एक सोयीस्करपणे दुर्लक्षित विषय
पर्यावरणाशी संबंधित प्रत्यक्ष काम करताना अगदी वैश्विक स्तरावरचा अभ्यास नसला तरी आजूबाजूला जे चालले आहे तिकडे डोळे उघडे ठेवून बघितले तरी काही धक्कादायक निष्कर्ष समोर येतात. जल वायु परिवर्तनासाठी जंगलतोड, वृक्षकटाई, काँक्रीटीकरण ह्यांना सामान्यतः जबाबदार धरण्यात येते; पण जल वायु परिवर्तनाचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे जमीन वापरातील (Land Use) बदलांमुळे मातीतील सेंद्रिय तत्त्वे झपाट्याने नष्ट होणे हे आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हा पडताळा तसा जुनाच आहे परंतु त्याचे परिणाम त्वरीत दिसत नसल्याने तो आडबाजूला टाकणे सोयीचे झाले आहे.