मार्क्सवादी आणि बिगर मार्क्सवादी पुरोगामी यांच्यातील संवाद

आज आपण २१ व्या शतकात जागतिक भांडवलशाहीच्या अवस्थेत जगत आहोत. आज प्रचंड प्रमाणात महागाई, मोठ्या प्रमाणात बेकारी, रुपयाची कमालीची घसरण, त्याबरोबरच राजकारणाचे गुन्हेगारीकरण, रोज होणारे खून, अपघात, घातपात, बलात्कार, दलित, अल्पसंख्यक व दुर्बल घटक ह्यांवर अत्याचार, अशी परिस्थिती आहे. धनदांडगे, बिल्डर लाबी, वाळू माफिया, अंडरवर्ल्ड आणि देशी-परदेशी भांडवलदार आणि व्यापारी हे सारे आपल्यावर राज्य करत आहेत. ही गोष्ट मार्क्सवादी आणि बिगर मार्क्सवादी पुरोगामी जाणून आहेत. म्हणूनच आज मार्क्सवादी आणि बिगर मार्क्सवादी पुरोगामी यांच्यामध्ये संवाद होण्याची आवश्यकता आहे. अनेक भांडवली पक्ष आहेत. खपरे निधर्मी, खोटे निधर्मी, धर्मवादी, जातीयवादी प्रांतवादी पक्ष आहेत. परंतु आर्थिक धोरणांबाबत त्यांचे जवळजवळ एकमत आहे. या देशात आणि जगात समता नांदावी जातिभेद, धर्मभेद,वर्गभेद, स्त्री-पुरुषभेद नसावा असे मार्क्सवादी आणि बिगर मार्क्सवादी पुरोगाम्यांना वाटते. याबाबत त्यांच्यात एकवाक्यता आहे. मग त्यांच्यामध्ये संवाद का बरे होत नाही ? जर भांडवलदारांचे वेगवेगळे पक्ष आपले मतभेद राखूनही महत्त्वाच्या प्रश्नांवर जर एकत्र येऊ शकतात, तर लोकांचे खऱ्या अर्थाने असलेले पुरोगामी पक्ष आपले मतभेद राखूनही महत्त्वांच्या प्रश्नांवर एकत्र का येत नाहीत ? त्यांनी आले पाहिजे ही काळाची गरज आहे. पुरोगाम्यांधील अंतर्गत अनेक प्रवाह मार्क्सवाद्यांध्ये अनेक प्रवाह आहेत. तसेच लोकशाही समाजवाद्यांध्येही आहेत. तसेच ते फुले आंबेडकरवाद्यांध्येही आहेत. गांधीवाद्यांध्येही आहेत, स्त्रीवाद्यांध्येही आहेत आणि पर्यावरणवाद्यांध्येही आहेत. परंतु हे सारे वादी आणि त्यांच्यातील प्रवाह सामान्य लोकांचे प्रतिनिधित्व करत असतील, तर त्यांनी आपल्यातील मतभेदांसकट पहिला संवाद सुरू केला पाहिजे आणि किमान कार्यक्रमांवर एकत्र आले पाहिजे. असा प्रयत्न खरे म्हणजे कॉ. विलास सोनावणे यानी काही वर्षांपूर्वी सुरू केला होता. पण ती संवादप्रक्रिया फारशी पुढे गेली नाही. त्यातून यवा भारत नावाची संघटना उभा राहिली, हा भाग वेगळा. असो.
भारतात जातिव्यवस्था आहे. म्हणून ब्राह्मणशाहीही आहे. हा समाजच पुरुषसत्ताक आहे. पण राज्य म्हणून आणि शासनकर्ता वर्ग म्हणून जगभर भांडवलशाही आहे. भांडवलशाहीची पहिली शास्त्रीय समीक्षा कार्ल मार्क्सने केली आहे. म्हणून या संवादप्रक्रियेला पुढे नेण्याचे काम मार्क्सवाद्यांनीच करायला हवे. त्यासाठी अगोदर मार्क्सवाद्यांनी आपल्या निरनिराळ्या प्रवाहातील कार्यकर्ते व विचारवंत यांच्यात संवाद सुरू केला पाहिजे. आता आपण २१व्या शतकात जगत आहोत. तेव्हा २०व्या शतकातील मार्क्सवादी क्रांतिकारी नेते कार्यकर्ते व विचारवंत यामधील वैचारिक मतभेद आणि त्यांचे ओझे आपण किती दिवस बाळगून राहाणार आहोत. उलट प्रत्येकातील सकारात्मक गोष्टी घेणे आणि २१व्या शतकाला साजेशी त्यात भर घालणे म्हणजेच शास्त्रीय समाजवाद पुढे नेणे आहे. लोकशाही समाजवाद्यांनीही तसेच इतर बिगर मार्क्सवादी पुरोगाम्यांनीही आपल्यातील जुनी ओझी फेकून दिली पाहिजेत. मगच मार्क्सवादी आणि बिगर मार्क्सवादी पुरोगामी किमान कार्यक्रमावर एकत्र येतील.
किमान कार्यक्रम
किमान कार्यक्रमावर एकत्र यायचे म्हणजे काय ? तर लोकशाही, समता, सामंजस्य आणि सहिष्णुता ही जीवनमूल्ये म्हणून स्वीकारायची आणि तसा व्यवहार करायचा. ही मूल्ये दडपलेल्या, पिळवणूक होणाऱ्या समाजविभागांध्ये त्यांना जगण्यासाठी प्राथमिक आवश्यकता म्हणून असतातच. हीच जीवनमूल्ये सर्व छटांच्या पुरोगाम्यांनी दडपलेल्या आणि पिळवणूक होणाऱ्या समाजातून, समाजासाठी समाजापर्यंत फुलवायची आणि सफळ संपूर्ण बनवायची. ही जीवनमूल्येच विषमतेवर आधारलेल्या माणसामाणसांतील संबंधांपासून ते समाजरचनेपर्यंतच्या जीवनव्यवहारांना आह्वान देतील. म्हणजेच उच्चवर्णीय पुरुषसत्ताक भांडवलशाहीला आह्वान देतील. लोकशाही
मार्क्सवाद्यांपासून सर्व बिगर मार्क्सवादी पुरोगाम्यांना लोकशाही हवी असते. त्याबाबत प्रत्येक विचारसरणींची आणि त्या अंतर्गत छटांची व्याख्या थोडी थोडी वेगळी असेल. तरीही जनताभिमुख लोकशाही सर्व डाव्यांना हवी आहे. डावे ज्या दडपलेल्या पिळवणूक होणाऱ्या समाजविभागांचे प्रतिनिधित्व करतात त्यांना तर जगण्याची ती प्राथमिक अटच आहे. हे कधी कधी त्या समाजविभागांना समजत नाही. कारण लोकशाहीचे खोटे रूप ते पाहातात. तेव्हा ते लोकशाहीविरोधी भूमिका घेतात व फॅसिझम, हुकूमशाही, झोटिंगशाही, लष्करशाही यांच्या बाजूंनी हे विभाग कधी कधी भूमिका घेतात. तेव्हा खरे म्हणजे त्यांचा लोकशाहीला विरोध नसतो, तर ते अनुभवत असलेल्या खोट्या लोकशाहीविरुद्धची ती प्रतिक्रिया असते. सर्व डाव्यांचे हे कर्तव्य आहे की, त्यांचा खऱ्या लोकशाहीवरचा विशास त्यांना परत मिळवून दिला पाहिजे. तो घरापासून, शेती. कारखाने, कचेऱ्यांपर्यंत तसेच शहरी आणि ग्रामीण विभागातील सर्व समाजजीवनातील व्यवहारांपर्यंत लोकांना लोकशाही त्यांच्या हाताला लागली पाहिजे.
समता
समाजवाद, साम्यवाद, सर्वोदय, अंत्योदय, लोकशाही समाजवाद, दलितबहजनवाद, स्त्रीवादातील सर्व प्रवाह व पर्यावरणवादातील सर्व प्रवाह यांचा गाभा समता हाच आहे. मग मोठे मोठे शब्द वापरले नाहीत तरी चालू शकते. खरे म्हणजे आजची गरज या टिपिकल शब्दांना, त्या मागील संकल्पनांना, त्यांचा कितीही चांगला अर्थ असला, त्या कितीही चागंल्या असल्या तरीही आजच्या बाजाराभिमुख खाजगी नफ्यावर आधारलेल्या ग्राहकवादी जागतिक व्यवस्थेने, या (समाजवाद वगैरे) संकल्पनांना कालबाह्य, त्याज्य, तुच्छ ठरवले आहे. पण तसे समतेचे नाही. माणसाला विषमतेचे कितीही आकर्षण वाटले, तरीही, त्याच्या अंतर्मनात समतेची आस आहे. ही आसच साऱ्या पुरोगामी तत्त्वज्ञानांागील चैतन्य आहे. त्या चैतन्यालाच सर्व प्रोगाम्यांनी आपल्या मतभेदांसकट आवाहन केले पाहिजे. सर्व पुरोगाम्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, ते प्रथमतः आणि अंतिमतः मानवतावादी आहेत. सर्व पुरोगाम्यांचा मूळ गाभा हा मानवतावादच आहे. सामंजस्य
आज समाजात सर्वांत मोठी गरज कशाची असेल, तर ती सामंजस्याची आहे. दुसऱ्याचे मत, दुसऱ्याच्या श्रद्धा, दुसऱ्याचे विचार शांतपणे समजून घेण्याची गरज आहे. मार्क्सवादी विचारवंत दि. के. बेडेकर असे म्हणत असत, की एखादा विचार चूक की बरोबर यापेक्षा तो विचार निर्माण का झाला यात मला रस आहे. कारण विचार मग तो कोणताही असो, त्याला भौतिक परिस्थिती कारणीभूत असते आणि त्याला भौतिक आधार असतो. प्रतिगामी विचारांचे खंडन करण्यासाठी हे आवश्यक आहे. तसेच पुरोगाम्यांतर्गत विविध मतप्रवाह का तयार झाले, त्याला भौतिक आधार काय आहे, हे समजून घेण्यासाठी तर खूपच आवश्यक आहे. यातूनच विविध विचारप्रणाली मानणाऱ्यांध्ये आणि त्यातील विविध छटांचा आविष्कार करणाऱ्यांध्ये सामंजस्य निर्माण होऊ शकते. आणि असे सामंजस्य सध्याच्या काळात खूपच महत्त्वाचे आहे. कारण आजचा समाज आणि त्यातील दडपलेला, पिळवणूक होणारा समाजविभाग हा अनेक पैलूंनी आणि अनेक कारणांनी दडपणूक, छळवणूक आणि पिळवणूक सहन करणारा आहे. तेव्हा या सर्व पैलूंचा आणि सर्व कारणांचा सांगोपांग विचार आणि त्या अनुषंगाने ते नष्ट करण्यासाठी आचरण करण्यासाठी गरजेचे आहे. हे परस्परसामंजस्याशिवाय अशक्य आहे.
सहिष्णुता
आजकाल जगभर आणि आपल्या देशात गरिबी, बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार यांच्या इतकीच सगळ्यांत मोठी समस्या कोणती असेल, तर ती असहिष्णुतेची आहे. आज जरा वेगळा विचार मांडला तर तो दसऱ्या व्यक्तीला खपत नाही. ती व्यक्ती संवाद करण्याऐवजी हमरीतुरीवर येऊन शत्रुत्वच पत्करते. हे कुठल्याही पुरोगामी विचाराला, जो असा दावा करतो, की त्याला समाज पुढे न्यायचा आहे, त्यासाठी घातक आहे. असहिष्णुता हे प्रतिगामी विचारवाहकांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. परंतु पुरोगामी विचारांना लागलेला तो रोग आहे. आणि त्यावर तातडीने इलाज करून त्यातून मुक्त व्हायला हवे. आणि निकोप मनोवृत्ती जोपासायला हवी. कुठल्याही पुरोगामी विचाराच्या वाहकांनी सहिष्णु असायलाच हवे. ज्या समाजाचे नेतृत्व पुरोगामी करू पाहातात, त्या समाजात जगण्यासाठी सहिष्णुता असायलाच लागते. परंतु प्रतिगामी विचारवाहक या समाजविभागात शिरतात आणि त्यांच्यात असहिष्णुतेचे विष पेरतात. मग याचा परिणाम म्हणून जाती- जातीत, धर्मा-धर्मात, तसेच स्त्रीपुरुषांध्ये असहिष्णुता वाढीस लागते. आणि मग उच्चजातीच्या, उच्चवर्गाच्या, बहुसंख्यक धार्मिकांच्या तसेच पुरुषी मनोवृतीच्या पुरुषांच्या समूहाची झोटिंगशाही सुरू होते. हीच झोटिंगशाही मनोवृती जर दडपलेल्या, छळवणूक, पिळवणूक झालेल्या समाजविभागांनी आणि त्यांचे नेतृत्व करणाऱ्या, त्यांच्यात काम करणाऱ्या पुरोगामी विचारवाहकांनी दाखवली, तर ते मानत असलेल्या लोकशाही व समता या मूल्यांनाच छेद जातो. मग ज्या उद्देशांसाठी लढायचे त्या उद्देशांनाच आपल्याच हातांनी हरताळ फासल्यासारखे होते.
काय करायला हवे?
मार्क्सवाद्यांनी लोकशाही समाजवाद्यांचा लोकशाहीचा आग्रह आपला मानला पाहिजे. तसेच गांधीवाद्यांचे अहिंसेचे मत गांभीर्याने घेतले पाहिजे. आंबडेकरांचा जातिअंताचा लढा आपला मानायला हवा. स्त्रीवाद्यांचा स्त्री-माणूसपणासाठीचा लढा आपल्या आचारविचारांचा भाग करण्याला हवा. तसेच जगात कोणतेही बदल करायचे असतील तर अगोदर पृथ्वी वाचली पाहिजे. तेव्हा पर्यावरणवाद्यांचे म्हणणेही गांभीर्याने घेऊन आपल्या विचारात त्याचा अंतर्भाव करायला हवा.
मी मार्क्सवादी असल्यामुळे मार्क्सवाद्यांनी काय केले पाहिजे हे आग्रहाने मांडू शकतो. परंतु बिगर मार्क्सवादी पुरोगाम्यांनी काय केले पाहिजे हे फक्त सुचवू शकतो. पहिली गोष्ट मार्क्सवाद्यांबद्दलच्या सर्व पूर्वग्रहांतून त्यांनी मुक्त व्हायला हवे. सर्व पुरोगामी आपण भांडवलशाहीत जगत आहोत हे मानतातच. मग आजची भांडवलशाही समजून घेत असताना सर्व पुरोगाम्यांच्या अंतर्गत विचारसरणीतून सकारात्मक काय काय घेता येईल हे त्यांचे त्यांनी ठरवायला हवे. त्यासाठी आपली विचारसरणी सोडायची आवश्यकता नाही. आपल्या विचारसरणीशी प्रामाणिक राहून इतर पुरोगामी विचारांच्या खिडक्या उघडल्या तर त्यातून येणारे विचारांचे वारे आपण अंगावर झेलायला त्यांनी घाबरता कामा नये. त्या विचारप्रणालीतील शुद्ध हवेचा शास घ्यायची मनाची तयारी ठेवायला हवी.
शेवटी एकच सांगायचे आहे. सर्व पुरोगाम्यांनो एक व्हा. परस्परांशी संवाद साधा. सामंजस्य दाखवा. सहिष्णुता दाखवा. लोकशाहीचा सूर्य आणि समतेचा चंद्र तुच्याशी हातमिळवणी करेल. कारण तुच्या बरोबर जो समाज आहे, त्याला लोकशाहीच्या सूर्याची आणि समतेच्या चंद्राशी हातमिळवणी करण्याची, त्याच्या जगण्यासाठीची ती अपरिहार्य अशी मूलप्रेरणात्मक गरज आहे. सी ३५ ए. अनंत निवास, वीर सावरकर मार्ग, दादर, मुंबई २८. भ्र.ध्व.: ९००४६१४५९४, इ-मेल … raj27k@ymail.com

नरेंद्र मोदी पंतप्रधान का होणार नाहीत ? हरीश शेट्टी (अनुवादः सीमंतिनी चाफळकर)
सर्व आघाडीच्या उद्योगपतींचे सेंलन गुजरातमध्ये जसे नियमितपणे होते तसे भारतातल्या कुठल्याच राज्यात आजपर्यंत कधीच पाहायला मिळाले नाही. हे घडवून आणणारी व्यक्ती म्हणजे नरेंद्र मोदी. पण गुजरातमध्ये फक्त मोदीच प्रकाशझोतात असतात, इतर कोणीच नाही. प्रादेशिक नेत्यापासून सार्वभौ सत्ताधीशापर्यंतचा बदल सोपा नाही. योद्ध्यापासून योग्यापर्यंतचा प्रवास करण्यात मोदी कदाचित यशस्वी होणार नाहीत. . . श्री. मो. क. गांधीनी भारतीय मानसिकतेचे पदर समजून घेण्यासाठी संपूर्ण भारत दोनदा पालथा घातला. साधे दिसणे, निर्धन असणे आणि अहिंसेचा अंगीकार हीच देशाला जागे करण्याची सूत्रे असू शकतात हे त्यांना समजले. ऋषीच्या पोशाखात ते नैसर्गिकपणे समरस झाले आणि सात्त्विक प्रतीकांची अन् उपक्रमांची त्यांनी निवड केली. भारतीय जनतेला नेत्यांधले स्त्रीतत्त्व भावते. कविमनाच्या नेहरूंनी वल्लभभाई पटेलांवर आघाडी घेतली. सौम्य व्यक्तिमत्त्वाचे व्ही. पी. सिंग यशस्वी झाले. लढाऊ शरद पवार नाकारले गेले तर गुळमुळीत मऊ नरसिंहराव खुर्चीवर बसले. ग्रामीण भारतात सोनिया गांधीनी केलेल्या हळुवार भावनिक आवाहनांनी आक्रमक ‘शायनिंग इंडिया’ प्रचाराला नमवले. ‘मौत का सौदागर’ आणि असे काही वाक्प्रचार सोडले तर सोनिया गांधी आणि त्यांचा परिवार सौम्य भाषा वापरतात. उदाहरण द्यायचे तर वरुण गांधीनी केलेल्या विषारी टीकेला त्यांच्या चुलत भावंडांनी ‘त्यांच्या बोलण्याचे आम्हाला दुःख होते’ इतकेच उत्तर दिले.
गेल्या काही वर्षांत गुजरातमध्ये झालेल्या महत्त्वाच्या तीन प्रचारकी उपक्रमांत नरेंद्र मोदी सर्वेसर्वा होते. श्रेय वाटून घ्यायला कोणी सहकारी नसल्याने दिसणारी ‘सब कुछ मोदी’ प्रतिमा त्यांच्या विरोधात जाईल. तिथे फक्त मोदी आणि मोदीच दिसतात. भारतीयांना त्यांच्या राजाच्या व्यक्तिमत्त्वात समर्पण, सेवाभाव, त्याग पाहायला आवडते. यातले मोदींमध्ये काहीच दिसत नाही. ‘हे मी नाही, त्या सर्वांनी साध्य केले’ असे धोनी वर्ल्ड कप जिंकल्यावर म्हणाला. पण मोदींनी हे कधीच प्रत्यक्ष म्हटले नाही किंवा सुचवले नाही.
इंदिरा गांधी सुरुवातीला नवशिक्या होत्या. देवळात जायच्या, बायकांना भेटायच्या, त्यांनी गरिबी हटाव घोषणा दिली. आणीबाणीत त्यांच्या ठाम पुरुषी वागण्यामुळे त्या अप्रिय झाल्या अन् हरल्या. नंतर जनता सरकारने त्यांना शहा कमिशन पुढे खेचले आणि दिवसांगून दिवस सुनावणी चालली. तेव्हा देश संतापला, ‘बाईला किती त्रास द्यायचा?’ जनता पार्टीतल्या अंतर्गत भांडणाबरोबरच इंदिरा गांधींच्या स्त्रीत्वाने काँग्रेसला परत सत्तेवर आणले. नरेंद्र मोदींनी सोनिया गांधींवर केलेली व्यक्तिगत टीका मोदींचे नुकसान करेल.
लालकृष्ण अडवाणींपेक्षा अटल बिहारी वाजपेयी त्यांच्या मित्रपक्षांना पसंत होते कारण वाजपेयी कटकटे अन् सैनिकी वृत्तीचे नव्हते. ते कवी होते, सहज भावुक व्हायचे, सौम्य, जिंकणारे हास्य आणि स्त्रीतत्त्वाचा अंश त्यांच्यात होता. जे त्यांना मवाळ अन् अडवाणींना जहाल मानतात, ते हे विसरतात की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर दोघांचे विचार सारखेच आहेत, पण दृश्य व्यक्तिमत्त्व मात्र दोघांचेही खूप वेगळे आहे. म्हणूनच अडवाणी कधीच पंतप्रधान होऊ शकणार नाहीत.
ममता बॅनर्जी, उमा भारती किंवा मोरारजी देसाई यांची व्यक्तिमत्त्वे पुरुषी आहेत. आणीबाणीत मोरारजी देसाई तुलनेने कमी पुरुषी होते म्हणून स्वीकारले गेले. भाजप कार्यकर्त्यांचा उदोउदो अन् मोदींना असलेला प्रचंड पाठिंबा योग्य आहे कारण ते कार्यक्षम आहेत, स्वच्छ आहेत आणि एक उत्तम व्यवस्थापक आहेत. गुजरातमध्ये अनेक राज्यांपेक्षा जास्त नोकऱ्या आहेत, जास्त पाणी आणि वीज आहे याचे श्रेय मोदींना आहे. टाटांनी त्यांच्या नॅनोसाठी गुजरात निवडला तो केवळ मोदींच्या वेग, कार्यक्षमता, व्यवस्थितपणा आणि गंभीर दृष्टिकोनामुळे. पण व्यवस्थापक पंतप्रधान होऊ शकत नाहीत. बदल हृदयात अन् आत्म्यात होणे आवश्यक आहे.
अलीकडे नरेंद्र मोदी जास्त शांत आणि मृदू झाले आहेत. त्यांचा सूर मवाळ असतो. पण २००२ च्या दंग्यात झालेल्या वाईट सरकारी कारभाराबद्दल ते माफी मागतील ? हिंदू आणि मुस्लिम दोघांच्याही कायमच्या अंतरलेल्या प्रियजनांसाठी ते अश्रू ढाळतील. . ? आजच्या निरर्थक राजकारणातून बाहेर पडून ते प्रायश्चित्त घेतील . . ? त्यांनी ते केलेले नाही आणि विकासाचे कितीही नवे उपक्रम या आध्यात्मिक कृतीची जागा घेऊ शकणार नाहीत.
अब्जावधी पैलू असलेले भारतीय समाजमन वैशिष्ट्यपूर्ण आहे. ७० च्या दशकात जनसंघाविरुद्धची संपूर्ण राजकीय नाराजी आणि आज मोदी विरुद्ध इतर सर्व या स्थितीत अनेक संदेश दडलेले आहेत. मोदींना त्यांच्या सर्व ज्येष्ठांकडूनही नकारात्मक प्रतिक्रिया मिळतात कारण ते उद्धट आहेत आणि गुजरातमध्ये तर त्यांच्यामागे कुणी ज्येष्ठच नाहीत. ते शक्तिमान आणि एकाधिकारशहा आहेत. पण प्रेळ अन् विशासार्ह नाहीत. वाजपेयी अन् इतर पंतप्रधानांवर त्यांचे विरोधकही प्रे करीत. मोदींची प्रतिमा मात्र घाईत असलेला जादूगार अशी भासवली जात आहे.
भारताला खंबीर पंतप्रधान हवा आहे पण लोकांना सौम्य बोलणारा, त्यांच्या जखमा भरू शकणारा नेता हवा आहे. म्हणून मनमोहन सिंगांनी दोन निवडणुका जिंकल्या. १९४७ मध्ये देशाला एक नकाशा मिळाला. पण स्वातंत्र्यसंग्राम आजही जारी आहे. आपल्याला माओवाद्यांचा अन दहशतवाद्यांचा मुकाबला करू शकणारे मोदी केंद्रात हवेत. पण जनतेला शक्तिमान नेता हवा आहे जो जखमाही भरू शकेल. नरेंद्र मोदी
या अपेक्षांना पुरे पडणार नाहीत. . . पण त्यांना हे लक्षात येईल तेव्हा कदाचित, जरा उशीर झाला असेल. .

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.