मासिक संग्रह: जून, २००४

पत्रव्यवहार

निखिल जोशी, ‘तत्त्वबोध’, हायवे, माथेरान रोडजवळ, नेरळ, रायगड – 410101 वादविवाद ज्ञानसंवर्धनासाठी आवश्यक आहेत. आ. सु.मध्ये अनेक विषयांवर वादविवाद झाले. परंतु त्यात खेळाचे नियम मोडणारी पत्रे कमी असत. एप्रिल 2004 च्या अंकातील वसंत त्रिंबक जुमडे यांचे पत्र त्यांपैकी आहे. बहुतेक वादांमध्ये काही मूलभूत गृहीतकांना दोन्ही पक्षांची मान्यता असते. जुमडे यांच्या “… चर्चा व त्यातून दोषारोप हे ज्ञानवृद्धीच्या दृष्टीने उपयोगी पडत नाहीत”, या दाव्यालाच बुद्धिप्रामाण्यवादाचा विरोध आहे, कारण “चर्चा हवी की नको”, या प्रश्नाचे उत्तर चर्चेने शोधले तर होकारार्थीच येईल. चर्चा नको अशी मागणी करणाऱ्या जुमडे यांना युक्तिवाद करण्याचाही हक्क नाही.

पुढे वाचा