मासिक संग्रह: ऑक्टोबर , २००७

कोणता भारत ‘चक दे’?

जयदीप साहनी हे सध्या चर्चेत असलेल्या ‘चक दे’ या चित्रपटाचे पटकथाकार आणि गीतकार. ह्याआधी ‘कंपनी’ आणि ‘खोसला का घोसला’ हे लोकप्रिय आणि समीक्षकांनी वाखाणलेले चित्रपटही साहनींच्या लेखणीतून उतरले आहेत. ‘चक दे’साठी अभ्यास करायला आपण शोधनिबंध लिहीत आहोत असे सांगत साहनींनी हॉकीचा खेळ आणि त्याचे खेळाडू यांचा कानोसा घेतला. निरीक्षण इतके नेमके ठरले की लॉस एंजलिसला एक बाई येऊन साहनींना भेटली. म्हणाली, “तुम्हाला माझी कहाणी कोणी सांगितली ? आम्ही वसतिगृहात काय बोलत होतो हे तुम्हाला कसं कळलं?’ ती होती ओरिलिया मॅस्करेनस, गोव्याची अर्जुन पुरस्कार विजेती हॉकीपटू !

पुढे वाचा

गरज मायेच्या ओलाव्याची

गरज मायेच्या ओलाव्याची
“बायको मागेच गेली. मुलं अमेरिकेत आहेत, मला बरं नाही असं कळलं, की लगेच पैसे पाठवतात नि लिहितात, की प्रकृतीची काळजी घ्या.’ … “मुलं लहान आहेत. त्यांना कसं कळणार, की मायेच्या ओलाव्याची गरज आहे, तिथे पैशांच्या उबेचा काय उपयोग?”
“खरं! म्हणजे तुमच्या उपेक्षेला सुरुवात होते, तेव्हाच तुम्ही ओळखायला हवं, की आता जगाच्या दृष्टीने तुमचा उपयोग संपला. मग तुम्ही त्या खेळातूनच नव्हे, तर मैदानातूनही बाहेर पडायला हवं. हे शहाणपण आदिवासी आणि रानटी टोळ्यांनासुद्धा असतं. उत्तर ध्रुवाजवळच्या एस्किमो लोकांत काय करतात माहीत आहे ?

पुढे वाचा

पत्रचर्चा

प्रदीप पाटील, चार्वाक, २६०/१-६, जुना कुपवाड रोड, सांगली, (फोन ९८९०८०४४९८)
ऑगस्ट २००७, अंकातील टी.बी.खिलारे यांची प्रतिक्रिया वाचली. जॉन हॉरगन यांच्या लेखाच्या आधारे त्यांनी असे म्हटले आहे की ईश्वरीय-धार्मिक अनुभवांविषयीचे सिद्धान्त चुकीचे व अस्थायी आहेत. मी तो मूळचा लेख “The God Experiment’ वाचला. त्या लेखात जॉन हॉरगन यांनी पाच जणांचे संशोधन दिले आहे. त्यांची चिकित्सा करता ते वैज्ञानिकदृष्ट्या चूक ठरत नाहीत. कारण जॉन हॉरगन हे बी.ए. (इंग्लिश) असून ते विज्ञान पत्रकार आहेत. त्यांनी पाचही जणांच्या संशोधनात कुठे व कशी चूक आहे हे नमूद करावयास हवे होते.

पुढे वाचा