विषय «इतर»

मायबोली मराठी

मराठी असे आमुची मायबोली
जरी आज ती राजभाषा से
नसो आज ऐशर्य या माऊलीला
यशाची पुढे थोर आशा असे…
असे कमी माधव ज्युलियन यांनी १७ मे १९२२ सालीच म्हणून ठेवले आहे. पण आज नव्वद वर्षांनंतरही मराठीची अवहेलना चालूच आहे. आज मराठी माध्यमांच्या शेकडों शाळा बंद पडताहेत. खेड्यापाड्यातून चकचकीत, भव्य, शोभिवंत इमारतीत इंग्रजी माध्यमांच्या शेकडोंनी शाळा सुरू झाल्या आहेत. कचकड्याच्या बाहुलाबाहुलीगत, बूट, टाय घालून लहान-लहान गोजिरवाणी मुले पिवळ्या गाड्यात बसून इंग्रजी भाषेचे आणि संस्कृतीचे धडे गिरवीत आहेत. मराठी लेखक असोत, ऑफिसर असोत, मंत्री, आमदार असोत अनेकांची मुले, नातवंडे या इंग्रजी माध्यमाच्या भोवऱ्यात अडकलेली आहेत.

पुढे वाचा

ग्रंथपरिचय/परीक्षण (उत्तरार्ध)

ग्रंथपरिचय/परीक्षण (उत्तरार्ध)
(मूळ इंग्रजीः ‘चर्निंग द अर्थ, द मेंकिंग ऑफ ग्लोबल)
श्रीनिवास खांदेवाले
पर्यावरण धोरणाची स्थिती आणि परिणाम ह्यांचे परीक्षण हे प्रस्तुत ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. तीन प्रकरणां ध्ये त्यांचा अभ्यास केला गेला आहे. त्यात वने, नद्या, खनिजे, ही विकासाकरता वापरताना त्यांच्या आश्रयाने राहणाऱ्या आदिवासी, कोळी व इतर जमीन कसणाऱ्या जाती-जमातींच्या जगण्याच्या संसाधनांवर घाला येत आहे. त्यांच्या उदरनिर्वाहाची पर्यायी समाधानकारक व्यवस्था न करताच त्यांना विस्थापित केले जात आहे. त्यांना विकासप्रक्रियेत सामील करून घेतले गेले नाही, हा महत्त्वाचा भाग आहे. तितकाच महत्त्वाचा मुद्दा देशाच्या नैसर्गिक संसाधनांचे (दोहन नव्हे) जे शोषण चालू आहे, त्याचा आहे.

पुढे वाचा

मार्क्सचा शासनसंस्थाविषयक विचार या लेखातून आध्यात्मिकता

आध्यात्मिकते (spiritualism)ची खरोखरच गरज आहे का ? आजकाल ‘माझा कुठल्याही धार्मिक कर्मकांडावर विशास नाही; मी धार्मिक नाही; परंतु मला आध्यात्मिकतेची (spiritualism) रुची आहे’ असे सार्वजनिकरीत्या विधान करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जणु काही आध्यात्मिकता म्हणजे एक फॅशन असल्यासारखे त्याकडे बघितले जात आहे. इंटरनॅशनल म्हणून स्वत:च शिक्का मारून घेतलेल्या महागड्या इंग्रजी माध्यमाच्या रेसिडेन्शियल स्कूलमध्ये तर याचे पेवच फुटले आहे. त्यांच्या मते प्रत्येकाला आपले समृद्ध आयुष्य जगण्यासाठी आध्यात्मिक शहाणपणाची (spiritual) आहे. मुळात आध्यात्मिकता ही एक अत्यंत ढोबळ, तकलादू अशी संकल्पना आहे. त्याची शाब्दिक फोड केल्यास ऐहिकतेच्या विरोधातील ही संकल्पना आहे, हे लक्षात येईल.

पुढे वाचा

स्त्रिया आणि अंधश्रद्धा-निर्मूलन

तिमिरातून तेजाकडे : समग्र अंधश्रद्धा निर्मूलन व पुढे या पुस्तकाची पहिली आवृत्ती एप्रिल २०१० ला प्रकाशित झाली. त्यातील एका प्रकरणात ‘स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन’ हा विषय डॉ. दाभोलकरांनी सविस्तर मांडला आहे. हा विषय डॉक्टरांच्या जिव्हाळ्याचा विषय होता कारण स्त्रिया त्यांच्यावर लादल्या गेलेल्या परिस्थितीमुळे, गुदमरून टाकणाऱ्या वातावरणामुळे अंधश्रद्धांना जास्त सहजपणे बळी पडतात; एवढेच नव्हे तर अंधश्रद्धेचे त्यांच्यावर झालेले संस्कार त्या पुढच्या पिढीपर्यंत पोचवतात; कित्येक वेळा त्या पार पाडीत असलेल्या पूजाअर्चा, कर्मकाण्डे निरर्थक आहेत, वेळ-पैसा-मेहनत यांचा अपव्यय त्यामध्ये होतो हे पटूनसुद्धा त्यांना यातून बाहेर पडता येत नाही.

पुढे वाचा

बंधुत्व-अभाव

(एक)
दर माणसामागे किती जमीन उपलब्ध आहे असा विचार केला, तर प्रत्येक अमेरिकन हा प्रत्येक भारतीयाच्या सुमारे अकरा पट ‘जमीनदार’ आहे. दोन्ही देशांमधल्या जमिनीकडे पाहायच्या दृष्टिकोनांत अर्थातच बराच फरक आहे. हा फरक सर्वांत तीव्रतेने दिसतो तो प्लॉट-फ्लॅट या संबंधातल्या रीअल इस्टेट उद्योगात.

भारतीय माणसांना मालकीचे घर असणे, त्यात दरडोई ऐसपैसपणा असणे, ते फॅशनेबल वस्तीत असणे, जमल्यास ‘फ्लॅट’ऐवजी बंगला असणे, या गोष्टींचे फार अप्रूप वाटते. राजधानी दिल्लीत तर बंगल्यांना ‘कोठी’ म्हणतात, जो शब्द महाराष्ट्रात अन्नधान्य साठवण्याच्या खोलीसाठी किंवा पत्र्याच्या मोठ्या डब्यांसाठी वापरतात!

पुढे वाचा

विज्ञान व वैज्ञानिक दृष्टी

विज्ञान व वैज्ञानिक दृष्टी
विज्ञान हेच एकमेव असे मानवी ज्ञानाचे स्वरूप आहे असा आक्रमक विवेकवाद (सायंटिसिझम) आणि अतीत तत्त्व माणसांतच अंतर्भूत असते हे मानणारा विवेकवाद यांत फरक आहे. हे न जाणल्याने विज्ञान व आत्मज्ञान यांची एकता तर सोडाच, पण शांततामय सहजीवन मान्य करणे अनेक पुरोगाम्यांना जड जाते. मुळात नीतिनिरपेक्ष असलेल्या विज्ञानाला आत्मज्ञानच योग्य ते सामाजिक वळण लावू शकते. या आत्मज्ञानाचा मंत्रतंत्रसिद्धी, गूढविद्या, पारलौकिक विश्व यांच्याशी तिळभरही संबंध नाही हे परत एकदा सांगितले पाहिजे. विज्ञान जेवढे वाढेल, तेवढे वाढवले पाहिजे. त्याची विनाशशक्ती रोखून विधायक शक्ती जोपासण्याचे काम आपण सांभाळले पाहिजे.

पुढे वाचा

विचार तर कराल

डॉ.नरेंद्र दाभोलकरांचा आणि माझा परिचय साधारणपणे १९९४-९५ च्या दरम्यान झाला. आम्ही सारे त्यांना डॉ. दाभोलकर वा नुसते डॉक्टर म्हणत असू पण त्यांच्या पुस्तकांवर दाभोलकर असे लिहिले जाते. त्यावेळी वास्तुशास्त्रावर दादरला एक सभा होती. एक वास्तुशास्त्रावर बोलणारे वकील, एक प्रतिवाद करणारे आर्किटेक्ट, दाभोलकर आणि अध्यक्ष एक निवृत्त न्यायमूर्ती अशी ती सभा होती. दाभोलकरांचे भाषण विनोदी आणि वास्तुशास्त्राची खिल्ली उडवणारे होते. मुद्दे इतके बिनतोड होते की प्रतिवाद करण्याची संधी मिळूनही वकील महाशयांना फारसे काही बोलता आले नाही.
ह्याच दरम्यान माझा आजचा सुधारक शी परिचय झाला.

पुढे वाचा

स्त्री-द्वेष, बलात्कार आणि औषधविज्ञान

आपण बलात्काराबद्दल बोलतो तेव्हा कशाबद्दल बोलतो ? आता आपल्यापैकी प्रत्येकाने स्वतःला हा प्रश्न विचारायची वेळ आली आहे. १६ डिसेंबर २०१२ नंतर भीतीचे एक राष्ट्रीय शोकनाट्य सादर झाले. स्त्रीद्वेषाचे सहसा दिसणारे परिणाम-भीती, जखमा आणि असुरक्षितता सगळीकडे व्यक्त झाले. विरोधाभास असा की, किंवा कदाचित विरोधाभास नाहीच, की दिल्लीतल्या त्या भयंकर रविवारनंतर जास्त विनयभंग, जास्त बलात्कार आणि जास्त खून घडले. या प्रश्नाच्या उत्तरातून कृती (अॅक्ट) आणि धारणा (अटिट्यूड) यातला फरक शोधण्याचा मी प्रयत्न करतो. या दोन्हीचा काही संबंध आहे का ? मला माहीत नाही.

पुढे वाचा

अनवरत भंडळ (६)

आध्यात्मिक साधनाः सुंदर जगण्यासाठी योगी श्री अरविंदांनी विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात आध्यात्मिक तत्त्वज्ञानाची जी पुनर्मांडणी केली, तिचा सारांश आपण मागील लेखांकात पाहिला. विशातील मूळ सत्य हे आनंदस्वरूप व एकमेवाद्वितीय असे चैतन्य असून तेच असंख्य रूपे, आकार व सामर्थ्य धारण करून क्रमाक्रमाने विविध पातळ्यांवर अवतीर्ण झाले आहे. भौतिक पातळीवर त्या चैतन्याने संपूर्ण जडतत्त्वाचे आवरण घेतले व आंधळ्या/अज्ञानी प्रकृतीच्या/निसर्गाच्या गर्भातून गुप्तपणे त्या प्रकृतीच्या विकासाला आधार देत राहिले. सृष्टीचा विकास धडपडत/चाचपडत झाल्यासारखा दिसतो कारण बाह्यतः हा जड/अचेतन ऊर्जेचा/पदार्थाचाच प्रवास आहे. आणि तरीही त्या प्रवासाला एक दिशा दिसते कारण त्या दिशेकडे प्रकृतीला पडद्याआडून घेऊन चालणारे चैतन्यही तिच्याच उदरात आहे.

पुढे वाचा

विज्ञान आश्रमाची कथा – लेखांक २

आघाडीचा अभ्यासक्रम मूलभूत ग्रामीण तंत्रज्ञानाची पदविका (DBRT)

‘ग्रामीण तंत्रज्ञान पदविका’ हा विज्ञान आश्रमाने विकसित केलेला मुख्य अभ्यासक्रम आहे. मागच्या अंकात म्हटल्याप्रमाणे निसर्ग हाच अभ्यासक्रम मानून सोईसाठी या अभ्यासक्रमाचे – अभियांत्रिकी, ऊर्जा-पर्यावरण, शेती डु पशुपालन आणि गृह आरोग्य हे चार विभाग केले आहेत. ज्यांना कोणाला हे तंत्रज्ञान शिकायचे आहे, त्यांना थोडे फार गणित आणि लिहिणे-वाचणे येते ना, म्हणजे सर्वसाधारणपणे आठवीपर्यंतचे शिक्षण आहे ना, वय चौदा वर्षांपुढे आहे ना, त्यांना एकट्याने घराबाहेर वर्षभर राहता येईल ना याची खात्री केली जाते. बाकी हिंदी – मराठीचे व्यवहारापुरते ज्ञान असले की मार्काची काही अट नसते.

पुढे वाचा