ॲलन ट्यूरिंग संगणन आणि कृत्रिम बुद्धिमतेचा जनक मानला जातो. दुसरे महायुद्ध जिंकण्यात त्याचा मोठा वाटा मानला जातो. १९५२ साली, त्याच्या घरी चोरी झाली. रिवाजाप्रमाणे पोलीस आले. तपासादरम्यान ॲलन ट्यूरिंगचे त्याच्या मित्राशी शारीरिक संबंध असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्याला अटक झाली आणि त्याच्यावर खटला भरला. ट्यूरिंग दोषी मानला गेला आणि त्याला शिक्षेचे दोन पर्याय देण्यात आले – दोन वर्षे कारावास किंवा रासायनिक पद्धतीने कॅस्ट्रेशन. ॲलनने दुसरा पर्याय निवडला. पण त्यानंतरही पोलिसांचा ससेमिरा त्याला चुकवता आला नाही. जागतिक किर्तीचा वैज्ञानिक असलेला ॲलन ट्यूरिंग ही अवहेलना आणि मानहानी सहन करू शकला नाही आणि सायनाईड ठेवलेले सफरचंद खाऊन त्याने आत्महत्या केली.
विषय «निसर्ग»
पृथ्वीच्या हवामानबदलाचे उग्र स्वरूप
गेल्या दहा वर्षांत उष्णतेची लाट, जंगलातील वणवा, महापूर, ढगफुटी इत्यादींबद्दलच्या बातम्या ऐकायला/वाचायला मिळाल्या नसतील, त्यापेक्षा जास्त प्रमाणात मागच्या वर्षी त्याबद्दल ऐकायला/वाचायला मिळाल्या आहेत. जुलै २०२३ मध्ये उष्माघाताने अनेक लोक मेले. जुलै-ऑगस्टमध्ये उत्तरभारतात व ऑक्टोबरमध्ये सिक्किम राज्यात महापूर आल्यामुळे व भूस्खलनामुळे शेकडोंनी जीवितहानी झाली, हजारो बेघर झाले. पिकांचे नुकसान झाले व रस्ते, पुलांसारख्या मूलभूत सुविधांची पडझड झाली. दिल्लीच्या काही भागात गंगा व यमुना दुथडी भरून वाहू लागल्या. गेल्या ४५ वर्षांत पोचली नाही त्यापेक्षा जास्त उंची पाण्याच्या पातळीने गाठली व मोठ्या प्रमाणात महापूर आला.
वन्यजीव आणि शेतीप्रश्न
आपल्या महाराष्ट्र राज्यात मागच्या पाच-सात वर्षांमध्ये वन्यजीव आणि शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये होणाऱ्या नुकसानाचा संघर्ष तीव्र झालेला पाहायला मिळतो आहे. गावकट्ट्यावर रोजच “आज अमुक एका शेतकऱ्याचे नुकसान झाले” असे शेतकऱ्यांकडून ऐकायला मिळते. वन्यजीवामुळे झालेल्या नुकसानाच्या मन हेलावून टाकणाऱ्या कहाण्या गावामधील प्रत्येकच शेतकऱ्याच्या आहेत. मी ज्या गावात राहतो त्या गावची एक अल्पभूधारक शेतकरी महिला आहे. ती एकल महिला आहे. पंधरा वर्षांपूर्वी रेल्वे अपघातात काकाचे निधन झाले. आणि फक्त दोन एकर शेतीच्या भरवशावर ती तीन मुलांचा सांभाळ करत आहे. एके दिवशी शेतीत झालेले नुकसान पाहून ती घरी आली आणि मोठा आकांत करून रडायला लागली.
पुस्तक परिचय – सह्याचला आणि मी – एक प्रेमकहाणी
लेखक: माधव गाडगीळ
प्रकाशक: राजहंस प्रकाशन
परवाच ‘सह्याचला आणि मी – एक प्रेमकहाणी’ हे माधव गाडगीळ यांचे पुस्तक हातात पडले; आणि मी ते आधाशासारखे वाचून काढले. एक निसर्गप्रेमी, पद्मभूषण, पर्यावरणवादी चळवळीतला एक आधारस्तंभ आणि भटनागर प्रशस्ती पुरस्कार मिळालेला एक विद्वान म्हणून मी त्यांना ओळखून होतोच. तशा आमच्या गाठीभेटीही झाल्या होत्या. माझ्या ‘अनर्थ’ पुस्तकासाठी त्यांनी ब्लर्बही दिला होता. पण तरीही त्यांचे हे पुस्तक वाचल्यावर मला माधव गाडगीळ ही काय असामी आहे हे खऱ्या अर्थाने कळले.
या माणसाने निसर्गावर प्रेम केले. सर्व प्राणी, वनस्पती, किडे, भुंगे – सर्व कीटक, दगड, धोंडे, पर्वत, नद्या, समुद्र, त्यातले मासे, हत्ती, वाघ, सिंह, एवढेच काय इथल्या शेवाळ्यावरही याने प्रेम केले!