मासिक संग्रह: एप्रिल, 2013

अनवरत भूमंडळ (१)

[मानवी व एकूण सजीवांचे आयुष्य, त्याचा आदि-अंत, त्याचे कारण- परिणाम, ते जेथे फुलते त्या जागेशी असलेले त्याचे नाते, त्याची स्वयंसिद्धता वा अवलंबित्व, विश्वाच्या विराट अवकाशातील त्याची प्रस्तुतता ह्या विषयांचे मानवी मनाला नेहमीच कुतूहल राहिले आहे. माणसाने विवेकवादी असण्या- नसण्याची व असावे नसावेपणाची काही कारणे वा पूर्वअटीही ह्या मुद्दयांमध्येच दडून आहेत. त्यामुळे आ. सु.चा तर हा विशेष जिव्हाळ्याचा विषय आहे. ह्यावर वैज्ञानिक दृष्टिकोणातून लिहिलेली प्रभाकर नानावटींची मानवी अस्तित्व ही मालिका आपण गेल्या वर्षीपासून वाचत आहोतच. आता ही थोड्या वेगळ्या अंगाने लिहिलेली, विज्ञान व अध्यात्म ह्यांची सांगड घालणारी मालिका.

पुढे वाचा

टिप्पणीविना

[ज्यावर काहीच वेगळी टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही अशा बोलक्या चालू-घडामोडींकडे वाचकांचे लक्ष वेधण्यासाठी हे सदर ह्या अंकापासून सुरू करीत आहोत. वाचकांच्या प्रतिसादाची व सहभागाची अपेक्षा आहे. – संपादक]

१. ‘ओपन सोसायटी जस्टिस इनिशिएटिव्ह’ ही न्यूयॉर्क येथील एक स्वयंसेवी संघटना आहे. ह्या संघटनेतर्फे नुकताच ‘ग्लोबलायज़ींग टॉर्चर’ नावाचा एक २१६-पानी अहवाल प्रकाशित करण्यात आला. सी आय ए. मानवी हक्कांचे उल्लंघन सातत्याने कानी आली आहे, हे सर्वविदित आहे. परंतु, आता सी आय ए ने ह्या ‘कामांची’ व्याप्ती वाढवली आहे. संशयावरून कोणाही व्यक्तीला ताब्यात घेणे, कोणतीही कायदेशीर मदत मिळू न देता तिला अज्ञात ठिकाणी अडकवून ठेवणे, तिचा विविध पद्धतीने छळ करणे ही सारी कृत्ये सी आय ए आता ५४ देशांच्या सरकारांच्या संगनमताने करीत असल्याचा गौप्यस्फोट ह्या अहवालात करण्यात आला आहे.

पुढे वाचा

अन्नाचा व्यवसाय

मूळ लेखक : नीता देशपांडे

काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशच्या एका खेड्यात स्वयंसेवक म्हणून काम करताना तिथल्या दोन हसऱ्या किशोरींनी एक दिवस मला जेवायला बोलावलं. त्या तेव्हा रोज दुपारी शाळेत येऊन हिन्दी वर्णाक्षरे शिकायचा चिकाटीने प्रयत्न करीत असत. मी जेवायला बसले तसा एक प्रश्न माझ्या मनात आला, जो शहाण्या मुलींनी विचारायचा नसतो हे मला माहीत होतं. ते जेवणात भाजी खात नाहीत काय? काही दिवसांतच मला त्याचं उत्तर मिळालं. त्या दिवशी मुलींनी वरण केलं होतं, म्हणून भाजी नव्हती. ज्या दिवशी त्या भाजी करायच्या, त्या दिवशी वरणाला सुटी असायची.

पुढे वाचा

मोरपीस – रवींद्रनाथांची ‘चित्रा’

[पुस्तके व इतर ललित-वैचारिक कलाकृतींचा परिचय व समीक्षा करणारे हे सदर आपण गेल्या तीन महिन्यांपासून चालवीत आहोत. ह्यामध्ये अनेक विषयांवरच्या कलाकृतींचा अंतर्भाव होईल. साहित्य अर्थातच त्याला अपवाद नसेल.
स्त्री-पुरुष नाते त्यांच्या (विशेषतः स्त्रीच्या) रूपावर अवलंबून असावे का ह्या आदिम प्रश्नाचा वेध एका मिथक कथेच्या व त्यावर आधारित टागोरांच्या नाटकाच्या निमित्ताने ह्या लेखात घेतला आहे. ह्या प्रश्नाशी असलेला (आजच्या आपल्या) मानवी वर्तनाचा संबंध ध्यानात घेऊन कृपया हा लेख वाचावा – संपादक ]

भारतीय साहित्यपरंपरा विलक्षण समृद्ध आहे. भारतातील विविध प्रदेश, विविध भाषा, विविध वैशिष्ट्यांनी समृद्ध झालेली संस्कृती, लोकजीवन, लौकिकासोबत पारलौकिकाची अनुभूती, येथे स्थापन झालेले, विकसित झालेले व बाहेरील जगतातून येऊन येथील प्रवाहात मिसळलेले धर्म व दर्शने अनेकविध विद्याशाखा, असंख्य विचारप्रणाली, वेद-उपनिषदे, बुद्ध-चार्वाक यांच्या तत्त्वज्ञानापासून ते आजच्या तंत्रज्ञानापर्यंत झालेला भौतिक, सामाजिक, सांस्कृतिक विकास या साऱ्यांचे यथार्थ प्रकटीकरण भारतीय साहित्य करीत आलेले आहे.

पुढे वाचा

आकडेबाजी

एक महत्त्वाचे नवे पुस्तक हाती आले, Churning the Earth : The Making of Global India (Penguin/ Viking, 2012) नावाचे. लेखक आहेत असीम श्रीवास्तव आणि आशिष कोठारी; आणि पुरस्कर्ते आहेत अमित भादुरी, अमिताभ घोष, अरुणा रॉय, आशिष नंदी, गणेश देवी, ज्यां ड्रेझे, कुमी नायडू, माधव गाडगीळ, मल्लिका साराभाई, रामस्वामी अय्यर, सुरेश होस्पेट, व्ही. आर. कृष्ण अय्यर व इतर.

लेखक एका ठिकाणी आर्थिक वाढ आणि रोजगार यांच्यातला संबंध तपासतात. भारतासारख्या देशांत प्रजेची सुख-समृद्धी एकूण आर्थिक वाढीपेक्षा रोजगाराच्या उत्पादक आणि बऱ्या पगाराच्या संधी जास्तजास्त उपलब्ध होण्यात आहे, हे उघड आहे.

पुढे वाचा

सावरकर – आंबेडकर : इतिहासलेखनातील द्वन्द्व

वि.दा. सावरकर आणि डॉ. आंबेडकर यांनी इतिहास लेखनाच्या क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण असे योगदान दिलेले आहे. १९३६ साली ‘अॅनिहिलेशन ऑफ कास्ट’ मध्ये डॉ. आंबेडकरांनी असे मत व्यक्त केले की, ‘हिंदूंचे जीवन ही सततच्या पराभवांची मालिका आहे. सत्याच्या बाजूने कबुली देण्यास न घाबरणाऱ्या कोणत्याही सूज्ञ हिंदूस लाज वाटेल असे ते जगणे आहे.” हे वक्तव्य वि.दा.सावरकरांचा ब्राह्मणी दंभ दुखावणारा संघर्षबिंदू ठरेल असेच म्हणावे लागेल कारण उपर्युक्त उद्धरण आपल्या ग्रंथात उद्धृत करताना सावरकरांनी ठळक केलेला भाग गाळला आहे व त्यावर दिलेली प्रतिक्रिया अशी आहे –

‘डॉ.आंबेडकरांचे

पुढे वाचा

ई-संवाद

[आजचा सुधारक ने ऑगस्ट 2008 मध्ये प्रसिद्ध उत्क्रान्तिवादी शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन ह्यांच्या जन्माला दोनशे आणि त्यांच्या ओरिजिन ऑफ स्पिशीज ह्या ग्रंथाला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डार्विन विशेषांक काढला होता; जो मागाहून डार्विन आणि जीवसृष्टीचे रहस्य ह्या नावाने पुस्तकरूपाने प्रकाशित करण्यात आला. हे पुस्तक वाचून तुषार बोरोटीकरांनी संपादक रवीन्द्र रु.पं. ह्यांच्याशी इ-पत्रव्यवहार केला. तो येथे देत आहोत.

आजचा सुधारक हे प्रांजळ, अभिनिवेशरहित चर्चा व वादविवाद ह्यांचे व्यासपीठ बनावे अशी आमची पहिल्यापासून इच्छा होती व आहे. त्या भूमिकेतून ह्या चर्चेचे आम्ही स्वागत करतो.

पुढे वाचा

मानवी अस्तित्व (८)

मी कुणाच्या तरी हुकुमाचा ताबेदार आहे का?

आपण आपल्या स्वतःच्या इच्छेनुरूप वागतो की आपल्याकडून कोणी हे करून घेते याबद्दल नेमके भाष्य करणे जवळजवळ अशक्य आहे. रेने देकार्त (१६४४) म्हणून एक तत्त्वज्ञ होऊन गेला. त्याने हे जग खरोखर आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला. जग आहे का म्हटल्यावर त्यातील चराचर सृष्टी आहे का असाही प्रश्न ओघाने आलाच. पैकी चेतन सृष्टीतला जो मी आहे, तो तरी खरा आहे का इथपर्यंत त्याची शंका पोहोचली. मग त्यावर, अशी शंका घेणारा कुणीतरी आहे, म्हणजे मग तोच मी आहे असे त्याने स्वतःच्या प्रश्नाला उत्तर दिले.

पुढे वाचा

विक्रम आणि वेताळ

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत खांद्यावर टाकून तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलता झाला.

राजा, खरेतर नियमाप्रमाणे मला तुला गोष्ट सांगणे आणि त्यानंतर प्रश्न विचारणे भाग आहे, पण खरे सांगू? आज कोणतीही नवीन गोष्ट तुला सांगण्याची अजिबात इच्छा नाही बघ. त्यापेक्षा असे करू या का? आपला जो हा उद्योग कित्येक वर्षांपासून, नव्हे शतकांपासून चालू आहे, तू, म्हणजे राजा विक्रमादित्याने, प्रेत उचलून खांद्यावर टाकायचे आणि स्मशानाच्या दिशेने चालू लागायचे, मग मी जागे होऊन तुला एक गोष्ट सांगायची आणि त्या आधारावर प्रश्न विचारावयाचे, त्यावर तुला उत्तर द्यावयास बाध्य करून तुझ्या मौनव्रताचा भंग करावयाचा आणि मी लगेच झाडावर जाऊन लोंबकळावयास लागावयाचे.

पुढे वाचा

चार फुले

हेही खरंच की हा सावधगिरीचा इशारा आहे
एक छोटंसं मूल आहे
हेही खरंच की हा सावधगिरीचा इशारा आहे.
चार फुलं फुलली आहे.
इशारा हा की अजून आनंद आहे
आणि माठात भरलेले पाणी पिण्यायोग्य आहे.
हवेत श्वास घेतला जाऊ शकतो अजूनही
आणि इशारा हा की जगही आहे
उरलेल्या जगात मीही आहे उरलेला.
हा इशाराच की मी अजून उरलो आहे
एखाद्या संभवनीय युद्धातून जिवंत वाचून,
मी आपल्या इच्छेनुसार मरू इच्छितो,
आणि मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत
अनंतकाळ जगण्याची कामना करतो.
कारण अजून चार फुलं आहेत आणि जग आहे.

पुढे वाचा