आरएसएसचे स्वयंसेवक, पण सध्या देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री असलेले अनुक्रमे नरेंद्र मोदी व अमित शहा या दोन मंत्र्यांच्या पुढाकाराने देशातील महत्त्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत. आरएसएसच्या अज्येंड्यानुसार आजपर्यंत त्यांनी काश्मिरातील कलम ३७०, ट्रिपल तलाक, बीफबंदी, नोटबंदी, जी.एस.टी. यांसारखे देशातील मुस्लिमांना व इतर सर्वच जनतेला त्रासदायक होतील असे निर्णय घेतलेले आहेत. ९ डिसेंबर २०१९ रोजी लोकसभेत आपल्या पाशवी बहुमताच्या जोरावर संमत करून घेतलेला सी.ए.ए. कायदा अशांपैकीच एक आहे. त्याला राज्यसभेतही मंजुरी मिळाली. लगोलग त्यावर राष्ट्रपतींनी सही करून त्याला कायद्याचे स्वरूप दिले. असा कायदा झाल्याबरोबर आसाम, त्रिपुरा इत्यादी पूर्वेतर राज्यातून असंतोषाचा भडका उडाला.
Author archives
आंबेडकरांचे विचार
(Abstract
Historic Perspective of Relevance and Impact of Dr. Babasaheb Ambedkar’s thought in The Contemporary Age)
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेची ऐतिहासिकता आणि समकालीन संदर्भात त्याचे उपयोजन व मूल्यांकन करण्याच्या दृष्टीने काही पैलूंवर मी माझे काही विचार आपल्यासमोर ठेवतो आहे.
१. बाबासाहेबांच्या प्रतिमा व प्रतीकाचे सापेक्ष विश्लेषण करणे गरजेचे आहे. भारतीय जातिसमाजात त्यांची प्रतिमा – (१) एका अस्पृश्य जातीचे म्हणजे महार जातीचे, (२) अस्पृष्य जातिसमूहाचे आणि (३) भारताला राष्ट्र-राज्य म्हणून घडविण्यासाठी योगदान करणारे राष्ट्रीय नेते या तीन प्रकारांत पाहिली जाते. १९९०-२०००च्या कालखंडात जागतिकीकरणानंतर ही प्रतिमा विश्वमहामानवाची झाली आहे.
आय डू व्हॉट आय डू
‘आय डू व्हॉट आय डू’ डॉ. रघुराम राजन यांचे आज गाजत असलेले पुस्तक. ते वाचून मला लिखाण करावेच लागले.’….मार्च २०१८
मला अर्थशास्त्रामध्ये कसा काय रस उत्पन्न झाला ते आठवत नाही. पण जॉन केनेथ गालब्रेथ यांची ‘इंडस्ट्रियल सोसायटी’, ‘पॉवर’ यांसारखी गाजलेली काही पुस्तके वाचल्यापासून तो विषय समजायला आणि म्हणून आवडायला लागला. नंतरही अनेक अर्थतज्ज्ञांची पुस्तके जेवढी जमतील तेवढी वाचली आणि त्यातून माझी एक समज घडत गेली. आर्थिक विकासाच्या संदर्भात नागरी अर्थव्यवस्था आणि ग्रामीण ‘नांगरी’ अर्थव्यवस्था (आसाराम लोमटे यांच्या ‘धूळपेर’मधील भावलेली ही व्याख्या) यांबाबत थोडा अभ्यास केला होता.
जंक फूड
जंक फूड हा शब्दच फसवा व विरोधाभासी आहे. कुठलेही अन्न हे जंक कसे काय असू शकते? जंक या शब्दाचा अर्थच मुळी भंगार, टाकाऊ असा होतो व कुठलीही खाण्याची वस्तू ही अशी असणे शक्यच नाही. तरीही जंक फूड हा शब्द इतका प्रचलित झालेला आहे की त्यामधील विरोधाभास सहज लक्षातदेखील येत नाही.
खरेतर मनुष्य जन्माला आल्यापासून ते अखेरचा श्वास घेईपर्यंत तो खातच असतो व तेही दिवसातून किमान ३ वेळा. याचा अर्थ मनुष्याचे सरासरी आयुर्मान ८० वर्षे धरले तर त्याच्या संपूर्ण आयुष्यात साधारणपणे ८८००० वेळा खाण्याची क्रिया घडते.
शेतीक्षेत्रातील महिलांच्या सबलीकरणासाठी स्वयंसहाय्य गट
भारतात कामकरी महिलांपैकी ८०% महिला शेतीत व संलग्न व्यवसायात आहेत. शेती, पशुपालन, वनीकरण, मासेमारी या व्यवसायात शेतकरी, मजूर, किरकोळ विक्रेते म्हणून त्या काम करतात. या महिला सामाजिक, आर्थिक, राजकीय व आरोग्य या दृष्टीने सर्वात जास्त वंचित आहेत. या महिलांचे सबलीकरण करून त्यांचा विकास करणे हे फार मोठे आव्हान आहे.
आर्थिक स्थिती- शेतीमध्ये महिला पेरणी, रोवणी, निंदणी, कापणी, खुडणी, वेचणी यांसारखी अकुशल व कष्टाची कामे करतात. शेतीमध्ये काम करणाऱ्या महिलांची मजुरी ही पुरुषांपेक्षा कमी असते व त्यांना नियमित काम मिळत नाही. कोरडवाहू शेतीत केवळ ४०-५० दिवस काम मिळते व ओलीत क्षेत्रात ८० ते १०० दिवस काम मिळते.
आवाहन
स्नेह.
१ एप्रिलला ‘सुधारक’चा पुढील अंक प्रकाशित होत आहे. ह्या अंकासाठी विषयाचे बंधन नसून आपल्याला जवळचा वाटणारा कोणताही संवेदनशील विषय आपण घेऊ शकता. ‘सुधारक’ कथा, कविता, ललित, विनोदी, विडंबनात्मक, निबंधात्मक, परीक्षणात्मक अशा कुठल्याही स्वरुपातील लिखाणाचे स्वागत करते.
– सद्यःस्थितीचा आढावा घ्यायचा झाल्यास नागरिकत्व संशोधन कायद्याविषयीच्या समज-गैरसमजांवर तथ्यात्मक, विश्लेषणात्मक असे काही आपण घेऊ शकतो.
– करोनाच्या विषाणूमुळे जगभरात निर्माण झालेल्या/ होत असल्या भयावह स्थितीविषयी काही तथ्ये व काही उपाययोजना यांवरही काही वैज्ञानिक माहिती यावी असे वाटते.
– ‘महिला दिना’च्या निमित्ताने स्त्री-पुरुष समानतेविषयी विचार करताना ‘थप्पड’ सारखा एखादा चित्रपट किंवा ‘देवी’ सारखा नेटफ्लिक्सवरील लघुचित्रपट डोळ्यांत अंजन घालणारा ठरतो.
‘फिरून एकदा स्त्रीमुक्ती’ च्या निमित्ताने….
२०२० च्या सुधारकच्या अंकासाठी घेतलेला ‘लैंगिकता’ हा विषय ठरला तेव्हा ‘आजचा सुधारक’मध्ये याविषयाबद्दल आधी काय लिहून आले आहे ते पाहण्याची उत्सुकता वाटली. हा विषय बऱ्याच वर्षांपूर्वी ‘सुधारक’मध्ये गाजला होता हे माहीत होते. त्यासाठी ‘सुधारक’चे ह्या विषयावर आधारलेले जुने अंक वाचले. हे भूतकाळात जाणे फारच रंजक ठरले. साधारणतः १९९३ ते २००१ दरम्यानच्या ‘सुधारक’चे बरेच अंक स्त्रीमुक्तीविषयीच्या उलटसुलट चर्चांनी गाजलेले आहेत. (‘सुधारक’च्या जुने अंक आता आंतरजालावर उपलब्ध आहेत.) ‘साधना’च्या मे १९९४च्या अंकामध्ये शांता बुद्धिसागर यांनी ‘चारचौघी’ नाटकाची चर्चा करत असता ‘खरी स्त्रीमुक्ती कोठे आहे?’
फिरून एकदा स्त्रीमुक्ती
फिरून एकदा स्त्रीमुक्ती …
गेली कमीतकमी १० वर्षे स्त्रीमुक्तीची चळवळ आपल्या देशात चालू आहे. पण स्त्रीमुक्तीविषयी, किंवा असे म्हणूया की त्या विषयाच्या व्याप्तीविषयी, आपणा बहुतेकांच्या मनांत संदिग्धता आहे. आपल्या स्त्रीमुक्तीविषयीच्या कल्पना अद्याप धूसर किंवा अस्पष्ट आहेत.
बहुतेक सर्वांच्याच कल्पनेची धाव स्त्रीमुक्ती म्हणजे पुरुषांनी स्त्रियांना घरकामात मदत करून त्यांची ढोरमेहनत कमी करावी आणि त्यांना आजच्यापेक्षा जास्त मानाने वागवावे ह्यापलीकडे जात नाही. ( वरच्या समजाला मदत म्हणून काही ज्येष्ठ समंजस स्त्रिया स्त्रीपुरुषसंबंधांमध्ये पुरुष बेजवाबदारीने वागतात, पण त्यांची बरोबरी करायची म्हणून स्त्रियांनी पुरुषांसारखे बेजवाबदारीने वागू नये; आपले शील संभाळावेअसे सांगतात.)
नव्या समजुतीची गरज
नवरा-बायको, आई-बाप, नातेवाईक व शेजारी मित्रांचे समूह ही नाती, वर्ग, धर्म व राज्य या संस्था आणि त्या सार्यांच्या जोडीला कायदा, परंपरा आणि नीतिनियमांची बंधने या सार्यांनी मिळून स्त्रीपुरुष संबंधाविषयीच्या आजच्या भूमिका घडविल्या आहेत. या सगळ्या गोष्टी एवढ्या जीवनव्यापी आणि मजबूत की त्यांच्या वजनदार सर्वंकषतेने या संबंधातली वैयक्तिक कोवळीक पार चिरडून टाकली आहे.
सगळ्या विचारसरणी, मग त्या मनूच्या असोत नाहीतर मार्क्सच्या, माणसाच्या सहजसाध्य संबंधांना एका घट्ट चौकटीत ठामपणे फिट्ट करण्याचा प्रयत्न करतात आणि त्या प्रयत्नांना अपरिहार्यपणे येणार्या अपयशासाठी विचारसरणीला दोषी न ठरवता माणसालाच दोषी ठरवून निकालात काढतात.
ती बाई होती म्हणुनी….
इंग्लंडमधल्या विपश्यनाकेंद्रात एका जर्मन साधक-गुरूची गाठ पडली. त्यांच्याशी बोलताना ते असं म्हणाले, “कोणताही आध्यात्मिक विषय शाळांमध्ये आणताना आम्हांला खूप परवानग्यांना सामोरं जावं लागतं. कारण पुन्हा आम्हांला मूलतत्त्ववादाकडे जायचं नाही…कारण तुम्हांला माहीतच आहे…!” असं म्हणून ते खजील होऊन हसले. मला उगीचच अपराधी वाटलं… त्यांच्या अकारण अपराधी वाटण्याबद्दल…! खरं तर त्यांचा जन्मच हिटलरच्या अंतानंतर झालेला. कुठल्याही प्रकारे ते त्या अत्याचारी कालखंडाचे समर्थक असण्याची शक्यताच नव्हती. पण तरीही त्यांचा चेहरा अपराधी झाला. जणु काही ‘हिटलरच्या देशातला म्हणून माझी मान आता कायमच शरमेने खाली राहणार,’ असं त्यांना म्हणायचं होतं.