उपयोगितावाद (Utilitarianism)
‘आजचा सुधारक’च्या डिसेंबर-जानेवारी अंकात ‘नीतिविचार धर्मविचाराहून निळा’ या लेखात नीतीचे धडे विवेचन केले होते. आज ते विवेचन अधिक विस्ताराने करण्याचा विचार आहे.
पाश्चात्य नीतिशास्त्राच्या इतिहासात पहिल्यापासूनच दोन परस्परविरुद्ध विचारसरणी किंवा संप्रदाय दिसून येतात. एवढेच नव्हे तर या दोन विचारसरणी परस्परांच्या शेजारी शतकानुशतके चालत आलेल्या आहेत. ह्या दोन संप्रदायांना आपण तापसवादी आणि तृप्तिवादी अशी नावे देऊ शकतो. यापैकी पहिल्या संप्रदायाचे प्रतिपादन असे आहे की वासना किंवा इच्छा हे सर्व दुःखांचे मूळ आहे, म्हणून वासना जिंकणे, किंवा वासनाक्षय हा मानवाच्या हिताचा मार्ग आहे; तर दुसर्याचे प्रतिपादन असे आहे की जास्तीत जास्त इच्छची जास्तीत जास्त पूर्ती करणे यात मानवाचे हित आहे.