्हणून ते खरेच असेल पाहिजे. तो महान माणूस म्हणतो तो शब्दच प्रमाण, वेगळ्या विचाराची आवश्यकताच नाही. चिकित्सा करण्याची गरजच नाही. शब्दप्रामाण्य आणि अचिकित्सा हे अंधश्रद्धा प्रक्रियेचे दोन प्रधान घटक आहेत.

हीच गोष्ट, आंबेडकरवादी चळवळीतील बहुसंख्य सामान्य जनतेची झाली. डॉ. बाबासाहेब सांगतात म्हणून त्यांच्या शब्दाखातर त्यांनी देव व धर्म सोडला. पण या देव-धर्म सोडण्यामागे जी एक संपूर्ण वैज्ञानिक विचार करण्याची प्रक्रिया होती, ती कधी त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही. त्या काळात आंबेडकरांना वेळ कमी मिळाला आणि नंतरचे त्यांचे अनुयायी त्यांच्या नावावर राजकारणच करीत राहिले.

आंबेडकरांनी सुरू केलेली प्रबोधनाची चळवळ खुंटली. सर्वसामान्य जनते ध्ये वैचारिक प्रक्रिया निर्माण होऊ शकली नाही. पर्यायाने देव व धर्म जाऊनही अंधश्रद्धा तशाच कायम राहिल्या. फक्त पंडितांचे, धर्म र्तंडांचे व ब्राह्मणांचे शब्दप्रामाण्य जाऊन त्या ठिकाणी आंबेडकरांचे शब्दप्रामाण्य आले. अर्थात चांगल्या व्यक्तीचे, विचारांचे शब्दप्रामाण्य स्वीकारले तर तेवढा त्या समाजाचा फायदा होतोच. तोच फायदा आंबेडकरांच्या विचारक्षमते ळे त्या समाजाचा झाला. पण शब्दप्रामाण्य शेवटी मानवी बुद्धीच्या विकासाचा शत्रूच असतो.

मला वाटते आपल्या लक्षात आले असेल की अंधश्रद्धेविरुद्ध आपली लढाई आहे याचा अर्थ आपली खरी लढाई शब्दप्रामाण्याविरुद्ध आहे. चिकित्सा न करण्याच्या प्रवृत्तीविरुद्ध आहे. जो समाज शब्दप्रामाण्य स्वीकारत नाही, ज्या समाजात खुली चिकित्साप्रवृत्ती विकसित झाली आहे, त्या समाजात दीर्घकाळ अंधश्रद्धा राहणे शक्यच नाही. जसे जसे ज्ञान वाढत जाते, तसतशा या अंधश्रद्धा कमी होत जातात. खरे सांगायचे तर अशा समाजात केवळ अज्ञानच शिल्लक राहते आणि अज्ञान तर नेहमीच शिल्लक राहणार आहे. जसे जसे ज्ञान वाढत जाते तसतशी अज्ञााची जाणीवही वाढत जाते आणि इथेच पठडीतील पुरोगामी विचार करणाऱ्यांची गल्लत होते. संपूर्ण मानवजातीच्या इतिहासाचे अवलोकन केले असता आपणास आढळते की अंधश्रद्धां धूनच आजचे आधुनिक विज्ञान विकसित झाले आहे. अंधश्रद्धा म्हणजे तरी काय असते? त्या कशा निर्माण होतात ? परिसरात एखादी घटना घडते, ती घटना का घडते याचे कारण शोधण्याचा माणूस प्रयत्न करतो. अर्थात त्या काळात जेवढे ज्ञान उपलब्ध असेल, त्याच्या आधारावर तो ती कारणमीमांसा शोधतो. अनेकदा ही कारणमीमांसा अपुऱ्या ज्ञानामुळे पूर्णतः चुकीची असते.

अशी चुकीची कारणमीमांसा म्हणजेच अंधश्रद्धा. उदाहरणार्थ माणसाच्या अंगात येते हे खरे आहे. फक्त भूत येते ही त्याची कारणमीमांसा अंधश्रद्धा आहे. खोटी आहे.

सर्वसामान्य स्थितीत ही चुकीची कारणमीमांसा समाजात रूढ झाली तरी अधिक योग्य, अचूक वैज्ञानिक कारणमीमांसा मिळाल्यानंतर ती गळून पडते. अंधश्रद्धा दूर होतात. विज्ञानाचा विकास होतो. सगळ्या संस्कृतींमध्ये याच पद्धतीने हे घडत आले आहे. पण अडीच हजार वर्षांपूर्वी धर्माचा उदय झाला. त्यासोबत शब्दप्रामाण्य प्रतिष्ठित झाले. नव्हे ते अंतिम प्रमाण (देववाक्य) ठरले. परिणामतः ज्ञान वाढले, अचूक कारणमीमांसा मिळाली तरी बदलाला स्थान उरले नाही. उलट बदलणे हा अधर्मच ठरला आणि अंधश्रद्धा दृढमूल झाल्या. धर्माने शब्दप्रामाण्य रुजवले म्हणून अंधश्रद्धा दीर्घकाळ टिकल्या हे खरे आहे. यामुळेच अनेकांना धर्म हे अंधश्रद्धांचे मूळ वाटते. पण हे चुकीचे आहे. हे आपण समजून घेतले पाहिजे. आपला खरा विरोध हा शब्दप्रामाण्याला असतो, धर्माला नव्हे.

कारण धर्म म्हणजे केवळ शब्दप्रामाण्य नव्हे. काही वर्षांपूर्वी शब्दप्रामाण्य आणि धर्म यांची फारकत करता येत नसे. पण १७ व्या शतकापासून धर्म विरुद्ध विज्ञान झगडा सुरू झाला आणि या झगड्यात विज्ञानाची सातत्याने सरशी होत गेली. संपूर्ण धर्माचा डोलारा कोसळवणाऱ्या डार्विनचा उत्क्रान्तिवादही जेव्हा धर्माने पचवला, तेव्हाच धर्म आणि शब्दप्रामाण्य यांची फारकत व्हायला सुरुवात झाली. आजवर मोठ्या प्रमाणावर ही फारकत झालीआहे. अगदी भारतासारख्या मागासल्या देशातही ही फारकत सर्वान्य झाली आहे. म्हणूनच विज्ञान सर्वमान्य झाले आहे.

धर्मात सांगितलेला प्रत्येक शब्द खराच असतो वा आहे असा दुराग्रहआज कोणताही सामान्य माणूस ठेवत नाही. म्हणूनच शब्दप्रामाण्याविरुद्धची आपली ही लढाई धर्मविरोधी लढाई ठरतेच असे नाही. नीतीशिवाय समाज जिवंतच राह शकत नाही आणि धर्माने त्या-त्या काळी ही नीतिमूल्ये प्रभावीपणे रुजविली, हा धर्माचा सर्वांत मोठा कार्यभाग आहे. त्यामुळेच धर्म आणि नीतिमूल्ये यांचे अतूट नाते निर्माण झाले. आजही नीतिमूल्ये आवश्यक आहेत आणि ती समाजात हवीच आहेत. मतभेद आहे तो फक्त तपशिलांबाबतचा. दुसरा आपला विरोध धार्मिक तत्त्वज्ञानाला नसतो तर, त्यातल्या अवैज्ञानिक भागाला असतो. कदाचित संपूर्ण तत्त्वज्ञान अवैज्ञानिक ठरत असेल तर आपला विरोध ते धार्मिक आहे म्हणून नसतो तर अवैज्ञानिक, असत्य आहे म्हणून असतो.

हा समाज, धर्माला विरोध म्हणजे नीतिमूल्यांना विरोध समजतो. अशा अवस्थेत मुळात धर्माच्या विरोधात नसताना, उगाच धर्मविरोधी भूमिका घेऊन ‘नीतिमूल्ये विरोधी आहोत’ अशी स्वतःची प्रतिमा निर्माण करून आपल्या कार्याची हानीच आपण करून घेत नाही काय? त्यामुळे धर्मविरोधी भूमिका घेणे हे मुळातच कसे अशास्त्रीय ठरते, ते आपण पाहिले आहे. तीच गोष्ट देवविषयक श्रद्धेची.

मानववंशशास्त्राचा अभ्यास आपणास सांगतो की, निसर्गाविषयीच्या अज्ञानातून माणसानं देवाची कल्पना निर्माण केली. देवाने माणसाला निर्माण केले की नाही याविषयी वाद होऊ शकेल. पण माणसाने देव निर्माण केला हे एक निर्विवाद सत्य आहे. देवाची कल्पना केवळ अज्ञानापोटी निर्माण झाली नाही, तर ती एक मूलभूत अशी मानसिक गरजही होती. माणूस जन्मतःच आईच्या नाळेपासून तोडला जातो. त्याला एकटे एकटे असुरक्षित वाटायला लागते. म्हणून तो प्रथम आईला व नंतर मानवी समाजाच्या प्रगल्भ अवस्थेत सर्वशक्तिमान देवाशी वा ईशराशी स्वतःला जोडून घेतो. स्वतःची नाळ कधीही न तुटणाऱ्या चिरंतन, सर्वव्यापी अशा ईशराशी त्याने जोडली, म्हणूनच ईशराची कल्पना सर्वदूर व सर्वच समाजात प्रस्थापित झाली.

आजच्या कालात इतिहासात कधीही नव्हती एवढी अधिक सुरक्षित समाजव्यवस्था निर्माण झाली आहे, त्यामुळे ही नाळ आज समाजातल्या माणसांशी जोडून घेणे सहज शक्य आहे. देव या कल्पनेशिवायही नीतिमान व सुसंस्कृत समाज राहू शकतो, हे आज काळाने सिद्ध केले आहे. मग अशा अवस्थेत देवाला का विरोध करायचा नाही ? तर ह्याचे उत्तर असे की, नव्या माणसासमोर ज्यावेळी आपण देव व धर्मावर हल्ला करतो, त्यावेळी जागृत मनाने विचार करून ही गोष्ट स्वीकारायची की नाही हे ठरवण्याआधीच सुप्त मन वा अंतर्मन एकदम आपला दरवाजा बंद करून टाकते. आणि ते स्वतःच्या संरक्षणाची भक्कम फळी उभे करते. म्हणून माणसात खरेच बदल घडवून आणायचा असेल तर त्याचे अंतर्मन दुखावणार नाही अशा पद्धतीनेच, पायरी पायरीने घडवला पाहिजे. प्रत्यक्ष जागृत मनाला प्रत्येक गोष्ट स्वीकारण्याची सवय लावली पाहिजे. एकदा जागृत मनाला वैज्ञानिक पद्धतीने विचार करून स्वतःत बदल घडविण्याची सवय लागली की तो स्वतःत आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो. या पद्धतीने एक एक व्यक्ती, एक एक गैरसमज/अंधश्रद्धा सहजतेने पण प्रयत्नपूर्वक दर करू शकते. या प्रक्रियेत त्याच्या जागृत मनाला तर्कशुद्ध विचार करण्याची सवयच लागते. प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक कसोटीवर तपासून स्वीकारण्याची सवय एकदा त्यांच्या व्यक्तिमत्तवाचा अविभाज्य भाग बनली की धर्म व देव यासारख्या नाजूक मुद्द्यांबाबत तो तीच चिकित्सक कसोटी वापरतो आणि या गोष्टी या कसोटीवर न टिकल्यास तो त्या सोडण्यास वा त्याची सुधारणा करण्यास तयारही होतो. अंधश्रद्धा निर्मूलनाचे खरे काम म्हणजे ही मेंदूची तर्कशुद्ध विचार करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे काम आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.