विषय «तत्त्वज्ञान»

मध्यस्थ दर्शन-सहअस्तित्ववाद : एक सांप्रत दर्शन – परिचय 

‘आजचा सुधारक’च्या ऑक्टोबर-२३ च्या अंकातील श्रीधर सुरोशे यांचा ‘मार्क्सची अर्थमीमांसा : भाग २‘ हा लेख वाचला. त्यातील विचार आणि मी ज्या दर्शनाचा अभ्यास करीत आहे, यांतील साम्यस्थळे मला दिसली. त्यावरील माझ्या अभिप्रायांवर ‘आजच्या सुधारक’ने प्रोत्साहन दिले की ‘मध्यस्थ दर्शन-सहअस्तित्ववाद’ याविषयी मी काही लिहावे, ज्याने एक नवा मौलिक विचार लोकांसमोर येईल आणि संवादाचा एक मोठा अवकाश खुला होईल. मला लिहिते केल्याबद्दल ‘सुधारक’चे आभार.

भूमिका : 

सर्वप्रथम हे सांगणे आवश्यक आहे की मध्यस्थ दर्शन-सहअस्तित्ववाद या दर्शनाचा मी गेले काही वर्षे अभ्यास करतो आहे.

पुढे वाचा

मानवी ज्ञानाच्या मर्यादा

सर्वसामान्यपणे एखाद्या विषयाची प्राथमिक ओळख करून देताना त्या विषयाशी संबंधित बोधकथा विषय समजावून घ्यायला मदत करतात. मीही या लेखात अशा कथांची मदत घेणार आहे. पण या कथा एकाच वेळी अनेक पातळीवर वावरत असतात. त्यामुळे त्या निरनिराळ्या वाचकांना निरनिराळे बोध देण्याची शक्यता असते. यासाठी, मला काय म्हणायचे आहे ते प्रथम सूत्ररूपाने पाहूया आणि त्यानंतर आपण स्पष्टीकरणाकडे वळूया. 

मला म्हणायचे आहे ते असे:

१. त्रिकालाबाधित, संदर्भरहित सत्य नावाची गोष्ट नसते आणि असली तरी ती तशी आहे हे सिद्ध करणे शक्य नसते. 
२. ज्याला आपण सत्य म्हणतो ते प्रत्यक्षात गृहीतक किंवा त्यातून काढलेले निष्कर्ष असतात.

पुढे वाचा

नीतिशास्त्राचा आधुनिक परिचय – प्रस्तावना

‘आजचा सुधारक’चा ऑक्टोबर, २०२२ चा अंक नेहमीप्रमाणे अतिशय वाचनीय आणि चिंतनीय झाला आहे, हे निःशंक आहे. त्यासाठी मी लेखक आणि संपादक यांचे मनापासून अभिनंदन करतो. 

या अंकात तात्त्विक (Philosophical) अंगाने बरेच लेखन आढळते. विश्वविख्यात तत्त्ववेत्ता बर्ट्रांड रसेल (Bertrand Arthur William Russell, जन्म:१८ मे १८७२-०२ फेब्रुवारी १९७०) याच्या ‘A Philosophy for Our Time’ या लेखाच्या श्रीधर सुरोशे यांनी केलेल्या ‘आपल्या काळाकरिता तत्त्वज्ञान’ या अनुवादापासून ‘दुर्बलांनी न्याय मागण्यासाठी कुठं जावं…?’ या साहेबराव राठोड यांच्या पत्रलेखनापर्यंत बहुतेक लेख तात्त्विक स्वरूपाचे आहेत. चिंतनाला प्रवृत्त करणारे आहेत.

पुढे वाचा

विक्रम आणि वेताळ – भाग १०

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलू लागला.

“राजन्, ह्या खेपेला बराच उशीर केलास, काय कारण झालं? सोपवलेल्या कामाचा विसर तर पडला नाही ना तुला?”

“छे, छे, चांगलंच लक्षात आहे माझ्या सगळं. परंतु त्यासाठी तू काही कालमर्यादा घालून दिल्याचं मात्र स्मरणात नाही माझ्या. पण असो.”

“आपण बनवलेली ती सांकल्पनिक मोजपट्टी वास्तवातील सुखदुःखाशी जुळवून दाखवल्याशिवाय सोडणार नाही असं म्हणाला होतास तू मला!”

“पण काय रे, ती मोजपट्टी वास्तवातील सुखदुःखाशी जुळवून बघण्यापूर्वी वास्तव म्हणजे काय हे नको का आपण समजून घ्यायला?”

पुढे वाचा

बुद्धिप्रामाण्यवादाचे स्वरूप

प्रा. मे.पुं रेगे ह्यांचे बुद्धिप्रामाण्यवादाचे विवेचन :

आज एकविसाव्या शतकातही ‘बुद्धिप्रामाण्यवादाचा’ उत्स्फूर्तपणे प्रचार करण्याची, त्याचे महत्त्व पटवून सांगण्याची आवश्यकता अनेकांना वाटते, त्यामागचे कारण काय? बुद्धिप्रामाण्यवादाचा प्रसार करणे हे आपले जीवितकार्य आहे आणि ते आपण केले तरच भारतीय समाजात काही ‘सुधारणा’ होऊ शकेल, अशी समजूत बहुधा त्यामागे असते. बुद्धिप्रामाण्यवाद ही केवळ एक विचारसरणी नसून, ती एक जीवनपद्धती आहे. मनुष्याने आपले सर्व जीवन बुद्धिप्रामाण्याने जगावे, त्याच्या जीवनाची सर्व अंगोपांगे ही बुद्धिप्रामाण्यानेच नियंत्रित व्हावीत, असे हे प्रतिपादन असते.

बुद्धिप्रामाण्यवादाचा जीवनमार्ग म्हणून स्वीकार आणि प्रचार करण्याआधी एक प्रश्न विचारला पाहिजे, तो म्हणजे : बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजे नेमके काय? 

पुढे वाचा

आपल्या काळाकरिता तत्त्वज्ञान 

तत्त्वज्ञानाने आजतागायत जी कार्ये इतर काळांत पार पाडलेली आहेत, त्यांच्याशी तुलना केली असता आपल्या आजच्या काळाकरिता तत्त्वज्ञान काही तऱ्हेवाईक प्रकारचे कार्य करीत आहे अथवा करू शकेल, असे मी समजत नाही. तत्त्वज्ञानाचे एक निश्चित असे शाश्वत मूल्य असते आणि बहुधा ते अपरिवर्तनीय स्वरूपाचे असते. या गोष्टीला एखादा अपवाद असलाच, तर तो असा : सुज्ञतेच्या संदर्भात एक युग हे इतर युगांच्या तुलनेत अगदीच वेगळे ठरते आणि परिणामतः त्यामुळे त्या युगांना तत्त्वज्ञानाची अधिकच गरज भासते.

आजच्या काळाकडे दृष्टिक्षेप टाकला असता आणि त्यासंदर्भात विविध अंगांनी विचार करता हे सहज दिसून येईल की हा काळ सुज्ञतेचा (Wisdom) काळ नाही किंवा अल्प-सुज्ञता हेच या काळाचे व्यवच्छेदक लक्षण दिसत आहे आणि म्हणूनच तत्त्वज्ञानाची जी शिकवण असते, तिचे लाभ ह्या काळाला करून घेता येण्याची संभावनीयता निर्माण झाली आहे.

पुढे वाचा

अज्ञानकोश

पुस्तकांमधील ‘शामची आई’ जशी आठवणीत आहे; तशी कित्येक पुस्तकंसुद्धा. अशीच एक आठवण. मी लहान असताना एकदा शास्त्रीजींकडे (तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी) बाबांचं काही काम होतं. ते मलाही घेऊन गेले. एका विद्वान व्यक्तीला आपण भेटणार आहोत एवढीच माझी समज. मी गेलो. पुस्तकांच्या गराड्यातच ते बसले होते. त्यांची आणि बाबांची काय चर्चा झाली हे काही मला कळत नव्हतं, पण तिथल्या एका पुस्तकाकडे मात्र माझं लक्ष खिळून राहिलं.

ते पुस्तक होतं ‘अज्ञानकोश’ (Encyclopaedia of ignorance)! माझ्या नजरेतली उत्सुकता पाहून शास्त्रीजींनीच मला माहिती दिली. 

ते संपादित करत होते तो विश्वकोश, तो तर ज्ञानाचा कोश, सतत वर्धिष्णू होणारा आणि हा होता अज्ञानकोश.

पुढे वाचा

इतिहासाचे मूलभूत प्रश्न – भाग २

“The educator has to be educated,in modern jargon,the brain of the brain-washer has itself been washed.”  — Karl Marx

इतिहासाचे चिकित्सक तत्त्वज्ञान हे जेव्हा इतिहासाला स्व-रूपाची जाणीव झाली व ते जाणून घेण्याची जिज्ञासा उत्पन्न झाली; तेव्हाच निर्माण होणे शक्य होते. अशी जाणीव पाश्चात्य परंपरेत आपल्याला अठराव्या शतकापासून निर्माण होत आलेली दिसून येते. ही इतिहासविषयक ‘जाणीवेची जाणीव’ असल्याने तिचे स्वरूप ‘चिकित्सक’ होते. इतिहासाविषयीची ही तत्त्वज्ञानात्मक चिकित्सा दोन दिशांनी झालेली आढळून येते. ह्या दोन दिशांतील मूलभूत भेद त्यांच्या मानवी प्रकृतीविषयक तत्त्वज्ञानात, तसेच इतिहास संशोधनाच्या रीतींमधील भेदांमध्ये आहे.

पुढे वाचा

इतिहासाचे मूलभूत प्रश्न – भाग १

“To the historian, the activities whose history he is studying are not spectacles to be watched, but experiences to be lived through in his own mind; they are objective, or known to him, only because they are also subjective, or activities of his own.” – R.G.Collingwood

(The Idea of History)

इतिहास हा शब्द आपण अनेक भिन्न अर्थांनी वापरतो; पण त्यांपैकी इतिहासाचे दोन अन्वयार्थ विशेष महत्त्वपावले आहेत. इतिहासाचा संबंध काळाशी, विशेषतः भूतकाळाशी असतो आणि गतकाळात घडलेल्या विविध घटना – विवक्षित अवकाश व कालात घडलेल्या – असतात.

पुढे वाचा

विक्रम आणि वेताळ – भाग ९

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. आणि थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलू लागला.

“राजन्, आता एकदा आपण सिंहावलोकन करूया.”

“तुला रे कशाला हवं सिंहावलोकन? तसाही फांदीवर उलटा लटकत करतोसच की मागच्या वाटेचं अवलोकन. वेताळावलोकन म्हण हवं तर त्याला.”

“बरं,बाबा, तसं म्हण. खूश?
तर, सर्वप्रथम फलज्योतिषाच्या लोकप्रियतेची कारणे कोणती ह्या प्रश्नावर तू ह्या सर्व कारणांच्या मुळाशी माणसाच्या दोन स्वाभाविक इच्छा आहेत असे म्हटले होतेस. पहिली आपल्या आयुष्यातील दुःख निवारण करण्याची आणि दुसरी भविष्याच्या अनिश्चिततेतून येणारी असुरक्षितता घालवण्याची.

पुढे वाचा