मासिक संग्रह: जुलै, १९९१

पत्रव्यवहार

पत्रव्यवहार
श्री. संपादक ‘आजचा सुधारक’ यांस,
प्रा. स. ह. देशपांडे यांचे एप्रिल (?) १९९१ च्या अंकातील पत्र वाचले. कळविण्यास खेद वाटतो की सावरकसांचे एकही पान उघडावयाचे नाही’ हा (स. रा. च्या म्हणण्यानुसारचा)’ पुरोगामी’ दंडक मी पाळलेली नाही. सावरकराचे समग्र लेखन अभ्यासले असल्याचा दावा मी करीत नाही, पण प्रसंगोपात्त त्यांचे लेखन जरुरीपुरते मी वाचले आहे. त्यांची चरित्रेही वाचली आहेत.
हिंदुत्वाची सावरकरांनी केलेली व्याख्या सुप्रसिद्ध आहे. धर्मनिष्ठ मुसलमान वा ईसाई यांची भारत ही पितृभू असली तरी पुण्यभू होऊ शकत नाही : ‘पुण्यभू’चा संदर्भ holy places या अनि आहे ही गोष्ट स्पष्ट आहे.

पुढे वाचा

धर्म, धर्मनिरपेक्षता आणि त्यामधून उद्भवणारे काही प्रश्न – ३

प्रस्तुत लेखाच्या प्रारंभी हिन्दू कोण नाही असा प्रश्न मी उपस्थित केला आहे. कारण हिन्दू कोण नाही हे नक्की ठरल्याशिवाय अल्पसंख्याक कोण व बहुसंख्याक कोण याचा, त्याचप्रमाणे कोण कोणाचा अपमान करीत आहे ह्याही प्रश्नांचा उलगडा होत नाही. माझ्या मते कोणीच बहुसंख्याक नाहीत व त्यांचा अपमानही होत नाही. ‘ तुमचा. तुम्ही बहुसंख्याक असून अपमान होत आहे’ अशी एक हूल उठवून दिली गेली आहे व त्या आवईला आमचे भाबडे देशबान्धव बळी पडत आहेत.

हिन्दू कोण नाही
हिन्द कोण नाही असा मला पडलेला प्रश्न मी पुढे एका पद्धतीने सोडवून दाखवीत आहे.

पुढे वाचा

भारताची सध्याची आर्थिक दुःस्थिती

भारताच्या पंतप्रधानांनी सत्ता ग्रहण केल्यानंतर राष्ट्राला उद्देशून केलेल्या पहिल्याच भाषणात आपले सरकार देशापुढील गंभीर आर्थिक प्रश्न सोडविण्याला अग्रक्रम देईल असे जाहीर केले होते. गेल्या जूनमध्ये झालेल्या निवडनुकीनंतर पक्षोपक्षांच्या जाहीर चर्चेत देशापुढील आर्थिक संकटातून बाहेर येण्याकरिता कोणते उपाय करावयास पाहिजेत यासंबंधीच्या मुद्द्यांवरच अधिक भर देण्यात आला होता. या संदर्भात आन्तरराष्ट्रीय मुद्रा निधीच्या कर्जाचा प्रश्न प्रामुख्याने चचिला गेला. तेव्हा या आर्थिक पेचप्रसंगाचे नेमके स्वरूप काय आहे आणि ह्याचे निराकरण करण्याकरिता कोणते उपाय योजणे आवश्यक आहे, इत्यादि प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे.

पुढे वाचा

विवेकवाद – १४

साक्षात्कार, विज्ञान आणि विवेकवाद

प्रा. श्याम कुळकर्णी यांच्या पत्राला उत्तर दिल्यानंतर त्यांची पुन्हा अनेक पत्रे आली आहेत. त्यांपैकी एक याच अंकात अन्यत्र छापले आहे. या पत्रात त्यांनी विवेकवादासंबंधाने मी जे वेळोवेळी लिहिले आहे त्यासंबंधी अनेक आक्षेप घेतले आहेत, आणि काही प्रश्न उपस्थित केले आहेत. वास्तविक या प्रश्नांपैकी बहुतेक सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखमालेत ठिकठिकाणी आली आहेत. ( विशेषतः ‘विवेकवाद – ४: जुलै १९९०, पृ. ११-१६ पहावा.) परंतु त्यांचे पुरेसे आकलन न झाल्यामुळे ते प्रश्न अनुत्तरित आहेत अशी त्यांची समजूत झाली आहे.

पुढे वाचा

आम्ही स्वतंत्र आहों

आम्ही स्वतंत्र आहों
हल्ली स्त्रियांची स्थिती पाहिली तर त्यांच्यांत कित्येक दुर्गुण शिरले आहेत. त्या सासुरवासांत असल्यामुळे खोटे बोलण्याची त्यांस संवय लागते व मग ती संवय मुलांस लागते. अशा रीतीने देशांतील लोक सत्य, तेज व साहसहीन होतात. आपण सर्वांनी सत्याचे व्रत धरले पाहिजे व तें आमरण चालविले पाहिजे. कोणास वाटेल की, आम्ही स्त्रियांनी काय सुधारणा करावी. आम्ही पडलों परतंत्र. तर मी त्यांस असें सांगते की, आम्ही स्वतंत्र आहों, आम्ही आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण मात्र केले पाहिजे, आमच्यापेक्षा पुरुषर्षास जास्त हक्क अगर स्वातंत्र्य असण्याची काहीएक जरूरी नाही.

पुढे वाचा