विषय «तत्त्वज्ञान»

विक्रम आणि वेताळ – ॲप्पलातून

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही, झाडावरचे प्रेत तो खांद्यावर टाकणार इतक्यात . . 

“Hello, राजन्!”

“ऑं? हे कोण बोललं?”

“मीच राजन्, हाच प्रेतात्मा, वेताळ!”

“आज तुला खांद्यावर टाकून स्मशानाच्या दिशेने चालू लागण्यापूर्वीच?”

“हो, म्हटलं तुला गोष्ट सांगून मग त्यावर प्रश्न विचारून तुझं मौनव्रत तोडण्यापेक्षा, तुला surprise देऊन आधीच तुझ्या मौनव्रताचा भंग करावा! आपल्याला आपली Free will वापरता येते का ह्याचा एक प्रयोग करून बघावा!

आता एवीतेवी तुझ्या मौनव्रताचा भंग झालाच आहे, तर सांग तुझंही मत. Free will असते की नाही आपल्याला?”

पुढे वाचा

बुद्धिप्रामाण्यवादातील प्रामाण्याचे निकष

नवभारत मासिकाच्या नोव्हेंबर १९८२ च्या अंकात प्रा. मे.पुं. रेगे ह्यांचा ‘बुद्धिप्रामाण्यवाद’ हा लेख प्रकाशित झाला होता. प्रस्तुत अंकासाठी ह्या लेखावरील प्रतिवाद आला तेव्हा, मूळ लेखही सोबतच पुनर्प्रकाशित करावा असे वाटले. असे केल्याने वाचकांची मूळ विचारांशी ओळख होईल आणि ह्या प्रतिवादातील संदर्भदेखील लक्षात येतील.


सर्वप्रथम rationalism ह्या शब्दाने ज्या दोन उपपत्ती संबोधल्या जातात त्याबद्दल लिहिणे इथे संयुक्तिक ठरेल. मनुष्याला इंद्रियांद्वारे झालेले अनुभव फसवे असू शकतात. रात्रीच्यावेळी अंधुक प्रकाशात एखादी दोरीदेखील साप वाटू शकते. अशावेळी इंद्रियांद्वारे होणाऱ्या अनुभवाने तयार झालेल्या ज्ञानावर शंका उपस्थित करणे उचित ठरते.

पुढे वाचा

बुद्धिप्रामाण्यवाद

बुद्धिप्रामाण्यवादाचा आवेशाने प्रचार करण्याची उत्कट आवश्यकता अनेकांना जी भासते, तिचे कारण काय? अनेकजण बुद्धिप्रामाण्यवादाचा प्रसार करणे हे आपले जीवितकार्य आहे असे मानताना आढळतात. बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजे तरी काय?

बुद्धिप्रामाण्यवादाचे जे एक स्पष्टीकरण अनेकदा देण्यात येते ते असे की, “आपल्या बुद्धीला जे सत्य किंवा योग्य म्हणून पटते, ते आणि तेच सत्य किंवा योग्य म्हणून स्वीकारावे; आपल्या बुद्धीला जे सत्य किंवा योग्य म्हणून पटलेले नसते त्याचा जरी कुणीही आदेश किंवा उपदेश केलेला असला, एखाद्या धर्मग्रंथात किंवा एखाद्या प्रेषिताने ते सत्य आहे किंवा योग्य आहे असे जरी घोषित केलेले असले, तरी त्याचा स्वीकार करू नये; अशा रीतीने वागणे म्हणजे बुद्धिप्रामाण्यवादी असणे.”

पुढे वाचा

नव्य लोकायत

टीप: नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘आजचा सुधारक’च्या अंकातील आजचा चार्वाक ह्या लेखावर बरेच अभिप्राय आले आणि त्याअनुषंगाने ‘चार्वाक विचारसरणी’ हा विषय चर्चेमध्ये आला. चर्चेतील मुद्द्यांच्या अनुषंगाने आणि अभिप्राय पाठवणाऱ्या एका सुजाण वाचकाच्या विनंतीवरून ‘आजचा सुधारक’मध्ये नियमीतपणे लेख पाठवणारे आपले स्नेही शशिकांत पडळकर ह्यांनी नवा चार्वाक,  पाश्चात्य तत्त्वज्ञानातील काही संदर्भ, आणि आजच्या चार्वाकाजवळ असणारे नवे सूचकांक अशा आशयाचा एक स्वतंत्र लेख आमच्याकडे पाठवला. तो लेख येथे प्रकाशित करतो आहोत. पूर्वप्रकाशित लेखांवर अश्या साधकबाधक चर्चा होत राहाणे आम्हांला मोलाचे वाटते.

भारतीय उपखंडातील बहुतेक सर्व स्थानिक (autochthonous) श्रद्धाप्रणाली ह्या कर्मसिद्धांताच्या पायावर उभ्या आहेत.‌

पुढे वाचा

आजचा चार्वाक

चार्वाकाविषयी आजच्या अनेक माणसांना विशेष आकर्षण का वाटते? ह्याचे सरळ उत्तर असे की तो निखळपणे जडवादी होता. ‘निखळपणे ’ असे म्हणायचे कारण असे की इतर काही भारतीय दर्शनेही जडवादाकडे झुकणारी आहेत. उदाहरणार्थ, वैशेषिक दर्शन. जे काही आहे ते सर्व परमाणूंचे बनलेले आहे, असे ते मानते, असे स्थूलमानाने म्हणता येईल. पण प्रारंभी जरी ते ईश्वर मानीत नव्हते असे समजायला जागा आहे, तरी पुढे त्याने ईश्वराला सामावून घेतले. शिवाय ते कर्मसिद्धांतही स्वीकारते. म्हणजे व्यक्तींच्या कर्मानुसार त्यांना सुखदुःखरूप फळे भोगावी लागतात असे ते मानते.

पुढे वाचा

लोकायत, काल आणि आज

भारतीय उपखण्डात अनेक स्थानिक विश्वास-प्रणाली (belief systems) फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहेत. “कर्म, पुनर्जन्म, मोक्ष” (कपुमो) ही चौकट या सर्व प्रणालींत समान आहे. कपुमो चौकट कधीपासून आणि कुणी सुरू केली किंवा झाली हा विषय इथे नाही. या चौकटीला आपण हिन्दू-वैदिक (ब्राह्मण परंपरा) किंवा बौद्ध (श्रमण परंपरा) हे आपापल्या विचारांनुसार किंवा आवडीनुसार म्हणू शकतो. भारतीय उपखण्डात जन्मलेले पण या चौकटीबाहेर राहिलेले दोन समूह आपण ढोबळ मानाने रेखांकित करू शकतो: एक म्हणजे निसर्गपूजक, बहुदेवतावादी (polytheist), चेतनवादी (animist) असलेला अतिप्राचीन किंवा इतिहासपूर्व (prehistoric) समूह ज्याचा एक मोठा भाग कपुमो चौकटीत यथावकाश आणला गेला आणि ज्याला आता अतिप्राचीनतेमुळे सनातनी (followers of eternal religion) असे संबोधिले जाते.

पुढे वाचा

जागतिक आनंद निर्देशांक

जागतिक आनंद अहवाल (World Happiness Report) हा संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास समाधान नेटवर्कचं एक वार्षिक प्रकाशन आहे. मार्च २०२५ मध्ये, फिनलँड सलग आठव्या वर्षी या यादीत पहिल्या स्थानावर आहे, त्यानंतर डेन्मार्क, आईसलँड आणि स्वीडन यांचा क्रमांक लागतो.

राष्ट्रीय आनंदाची क्रमवारी कॅन्ट्रिल लॅडर सर्वेक्षणावर आधारित आहे. यात सहभागींना एक शिडीची कल्पना करायला लावली जाते, ज्यात १० म्हणजे त्यांच्यासाठी सर्वोत्तम आयुष्य आणि ० म्हणजे सर्वात वाईट आयुष्य. त्यानंतर त्यांना त्यांच्या सध्याच्या आयुष्याला ० ते १० च्या प्रमाणात मोजायला सांगितलं जातं. यात शीर्षस्थानी असलेल्या सर्व देशांमध्ये सहा प्रमुख घटकांचं मूल्य जास्त आहे, जे आनंदी जीवनासाठी महत्त्वाचे आहेत: उत्पन्न, निरोगी आयुष्य, सामाजिक आधार, स्वातंत्र्य, विश्वास आणि औदार्य.

पुढे वाचा

सुखाचा शोध

सुखाच्या मागे मागे आपण धावत रहावे का?
कदाचित हा प्रश्न अत्यंत मूर्खपणाचा वाटेल. परंतु सुखी माणसाचा सदरा सापडणे व वाळवंटातील मृगजळ पकडणे दोन्ही सारखेच ठरतील. सुखाचा शोध घेण्याचा मार्ग फारच खडतर आहे याची जाणीव बहुतेकांना आहे व या मार्गावरील खड्ड्यात पडणार्‍यांची, टक्के टोणपे सहन करत राहणार्‍यांची संख्यासुद्धा कमी नाही. या मार्गाच्या शेवटच्या टप्प्यात परमसुख मिळणार आहे या आशेने आपण मार्गक्रमणातील दु:ख, वेदना, त्रास, विसरून पुन्हा पुन्हा प्रयत्न करत असतो. भरपूर पगाराची नोकरी, मुबलक (अतिरिक्त!) पैसा (disposable income), प्रशस्त घरात वास्तव्य, आवडत्या संगातीबरोबरचे कौटुंबिक सौख्य, आरोग्यमय जीवन, इत्यादीत अडकून घेतल्यामुळे आयुष्यात या व्यतिरिक्त काही गोष्टी असू शकतात, त्यातूनही मानसिक समाधान मिळू शकते, हे आपण विसरत आहोत.

पुढे वाचा

सुखाचा शोध आणि आधुनिक आव्हाने

“सर्वेपि सुखिनः संतु” ही संकल्पना भारतीय परंपरेत खोलवर रुजलेली आहे. चारही वेद, उपनिषदे, गीता तसेच संतसाहित्य यात सर्वत्र “सर्वजनहिताय, सर्वजनसुखाय” ही भावना कमीजास्त प्रमाणात आढळते. सुख केवळ वैयक्तिक नाही, तर सामूहिक असावे, ही धारणा प्राचीनतम आहे. भारतीय परंपरेतील पुरुषार्थचतुष्ट्य – धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष – ह्यांतूनही सुखाची कल्पना व्यक्त होते. येथे अर्थ आणि काम हे ऐहिक सुखाशी निगडित आहेत, पण त्यांना धर्म हा नियंत्रक घटक व मोक्ष हा अंतिम परिपाक आहे. म्हणजेच सुखाचा शोध वैयक्तिक आणि सामूहिक जबाबदारीशी बांधलेला आहे.

पुढे वाचा

चार्वाक — तर्काचा बंडखोर

नाकारले वेदांचे प्रामाण्य
तर्काचा तो बंडखोर—चार्वाक
इंद्रियप्रत्यक्ष सत्य मानले
अनुमान-आगम बुद्धीचे खेळ  

ईश्वर नाही, आत्मा नाही
परलोकही केवळ कल्पना
“यावज्जीवं सुखं जीवेत”
विवेकातून आनंदाचा झरा  

चार महाभूतांचा संगम
चैतन्य म्हणजे देहाचा योग
सृष्टी स्वाभाविक, ईश्वर नाही
भौतिकतेतच जीवनाचा भोग  

नाही पाप, नाही पुण्य
नाही पुनर्जन्माचा व्यापार
जगणे म्हणजे अनुभवांचा उत्सव
नैतिकतेचा स्वाभाविक आधार  

आज विज्ञानाचे युग उजळते
अनुभववादाची महत्ता ठळक
अंधश्रद्धा, रूढी, कर्मकांड
नाकारण्यातच प्रगतीचा मंत्र  

डेटा, तर्क, प्रयोगशीलता
ज्ञानाचे खरे दीपस्तंभ
चार्वाक नाही अंतिम सत्य
पण विचारांना देतो दिशा  

सुख म्हणजे भोग नव्हे केवळ
तर समता, सहजीवनाचा अर्थ
चार्वाक सांगतो—जगणे म्हणजे
जागृत मनाने अर्थपूर्ण जीवन

चेंजमेकर, बहुभाषिक अभ्यासक व स्तंभ लेखक
छ.

पुढे वाचा