मानवी अस्तित्व (११)

माणूस प्राणी नामशेष होणार का?

अमरत्वाचे स्वप्न पाहणाऱ्या मानवाला मृत्यूच्या बरोबरच्या झोंबाझोंबीत अजूनही म्हणावे तसे यश मिळालेले नाही. उलट हा लढा माणसाला गोत्यात आणत आहे. परंतु आता आपल्याला वैयक्तिक मृत्यूबद्दलचा (स्वार्थी!) विचार करायचा नसून संपूर्ण मानववंशाच्या अस्तित्वाबद्दल काळजी करायची आहे. विशिष्ट दिवशी हा मानव वंश नामशेष होणार, मानवासकट जगातील समस्त प्राणिवंश नष्ट होणार, महाप्रलय येणार, याबद्दलची भाकिते अधूनमधून वाचायला मिळत असतात. आजकाल असल्या अवैज्ञानिक भाकितांची भीती वाटेनाशी झाली आहे. आजच्या मानवाऐवजी दुसरा एखादा मानवसदृश प्राणी उत्क्रांत होत असल्यास त्याची भीती बाळगण्याचेही कारण नाही. फक्त अस्तित्वाच्या सातत्याचा विचार होत असल्यास उत्क्रांतीची कल्पना स्वीकारार्ह वाटते. परंतु हे कितपत शक्य आहे?
यासंबंधीची एक चांगली बातमी: आपल्याकडे भरपूर वेळ आहे. यापूर्वीच्या काही सस्तनी जाती १० लाख वर्षे जगून नष्ट झाल्या व त्यातून उत्क्रांत होत होत दुसऱ्या जाती जन्माला आल्या. हेच खरे असल्यास हो सेपियन मानववंशाची जात नष्ट होऊन दुसरी जात उत्क्रांत होण्यास अजूनही ८ लाख वर्षे शिल्लक आहेत. आपणही एक सस्तनी प्राणी आहोत हेच खरे असल्यास हा वेळ आपल्यासाठी उपलब्ध असेल. परंतु आपण इतक्या वेळा आपल्या वंशाबद्दल/जातीबद्दल उलट-सुलट विधाने करत आल्यामुळे सस्तनी प्राण्यांचे निकष आपल्याला लागू होतील की नाही याबद्दल शंका आहेत.
उत्क्रांतीचाच विचार केल्यास दोन ठळक गोष्टी आपल्या लक्षात येतील;
एक विविधता व दुसरी निवड. जीववैविध्याला जनुकीय परिवर्तन कारणीभूतअसून आपण त्यापासून अजूनही मुक्त झालेलो नाही. उलट जनुकीय परिवर्तनाचा वेग वाढतच आहे व मानवी कृत्रिम जनुकीय उत्परिवर्तनाला मर्यादा नाहीत अशी स्थिती आज आहे. त्याचप्रमाणे निसर्गावर मात करत नैसर्गिक निवडीतही आपण ढवळाढवळ करून त्याचे नियमही आपण बदलत आहोत. सामान्यपणे भोवतालच्या परिस्थितीप्रमाणे सजीवांचे अस्तित्व आकार घेत असते व त्यानुसार बदललेली जनुकांची रचना पुढच्या पिढीत दिसू लागते. परंतु माणसाने तंत्रज्ञान व वैद्यकीय ज्ञान यांच्या बळावर कुठल्याही भोवतालच्या नैसर्गिक परिस्थितीत तग धरू शकेल अशी व्यवस्था केलेली असल्यामुळे कदाचित नैसर्गिक निवडीला वाव नाही असेच वाटत असेल.
परंतु हे खरे नाही. जनुकीय विश्लेषणाच्या अभ्यासावरून अजूनही नैसर्गिक निवडप्रक्रिया चालूच आहे याबद्दल शंका नसावी. गेल्या ५० हजार वर्षात सुारे १८०० जनुकीय उत्परिवर्तने (mutations) झालेली आहेत, असे एका अभ्यासाअंती लक्षात आलेले आहे. दुसऱ्या एका अभ्यासानुसार हा बदल फार वेगाने होत आहे. या जगावर प्रभुत्व गाजवण्याची मानवाची महत्त्वाकांक्षा व त्यातून उद्भवत असलेली गुंतागुंतीची संस्कृती यामुळे नैसर्गिक निवडीसाठीचा दबाव वाढत आहे व वाढतच जाणार आहे. त्यामुळे उत्क्रांती होत आहे हे नाकारण्यात अर्थ नाही. फक्त ही उत्क्रांती आपल्याला कुठल्या दिशेकडे नेत आहे हा आपल्यासमोरचा प्रश्न आहे. माणसाच्या निसर्गाला ओरबडण्याच्या हव्यासापायी निसर्गाची मूळ प्रभावशाली शक्ती कुंठित झाल्यामुळे आपली उत्क्रांती दिशाहीन ठरत आहे. तरीसुद्धा त्याचे परिणाम जाणवण्याइतपत आहेत. शेकडो – हजारो वर्षानंतरच्या माणसांतील जनुकां ध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात बदल झाले असतील की त्यामुळे त्याला मानव वा हो । सेपियन म्हणणेसुद्धा चुकीचे ठरू शकेल. कदाचित त्याला हो ोनिन असे नाव द्यावे लागेल. ही आजच्या माणसापेक्षा सर्वस्वी वेगळी जात असेल. ती कशी दिसेल, ती काय काय करू शकेल याबद्दल आपण ने के काही सांगू शकणार नाही.
परंतु काही नैसर्गिक नाट्यमय घटना वा उलाढालीमुळेसुद्धा या प्रक्रियेला वेग येईल. एखाद्या अनामिक रोगाच्या साथीमुळे जगातील ९० टक्के माणसं मरून जातील व उरलेल्या १० टक्क्यामध्ये या साथीला प्रतिकार करू शकणारे जनुक असल्यामुळे त्यांची नंतरची पिढी सर्वस्वी वेगळ्या जातीचीच ठरेल. हवामानातील बदल टोक गाठल्यास पृथ्वीवरील माणूस प्राणी दुसऱ्या एखाद्या ग्रह-उपग्रहावर जाऊन राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. जी काही उरली सुरली माणसे या जगात अशा स्थितीतही तगून राहू शकतील, त्यांचीसुद्धा वेगळ्या जातींत गणना करावी लागेल.
अत्याधुनिक प्रजनन-तंत्रज्ञानामुळे माणूस कृत्रिमरीत्या जनुकीय बदल घडवून आपल्याला हव्या तश्या गुणविशेष असलेल्या पिढ्यांना जन्म देईल. संगणक तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, नॅनो तंत्रज्ञान, रोबोटिक्स या क्षेत्रांतील प्रगत संशोधनामुळे सुपरह्यूनची पिढी जगावर सत्ता गाजवेल. बहतेक जण अशा गोष्टीमागे लागलेले असले तरी अपवाद म्हणून काही ‘मागासलेले’ या गोष्टीपासून दूर राहतील. अशा प्रकारे मानववंशातच दोन तट पडलेले दिसू लागतील.
तरीसुद्धा मानववंश पूर्णपणे नष्ट होण्याची शक्यता धूसर वाटते. डायनोसारसारख्या प्राणिजातीप्रमाणे स्पर्धेमळे, किंवा इतर बलाढ्य प्राण्यांच्या शिकारीमुळे, किंवा जनुकीय दुर्बलतुळे कदाचित हा प्राणी निर्वंश होणार नाही. शिवाय याची वाढत असलेली प्रचंड संख्या व त्याची बुद्धिमत्ता यांच्या जोरावर तो अजूनही बराच काळ तगून राहू शकेल. त्यामुळे त्याची समूळ नष्ट होण्याची शक्यता फार कमी आहे. परंतु मानवाच्या हातात नैसर्गिक आपत्तींना थोपवण्याची शक्ती नाही हेही तितकेच खरे. मोठमोठे उल्कापात, अस्टेरॉइड्स कोसळणे यांना मानवीवंश थांबवू शकणार नाही. कदाचित नावीन्याच्या ध्यासापायी व अती उत्सुकतेपायी माणूसच रेणू, अणू, परमाणूत बदल करून एखाद्या नवीन सजीवाची निर्मिती करू शकेल. हा सजीव कुठल्याही नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्याइतका सशक्त असेल. किंवा जैवतंत्रज्ञानातील अत्युच्च संशोधनातूनसुद्धा एखादा सजीव निर्माण होईल व मानवीवंशाला आपत्तीतून वाचवेल.
भविष्यात काय घडणार आहे हे आज ने के सांगता येत नसले तरी आपले अस्तित्व क्षणभंगुर आहे हे मात्र निश्चित!
८, लिली अपार्ट ट्स, वरदायिनी सहकारी गृहनिर्माण, पाषाण-सूस रोड, पाषाण, पुणे ४११०२१.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.