विषय «इतर»

विवाह आणि नीती

बहुजनसमाजास ही नीती अजून कळू लागली नाही, व केवळ विवाहबाह्य समागम म्हणजेच अनीती अशी त्याची समजूत आहे. शास्त्रीयदृष्ट्या विवाहाचा व नीतीचा बिलकुल संबंध नाही; किंबहुना विशिष्ट वयोमर्यादेपुढे पत्नीवर बळजबरी करण्याचा कायदेशीर हक्क पतीस असल्यामुळे, व विवाहबाह्य समागमात बळजबरी कायदेशीर नसल्यामुळे विवाह हीच कायदेशीर अनीतीस सवड आहे. तथापि धार्मिक वेडगळांस हे कळत नाही, व विवाहबाह्य समागम करणारांस सामाजिक त्रास होण्याची खात्रीच असते; कारण समाज कितीही दुबळा असला तरी त्रास देण्याची शक्ती त्याला असते. अर्थात् यामुळे विवाहबाह्य समागम किंवा व्यभिचार बंद झालेला नाही, मात्र तो समाजाच्या नजरेस येणार नाही अशी खबरदारी लोक घेतात इतकेच …… अशा वेळी समागम करणार्‍या पुरुषाच्या पदरात अनीती येते, कारण त्यापासून अशा स्त्रीची समाजात फजीती होईल, इतकेच नव्हे तर तिचे उपजीविकेचे साधन नाहीसे होऊन तिच्यावर वेश्यावृत्तीचा प्रसंग येईल…….

पुढे वाचा

पत्रव्यवहार

तात्पर्य सांगताना ते म्हणतातः …. तात्पर्य, व्यक्ती व समूह-जीवनाची अमुक अमुक अंगे ही राज्यसत्तेच्या नियंत्रणाखालीच असणे योग्य व वैध आहे. राज्यसत्ता धर्मपीठाच्यापेक्षा उच्चतर अशी सार्वभौम सत्ता आहे याला मान्यता मिळाली. गाभ्याचा मुद्दा सार्वभौमत्व व अंतिमतः नियंत्रण व अधिकार कोणाचा हा होता. ‘धर्माचा आधार समाजव्यवहारांना असावा की नसावा हा मुद्दा नव्हता. हाच पळशीकरांचा पायाभूत घोटाळा! युरोपमध्ये १२०० वर्षे चाललेला संघर्ष याच मुद्यासाठी होता. राज्यसत्ता विरुद्ध धर्मपीठ असा केवळ दोन सत्ताकेंद्रांचा सार्वभौमत्वासाठी चालेला हा लढा नव्हता. यामागील तत्त्व महत्त्वाचे होते. धर्मपीठ या कल्पनेमागे ईश्वर, त्याने पृथ्वीवर पाठविलेले प्रेषित, प्रेषितांच्या मुखातून व्यक्त झालेले ईश्वराचे संदेश व आज्ञा आणि हे सर्व ज्यात ग्रथित केलेले आहे असे धर्मग्रंथ या चार वस्तू येतात, तेव्हा एका बाजूला ऐहिक पातळीवरून सामाजिक, राजकीय, आर्थिक, विवाहसंस्थाविषयक, मालकी हक्कविषयक, गुन्हाविषयक-थोडक्यात सांगायचे तर सर्व समाजव्यवहाराचे (परलोकविषयक विचार वगळून) नियमन-नियंत्रण करण्यासाठी अवतरलेली मानवनिर्मित राज्यसत्ता, आणि दुसऱ्या बाजूला ईश्वराने पाठविलेले प्रेषित, त्यांनी प्रगट केलेले ईश्वरी संदेश व आज्ञा, अषितांनी ग्रथित केलेले धर्मग्रंथ आणि त्यांतील विधिनिषेध म्हणजेच ईश्वरी कायदा (Divine Law) यांच्यामधील हा संघर्ष होता.

पुढे वाचा

संपादकीय – फाटलेले आभाळ ?

श्री दिवाकर मोहनी यांचे आम्हाला आलेले एक पत्र आम्ही अन्यत्र छापले आहे. त्यांनी त्या पत्राद्वारे एका अत्यंत गंभीर समस्येकडे लक्ष वेधले आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशाला भ्रष्टाचाराची जी लागण झाली तिची तीव्रता गेली चाळीस-पंचेचाळीस वर्षे सतत वाढतच आहे, आणि आज जीवनाचे एकही क्षेत्र असे राहिलेले नाही की जे भ्रष्टाचारामुळे किडलेले नाही. राजकारण आणि व्यापार ही भ्रष्टाचाराची पारंपारिक क्षेत्रे. पण आता शासन आणि शिक्षण यातही हे विष बेसुमार शिरले आहे. आजची तरुण पिढी या वाढत्या भ्रष्टाचाराच्या वातावरणात लहानाची मोठी झाली असल्यामुळे तिच्या ते पूर्ण अंगवळणी पडले आहे, आणि त्यात काही अनिष्ट आहे अशी जाणीवही तिला नाही.

पुढे वाचा

वास्तव देवकल्पना

वास्तव देवकल्पना
एकटा देवधर्म घेतला आणि त्याकडे पाहू गेले तर, कातकरी पिशाचपूजक होता, यहुदी, मुसलमान व ख्रिस्ती मनुष्याकार एकदेवपूजक होते, पारशी अग्निपूजक ऊर्फ पंचभूतांपैकी एका भूताचा पूजक होता, आणि हिंदू पशुपक्षिमनुष्याकार अनेकदेवपूजक असून शिवाय अग्न्यादिपंचभूते, पिशाच्चे, एकदेव, झाडे व दगड, ह्यांचा भक्त होता, इतकेच नव्हे तर स्वतःच देव, ईश्वर व ब्रह्मही होता. देव एक हे जितके खरे तितकेच ते कोट्यवधी आहेत हेही खरे असल्यामुळे, म्हणजे दोन्ही कल्पना केवळ बागुलबोवाप्रमाणे असत्य असल्यामुळे, कातकरी, यहुदी, मुसलमान, पारशी, ख्रिस्ती व हिंदू हे सारेच अनेक निराधार व अवास्तव कल्पनांच्या पाठीमागे धावत होते व आपापल्या कल्पनांचा अनिवार उपभोग घेण्यात सौख्य मानीत होते.

पुढे वाचा

विवेकवाद – १८

नैतिक मूल्यांविषयी आणखी थोडेसे

आजचा सुधारक च्या नोव्हेंबर १९९१ च्या अंकात नागपूर येथे भरलेल्या एका वाचक मेळाव्याचा वृत्तांत आला आहे. त्यात झालेल्या चर्चेचे संचालन आमचे मित्र प्रा. अ.ना. लोथे यांनी केले. त्यांनी प्रारंभीच काही प्रश्न उपस्थित केले आणि त्यांच्या अनुषंगाने चर्चा व्हावी असे सुचविले. वेळेच्या अभावी त्यांपैकी काही प्रश्नांना मी संक्षेपाने उत्तरे दिली, परंतु त्यांचा पुरेसा विस्तार मला करता आला नाही, प्रा. लोथे यांनी उपस्थित केलेले प्रश्न महत्त्वाचे असल्यामुळे, आणि ते अन्यही अनेकांच्या मनात उपस्थित झालेले असणार असे वाटल्यावरून त्यांची काहीशी सविस्तर चर्चा करण्याचे येथे योजले आहे.

पुढे वाचा

विवाह आणि नीती (भाग १६)

लोकसंख्या
‘विवाहाचे प्रमुख प्रयोजन म्हणजे पृथ्वीवरली मानवाची संख्या भरून काढणे, काही विवाहव्यवस्थांत हे प्रयोजन अपुऱ्या प्रमाणात साधले जाते, तर काही जास्तच प्रमाणात ते पुरे करतात. या प्रकरणात मी लैंगिक नीतीचा विचार या दृष्टिकोणातून करणार आहे.
व नैसर्गिक अवस्थेत मोठ्या सस्तन प्राण्यांना जिवंत राहण्याकरिता दरडोई बराच मोठा भूभाग लागतो. त्यामुळे मोठ्या सस्तन प्राण्यांच्या कोणत्याही जातीत प्राणिसंख्या अल्प असते. मेंढ्या आणि गाई यांची संख्या बरीच मोठी आहे; पण त्याचे कारण मनुष्याचे कर्तृत्व. मनुष्याची संख्या अन्य कोणत्याही मोठ्या प्राण्यांच्या तुलनेने प्रमाणापेक्षा फारच जास्त आहे.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

पत्रव्यवहार
संपादक, आजचा सुधारक स.न.वि.वि.
तमचा “धर्मनिरपेक्षता” अंक मिळाला. त्यात अनेक व्यासंगी विद्वानांचे लेख आले आहेत. त्यात डावे उजवे आहेत. तरी त्यांच्यांत आगरकर यांचा बुद्धिप्रामाण्यवाद गोमारोमातून भिनलेला दिसत नाही. कारण ते सर्वजण हिंदूंच्या सहिष्णुतेची अपरंपार स्तुती करताना दिसतात.
वास्तविकरीत्या जगाच्या इतिहासावरून हे स्पष्ट होते की जेते अत्याचार करतात आणि हिंदु जेते कधीच नव्हते. नवराबायको या जोडीमध्येसुद्धा हुशार जो असतो किंवा अर्थार्जन करतो तो दुसऱ्यावर कुरघोडी करतो, स्त्रियांनी पुरुषावर केलेल्या कुरघोडीची अनेक उदाहरणे आहेत.
पुराणकाळी खांडववन जाळणे किंवा नागांची हत्या करणे अशा अनेक गोष्टी जेत्यांनी केलेल्या आहेत.

पुढे वाचा

आजचा सुधारकः वाचक मेळावा

‘आजचा सुधारक एक वर्षाचा झाला तेव्हापासून एखादा वाचक मेळावा घ्यायचे वाटत होते. नागपूरच्या वसंतराव नाईक कला व समाजविज्ञान संस्थेच्या (जुने मॉरिस कॉलेज) राज्यशास्त्रविभागाच्या पुढाकाराने ती कल्पना साकार झाली, “धर्मनिरपेक्षता, विवेकवाद आणि आजचे सुधारक’ या विषयावर एक परिचर्चा उपर्युक्त संस्थेचे राज्यशास्त्रविभागप्रमुख प्रा. कवठाळकर यांनी १४ सप्टेबर १९९१ रोजी घडवून आणली. या चर्चेसाठी शहरातील विविध क्षेत्रांशी संबंधित विचारवंत, सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक, धर्मशास्त्राचे अभ्यासक, व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर आमंत्रित केले होते. योगायोगाने प्रसिद्ध विचारवंत श्री. वसंत पळशीकर नागपुरात मुक्कामाला होते. त्यांच्याही उपस्थितीचा आम्ही लाभ घेतला.

पुढे वाचा

एकात्मतेमुळे मानवता की मानवतेमुळे एकात्मता

एकात्मतेमुळे मानवता की मानवतेमुळे एकात्मता
मुसलमानांची समता फक्त मुसलमानांपुरतीच होती. इस्लाम धर्म इतका एकतर्फी आहे व स्वतःच्या अटीशिवाय कोणत्याही प्रकारची देवाण-घेवाण न करता (वन्दे मातरम् म्हणण्याससुद्धा तो तयार होत नाही) मुस्लिमेतरांबरोबर संहअस्तित्वास इतका प्रतिबंध करणारा आहे की तो फक्त मुस्लिम देशांकरिताच योग्य आहे आणि असे असले तरी तेथेही विसाव्या शतकाने कायदेविषयक बदल आवश्यक झाले आहेत. भारतासारख्या मुस्लिम नसलेल्या देशात मुस्लिमेतर बहुसंख्याकांबरोबर मुस्लिम अल्पसंख्याकांना राहावयाचे झाले तर त्यांनी एकरूप व एकात्म होणे जरूरी आहे, हे ओघानेच येते. पण इस्लाम धर्म या गोष्टीस विरोध करतो.

पुढे वाचा

विवेकवाद -१७

गीतेतील नीतिशास्त्र – (उत्तरार्ध)

या लेखाच्या पूर्वार्धात गीतेत जी नीतिमीमांसा आलेली आहे तिचा माझ्या मते यथार्थ अनुवाद मी दिला आहे. आता उत्तरार्धात त्या मीमांसेचे विवेकवादी भूमिकेवरून परीक्षण करावयाचे आहे.

गीतेतील मोक्षशास्त्र खरे आहे काय?
पूर्वार्धात आपण पाहिले की गीतेतील नीतिमीमांसा मोक्षशास्त्रावर आधारली आहे. त्या मोक्षशास्त्राच्या आधारावाचून गीतेतील नीतिमीमांसेला प्रतिष्ठा नाही. म्हणून तिच्यात अभिप्रेत असलेले मोक्षशास्त्र यथार्थ आहे काय? या प्रश्नाचे उत्तर आपण प्रथम द्यायला हवे.
स्थलाभावी या प्रश्नाचा परामर्श येथे काहीशा संक्षेपानेच घेता येईल. या चर्चेवर दुसरेही एक बंधन आहे. ते असे की हा लेख केवळ तज्ज्ञ, विशेषज्ञ किंवा तत्त्वज्ञ यांनाच फक्त कळेल असा होता कामा नये, साधारण सुशिक्षित अशा सामान्य वाचकालाही तो कळेल असे त्यातील विवेचन असावे असा आमचा प्रयत्न असतो.

पुढे वाचा