Monthly archives: जानेवारी, 2025

मनोगत

स्नेह.

नव्या वर्षाच्या सुरुवातीला स्वतःसाठी काही संकल्प आखायचे आणि पुढे वर्षभरात त्यातील किती पूर्ण होतात, किती अपूर्ण राहतात ह्याचा हिशोब मांडल्यावर अनुषंगाने आनंदी वा दुःखी व्हायचे, हे आपल्यापैकी अनेकांसोबत वयाच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यात झाले असतेच! 

ह्या संकल्पांमध्ये एक नागरिक ह्या नात्याने आपण किती आणि कुठले संकल्प करतो, ह्याचाही विचार असायला हवा. विवेकाने केलेले असे संकल्प आपल्या सगळ्यांना पूर्णत्वाला नेता आले असते तर, आज आपल्या देशाच्या प्रगतीला काही वेगळी दिशा नक्कीच मिळाली असती. पण, नागरिकत्वाची आपली कर्तव्ये पार पाडण्याचे साधे, सोपे यत्नदेखील आपण करीत नाही आहोत.

पुढे वाचा

निवडणुकांचे मुद्दे, आणि विवेकवादी नागरिकांची जबाबदारी

  • निवडणुकांमध्ये सत्तेसाठी, आणि त्यानंतर सत्ता टिकविण्यासाठी सत्यनिष्ठा आणि कर्तव्यनिष्ठेचा त्याग करणाऱ्या व्यवस्थांनी समाजाला असहाय अवस्थेत ढकलले आहे. अशा परिस्थितीत विवेकवादी नागरिकांवर सत्याच्या आधारे जनजागृती करून योग्य दिशा दाखविण्याची मोठी जबाबदारी आहे.

महाराष्ट्रातील अलीकडच्या निवडणुकांमध्ये “बटेंगे तो कटेंगे” ही घोषणा, आणि अचानक समोर आलेली “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” योजना, हे दोन निर्णायक मुद्दे ठरले. माध्यमांनी ह्या मुद्द्यांचा गाजावाजा केला, परंतु सखोल आणि विवेचक चर्चा करण्याचे टाळले. परिणामी, ह्या घोषणा/योजनांना जनतेचा भावुक असा मोठा प्रतिसाद मिळाला, आणि दक्षिणपंथी सत्ताधारी पक्षाने प्रचंड बहुमताने सत्ता स्थापन केली.

पुढे वाचा

पर्यावरणीय ‘दहशतवाद’ – वास्तव आणि अपलाप (उत्तरार्ध)

रेमेडोके अतिरेकी (पर्यावरणवादी नव्हे, खरेखुरे अतिरेकी) नैसर्गिक संसाधने वेठीला धरून आपली दुष्ट उद्दिष्टे पार पाडू पाहतील, ही लेखाच्या पूर्वार्धाच्या अखेरीस व्यक्त केलेली भीती मध्य-आशिया आणि आफ्रिकेपुरती तरी २०२४ संपताना खरी ठरू लागली आहे. दुसरीकडे विविध सरकारांच्या हवामानबदलविषयक कृतीतील निष्क्रियतेमुळे संतप्त तरुण पिढी पाश्चात्य जगात काही उग्रवादी कृत्ये करतानाही दिसते. हवामानबदलविषयक उग्रवाद युरोपात पाय पसरू लागला आहे. कट्टर उजव्या काही लोकांची “‘त्यांच्या’ येण्यामुळे ‘आमच्या’ राष्ट्रातील मूलस्रोत संपत चालले आहेत”, अशी कोती, एकांगी आणि चुकीची धारणा आणि त्यामुळे स्थलांतरितांचा द्वेष अमेरिकेत आणि अन्य पाश्चात्य देशांमध्येही पसरू पाहत आहे.

पुढे वाचा

पर्यावरणीय ‘दहशतवाद’- वास्तव आणि अपलाप (पूर्वार्ध)

आपल्या देशात पर्यावरणवादी लोकांनी एखाद्या प्रश्नावर नुसती थोडीशी तिखट प्रतिक्रिया दिली तरी तात्काळ त्यांना पर्यावरणीय अतिरेकी, दहशतवादी असे संबोधले जाते. पर्यावरणीय अतिरेक (दहशतवाद नव्हे) काय व कसा, आणि मुख्य म्हणजे कितपत सौम्य/उग्र असतो ते माहीत नसल्यानेच असे विनोद आपल्याकडे मधूनमधून होत रहातात. मोठ्या प्रमाणावर काही थेट, रांगडी कृत्ये करून निसर्ग वाचवण्याचा प्रयत्न करणारे खरे अतिरेकी इंग्लंड आणि अमेरिकेत सर्वप्रथम निपजले. आजही त्यांचे सर्वाधिक उद्योग तिथे, आणि युरोपमधील अनेक देशात, तसेच ब्राझील, पेरू, अर्जेंटिना अशा दक्षिण अमेरिकेतील देशांतही चालू असतात. २०१० ते २०१९ ह्या कालावधीत त्यांनी जगभरात घातपात, जाळपोळ, मालमत्तांचे नुकसान अशी २५२१ प्रतिबंधित कृत्ये केल्याचे त्यांच्याच वेब-मासिकावर पाहायला मिळते.

पुढे वाचा

वेगवान बदलाची पन्नास वर्षे, स्त्री-चळवळी आणि भविष्यातील आव्हाने

शाश्वत विकासाच्या चौकटीमध्ये आर्थिक, सामाजिक-सांस्कृतिक आणि परिसरातील बदल ह्या तीन विषयांचा समावेश आहे. एक आर्किटेक्ट आणि नगरविज्ञान विषयाची अभ्यासक म्हणून मी ह्या तीन विषयांकडे बघते. ह्या तीन विषयांचे एकमेकांवर गुंतागुंतीचे परिणाम झाले आहेत, होत आहेत आणि होणार आहेत.

गेल्या पन्नास वर्षांमध्ये भारतात जे मोठे आर्थिक, सामाजिक-सांस्कृतिक बदल झाले आहेत, त्या बदलांचा स्त्री-स्वातंत्र्याच्या अंगानेही विचार करायला हवा. त्या बदलांचे स्त्रियांवर बरे-वाईट परिणाम तर झाले आहेतच; त्याचबरोबर स्त्री-चळवळींचे भारतीय समाज-संस्कृतीवर जे मोठे परिणाम झाले आहेत, त्यांचीही दखल घ्यावी लागेल. अशा दुपदरी बदलांचे ढोबळ स्वरूप आणि परिणाम लेखाच्या पहिल्या भागात नोंदले आहेत.

पुढे वाचा

आपण बोलत राहिलं पाहिजे…

“ना तो मै तुम्हारा आकडा हूं, ना ही तुम्हारा वोट बँक. मै तुम्हारा प्रोजेक्ट नही हूं और ना ही तुम्हारे अनोखे अजायबघर की कोई परियोजना, ना ही अपने उद्धार की प्रतीक्षा मे खडी आत्मा हूं, और ना ही वह प्रयोगशाला जहाँ परखे जाते है सिद्धांत.”

“तुमने जो नाम मुझे दिये है, जो फैसले सुनाए, जो दस्तावेज लिखे, परिभाषायें बनायी, जो मॉडेल घडे नेता और संरक्षक दिये मुझे, सबसे इन्कार मै करूं. इन सबका, प्रतिकों का. वंचित किया है मुझे मेरे अस्तित्व से, मेरे स्वप्न और मेरे आकाश से.

पुढे वाचा

जागतिक बावळट मंचाची स्थापना – एक निवेदन

कळविण्यास अत्यंत आनंद होतो आहे की, जागतिक बावळट मंचाची स्थापना एकदाची झाली आहे! मागील महिन्यात मुक्काम पोस्ट गावडेवाडी येथे झालेल्या एका साध्या समारंभात विशेष पाहुण्यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. ह्याच कार्यक्रमात बावळट मंचाचा जाहीरनामाही प्रकाशित करण्यात आला. त्याबद्दल सांगण्यापूर्वी हे नमूद करणे आवश्यक आहे कीm ह्या निवेदनातील नावे व घटना काल्पनिक असून त्यांचे प्रत्यक्ष व्यक्तींशी आणि घटनांशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा, असे बावळट मंडळींतर्फे कळविण्यात आले आहे. ह्या संघटनेचे नेतृत्व करण्यास कुणीच पुढे न आल्याने हे निवेदन ‘लेखक-अनामिक’ म्हणूनच प्रकाशित करीत आहोत. 

पुढे वाचा

नाते कुंपणावरचे

ॲलन ट्यूरिंग संगणन आणि कृत्रिम बुद्धिमतेचा जनक मानला जातो. दुसरे महायुद्ध जिंकण्यात त्याचा मोठा वाटा मानला जातो. १९५२ साली, त्याच्या घरी चोरी झाली. रिवाजाप्रमाणे पोलीस आले. तपासादरम्यान ॲलन ट्यूरिंगचे त्याच्या मित्राशी शारीरिक संबंध असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्याला अटक झाली आणि त्याच्यावर खटला भरला. ट्यूरिंग दोषी मानला गेला आणि त्याला शिक्षेचे दोन पर्याय देण्यात आले – दोन वर्षे कारावास किंवा रासायनिक पद्धतीने कॅस्ट्रेशन. ॲलनने दुसरा पर्याय निवडला. पण त्यानंतरही पोलिसांचा ससेमिरा त्याला चुकवता आला नाही. जागतिक किर्तीचा वैज्ञानिक असलेला ॲलन ट्यूरिंग ही अवहेलना आणि मानहानी सहन करू शकला नाही आणि सायनाईड ठेवलेले सफरचंद खाऊन त्याने आत्महत्या केली.

पुढे वाचा

पृथ्वीच्या हवामानबदलाचे उग्र स्वरूप

गेल्या दहा वर्षांत उष्णतेची लाट, जंगलातील वणवा, महापूर, ढगफुटी इत्यादींबद्दलच्या बातम्या ऐकायला/वाचायला मिळाल्या नसतील, त्यापेक्षा जास्त प्रमाणात मागच्या वर्षी त्याबद्दल ऐकायला/वाचायला मिळाल्या आहेत. जुलै २०२३ मध्ये उष्माघाताने अनेक लोक मेले. जुलै-ऑगस्टमध्ये उत्तरभारतात व ऑक्टोबरमध्ये सिक्किम राज्यात महापूर आल्यामुळे व भूस्खलनामुळे शेकडोंनी जीवितहानी झाली, हजारो बेघर झाले. पिकांचे नुकसान झाले व रस्ते, पुलांसारख्या मूलभूत सुविधांची पडझड झाली. दिल्लीच्या काही भागात गंगा व यमुना दुथडी भरून वाहू लागल्या. गेल्या ४५ वर्षांत पोचली नाही त्यापेक्षा जास्त उंची पाण्याच्या पातळीने गाठली व मोठ्या प्रमाणात महापूर आला.

पुढे वाचा

गोष्ट बायकांच्या बस प्रवासाची

संगीताचा नवरा एका कंपनीत नोकरी करतो. त्याची कंपनी घरापासून दहा-बारा किलोमीटर अंतरावर आहे. कंपनीत जाऊन परत यायला आपल्या बाईकमध्ये त्याला रोज साधारण अर्धा लीटर पेट्रोल टाकावे लागते. म्हणजे रोजचे जवळपास चाळीस रुपये खर्च होतात. महिन्याचे साधारण एक हजार रुपये. दहा-बारा हजार रुपये पगारावर काम करणाऱ्या संगीताच्या नवऱ्याला प्रवासाचे हे हजार रुपये परवडत नाहीत, पण त्याशिवाय तो कामावर जाऊच शकणार नाही. नाईलाज आहे.

संगीतासुद्धा कामाला जाते, पण ती कुठल्या कंपनीत नोकरीला नाही. रोज सकाळी तीन-चार ऑफिसेसमध्ये साफसफाईचे काम ती करते. डॉक्टरांचे क्लिनिक, सीए साहेबांचे ऑफिस, कोचिंग क्लासेस, अश्या ठिकाणी तिला सकाळी दहा वाजेपर्यंत काम संपवावे लागते.

पुढे वाचा