दोन महिन्यापूर्वी मी पुणे येथे माझे विज्ञान : माझे अध्यात्म या विषयावर भाषण दिले. कार्यकर्त्यांना व नागरिकांना ते आवडले. नवीन वाटले. यापूर्वी मी महाराष्ट्रात काही ठिकाणी ‘आम्हीच खरे धार्मिक’ या विषयावरही बोललो होतो. विषयाचे शीर्षक थोडे चकवा देणारे होते हे खरेच. धर्म न मानणाऱ्या व्यक्तीने मी खरा धार्मिक आहे असे उच्चारवाने सांगणे यात अंतर्विरोध वाटतोच. असे असतानाही हा विषय घेतला होता याचे कारण होते. एकतर धर्मभावनेचे व्यापारीकरण, बाजारीकरण, विकृतीकरण व राजकारण करण्याचा पद्धतशीरपणे प्रयत्न चालू होता. महाराष्ट्रात व दिल्लीतही त्याच मंडळींच्या हातात सत्ता होती. धर्माच्या नैतिक भागाशी त्यांचे काही देणेघेणे नव्हते. कर्मकांडे, पुरोहितशाही, शोषण, हेच त्यांच्या धर्माचे रूप होते. मी अंनिसचा कार्यकर्ता होतो. त्यामुळे विवेकाने म्हणजेच विवेकाधिष्ठित नीतीने जगत होतो. या अर्थाने मी धार्मिकपणेच जगत होतो. मी ज्यांच्या पोटी जन्माला आलो त्यांचा धर्म मला आपोआप लाभला होता. तो सोडून मी दुसरा अधिकृतपणे स्वीकारलेला नव्हता. तोपर्यंत मी हिंदूधर्माचाच होतो. मला आपोआपच संत आणि समाजसुधारकांचा वारसा लाभलेला होता आणि त्यांनी सांगितलेला धार्मिकतेचा उदात्त अर्थ मला मान्य होता. हिंदू धर्मातील प्रचंड लवचिकते ळे देव न मानणारा, वेद न मानणारा असूनही मी हिंदू राहू शकत होतो. मी धार्मिक नाही हे जाहीर करण्याची घाई माझ्या वैचारिक विरोधकांना होती कारण त्यांना धर्म म्हणजे काय यावर मत प्रदर्शित करणे आणि कृती करणे यावर राजकीय स्वार्थासाठी एकाधिकारशाही स्थापन करावयाची होती. धर्मासारखे प्रभावी अस्त्र त्यांच्या हातात संपूर्णपणे सोपवण्याऐवजी त्यांच्या धर्मविषयक वैचारिक भूकेत जाऊन ‘मीच खरा धार्मिक आहे तुम्ही खोटे धार्मिक आहात’ असे ठणकावून सांगण्याचा एक डावपेचात्मक पवित्राही त्या विषयाच्या मांडणीत होता. धर्म ही सामाजिक संस्था आहे हे तथ्य धर्मशास्त्रज्ञांनी स्वीकारले तर धर्माचे स्थलकालातीत निकष त्यांना शोधता येतील. त्यातून धार्मिक मूलतत्ववादाला हे दूर ठेवू शकतील. धर्माच्या समाजशासस्त्रीय अभ्यासकाने जर स्वतःच्या ठिकाणी धार्मिक सहानुकंपा विकसित केली तर विनोबा अथवा विवेकानंद यांच्यासारख्या काही थोर धर्मचिंतनकारांनी जो धर्माचा उन्नत अर्थ लावला त्यातून त्याला काही वेगळी दृष्टी लाभू शकेल. मार्क्सवादी असलेले विचारवंत दि.के.बेडेकर यांचाही याबाबत उल्लेख करावा लागेल. विज्ञान आणि अध्यात्म याबाबतचे विवेचन करताना ही भूमिका माझ्या मनात होती. ही भूमिका योग्य आहे अथवा ही संघटनेची अधिकृत भूमिका आहे असे नाही. तर या भूमिकेवर विचारमंथन घडून येणे गरजेचे आहे. या कल्पनेतून सूत्ररूपाने ही भूमिका पुढे मांडत आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाबदद्दलची भूमिका सर्वज्ञात आहे. आणि त्याबाबत मतभिन्नताही नाही. निरीक्षण ते प्रयोग या प्रक्रियेतून सत्य शोधता येते. वैज्ञानिक दृष्टिकोण नेहमीच नम्र असतो. तो अंतिम सत्याचा दावा करत नाही. सत्याचे सातत्य त्याला महत्त्वाचे वाटते. हे सत्य सार्वत्रिक व वस्तुनिष्ठ असते.वैज्ञानिक दृष्टिकोण आकलनाची परिपक्वता निर्माण करतो. या आकलनाच्या परिपक्वते .ळे समाजासमोरील प्रश्नांचीही उत्तरे मिळतात. यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोण प्रयोगशाळेत न वापरता सर्वत्र वापरावयास हवा.
आता अध्यात्माविषयी
अध्यात्म म्हणजे आत्म्याचा विाचर. आत्मा नसतोच असे मानणाऱ्या विचारसरणीप्रमाणे अध्यात्माची पोकळ चर्चा अर्थहीन असते. ‘जेथे विज्ञान संपते तेथे अध्यात्म सुरू होते’ या लोकप्रिय वाक्याचा प्रतिवाद ‘अध्यात्म खूप जुने आहे. त्याने माणसाचे भूक, दारिद्रय, विषमता याचे कोणतेच प्रश्न सुटेनात आणि विज्ञानामुळेच हे प्रश्न सुटण्याची दिशा लाभली. त्यामुळे आध्यात्मिक जेथे साफ अपुरे ठरले तेव्हा विज्ञान मानवाच्या मदतीला धावले’ असा केला जातो. की जुगलबंदी बाजूला ठेवून आपण मान्यताप्राप्त आध्यात्मिक मांडणीच्या क्षेत्रात जाऊन त्याबाबत बोलणार आहोत. १) अध्यात्म हा आधिभौतिक विचार आहे. इहलोकापेक्षा पारलौकिकाचा विचार आहे. ऐहिक जीवनाला त्यामध्ये गौण स्थान आहे. आत्म्याचे मूळ स्वरूप काय आहे. तो व्यक्तीच्या जीवनापूर्वी व जीवानंतर कुठे राहतो? तो अनेक योनीतून फिरतो का? तो अमर आहे का? हे विश कोणी निर्माण केले? त्याचा हेतू काय ? हे विश चालवते कोण ? त्याचा आत्म्याशी संबंध काय ? मी कोण ? मी माझ्याशीच संवाद करतो म्हणजे काय ? डोळे पाहतात हे खरे पण डोळे कुणामुळे पाहू शकतात? अशा असंख्य प्रश्नांचे उत्तर शोधमे अध्यात्मात येते. धार्मिक गोष्टी व अध्यात्मिक गोष्टी यां ध्ये थोडा फरक आहे. आध्यात्मिक तत्त्व हे भौतिक तत्त्वापेक्षा निराळे असे चेतनतत्त्व आहे. निरनिराळ्या कारणांनी ते अज्ञानात पडते, अशुद्ध होते. बंधनात पडते व दुःखी होते. या चेतन तत्त्वाला आत्मज्ञान झाले की ते सगळ्या बंधनातून मुक्त होईल व त्याला अनंत सुख मिळेल. जगाचे मूलतत्त्व आध्यात्मिक आहे. त्यालाच ईशर म्हणतात. व्यक्तीचे सारतत्त्व आध्यात्मिक आहे त्याला आत्मा म्हणतात. आत्मा व ईशर (म्हणजे परमात्मा) याचे जीवशिवाचे मीलन झाले की । आनंदाचे डोही, आनंद तरंग अशी अवस्था प्राप्त होते. ही अवस्था सच्चिदानंद स्वरूपी असते. याचा अर्थ ती सत् म्हणजे सत्य असते. चित् म्हणजे शोशत असते. आणि आनंदरूपी तर असतेच असते. दुःखात पडलेल्या आध्यातिमक तत्त्वाला आत्मज्ञान करून देण्याचा जो मार्ग आहे त्याला धर्म म्हणतात. हे सर्वज्ञान मिळण्याचा पाया शब्द व साक्षात्कार हा आहे. शब्द याचा अर्थ, अलौकिक शब्द-वेदाप्रमाणे वा प्रेषितांच्या वचनाप्रगाणे. आध्यात्गिक तत्त्व चेतन असते. चेतन असल्यामुळेच ‘आत्गा विचार करू शकतो, त्याला रगृती असते. त्याला ज्ञान प्राप्त होऊ शकते. ते संवेदनक्षम असल्यामुळे त्याला सुखदुःखाची जाणीव नसते. दया, प्रेम, परोपकार, नैतिकता या गोष्टी आध्यात्मिक तत्त्वालाच शक्य असतात. प्रत्येक व्यक्तीला आत्मा असतो. परमेशर केवळ एक आत्मा नाही तो परमात्मा आहे. तो गुणवत्तेच्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ आहे. आत्म्याचे परमात्म्याशी मीलन झाले की स्वाभाविकच या सर्वश्रेष्ठ गुणवत्तेचा लाभ या आत्म्याला होतो. तो आत्मा धारण करणाऱ्या व्यक्तीला होतो. त्याची अपूर्णता भरून निघते. सर्व संपन्नता प्राप्त होते. तेव्हा प्रत्येकाने जीवनाचा हाच मार्ग अनुसरावयास हवा.
आध्यात्माची वरील कल्पना नाकारावयास हवी, उत्क्रांतीचा अभ्यास असे सांगतो की सध्याचे ब्रांड एका अमूर्त ऊर्जेतून निर्माण जाले. ब्रह्मांडातील सर्वच गोष्टींची पूर्वज जी स्वयंभू निर्जीव ऊर्जा आहे. तिच्यापासून उत्क्रांती होत होत भौतिक पदार्थ, जीवन व चैतन्य आले. आदिऊर्जेला चेतनशक्ती म्हणता येणार नाही. कारण वैज्ञानिकांनी हे दाखवून दिले आहे की, जिवंत मेंदू म्हणजेच चेतना. त्याशिवाय चैतन्याचे अस्तित्व संभवत नाही. तेव्हा विशाचे मूलतत्त्व ज्ञानी, संवेदनशील, नैतिक, न्यायी आणि आनंदस्वरूप आहे असे मानण्यास काहीही आधार नाही. अमूर्त स्वयंभू निर्जीव ऊर्जेतून भौतिक पदार्थाची, त्यांच्यातून प्राण्याची व त्यांच्यातूनच पुढे चैतन्याचा विशेष विकसित स्तर लाभलेल्या मानवाची निर्मिती झाली. तेव्हा मानव हा देवाचा विशेष लाडका प्राणी आहे हे खरे नव्हे उत्क्रांतीच्या विशेष टप्प्यावर पोचू शकलेला प्राणी आहे एवढेच खरे आहे. अध्यात्माचा संबंध विवेकी, संयमी वर्तनाशी, परिग्रही जीवनशैलीशी जोडलेला आहे. आध्यात्मिक जाणिवेत आणखी एक सूत्र आहे. अखेर सत्याचाच जय होईल, मांगल्याचा विजय होईल ही मानवी जीवनाची भावात्मक गरज आहे. यासाठीचा प्रयत्न करण्याचा मार्ग म्हणूनही अध्यात्माकडे पाहता येईल. ही गोष्ट उघड आहे की सर्वच धर्माचे एक दर्शन अखेरचा विजय मानवी मांगल्याचाच होईल हे आहे. धर्मश्रद्धेचा तो एक महत्त्वाचा घटक आहे. या अर्थाने विनोबा म्हणतात की, सर्व धर्माचे अध्यात्म एकच आहे. यापुढे जाऊन विनोबांचे एक प्रख्यात वाक्य आहे ते असे की, ‘राजकारण वा धर्म जातील आणि पुढे विज्ञान व अध्यात्म राहील.’ या वाक्याचा अर्थ थोडा नीटपणे समजावून घ्यावयास हवा. राजकारण हे उघडपणे हितसंबंधाच्या झटापटीचे क्षेत्र असते. उपलब्ध साधनसामुग्रीवर स्वतःचा कब्जा करण्याची ती लढाई असते. विज्ञानाने जगातील सर्वांना पुरेसे मानवी सुख देता याईल याची उपलब्धी करून ठेवली आहे. मात्र हितसंबंधांच्या राजकीय लढायात ते आज अशक्यप्राय वाटते. विनोबा असे चित्र पाहतात की शहाणा होत जाणारा माणूस एक दिवस या राजकारणातील व्यर्थता ओळखेल आणि त्यावेळी विज्ञानाचा वापर माणसाच्या कल्याणासाठी करण्यात असलेला प्रमुख अडथळा दूर होईल. याचाच पुढचा भाग धर्माचा. राजकारण हा अल्पकालीन धर्म आहे आणि धर्म हे दीर्घकालीन राजकारण आहे असे डॉ. लोहियांचे एक मार्मिक वाक्य आहे. दीर्घ स्वरूपाचे राजकारण असलेल्या प्रत्येक धर्मात नीती आहे. धर्माचे तत्त्वज्ञान आहे. कर्मकांडे आहेत. पुरोहित आहे आणि शोषणही आहे. या धर्माचा दोन प्रकारे क्षय होईल असे स्वामी विवेकानंद अथवा विनोबा यांना वाटते.एकतर धर्माच्या ज्या बाबी विज्ञानाच्या नियमाशी उघडपणे विसंगत असतील त्या गळून पडतील. जसे गॅलिलिओच बरोबर होता म्हणून उशिरा का होईना पोपला बिनशर्त माफी मागावी लागली; परंतु सर्व धर्मातील गाभ्याचा भाग म्हणजे मानवी मांगल्याचा विजय होईल हा नैतिकतेच्या विजयावरील विशास. अंतिम विजय मांगल्याचाच होईल. हा विशास कार्यकारणभावावर आधारित नाही. तसाच तो सर्वस्वी कार्यकारणभावाच्या विरोधीही नाही. सत्याचा विजय होतो; परंतु अनेकदा सपशेल पराभवही होतो असे व्यवहारात दिसते. अशावेळी रूढ अर्थाने धार्मिक व्यक्ती अखेर सत्याचा विजय परमेशर कृपेने होईल असे म्हणतो. हे त्याचे प्रतिपादन परमेशरावरील त्याच्या असलेल्या विशासाबरोबरच मांगल्याचाच विजय व्हावा या सहजस्फूर्त माणूसकीच्या अभिव्यक्तीवरही अवलंबून असते. ज्याचा परमेश्वर आणि धर्म यावर विश्वास नाही असा माझ्यासारखा माणूस स्वतःला श्रेयस्कर वाटणाऱ्या, परंतु जी मूल्ये साकार करणे माझ्याशक्तीपलीकडची आहेत, त्याच्या पूर्ततेसाठी धडपडतो, त्यावेळी त्याला देवाधर्माचा आधार उपलब्ध नसतो हे उघडच आहे. मात्र त्याची भावना अशी असते की, माझ्या शक्तीपलिकडच्या या धडपडीत इतर माणसे मला सहकार्य करतील व मी मला इष्ट वाटणाऱ्या मूल्यांच्या समीप जाऊ शकेन. या भूमिकेतही थेट कार्यकारणभाव नाही. कारण मूल्यासाठीच्या या धडपडीत माणसे सहकार्य करतात असा अनुभव आहे. तसाच विरोधही करतात असाही अनुभव आहे. थोडक्यात, हा आशावाद हीदेखील व्यक्त होण्याची एक अभिव्यक्तीच आहे. बारकाईवरील भूमिका तपासली तर त्यामध्ये मूळ मुद्द्यातील अंतर्विरोध कमी आहे असे आढळते.
अ) माणसाच्या वासना, विकारावर मात आणि माणसाच्या मंगल नैतिक भावनांचा परिपोष. ही बाब ईशराच्या नावाने असो वा त्याच्या नावाशिवाय असो, घडून येण्याची गरज आहे. माणसाच्या मनाचे हे उन्नयन कसे घडून येईल याचा शोध धर्माने आणि अध्यात्माने आपल्या परीने घेतला. त्यातील प्रामाणिकपणा मान्य करूनही तो साफ अपुरा ठरला हे दिसतेच आहे. मात्र त्याचा आदर करावयास हवा. दुसयाबाजूला मनोविज्ञानाच्या क्षेत्रात एक आव्हान आहे की, माणूस स्वतःच्या भावभावनांचे शुद्धीकरण व उन्नतीकरण कसे करू शकेल? बाह्य परिस्थितीमुळेच या भावभावना उद्भवतात असे जरी मानले तरीदेखील याबाबत करण्यासारखे काही मनोविज्ञानासाठी शिल्लक आहे.
ब) निसर्गसुसंगत जीवन जगावे यासाठी खरे तर त्याद्वारे आपणास परमात्म्याचे दर्शन घडते असे सांगण्याची गरजही राहिली नाही आणि तसे घडते असे मानून कोणी पर्यावरण सुसंगत जीवन जगत असेल तर त्याला विरोध करण्याचेही कारण नाही. एक पर्यावरण विसंगत आत्मघातकी जीवनशैली आजचा समाज अंगीकारत आहे. यामध्ये देव आहेच मानणाऱ्यांपासून देव नाही मानणाऱ्यापर्यंत सर्वांचा समावेश आहे. पालेभाज्या, उसळी, फळे नियमांनी सेवन करावेत. तेलकट, तिखट, तळलेले, गोड यांचे सेवन टाळावे. साधे सुती कपडे घालावेत. नैसर्गिक पेये घ्यावीत. थोडे शरीरश्रम आवर्जून करावे. डोळ्यांचा वापर सतत टी.व्ही. पाहण्याऐवजीवाचन व निसर्ग अवलोकन यासाठी करावा. हे समजण्यात काहीही आध्यात्मिक नाही. हा साधा शहाणपणाचा भाग आहे आणि याचा अवलंब कोणी आध्यात्मिक साधना म्हणून करत अल तर त्यात आक्षेपार्हही काही नाही. याच जणिवेचे विकसित रूप म्हणजे एकूणच समाज जीवनाची जडणघडण पर्यावरणसुसंगत पद्धतीने करण्यासाठी धडपडणे.
वरील सर्व मांडणणीचा थोडक्यात अर्थ असा की, अहंकार सोडण्यासाठी सतत कार्यग्न राहण्याचा सल्ला देणारे, अध्यात्म, समोरील व्यक्तीचे गुणग्रहण करून मनशुद्धीची कल्पना मांडणारे अध्यात्म, सामूहिक सुखासाठी साधना करू मागणारे अध्यात्म, यासाठी बिचकून जाऊन विरोध करण्याचे वा त्याबरोबरच भांडत बसण्याचे कारण नाही. दुसऱ्या बाजूला यातून साध्य होणार आहे जे ती अभिव्यक्ती वैज्ञानिक दृष्टिकोन असणारा माणूस अधिक सहजपणे आत्मसात करू शकेल. कारण स्वतःचे मन व आत्मभान उन्नत करणे, पर्यावरण सुसंगत वर्तन करणे आणि विज्ञाननिष्ठ परिवर्तनाबाबत आग्रही राहणे या गोष्टी विवेकवादी व्यक्ती करतच असते. या अर्थाने ती व्यक्तीच खरी आध्यात्मिक नाही काय ? शेवटी एक मुद्दा चळवळीसाठी. अध्यात्माचा दावा करणाऱ्या अनिरुद्ध बापूंच्याबद्दल असा थेट खोटा प्रचार केला जातो की ते भक्तांना एका वेळी विविध देवांच्या रूपात भेटतात. दुसरे आध्यात्मिक पुरुष नरेंद्र महाराज हे तर जाहीरपणे विरोधकांचे हातपाय तोडण्याची धमकी देत असतात. आसारामबापू हे मागील जन्मातील पापामुळे या जन्मी स्त्री विधवा होते असे खुशाल सांगतात. सत्यसाईबाबा चमत्कार करतात पण तो कधीही तपासू देत नाहीत. आणि स्वतःवर हल्ला करणाऱ्या स्वतःच्या भक्तांना अटक करण्याऐवजी गोळी घालून संपवले जाईल असे पाहतात. निर्मलामाताच्या कुंडलिनी जागृतीला आव्हान दिले तर तिचे भक्त निदर्शकांवर तुटून पडतात. ह्या मंडळींना आध्यात्मिक मानणे याचा अर्थ ‘अध्यात्म’ या शब्दाचे समाजाचे आकलन अपुरे असणे आहे. दुसरे असे की, यांपैकी प्रत्येकाचे वागणे अत्यंत आलिशान असते. महाप्रचंड मालमत्ता जमा झालेली असते. थोडी समाजोपयोगी कामे करून जणू काही फार मोठी सत्कृत्ये केल्याचे दावे ही मंडळी करत असतात. व्यवस्था परिवर्तनाबद्दल ते कधी चकार शब्द बोलत नाहीत. बेकारी, महागाई, भ्रष्टाचार, जातीयता, धर्मांधता, विषमता, स्त्री-भ्रूणहत्या हे त्यांचे विषयच नसतात. या उलट गाडगेबाबा, म. गांधी, विनोबाजी यांची परंपरा आहे. गाडगेबाबांनी कोट्यवधी रूपये जमा केले. प्रत्येक पैचा हिशोब चोख ठेवला आणि आयुष्यभर स्वतःची मालमत्ता म्हणून बाळगल्या फक्त चिंध्या, हातातील काठी आणि भिक्षा घेण्यासाठी खापराचा तुकडा. उभा महाराष्ट्र स्वच्छ करण्याचे व्रत घेऊन ते हिंडले. जातीच्या उच्चनीचतेबद्दल, अंधश्रद्धांबद्दल सतत कडाडून आसूड ओढत राहिले. विनोबाजी संपूर्ण भारतात सतत १२ वर्षे एकदाही आजारी न पडता पदयात्रा करत राहिले. ४२ लाख एकर जमीन त्यांनी दान मिळविली. त्यातील काही लाख जमिनींचे वितरणही केले. बॅरिस्टर असलेले गांधी इंग्लंडमधील कडाक्याच्या थंडीतही एकाच पंचावर राहिले. बादशहालाही तसेच भेटले. आणि स्वतःच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य मिळाले असतानाही स्वातंत्र्यदिनाला हजर न राहता नौखालीत दंगलग्रस्थांचे अश्रू पुसावयास गेले. ही सर्व माणसे अत्यंत सश्रद्ध होती. देव मानणारी होती. आध्यात्मिक उन्नतीचे एक विशिष्ट उंची कष्टसाध्यतेने मिळवलेली होती आणि आजच्या कथित आध्यात्मिक पुरुषांच्या पेक्षा संपूर्ण वेगळी आणि संपूर्ण अस्सल होती. त्यांची परिभाषा देवाची, धर्माची आणि अध्यात्माची होती. अंधश्रद्धा निर्मलन समितीची परिभाषा ती असण्याचे कारण नाही पण या विभूतींच्या जीवनातील सकारात्मकतेचा अर्थ लावताना अध्यात्म या शब्दाचा सकारात्मक (कोणी त्याला चळवळीसाठी सोईस्कर असेही म्हणू शकेल) अर्थ लावण्यास काय हरकत आहे?
(साभारः अंधश्रद्धा वार्तापत्र – वार्षिक २००७)