आजचा सुधारक ह्या आमच्या मासिकाच्या गेल्या अंदाजे चार वर्षांच्या वाटचालीत आम्ही तीन परिसंवाद विशेषांकांच्या स्वरूपात प्रकाशित केले. वा. म. जोशी ह्यांचे विवेकवादी लिखाण ह्यावर पहिला विशेषांक, धर्मनिरपेक्षता ह्यावर दुसरा आणि निसर्ग आणि मानव ह्या विषयावर तिसरा. ह्या तीनही विशेषांकांना चांगला प्रतिसाद मिळाला. आता थोड्या वेगळ्या प्रकारच्या विशेषांकांची योजना केली आहे.
या विशेषांकांचे एक वैशिष्ट्य असे राहील की त्यांच्या संपादनाचे काम आम्ही महाराष्ट्रातील प्रथितयश मंडळीकडे सोपविले असून त्यांला अनुकूल प्रतिसादही आहे.
तूर्त आमच्या नजरेसमोर असलेले काही विषय पुढीलप्रमाणे आहेत.
* समान नागरी कायदा
* शिक्षण पद्धतीतील आवश्यक बदल .
Monthly archives: जानेवारी, 1994
पत्रव्यवहार
श्री. संपादक, आजचा सुधारक
स.न.वि.वि.
मुस्लिम प्रश्नासंबंधात श्री वसंत पळशीकरांना ‘वाळूत डोके खुपसून बसणाऱ्या शहामृगाची उपमा देणारे मा. श्री. रिसबूड यांचे पत्र वाचले. (नोव्हें. ९३) “(हिंदूंच्या) सनातन धर्माच्या कोणत्या तत्त्वानुसार मुस्लिम समाजाचे मन वळविण्याचे कोणते प्रयत्न (हिंदूंकडून) झाले.?” असा पळशीकरांचा प्रश्न आहे. या प्रश्नाची मूलगामी चिकित्सा नरहर कुरुंदकर आणि हमीद दलवाई यांनी केलेली आहे. मुस्लिमांचे मन वळविण्यापूर्वी त्यांचे ‘मन’ आहे तरी काय? त्यांना पाहिजे आहे तरी काय ? हे समजून घ्यावे लागते. कुरुंदकरांनी या प्रश्नाची . मूलगामी चिकित्सा त्यांच्या ‘अन्वय’ ग्रंथातील ‘धर्म आणि मन’ या प्रकरणात पुढीलप्रमाणे केलेली आहे:
भारतीय मुसलमानांची कायमची एक तक्रार असते की, त्यांना भारतीय घटनेने धर्मस्वातंत्र्य दिलेले नाही.
चर्चा
त्या अनाठायी औदार्याने काय साधले?
श्री संपादक, आजचा सुधारक यांसी स. न. वि.
त्या घटनेला आता ४५ वर्षे होऊन गेली आहेत. तिचा विचार आज अलिप्तपणे करता येतो का, हे पहावे अशा उद्देशाने हे लिहीत आहे. सुरुवातीलाच हे अगदी स्पष्टपणे सांगितले पाहिजे की गांधी-हत्येशी या चर्चेचा संबंध जोडायचा नाही ही या चर्चेची पूर्व अट आहे.
सर्वानाच माहीत असलेली पाश्वभूमी मी माझ्या पद्धतीने थोडक्यात सांगतो. काश्मीर नरेशांनी पाकिस्तानी आक्रमणामुळे हतबल होऊन भारताशी सामीलनामा केला, आणि काश्मीर हा भारताचा भूभाग बनला. भारतीय फौजा श्रीनगर वाचवण्यासाठी धावल्या, आणि एका अघोषित युद्धास तोंड लागले.
अकुतोभय गीता साने -२
विनोबांची पदयात्रा होऊन गेल्यानंतर सुमारे सहा महिन्यांनी म्हणजे नोव्हेंबर ६१ मध्ये गीताबाई चंबळ-घाटीत गेल्या. जिथे जिथे विनोबा गेले तिथे तिथे बाई गेल्या. सोबत अर्थात् विनोबांनी स्थापन केलेल्या शांतिसमितीच्या कार्यकर्त्यांची होती. घाटीतील जनता अशा प्रकारच्या चौकश्यांना सरावली होती. ठरीव साच्याची पढविल्याप्रमाणे उत्तरे येत. म्हणून गीताबाईंनी आपला मोर्चा अस्पृश्य आणि स्त्रिया यांच्याकडे वळवला. कारण आचार्यांच्या पदयात्रेवेळी खरा पीडित अस्पृश्य वर्ग अलक्षित राहिला होता. स्त्रियांशी संवाद साधल्यामुळे त्यांना सत्याच्या अधिक जवळ जाता आले.
चंबळ घाटीत जाण्यापूर्वी डाकूच्या प्रश्नावरचे साहित्य त्यांनी धुंडाळले, तेव्हा त्यांना दोनच पुस्तके मिळाली.
तत्त्वज्ञानाची ओळख (भाग १०)
उद्गमन (३): औपन्यासिक-निगामी रीत
गेल्या लेखांकात उद्गमनाच्या दोन प्रमुख रीती आहेत असे मी म्हणालो, या रीती म्हणजे (१) सरल गणना (Simple Enumeration) आणि (२) औपन्यासिक-निगामी रीत (Hypothetico-Deductive Method). निसर्गातील काही साधेसोपे नियम आपल्याला सरल गणनेने सापडतात; परंतु कारणिक नियम शोधून काढण्याकरिता उपन्यासरीतीचा उपयोग अपरिहार्य होतो. ही गोष्ट कारणनियमाहून भिन्न गणितीय स्वरूपाच्या नियमांच्या शोधात अधिकच स्पष्ट होते. गणिताच्या एका सूत्रात (formula) ग्रथित करता येणारे नियम केवळ निरीक्षणाने सापडण्यासारखे नसतात. त्यामुळे निसर्गाचे बरेचसे निरीक्षण झाल्यावर त्यातील नियम काय असू शकेल याचा अंदाज करून त्या अंदाजाचे परीक्षण करावे लागते.
कामसूत्रे आणि स्त्री
कामसूत्रं वाचली की पुरुषाला संभोगाचे किती वेड असतं ते कळतं. माझ्या नेहमी मनात येतं, बायकांवर कोणी संभोगशास्त्र लिहिलेलं नाही. निदान इतक्या मोठ्या प्रमाणावर तरी नाही. कारण एकच दिसते, पुरुषाला संभोगाची जबाबदारी स्वीकारावी लागत नाही. क्रिया झाली की तो मोकळा होतो. त्यामुळेच मला वाटतं, त्याची लैंगिक भूक जबरदस्त असते. आणि ती भागविली गेल्यावर त्याला वारंवार मोकळेपणाचं समाधानही प्रचंड असावं असं मला वाटतं. साधारणपणे शंभरातल्या नव्याण्णव ठिकाणी वाचशील, ऐकशील की संभोग झाला आणि ‘तो’ झोपून गेला. ‘ती’ तळमळत जागी राहिली. तो जर तिच्यासाठी जागा राहिला तर ती एक केस मी भाग्यवान समजेन की त्या ठिकाणी पुरुषाला लैंगिकता म्हणजे काय, तिचा स्त्रीशी असलेला संबंध समजला आणि त्याची कदर करावीशी वाटली.