गांधीनंतरचे गांधी

मोहनदास करमचंद गांधी (1761-1948) यांच्या मृत्यूला साठ वर्षे उलटून गेल्यानंतर चार गांधी आजही जीवित आहेत. ह्या चौघांची ओळख प्रस्थापित करणे आवश्यक ठरते कारण मायबाप इंग्रजी सरकारने त्यांच्या जमान्यात हे काम नक्कीच नेकीने केले असते.
हे चारही गांधी त्रासदायक आहेत, पण त्यांचा त्रास वेगवेगळ्या व्यक्तींना, अवेगळ्या वेळी व वेगवेगळ्या प्रकारे होत असतो. समकालीन सार्वजनिक आयुष्यात आवेगळ्या कारणांसाठी हे चौघेजण उपयुक्तदेखील आहेत. हे मी दुःखाने बोलत नसून आदराने बोलत आहे कारण आपल्या जन्मानंतर एकशेपन्नास आणि मृत्यूनंतर साठवर्षांनंतरही लोकांना त्रासदायक किंवा उपयुक्त ठरणे ही काही साधीसुधी बाब नव्हे. खरे सांगायचे कमळ गांधी कोण होता ह्याविषयी मला फारसे सोयरसुतक नाही. त्या ऐतिहासिक मोटीचा शोध घ्यायला पुस्तकी पंडित आहेतच. पण समकालीन राजकारण हे ऐतिहासिक स्त्यांवर आधारित नसून आठवणीतील भूतकालाशी व त्याच्या आधाराने भविष्य रचताना माया अडचणींशी संबंधित असते. बऱ्यावाईट कोणत्याही कारणाने असेल, गांधी त्या मांचे एक अभिन्न अंग बनले आहेत. हे निर्विवाद.
सुरुवातीलाच सांगतो की मी गांधीवादी नाही. माझे मत दखल-पात्र नसेलही, पण माझ्या समजानुसार गांधीपेक्षा गांधीवाद श्रेष्ठ आहे. गांधी त्यांचे तत्त्वज्ञान पूर्णपणे आचरणात आप शकले नाहीत कारण ते व्यवहारकुशल राजकारणी होते, आणि वैचारिक व नैतिक बद्धता पातळ करणे हे राजकारणाचे कामच आहे. अर्नोल्ड टॉयन्बीने त्यांना वाहिलेल्या श्रद्धांजलीत असे म्हटले आहे की राजकारणाच्या घाणेरड्या वस्तीत राहायला तयार असणारा तो एक देवदूत होता. त्यामुळे शंभर टक्के गांधीवादी होणे खुद्द गांधींना परवडण्याजोगे नव्हते. त्यांना अपूर्ण गांधीवादी म्हणणे म्हणजे त्यांच्या कार्याला सलाम करणेच होय.
आता ह्या गांधींविषयी बोलू या. ते चौघेही आपल्या साऱ्यांच्या परिचयाचे आहेत. मी केवळ नेणिवेच्या पातळीवरील ज्ञात गोष्टी जाणिवेच्या पातळीवर आणण्याचे कर करणार आहे. पण मानसशास्त्रज्ञ या नात्याने मी तुम्हाला इशारा देऊ इच्छितो, की नमिवेच्या पातळीवर अस्तित्वात असणारे ज्ञान स्वीकारणे हे अनेकदा अतिशय दुःखद बमनस्तापजनक असते.
पहिला गांधी हा भारतीय राज्यसंस्था व भारतीय राज्यवादाचा गांधी आहे. मला स्वातला (व कदाचित गांधींना स्वतःलाही) हा गांधी पचविणे जड जाते, परंतु अनेकदा हा एकच गांधी लोकांना परवडतो, सहन करता येतो आणि म्हणून ते त्याच्यासोबत सुखाने राहू शकतात.
पुढचे सांगण्यापूर्वी थोडे मूळ गांधींबद्दल. राष्ट्रपित्याचे राजकीय अस्तित्व, स्मृती व लिखाण ह्या बाबी अतिशय तापदायक आहेत ही गोष्ट स्वातंत्र्यानंतर लगेच येथील राज्यव्यवस्थेच्या व तिचे आश्रित बनू पाहणाऱ्या बुद्धिमंतांच्या लक्षात आली. गांधी हा माणूस अराजकवादी होताच, पण खाजगी विरुद्ध सार्वजनिक, धार्मिक विरुद्ध इहवादी, भूत विरुद्ध वर्तमान हे भेद मुळातून अमान्य करण्याची त्याची वृत्तीही अनेक प्रश्न निर्माण करीत होती. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या केंद्रित राज्यव्यवस्था व सामाजिक अभियांत्रिकी यांच्या ‘आधुनिक’ व ‘सुरचित’ दुनियेत त्यांच्या भोंगळ, आकारहीन संकल्पना फारच कालबाह्य व बेंगरूळ वाटत होत्या. या सर्वांचा ताप विचारवंतांप्रमाणेच त्यांच्या मारेकऱ्यालाही होत होता, स्वतःला बुद्धिवादी व आधुनिक म्हणवणाऱ्या नथुराम गोडसेने न्यायालयासमोर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की नवजात भारत राष्ट्राला ह्या आधुनिकताविरोधी व राजकीयदृष्ट्या अजाण असलेल्या माथेफिरूपासून वाचविण्यासाठीच त्याने पितृहत्येचे पातक स्वतःच्या माथ्यावर घेतले.
नथुराम गोडसेच्या ह्या एका कृतीमुळे राष्ट्रपित्यावर अकाली हौतात्म्य लादले गेले आणि उजव्या व डाव्या दोन्ही प्रकारच्या राज्यवाद्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. नथुरामने केलेल्या थोर उपकारांची वाच्यता अर्थातच कुणी केली नाही. खरे तर गांधींना थेट संतपद बहाल करून त्यांचे जिवंत, उपद्रवी राजकीय अस्तित्व संपुष्टात आणणे नथुराममुळेच शक्य झाले होते. पण .. त्यातही एक गोची झाली, ती अशी की गांधी स्वतःच, त्यांना निष्प्रभ करण्यासाठी त्यांच्यावर लादलेले संतत्व अधूनमधून झुगारून देतात. त्यांचे उत्तराधिकारी, या गोचीसाठी त्यांना कधीच माफ करीत नाहीत.
… तर भारतीय राज्यवादाच्या ह्या गांधीची प्रतिष्ठापना आता इंडिया गेटवरील पंचम जॉर्जच्या पुतळ्याच्या रिकाम्या झालेल्या जागेवर करण्यात येणार आहे असे आम्हा दिल्लीवासियांना अधूनमधून सांगण्यात येते. तसे घडले तर तो ह्या सरकारी गांधींचा राज्याभिषेकच ठरेल! यापूर्वी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौजेतील एका पलटणीला गांधींचे नाव दिले होते. त्यानंतर गांधींच्या नावाचा विनोदी वापर करणाऱ्या सांस्कृतिक राष्ट्रवादाची अनेक दकाने कुत्र्याच्या छत्र्यांसारखी फोफावली आहेत. अशात ह्या सरकारी गांधींची प्रकृती तितकीशी चांगली राहत नाही. नथुराम गोडसे जे करू शकला नाही, ते करण्यात हिंदू राष्ट्रवादाचे स्वघोषित प्रणेते बाळ ठाकरे आणि लालकृष्ण अडवानी हे दोघे मात्र कमालीचे यशस्वी झाले आहेत.
दुसरे गांधी हे गांधीवाद्यांचे गांधी आहेत. हे सध्या तीव्र अशा अॅनिमियाने पीडित आहेत. ह्या गांधींबद्दल लोकांना आपुलकी वाटते. भारतीय जनमानसात त्यांना प्रेमळ आजोबांचे स्थान आहे. पण त्याचबरोबर, ते चुकून भारतात जन्म घेतलेले व्हिक्टोरियन काळातील सनातनी, सोवळे (प्यूरिटन) वाटतात आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत कंटाळवाणे आहे. ‘पहिले’ गांधी बहुराष्ट्रीय कंपन्यांनी बनवलेला कोकाकोला न पिता, भारतीय कंपनीने बनवलेला कॅम्पा कोला पितात. परंतु हे दुसरे गांधी मात्र लिंबूपाणी पिणे व घरी कातलेल्या सुताची खादी वापरणेच पसंत करतात. ते राजकारण्यांच्या वाऱ्यालाही उभे राहात नाहीत. खरे तर, त्यांना तसे करताच येत नाही, कारण ते जर राजकारणात पडले जात्याच्या नावाने उघडलेल्या सर्व आश्रमांना, आणि त्यांच्या त्या खादीला शासनाकडून मनमाने सारे अर्थसहाय्य व अनुदान बंद नाही का पडणार? शिवाय गांधीवादावर झडणारी चर्चासत्रेही आटून जातील. ते वेगळेच! तसे हे गांधी अधूनमधून देशाच्या राजकारणातील बाढलेल्हारीकरण’, ‘देशातील विषम विकास’, ‘भ्रष्टाचार’ यांसारख्या विषयांवर धिक्कार यावेतात म्हणा, पण ह्या बैठकांमध्ये होते एवढेच, की कुणाही व्यक्तीचे वा पक्षाचे नवनवेता सर्वजण परिस्थितीच्या नावाने भरमसाठ अश्रू ढाळतात. सभा संपल्यावर नावमजेत असतात. भ्रष्टाचारी राजकारणीदेखील जोशात टाळ्या वाजवतात.
गांधीवाद्यांचे गांधी, गांधीविचारावर व्याख्याने देण्यासाठी जगभर भ्रमण करतात, परंतु आपल्या अनुयायांमार्फत भारतातील जनतेशी मात्र ते क्वचितच संवाद साधतात. गाव आहे म्हणा. भारतातला त्यांचा श्रोतृवर्ग तो केवढास्सा! आणि तोही आपला सातादेह घेऊन येणार आणि जडावलेल्या डोळ्यांनी ते प्रवचन ऐकणार! त्यांच्यात काही उत्साह चैतन्य नावालाही शिल्लक आहे का? आता आपण गांधीविचारावरील मनोनाही तर वाईट दिसेल बुवा… म्हणून ते येणार. अशा गांधीवाद्यांचे सरासरी वय आता असेल सुमारे शंभर वर्षे आणि त्यांना ऐकणाऱ्यांचे वयदेखील त्याहून काही फारसे कमी नसणार!
यावरून गांधीवाद्यांना वाटते की भारतीय जनतेने गांधींकडे पाठ फिरवली आहे माधवियों यथोडा कमी आदर बाळगणाऱ्यांना मात्र मनापासून असेच वाटते, की सार्थवाहानी माकडे आणि भारतीय जनतेकडे पाठ फिरवली आहे. त्यांना बिचाऱ्यांना बाने की गांधी+चे नाव देण्याहा गांधीवाद्यांना प्रवचने देत फिरण्यापेक्षा बाबा आमटे, आमाहबाने किंवा दलालबामा यांच्याप्रमाणे काही वेगळा मार्ग चोखाळता आला नसता का?
आजचे तिसरे गांधी हे लहरी, मनमानी आणि कलंदर व्यक्तींचे गांधी आहेत. त्यांचा स्कॉच व्हिस्कीपेक्षाही कोकाकोल्याला अधिक तीव्र विरोध आहे. आणि त्यांची स्थानिक रूपे आयात केलेल्यापेक्षा भयानक आहेत असे त्यांचे मत आहे. आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा वापर असल्या क्षुद्र गोष्टींसाठी व्हावा, हे त्यांना मान्य नाही. आणि हे ते अनेक प्रकारे बोलून दाखवतात. असला खोटा राष्ट्रवाद जोपासण्यापेक्षा तर ते कोकाकोला व पेप्सीकोल्याशिवाय जे लोक राह शकत नाहीत त्यांच्यासाठी तो आयातही करतील. पण कॅम्पाकोलाचा आग्रह धरणार नाहीत.
‘हिंद स्वराज’ला कोळून प्यालेले गांधी नाही नाही त्या गोष्टींचा अगदी पिच्छा परवतात. सगळं काही अगदी छान चाललेलं असताना हे वेगळंच काही टुमणं लावतात. वंदना शिवाने कडुनिंबाच्या काही पेटंट मिळवण्यावरून अमेरिकन न्यायालयात दावा दाखल केला तेव्हा हेच गांधी – म्हणजे तिने गांधी वाचला आहे की नाही माहीत नाही, पण हेच गांधी तिच्या मनात होते. मेधा पाटकरच्या ‘कुप्रसिद्ध’ नर्मदा बचाव आंदोलनाला प्रेरणा देणारे हेच आणि ऐंशी पार केलेले-नर्तक-विचारवंत शिवराम कारंत यांनी भारतातील अणुऊर्जेच्या प्रतिष्ठापनेतील फसवणूक, मूर्खपणा आणि अपरिहार्य असा विनाश यांच्याविरुद्ध हल्लाबोल केला, तेव्हा त्यांच्या मनात दडून बसले होते, तेदेखील हेच गांधी.
ह्या गांधींची, त्यांना अगदी आतून विरोध करणाऱ्यांशीही मैत्री आहे. व्ही.एम.तारकुंडेंसारखे त्यांचे ख्यातनाम टीकाकार, अस्मा जहाँगीर यांच्यासारखे पाकिस्तानी नागरिक, यांचा सहवास त्यांना गांधींचे नाव धारण करून जे भारतीय राजकारणात दोन दशकांपासून वावरत आहेत, त्यांच्यापेक्षाही अधिक आवडतो. ह्यांच्या संपर्कात असणाऱ्यांचे सरासरी वय बऱ्यापैकी कमी आहे. तारकुंडे व कुलदीप नय्यर यांच्याप्रमाणे मनाने(च) तरुण असलेले लोक जर त्यामध्ये नसते, तर ते आणखीही खाली आले असते. हे तिसरे गांधी आणि त्यांचे तरुण मित्र मिळून भारतीय राज्यसंस्था, तिचे सुरक्षात्मक हितसंबंध आणि विज्ञान-आस्थापना यांच्यासाठी एक नस्ती डोकेदुखी होऊन बसली आहे. ती डोकेदुखी होऊन बसली आहे समाजाच्या आकलनशक्तीसाठी, जिला सर्वसाधारणपणे ‘शहाणपणा’ असे संबोधले जाते. पण माझे आद्य गुरू सिग्मंड फ्रॉईड याच्या शब्दांत सांगायचे झाले तर हिला दैनंदिन जीवनातली विकृतीच म्हणावे लागेल. हे गांधी आणि त्यांचे विलक्षण बेजबाबदार तरुण साथीदार यांच्यामध्ये मला मात्र विशेष स्वारस्य आहे. कारण माझ्या आयुष्यात मी केलेल्या अनेक गोष्टी, आज ही तरुण मंडळी अधिक चांगल्या प्रकारे करतात. कलंदर लोकांचे बळ वाढते आहे. मी तर माझ्या असंख्य शत्रूना खिजविण्यासाठी असेही म्हणेन की मी जे काही जीव तोडून सांगतो वा करतो आहे, ते माझ्या मृत्यूनंतर त्यांच्याचकडून अधिक आक्रमकपणे, आत्मविश्वासाने व त्याबरोबरच अधिक सुघटितपणे व राजकीय कौशल्य वापरून सांगितले जाईल याबाबत माझी खात्री आहे आणि खुशीही. हो, मृत्यूनंतरही मला मागे राहिलेल्या शत्रूचा पिच्छा पुरवायचा आहे.
ह्या गांधींवर खादी वापरण्याचे वा दारूला न शिवण्याचे बंधन नाही. त्यांचा नेहमीचा पेहराव निळी जीन्स, व खादीचा कुडता आणि खांद्यावर झोळी असाच आहे. ह्या गांधींचे, त्यांचे जन्मस्थान असलेल्या गुजरातशी तणावपूर्ण संबंध आहेत असे म्हणतात आणि गुजरातने ज्याप्रमाणे त्यांचा परित्याग केला. त्याप्रमाणे तेदेखील गुजरातचा परित्याग करतील असा लोकांचा कयास आहे.
हां, तर आपण गांधी आणि त्यांचे सवंगडी येणाऱ्या काळात शहाण्या, विवेकी व उच्चशिक्षित भारतीयांचे जिणे कसे हराम करणार आहेत त्याबद्दल बोलत होतो. तैवानचे राजकीय कार्यकर्ते फ्रेड च्यू असे म्हणतात की वैश्विक भांडवलवाद जिथे जिथे पसरेल, तिथे तिथे तो आपल्याबरोबर राजकीय चळवळी, स्वयंसेवी संस्था व झोळीवाले’ घेऊन जाईल आणि मोठमोठ्या उद्योगपतींची भंबेरी उडवेल. ही किंमत भांडवलशाहीला चुकवावी लागणारच आहे. मला तर त्यांच्या या धाडसी स्वभावाचे कौतुक वाटते.
चौथे गांधी हे सहसा वाचले जात नाहीत. ते फक्त ऐकले जातात आणि तेही अप्रत्यक्ष पणे. मार्टिन ल्युथर किंगसारखा एखादाच माणूस काळजीपूर्वक व साक्षेपाने वाचून त्यांच्या कामाचे मूल्यमापन करतो. बाकीच्यांना त्यांनी काय लिहिले हेदेखील ठाऊक नसते. गांधींबद्दलचा त्यांचा दृष्टिकोण हा ए.के.गोपालनचा कार्ल मार्क्सविषयी जसा होता तसाच आहे. हे गोपालन म्हणे एकदा असे म्हणाले की आपण काही.मार्क्स वाचला नाही कारण वाचून तो आपल्याला कळलाच नसता. पण असे म्हणणारे गोपालन शेवटपर्यंत मार्क्सवादी राहिले हेही तेवढेच खरे.
हे गांधी मुख्यतः मिथकांचे गांधी आहेत. ते आपल्या सिद्धान्तांना घट्ट धरून आहेत. म्हणजे निदान त्यांच्या पर्यावरणीय, अणुऊर्जाविरोधी व स्त्रीवादी चळवळीतल्या चाहत्यांचे तरी तसे म्हणणे आहे. कारण, गांधीवादाची तत्त्वे, गांधी ह्या मिथकाच्या रूपाने जगभर पोहचली आहेत.
काही वर्षापूर्वी रिचर्ड ग्रेनियर हा अमेरिकन स्तंभलेखक, रिचर्ड अटेनबरोचा ‘गांधी पाहून काहीसा खंतावला आणि गांधींचे महत्त्व कमी करण्यासाठी त्याने त्यांचे जीवन आणि त्याचे सिद्धांथ यांच्यामधील तफावती उघड करण्याचा प्रयत्न केला. (थोर कवी जान मिल्टन वा संगीतकार बीथोव्हेन यांनी बालकांचा गैरवापर केल्याबद्दल किंवा तत्वाद्ध प्लेटो याने सम संभोगाच्या नावाखाली त्याची भलावण केल्याबद्दल ग्रेनियरने कधी ल्यवेकवात नाही) पण रहस्यभेदाचे असे प्रयत्न फारसे कधी यशस्वी होत नाहीत कारण जगभरच्या नियर्सना कधी ना कधी मानवी क्षमतांमध्ये विश्वास ठेवण्याची गरज भासतेय पोलंडच्या कामगारांनी 1980 च्या दशकात त्यांच्या जुलमी राजवटी विरुद्ध लढा केला तेव्हा लेक वालेसा हे आमचे गांधी आहेत’ असेच ते म्हणाले. त्या व्होडका पिणाऱ्या रोखठोक बोलणाऱ्या कामगार संघटनेच्या नेत्याला हे शब्द पचवणे जडच गेले असणार पण पोलंडच्या जमानेला हा दोन व्यक्तिमत्त्वांमधील ऐतिहासिक साम्यभेद पडताळून पाहण्यात काहीच स्वारस्य नव्हते. त्यांना वेगळेच काही म्हणायचे होते. गांधी हे आमच्या काळात राज्य व्यवस्थेचे व आधुनिक तंत्रज्ञानाचे पाठबळ असलेल्या निरंकुश नोकरशाही व जुलमी राजवट यांच्या विरोधात बंडखोरी करण्याचे व त्यासाठी आक्रमक अहिंसेचे हत्यार वापरण्याचे प्रतीक बनले होते. थोडक्यात सांगायचे तर गांधी हे अन्यायाच्या विरोधात करावयाच्या संघर्षाचे नाव आहे. असा संघर्ष जो पराकोटीच्या अमानुषतेचा सामना करतानाही आपली माणुसकी सोडत नाही! म्हणूनच फिलिपाइन्सच्या बेनिटो अक्कीनोची हत्या झाली तेव्हा तेथे रस्त्यावर आलेल्या मोर्चेकऱ्यांनीही तेच केले. ‘आमचा गांधी बेनिटो’ अशाच त्यांनी घोषणा दिल्या. आता हाही जर तुम्हाला योगायोग बात असेल, तर आणखी एक उदाहरण आहे माझ्या पोतडीत. म्यानमारच्या विद्यार्थ्यांनी तेथीललष्करी राजवटीविरुद्ध उठाव केला तेव्हा त्यांनीही गांधींचाच धावा केला. फक्त एवढेच की त्यांच्या नेत्या ह्या खेपेला होत्या आंग सान स्यू की. गंमत अशी की स्यू की यांच्यावर ‘दुराग्रही गांधीवादी’ असल्याचा दुर्दैवी आरोप झाला तेव्हा त्यांनी गांधी वाचलाच नव्हता. याशिवायही, खान अब्दुल गफ्फार खान (सरहद्द गांधी) यांच्यापासून
तर नेल्सन मंडेलांपर्यंत अनेकांना हे बिरूद बहाल करण्यात आले आहे.
जीवनाचे विद्रूप, उघडेनागडे रूप दाखविण्याऱ्या गल्लीबोळांमध्ये हा मस्तमौला गांधी परिवर्तनविरोधी आणि सवंग, धनदांडग्या लोकांच्या स्थानांना धक्के देत मुक्तपणे फिरतो आहे. याला कशाचेच भय नाही. पण त्यांना तरी याच्या शक्तीचा अदमास कुठे आहे? शस्त्रास्त्राचे पाठबळ नाही म्हणून जुलमी राजवट ह्याला कमी लेखते, आणि अहिंसेच्या गोष्टी करतो म्हणून धंदेवाईक क्रांतिकारक ह्याची टर उडवतात. अर्थात दोघांनाही त्याची भारी किंमत मोजावी लागतेच! ह्या गांधीने केलेला उत्पात पाहन बऱ्याच उशिराने त्यांचे डोळे खाडकन उघडतात. मग ‘परिवर्तनाची चक्रं कधीकधी उलटीही फिरतात’ किंवा ‘क्रांतीला जबरदस्त यश मिळाल्यानंतरही कधीकधी ती कोलांटउडी खाते व सपशेल शरणागती पत्करते’ असे काही बोलून ते स्वतःची कशीबशी समजूत घालतात. ते खरंही आहे म्हणा! क्रांती आपलीच पिल्लं खाते म्हणतात ते याच अर्थाने. तर हे झालं जुलमी राजवटीबद्दल. दुसरा गट असलेल्या क्रांतीच्या दूतांबद्दल काय बोलावे? आजकाल क्रांतिकारक म्हणजे आपली उमेदीची कारकीर्द विद्यापीठांमध्ये घालविलेल्या मध्यमवयीन, सुखवस्तू, विक्षिप्त अशा अठरापगड जमातींच्या लोकांचा जथ्थाच आहे. तेही बिचारे ‘गांधीवादाच्या ऐतिहासिक मर्यादा वगैरे विषयांवर आपण गेला बाजार एखादे चर्चासत्र तरी घेऊ’ असे म्हणून (खरे तर या मर्यादांमुळे गांधीवाद कधीच संपायला हवा होता) समाधान मानून घेतात (शेवटी समाधान ही मानण्याचीच तर गोष्ट आहे!) परंतु हे समाधान मानले व मनवले जात असतानाच हा मिथकातील गांधी जगातल्या दुसऱ्याच कोण्या झोपडपट्ट्यांमध्ये निघून जातो आणि तेथे तो आपल्याच जुन्या, बनचुक्या चेल्यांच्या विरोधात बंडखोरी करण्यासाठी नवीन क्रांतिकारक घडवण्याच्या उद्योगाला लागतो.
मी तुम्हाला चार गांधी दिले आहेत आणि त्यातील माझा प्राथम्यक्रमही स्पष्ट केला आहे, ज्यायोगे तुम्हाला त्यातून निवड’ करता यावी. पण… तेही नकोच, कारण निवड करणे म्हणजे कोणत्यातरी गांधींचा अंगीकार करणे आलेच आणि गांधी कसे धोकादायक असू शकतात, हे आपण पाहिलेच आहे. त्यापेक्षा असे कराना… गांधींची तसबीर तुमच्या घरच्या वा कार्यालयाच्या भिंतीवर टांगून द्या. बस्स. मला वाटतं की हेच सगळ्यांत शहाणपणाचे होईल. तुमचा त्यांच्याविषयीचा आदर जाहीर होईल व भारतीय देवगणात एकाची भर पडेल. शिवाय त्यांच्या जन्मतिथीला – जी शासनाने सार्वजनिक सुटी म्हणून जाहीर केली आहे – आपल्या मुलांना पिकनिकला घेऊन जाण्यासाठी तुम्ही मोकळेच. कसे?
[ द लिट्ल मॅगझीन, खंड 1, अंक 1 मधून. ] NMIMS-SHPTM, मुंबई-आग्रा महामार्ग, तापी काठ, बाबुळदे, ता.शिरपूर, जि. धुळे ४२५ ४०५.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.