मानवी अस्तित्व (१२)

आपल्या विश्वाच्या शेवटाची सुरुवात कशी असेल?

मानवी अस्तित्वाच्या अंताबद्दल भाकीत करताना आपल्या विशाचा मृत्यूसुद्धा त्यास कारणीभूत ठरू शकेल असे म्हणावे लागते. हे विश कशाप्रकारे कोसळून जाईल याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मुळात यांची चाचणी कशी घ्यावी, त्यांची शहानिशा कशी करावी याबद्दलच अनेक शंकाकुशंका आहेत. उत्सुकता शमवण्यापोटीच हा मुद्दा उपस्थित केला जातो असेही वाटण्याची शक्यता आहे. हे विश पूर्णपणे गोठून जाईल (deep freeze), की कृष्णविवरात नाहीसे होईल की अस्टेरॉइड्सच्या माऱ्यामुळे तुकडे तुकडे होऊन ब्रह्मांडात सामावून जाईल की…. आणखी काही तरी ?
सुदीर्घ काळानंतर होऊ घातलेल्या घटनेबद्दल आताच्या सिद्धान्तावरून काही अंदाज बांधता येतील. आपल्या विशाचे प्रसरण होत आहे, या प्रसरणाचा वेगही वाढत आहे व कृष्ण-ऊर्जा त्याचा ताबा घेत आहे, याबद्दल तरी दुत असण्याचे कारण नाही. ज्याप्रकारे हे विश फुगत झालले आहे त्यावरून तरी हा अंत भयानक असेल याची खात्री पटत आहे. अवकाशाचा बहुतांश भाग अंधारात गडप होऊन दीर्घिकांचे समूह एकाकी पडत जातील. ताऱ्यांचा ह्रास होईल. या घटनाक्रमामुळे वस्तूंधील प्रोटॉन्स नष्ट होऊ लागतील. त्याचा परिणाम म्हणून वस्तूंचे रूपांतर परमाणयुक्त ध्रुवलयी वायूत होईल. कदाचित यापेक्षाही भयानक असे काही तरी घडेल. आपल्याला अजूनही कृष्ण ऊर्जा म्हणजे काय याचा नेका अंदाज आलेला नाही. त्यामुळे भविष्यकाळात ती ऊर्जा स्थिर राहील की अस्थिर याचाही नीटसा अंदाज येत नाही. अपकर्षण वाढत गेल्यामुळे विशप्रसरणाचा वेगही वाढत जाईल. ही फँटम ऊर्जा खरोखरच वाढत वाढत गेल्यास विशात हलकल्लोळ माजू शकेल. यच्चयावत सगळ्याच गोष्टीची चिरफाड होत राहील. ग्रहांचे, उपग्रहांचे तुकडे तुकडे पडतील. अवकाशातील आवरण नष्ट होत जातील. परमाणूंच्या ठिकऱ्या उडतील. त्यानंतर पुन्हा एकदा आकर्षण करू शकणारे वैशिक बळ जोर धरून अपकर्षणावर मात करील. त्यामुळे दीर्घिकांचे पुनरागमन होईल. पुन्हा एकदा महापाताची (big cruch) अवस्था ब्रह्मांडात येईल. फक्त या गोष्टी इतक्या लवकर होणार नाहीत हे आपले सुदैव ठरेल. अशा प्रकारचा महापात किंवा ग्रहांचा समूळ नाश काही हजारो कोटी वर्षांनंतर होण्याची शक्यता आहे. अजून एक भयानक शक्यता नजीकच्या काळात होऊ घातलेली आहे, असे या क्षेत्रातील अभ्यासकांना वाटत आहे. काळाचे व अवकाशाचे स्वरूपच अस्थिर होईल. तंतुसिद्धान्तानुसार विशातील निर्वात पोकळी भरकटल्यामुळे एका प्रकारची संभ्रावस्था निर्माण होईल. कण बदलतील. बल बदलतील. एवढेच नव्हे तर मिती बदलतील. आपल्या आताच्या स्थिर स्थितीचा ह्रास होऊन तिला कमी ऊर्जेचे स्वरूप प्राप्त होईल. आपल्या पायाखालची जमीन उखडून जाईल. आपले अस्तित्व नष्ट होईल. निर्वात पोकळीचा ह्रास होत असल्यास त्याची सुरुवात अवकाशात कुठून तरी होईल. त्याचा वेग वाढत वाढत shock front चे गोल तयार होऊन जवळपास प्रकाशाइतक्या वेगाने प्रवास करू लागतील. तात्त्विकदृष्ट्या प्रलयाच्या जवळ जाताना या धोक्याची पूर्वसूचना आपल्याला मिळेलही. परंतु ती अगदी कमी मुदतीची, केवळ काही मायक्रोसेकंद एवढाच दिल्यामुळे ते पुरेसे ठरणार नाही. कदाचित या क्षणी या भयानक ह्रासाची सुरुवातही झाली असेल. आपली चंद्र ectoplasm मध्ये बदलून पृथ्वीकडे चालही करत असेल. अशा प्रकारचा अंत आपल्याला टाळता येणार नाही. हे टाळण्यासाठी एखाद्या big rip निर्वात पोकळीला गिळून त्याला ऋण ऊर्जेच्या स्थितीला पोचावे लागेल. त्यानंतर अवकाश स्वतःमधील शक्तिशाली वापर करून विशाला महापातापासून वाचवू शकेल.
आपल्या विशाचा मृत्यू अशा प्रकारेच होईल असे ठामपणे सांगता येणार नाही. आपले विश बहुविशाचा एक भाग असेल व ब्रह्मांडातील विशांचे आयुष्य निर्दिष्ट असेल तर ब्रह्मांड काही प्रमाणातातील वैशिक बदलांना सहन करू शकेल. त्यामुळे आपले हे स्थानिक विश यातून सहीसलामत सुटूही शकेल. मात्र आपले भौतिक सिद्धान्त व नियम महापात वा big rip अवस्थेसमोर कोसळतील. विश गोठण्याच्या अवस्थेत गेल्यास quantum fluctuations साठी वेळ मिळून अजून एक महास्फोट होऊ शकेल. या सर्व शक्याशक्यतांचा विचार करता, आपल्या अस्तित्वाला नजीकच्या काळात कुठलीही भीती नाही एवढे मात्र आपण ठामपणे सांगू शकतो. ८, लिली अपार्टमेंटस्, वरदायिनी सहकारी गृह. संस्था, पाषाण सूस रोड, पाषाण, पुणे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.