ग्रामस्वराज्यावरील हा विशेषांक मोहन हिराबाई हिरालाल ह्यांच्या कार्यास समर्पित आहे. ह्याविषयी आमचे मित्र सोपान जोशी ह्यांच्याशी होत असलेल्या चर्चेतून निघाले की अंकाचा आवाका वाढवायचा तर ह्यात महाराष्ट्राबाहेरील अनुभवदेखील यायला हवे. अनुषंगाने हिंदी भाषेतील लेखही ह्या अंकात समाविष्ट झाले. त्याची जुळवाजुळव करण्यात वेळ गेल्याने एरवी एप्रिलमध्ये प्रकाशित होणारा अंक आपल्यापर्यंत पोहोचण्यास विलंब झाला, त्याबद्दल दिलगीर आहोत.
स्वातंत्र्य म्हणजे आपले निर्णय आपण घेण्याचा अधिकार. मग ते व्यक्तिगत पातळीवरचे असोत की सामाजिक. ज्यांना स्वातंत्र्य प्रिय असते ते त्याची किंमत, प्रसंगी खडतर आयुष्य स्वीकारून चुकवण्यास तयार असतात.