विषय «तत्त्वज्ञान»

विक्रम आणि वेताळ – भाग ८

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलू लागला.

“राजन्, गेल्या खेपेत तू सर्वसमावेशक सुखाची व्याख्या ‘प्रत्येकाला आपापल्या व्यक्तिगत आयुष्यात, जे हवेहवेसे, आनंददायक वाटते आणि जे त्याच्यासाठी कल्याणकारक, समाधानकारक असते ते सुख आणि अर्थातच ह्याच्याच विरुद्धार्थी दुःख’ अशी केलीस. तसेच व्यक्तिगत सुखाची व्याख्या; ‘प्रत्येक व्यक्तीने जो अग्रक्रम ‘स्वतः’ निवडून एखाद्या गोष्टीस प्राधान्य दिले असेल त्यात त्या व्यक्तीला सुख वाटत असते, अशी केली होतीस.

त्या व्याख्या करतांना सुखदुःख कसं तुलनात्मक असतं ह्याविषयी तू बोलला होतास. परन्तु अशी तुलना करण्यासाठी सुखदुःख मोजण्याचा मापदंड तू कसा तयार करशील असा प्रश्न मी तुला होमवर्क म्हणून दिला होता.”

पुढे वाचा

खट्टरकाकांची भगवद्गीता

प्रो. हरीमोहन झा (१९०८ – १९८४) यांच्या ‘खट्टर काका’ पुस्तकातील भगवद्गीता या मूळ हिंदी लेखाचे स्वैर रूपांतर देत आहे. या पुस्तकातील लेख १९५०च्या दशकात लिहिलेले असले तरी आजही त्यातील विनोद व आशय आपल्याला अंतर्मुख करणारे आहेत.

‘खट्टर काका’ हे त्यांचे विनोदी अंगाने लिहिलेले हिंदी भाषेतील पुस्तक भरपूर गाजले. परंतु प्रो. हरीमोहन झा यांना केवळ विनोदी लेखक म्हणून ओळखणे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे होईल. ते मुळात तत्त्वज्ञानाचे अभ्यासक होते व संस्कृत, इंग्रजी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. पाटणा विद्यापिठाचे हे मैथिली भाषेचे तज्ज्ञ होते.

पुढे वाचा

हिंदू, हिंदुत्व आणि धर्मनिरपेक्ष लोकशाही

आज हिंदुधर्म अनेक कारणांसाठी चर्चेत आहे. नुकतेच भारताच्या एका प्रमुख राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्याने इसिस (दाएश) आणि बोकोहराम या दहशतवादी संघटनांशी हिंदुत्वाची तुलना केली आहे. महिन्याभरापूर्वी अमेरिकेत हिंदुत्वाच्या उच्चाटनावर विचार करण्यासाठी एक जागतिक परिषदही आयोजित केली होती. त्यामध्ये हिंदुधर्म आणि हिंदुत्व वेगळे करता येणार नाहीत या मुद्द्यावर आम-सहमती झाली होती. उलटपक्षी सर्वसामान्य सुशिक्षित हिंदूला त्याच्या धर्मासंबंधी अथवा संस्कृतीसंबंधी जुजबी माहितीही नसते असा वरचेवर अनुभव येतो. आय.आय.टी. कानपूरमध्ये असताना एका एम.टेक. करणाऱ्या विद्यार्थ्याने एकदा मला रावणाचा भाऊ भीमसेन होता असे छातीठोकपणे सांगितले होते. Bibhishan आणि Bhimsen यात अनेक अक्षरे समान असल्याने कॉन्व्हेंट-स्कूलमध्ये शिकणाऱ्याचा असा घोटाळा होणे स्वाभाविक होते. बरे

पुढे वाचा

विक्रम आणि वेताळ – भाग ७

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत खांद्यावर टाकून तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलू लागला.

“हां, तर कुठे होतो आपण राजन्?” 

“तू त्या झाडाच्या फांदीवर उलटा लोम्बकळत होतास; मी तिकडून, काट्याकुटयांनी भरलेल्या पायवाटेने येऊन तुला फांदीवरून कसंबसं उतरवून खांद्यावर घेतलं आणि आता  स्मशानाच्या दिशेने निघालो आहे.” 

“तसं नाही रे बाबा, मी म्हणत होतो की गेल्या खेपेस, दुःख निवारण करण्याचा आणि भविष्यातील अनिश्चितता कमी करण्याचा मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात आपण कुठवर आलो होतो?”

“ओह्ह…. विसरला असशील तर बरंच आहे.”

पुढे वाचा

आजची युगनिष्ठा

‘ऐहिक निष्ठा ही आजची युगनिष्ठा आहे.’, असे आज ढोबळमानाने म्हणता येईल. ढोबळमानाने याकरिता कारण, मानवाच्या एकमूलकतेचे गृहितक हे आता मानवशास्त्राने टाकून दिले आहे. त्यामुळे, मानवी समाजाची आणि म्हणून सर्व व्यक्तींची (individuals) मूल्यनिष्ठा सर्वत्र एकसारखीच आहे, असे मानण्यातील तर्कदोष उघड आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, ती तशी कधी होती का? असे विचारल्यास, त्याचे उत्तर नकारार्थी द्यावे लागते. उलट, ती किती वैविध्यपूर्ण आणि समृद्ध होती, याला बरेचसे अनुकूल पुरावे मिळू शकतील. भारतीय सामाजिक-धार्मिक परंपरेचा परिपोष हा जसा आत्मवाद, ईश्वरवाद, अद्वैतवाद यांतून झाला, तसाच तो अनात्मवाद, निरिश्वरवाद, द्वैतवाद, संशयवाद आणि अज्ञेयवादातूनही झालेला आढळून येईल.

पुढे वाचा

विक्रम आणि वेताळ – भाग ६

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलू लागला.

“राजन्, गेल्या खेपेत तू आपल्या आयुष्यातील दुःख निवारण करण्याचा आणि भविष्यातील अनिश्चितता कमी करण्याचा मार्ग शोधताना आपल्या स्वभावामुळे येणाऱ्या अडचणींविषयी बोललास.
त्यातील पहिली: वैचारिक आणि शारीरिक शक्ती खर्च करण्याची आपली अनिच्छा; आणि त्यातून येणारी सोयीस्कर अनुकरणप्रियता.
दुसरी: अनुक्रमाने घडलेल्या कोणत्याही दोन यादृच्छिक (random) घटनांत काल्पनिक/अतार्किक कार्यकारण संबंध जोडण्याची आपली सवय.
तिसरी: आपल्या विचारात असणारी तर्कदोषाची शक्यता.
चवथी: बुवाबाजीतून, बाबावाक्य प्रमाण मानण्याच्या आपल्या सवयीमुळे, आपली फसवणूक होण्याची शक्यता.

पुढे वाचा

विक्रम आणि वेताळ – भाग ५

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलता झाला.

“राजन्, गेल्या खेपेत, आपल्याला आपल्या कल्पनासाम्राज्यात वास्तवाची किंवा तर्कबुद्धीची बोच कशी नकोशी वाटते आणि सभोवतालचं वास्तव जितकं जास्त कटू/दुस्सह असेल तितकं आपल्याला आपल्या काल्पनिकविश्वाचं आकर्षण कसं जास्त असतं, हे जे तू सांगितलंस ते तर अगदी खरं आहे. करमणुकीच्या किंवा मनोरंजनाच्या क्षेत्रात तर हा अनुभव नेहमीच येतो. आपल्याकडे बहुसंख्य लोकांना कोणते चित्रपट आवडतात ते बघ. ज्या चित्रपटात निव्वळ कल्पनारंजन असेल, वास्तवाला किंवा तर्काला थारा नसेल, असेच ‘दे मार’ चित्रपट लोकप्रिय होतात.

पुढे वाचा

विक्रम आणि वेताळ – भाग ४

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलता झाला.

“राजन्, भारतीय तत्त्वज्ञानाच्या षट्दर्शनांतील प्रत्यक्ष आणि अनुमान ह्या दोन प्रमुख ज्ञानस्रोतांच्या कसोटीवर फलज्योतिष हा यथार्थज्ञानाचा स्रोत नसून निव्वळ भ्रम कसा आहे हे तू सिद्ध केलंस. त्यामुळे आता ते मान्य करणं तर भागच आहे. पण असं सिद्ध केल्यानं फलज्योतिषाची लोकप्रियता कमी होईल असं तुला खरोखरंच वाटतं का? “

“खरं सांगू का? फलज्योतिष हे केवळ भ्रामक कल्पनामात्र आहे, हे सिद्ध केल्याने त्याची लोकप्रियता कमी होण्याची सूतरामही शक्यता नाही!”

पुढे वाचा

विक्रम आणि वेताळ – भाग ३

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलू लागला.

“राजन्, आपल्या भारतीय तत्त्वज्ञानातील षट्दर्शनांच्या प्रत्यक्षप्रमाण ह्या कसोटीवर फलज्योतिष हा यथार्थज्ञानाचा स्रोत नाही, हे तू गेल्या खेपेत सिद्ध केलंस. परंतु फलज्योतिष हे भविष्याचा वेध घेतं, त्यामुळे आपण ते ‘अनुमान’ ह्या ज्ञानाच्या दुसऱ्या स्रोताच्या कसोटीवर तपासून बघायला नको का?”

“खरं सांगू का, ‘प्रत्यक्षप्रमाण’ ह्या भारतीय तत्त्वज्ञानातील दर्शनांच्या सगळ्यात जास्त महत्त्वाच्या कसोटीवर जी गोष्ट निव्वळ ‘भ्रम’ आहे हे सिद्ध झाले आहे, त्याविषयी आणखीन काही चर्चा करणे निरर्थक आहे.

पुढे वाचा

विक्रम आणि वेताळ – भाग २

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही, झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलू लागला.

“राजन्, अरे गेल्या खेपेला तू माझ्यावर एकदम तलवारच उगारलीस, त्यामुळे मी माझं पूर्ण समाधान झालं असं म्हणून तर टाकलं, पण खरं सांगू? माझं अर्धवटच समाधान झालं होतं. त्याविषयीचे आणखीनही बरेच प्रश्न मला छळताहेत.

आता हेच बघ ना, IGNOU, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालय, आता फलज्योतिषाचा अभ्यासक्रम सुरू करणार असल्याचं ऐकतोय. त्यांच्या मते ते एक विज्ञानाधारित शास्त्र आहे. ह्याचा अर्थ प्रत्येकाचं नेमकं भविष्य सांगणं शक्य आहे तर!

पुढे वाचा