मासिक संग्रह: एप्रिल, 2013

पत्र-पत्रोत्तरे

धर्म-ग्रंथ कालनिरपेक्ष व कालातीत नाहीत!
२०१३ जानेवारी महिन्याचा ‘आजचा सुधारक माझ्या हातात आला. ह्यातील उत्पल व.रा. च्या कवितेत शेवटच्या कडव्यात ‘तरी व्यापून उरावी, संवेदना…..’ म्हटले आहे. कवितेतले फारसे काही मला कळत नाही. पण, ‘संवेदना व्यापून उरावी’ एवढे मात्र कळू शकले आहे. पण, श्री मधुकर कांबळे यांचा ‘भगवद्गीतेचे भारतात पुनरुज्जीवन’ हा लेख वाचल्यामुळे त्यातल्या भाव-भावनांचा मी विचार करू लागलो. अर्थात, श्री मधुकर कांबळे यांच्य या लेखावर अनुकूल-प्रतिकूल प्रतिक्रिया देण्याच्या मनःस्थितीत मी यावेळी नाही. फक्त जो विचार मला सुचला वा स्फुरला तेवढाच या ठिकाणी देण्याचा विचार केला आहे.

पुढे वाचा