विषय «मनोगत»

मनोगत

स्नेह

जून २०२४ ला निवडून आलेल्या नवीन सरकारचे स्वागत आणि शुभेच्छा!

निवडून आलेल्या सरकारने जनतेच्या समस्या समजून घेऊन काम करावे अशी अपेक्षा ठेवावी लागणे म्हणजे खरे तर मतदान करणाऱ्या जनतेप्रति आणि निवडून येणाऱ्या राज्यकर्त्यांप्रति अविश्वास दाखवण्यासारखे आहे. पण इलाज नाही. आपल्या निवडणुकपद्धतीतील पारदर्शिकता कधीच लोप पावली आहे आणि सत्तेच्या उन्मादापुढे आपण लोकशाहीची विटंबना चालवली आहे याचे भान राजकारण्यांना उरलेले नाही.

प्रस्थापित सरकारकडून जनतेच्या असलेल्या अपेक्षा ‘आजचा सुधारक’च्या जुलै अंकात घ्याव्यात असा आमचा प्रयत्न होता. तसा तो पूर्ण झालाही.

पण सगळ्याच समस्यांसाठी सरकारवर अवलंबून चालत नाही याकडेदेखील दुर्लक्ष करून चालणार नाही.

पुढे वाचा

मनोगत

स्नेह.

येत्या एप्रिल/मे मधील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘आजचा सुधारक’चा अंक प्रकाशित करतो आहोत. आव्हाने अनेक आहेत. भाजप आत्तापासूनच आपल्या सलग तिसऱ्या विजयाच्या दुदुंभी फुंकत आहे. INDIA आघाडी पर्याय म्हणून समोर यायला धडपडत आहे. निवडणुकांआधी प्रचार, अपप्रचार, कुप्रचार ह्यांचा कोलाहल असतोच. त्यात आता सोशल मीडिया, एआयचा वाढता वापर यांतून वाढलेला गोंधळ!! अश्यात सामान्य नागरिक मतदाता म्हणून विचारपूर्वक समोर येऊ शकतो आहे का हा एक अत्यंत गंभीर प्रश्न आहे.

आपण प्रत्येकच जण पाच वर्षामधून एका दिवसासाठी मतदाता असतो, तर इतर पूर्ण वेळ जबाबदार नागरिक असतो.

पुढे वाचा

मनोगत


चित्र : तनुल विकमशी

आपल्या समाजात नास्तिकांची संख्या किती या प्रश्नाचे नेमके उत्तर मिळणे कठीणच! याचे एक कारण म्हणजे याच्या नोंदणीची कुठे सोय नाही. आणि दुसरे म्हणजे नास्तिक असणारे अनेकजण उघडपणे आपली अशी ओळख देऊ इच्छित/धजावत नाहीत.

खरे तर संशयवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांतून सुरू होणारा प्रवास स्वाभाविकपणे नास्तिकतेकडे जातो. विज्ञान, तंत्रज्ञान यांतून मिळणाऱ्या सुविधांचा उपभोग सगळे जण उचलतात. पण तरीही विज्ञानाने साध्य केलेल्या अनेक छोट्या-मोठ्या शोधांचे श्रेय शेवटी देवाला देण्याकडेच आस्तिकांचा कल जातो. आणि म्हणूनच आस्तिक असणाऱ्यांचा आस्तिक नसणाऱ्यांसोबतचा संवाद उदार नसतो.

पुढे वाचा

मनोगत

‘आजचा सुधारक’च्या जुलै २०२३ च्या कृत्रिमप्रज्ञा विशेषांकाला लेखकांचा आणि वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्या अंकाच्या मनोगतात आम्ही लिहिले होते की, 

आजवरच्या विकासात बनलेली साधने, उपकरणे, तंत्रज्ञान हे माणसाचे शारीरिक श्रम कमी करून त्याची ऊर्जा आणि त्याचा वेळ वाचवण्यासाठी बनलेली दिसतात. असा मोकळा वेळ मिळाला तर बुद्धी सृजनाचे काम अधिक करते. आज कृत्रिमप्रज्ञेसारख्या शोधाने मात्र माणसाच्या मनाला आणि बुद्धीलाच गुंतवून टाकले आहे. एवढेच नव्हे तर माणसाच्या विचारांना दिशाही तीच देते आहे.

मानवाची आजवरची वाटचाल/प्रगती ज्या अंगभूत गुणांमुळे, जसे जिज्ञासा, कल्पकता, सर्जकता, इत्यादींमुळे झाली, ते गुण कृत्रिमप्रज्ञेच्या वाढत्या उपयोगामुळे निकामी तर होणार नाहीत ना अशी शंका उपस्थित केली जात आहे.

पुढे वाचा

मनोगत

सादर निरोप

नंदा खरेंनंतर एका वर्षाच्या आत ‘आजचा सुधारक’ने आणखी दोन खंदे विचारवंत गमावले.

सुनीती देव

लेखिका आणि सामाजिक कार्यकर्ता, विवेकी विचारवंत, आणि ‘आजचा सुधारक’च्या संपादकमंडळात अनेक वर्षे कार्यरत सुनीती देव ह्यांचे २ मे २०२३ ला निधन झाले. अमरावती येथील विदर्भ महाविद्यालयात त्या तत्त्वज्ञान विषयाच्या प्राध्यापिका होत्या. परंतु नागपुरात त्यांची ओळख फार वेगळी होती. सुनीतीताई जगन्मित्र होत्या. त्यांचे सोबत असणे अतिशय आश्वासक वाटे. त्यांचे हास्य केवळ त्यांच्यापुरते नसून संपूर्ण वातावरणात आह्लाद पसरवणारे होते.

‘आजचा सुधारक’च्या अगदी सुरुवातीपासून (तेव्हाचा, नवा सुधारक) त्या संपादकमंडळात तर होत्याच, पण तेव्हा वर्गणीदारांची यादी बनवण्यापासून, पत्ते आणि तिकिटे चिकटवून अंक पोस्टात टाकण्यापर्यंतच्या विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. 

पुढे वाचा

मनोगत

‘आजचा सुधारक’ विवेकवादी चिंतनाला वाहिलेले आहे असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा विवेकाधीष्ठित विचारांना यात प्राधान्य असणे साहजिकच आहे. १८ डिसेंबरला ब्राइट्स सोसायटीने पुणे येथे ‘राष्ट्रीय नास्तिक परिषद’ आयोजित केली होती. परिषदेच्या पहिल्या भागात नास्तिकता, विवेकवाद, विज्ञाननिष्ठा आणि या सगळ्याला मिळणारे आणि मिळायला हवे असणारे कायद्याचे संरक्षण यावर आमंत्रितांची भाषणे झाली. तर दुसऱ्या भागात काही चर्चासत्रे त्यांनी घेतली. या साऱ्याचे समालोचन वाचकांपर्यंत पोहोचावे असे आम्हाला वाटले. ब्राइट्स सोसायटीचे सचिव कुमार नागे यांनी या अंकाच्या संपादनाची जबाबदारी घ्यावी असे आम्ही सुचवले. कुठलेही चांगले काम हे एकेकट्याने केले तर मोठे होत नसते.

पुढे वाचा

मनोगत

हरिहर कुंभोजकर ह्यांचा ‘हिरण्यकश्यपूचे मिथक……’ हा लेख आणि निखिल जोशी ह्यांना त्या लेखात सापडलेल्या विसंगती हे दोन्ही ‘आजचा सुधारक’च्या जानेवारीच्या अंकात प्रकाशित झाले होते. “हे एकाच वेळी प्रकाशित झाले ह्याचा अर्थ निखिल जोशी ह्यांना मूळ लेख प्रसिद्धीपूर्वीच उपलब्ध झाला होता” अशी तक्रारवजा मांडणी हरिहर कुंभोजकर ह्यांनी त्यांच्या प्रतिवादात केली आहे. ही त्यांची तक्रार रास्तच आहे. परंतु ह्या विषयावर चर्चा घडवून आणावी ह्या हेतूने जाणूनबुजून केलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न होता. ह्यामुळे हरिहर कुंभोजकरांना त्यांच्या लेखात आणखीन स्पष्टता आणण्याची संधी मिळाली हे त्यांनीही त्यांच्या प्रतिवादात मान्य केले आहे.

पुढे वाचा

मनोगत

चित्र – तनुल विकमशी

जगण्याच्या रोजच्या धडपडीतून, मनात चाललेल्या वैचारिक गोंधळाकडे थोडे दुर्लक्ष होत असते. परंतु सभोवतालच्या घटनांमुळ आपण अस्वस्थ होत असतो. ही अस्वस्थता दूर करण्याचे सर्वांत प्रभावी माध्यम म्हणजे संवाद. हा संवाद परस्परांमध्ये थेट घडत असतो किंवा पुस्तके, नाटके, चित्रपट, वा समाजमाध्यमे अशा अनेक मार्गांनी तो घडत असतो.

१८ डिसेंबर २०२२ ला पुणे येथे झालेली नास्तिक परिषद ही संवादाची अशीच एक जागा होती. ‘आजचा सुधारक’च्या प्रस्तुत अंकासाठी केलेल्या आवाहनात या परिषदेच्या निमित्ताने आपण काही प्रश्न उभे केले होते. त्यांपैकी काहींची उत्तरे आपल्याला या अंकात नक्कीच वाचायला मिळतील. याशिवाय

पुढे वाचा

मनोगत

ऑक्टोबरच्या अंकाचा विषय – नीतिनियम, न्याय-अन्याय – आम्हाला महत्त्वाचा वाटला होता. सोबतच वाचकांना आणि लिहिणाऱ्यांनादेखील तो तितकाच महत्त्वाचा वाटावा याचा अनुभव या अंकाच्या प्रकाशनानंतर आला. नीतिनियम, न्याय, अन्याय यांसारख्या विषयावर मूळ लेख भरपूर आले आणि प्रकाशित झालेल्या लेखांवर अभिप्रायही भरपूर आले. लोकांना या विषयावर बोलते व्हावेसे वाटले यासाठी हे उदाहरण पुरेसे आहे.

ह्या अंकासाठी लेख पाठवायला दिलेल्या मुदतीनंतरही अनेक लेख आमच्याकडे येत राहिले. तेव्हा या विषयावरील उर्वरित लेख काही काळानंतर परंतु ऑक्टोबर अंकाचाच भाग म्हणून प्रकाशित करावे असे ठरवले होते. ते लेख आता प्रकाशित करतो आहोत.

पुढे वाचा

मनोगत – आपले नंदाकाका

अनंत यशवंत उर्फ नंदा खरे उर्फ नंदाकाका ह्यांचे, दि. 22 जुलै 2022 ला, दीर्घ आजारानंतर, पुण्यात निधन झाले.

मुळात स्थापत्यअभियंता असलेले नंदाकाका, सुरुवातीला ‘आजचा सुधारक’च्या संपादकमंडळात, आणि नंतर अनेक वर्षे ‘सुधारक’चे संपादक होते. 

ज्ञानाच्या क्षेत्रात त्यांचा चौफेर वावर होता. इतिहासापासून जीवशास्त्रापर्यंत आणि तंत्रज्ञानापासून भूगर्भशास्त्रापर्यंत सर्वच विषयांत त्यांना रस आणि गती होती. त्यांनी जशी विविध विषयांवर पुस्तके लिहिली तशीच अनेक महत्त्वाची पुस्तके भाषांतरित करून मराठीत आणली. अनेकजणांना त्यांनी लिहिते केले. आणि स्वतः त्यांचेही लिखाण आयुष्याच्या अगदी अखेरपर्यंत अव्याहत सुरू होते.

नंदाकाकांच्याच शब्दांत सांगायचे झाले तर अगदी ‘सुधारक’चे संपादक असतानादेखील ते एक ठेकेदार माणूसच होते.

पुढे वाचा