विषय «इतर»

विवाह आणि नीती (भाग १२)

आजचे कुटुंब आपण प्रकरण २ आणि ३ यांत मातृवंशीय आणि पितृसत्ताक कुटुंब आणि लैगिक-नीतिविषयक प्रारंभिक कल्पनांवर त्यांचा परिणाम यांचा विचार केला याचे वाचकाला एव्हाना विस्मरण झाले असेल. ती कुटुंबविषयक चर्चा फिरून सुरू करण्याची वेळ आता आली आहे, कारण लैंगिक स्वातंत्र्यावर निर्बध घालण्याचा एकमेव विवेकी आधार कौटुंबिक जीवनात आढळतो. कामवासना आणि पाप यांच्यावरील दीर्घ चर्चा आता संपली आहे. काम आणि पाप यांतील संबंध ख्रिस्ती धर्माने निर्माण केला नाही हे खरे, पण त्याने त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतला, आणि तेथूनच तो आपणा बहुतेकांच्या नैतिक अवधारणांत (moral judgements) मूर्त झाला आहे.

पुढे वाचा

धर्म, धर्मनिरपेक्षता, आणि त्यांमधून उद्भवणारे काही प्रश्न – १

आणखी काही दिवसांनी आम्हाला मध्यावधी निवडणुकांना सामोरे जावयाचे आहे. मागच्या निवडणुकीमध्ये विविध पक्षांचे जे बलाबल होते त्याचा अपरिहार्य परिणाम म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली आहे. राजकीय अस्थैर्य हा आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये फार मोठा अडथळा आहे हे कोणालाही मान्य होईल. ह्या वेळच्या ह्या राजकीय अस्थैर्याचे मूळ अलीकडे वाढलेल्या धर्माभिमानामध्ये आणि धर्माच्या आधारावर स्वतःला अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक मानण्यामध्ये आहे असे मला वाटते. त्याचप्रमाणे हा धर्माभिमान वाढविण्याची जबाबदारी हिन्दनेतृत्वाची आहे असेही मला वाटते. धर्म आणि धर्मनिरपेक्षता ह्या विषयांना सध्या फार महत्त्व आलेले आहे व कोणाचे काही चकत आहे की काय चुकत असल्यास काय चुकत आहे हे पाहण्याचा यत्न आवश्यक झाला आहे, हिन्दुनेतृत्व काय म्हणते?

पुढे वाचा

मार्क्सवादः पुनर्मूल्यांकन-काही प्रश्न

[मार्च १९९१ च्या अंकात जाहीर केलेल्या दोन परिसंवादांच्या विषयांपैकी धर्मनिरपेक्षता’ या विषयाची अपेक्षित व्याप्ती दाखविणारे प्रश्न एप्रिल १४ व्या अंकात प्रसिद्ध केले आहेत. आज दुसर्‍या विषयावरील – माक्र्सवादावरील प्रश्न देत आहोत. ही प्रश्नावली आमचे मित्र हा विश्वास कानडे आणि डॉ निवास खाईवाले यांनी तयार केली आहे. त्यांचे आम्ही आभारी आहोत. पहिल्या परिसंवादाप्रमाणे चर्चेत भाग घेण्यासाठी आम्ही काही व्यासंगी विद्वानांना झामन्नत करत आहोत. परंतु या परिसंवादात आमच्या वाचकांनाही भाग यावा अश विनंती आहे.
– संपादक]
माक्र्सवाद है सामाजिक असमतोलाचे निदान करण्याचे आणि सामाजिक परिवर्तनाचे दिग्दर्शन करण्याचे एक प्रभावी साधन म्हणून प्रतिष्ठा पावले होते.

पुढे वाचा

मला उमगलेले डॉ. आंबेडकर

आंबेडकरांच्या चरित्राचा अभ्यास करीत असताना मी एक टिपण टिपले. ते असे —-
अस्पृश्यतेचे चटके बसलेले आंबेडकर जर साहित्यिक बनले असते, तर विद्रोद्दा व संघर्षाची भाषा स्वीकारून, त्यांनी ‘दलित साहित्य’ निर्माण केले असते. पण असे ‘साहित्यिक’ ते झाले नाहीत. ते ‘समाजसुधारक’ झाले. मृाची भावना जोपासण्याऐवजी त्यांनी क्रांतिकारकता जापासली. ते ‘समतेचे’ पुरस्कर्ते बनले. सामाजिक व आर्थिक ममतेप्टे त्यांनी देशाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न अंमळ गौण मानला. देशभक्ती गौण मानली, असे मात्र नाही.
मनुस्मृति जाळणे हिंदत्व – विरोधी दिसले तरी कालबाह्य झालेल्या दोघांना बाजूला सारण्याचा तो एक संकेत होता.

पुढे वाचा