विषय «मनोगत»

मनोगत

‘आजचा सुधारक’च्या ऑक्टोबरच्या अंकासाठी साहित्य मागवताना आपल्या समाजातील विषमतेवर आणि चढाओढ, स्वार्थ यांसारख्या मूलभूत स्वभाववैशिष्ट्यांवर लिहावे असे आम्ही सुचवले होते.

तदनुषंगाने श्रीधर सुरोशे यांचे बर्ट्रांड रसेल यांच्या ‘The Principles of Social Reconstruction’ या ग्रंथाचे परीक्षण उल्लेखनीय वाटते. त्यांच्या परीक्षणाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अनुक्रमे ग्रंथपरिचय आणि ग्रंथसमीक्षा असा असून यात बर्ट्रांड रसेलांनी आणि डॉ. आंबेडकरांनी मांडलेल्या विविध संकल्पनांचे अभ्यासपूर्ण विवेचन आहे.

या अंकात पुस्तक परीक्षणांना विशेष जागा देता आली याचा आनंद वाटतो. यानिमित्ताने वाचकांची अनेक नव्या व जुन्या उत्तम, वाचनीय अशा पुस्तकांशी ओळख होईल.

पुढे वाचा

मनोगत

कुठल्याही शैक्षणिक संस्थेत एखादा विषय अभ्यासक्रमाच्या स्वरूपात घेतला जातो, तेव्हा त्या विषयावर लिहिलेल्या साहित्याकडे प्रमाणित साहित्य म्हणूनच बघितले जाते. तेव्हा ज्योतिषकलेत येणाऱ्या कुंडली, पत्रिका, ग्रह-ताऱ्यांचे मानवी जीवनावर होणारे परिणाम या साऱ्यांविषयीची माहिती प्रमाणित होऊन सामान्य माणसाच्या मानसिकतेवर तिचा गंभीर परिणाम होण्याचा धोका संभवतो. ज्योतिष हे शास्त्र नाही हे सिद्ध करणारे अनेक प्रयोग झालेत, परंतु ते शास्त्र आहे असे आजवर तरी सिद्ध झालेले नाही या पार्श्वभूमीवर आम्ही ज्योतिषाला ‘कला’ असे संबोधले आहे.

ज्योतिषाची गरज माणसाला का पडते? याची मानसशास्त्राला माहीत असलेली अनेक कारणे आहेत.

पुढे वाचा

मनोगत

सुधारकचा अंक प्रकाशित करण्याच्या टप्प्यात असतानाच दिल्लीच्या इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाने (IGNOU) ज्योतिषावर एक स्नातकोत्तर अभ्यासक्रम सुरू करत असल्याचे जाहीर केले. हे एक अ-शास्त्रीय पाऊल आहे असे आम्हांला वाटते.

२००१ साली मुरलीमनोहर जोशी यांनी वाजपेयींचे सरकार असताना UGC मार्फत असाच एक अभ्यासक्रम विज्ञानशाखेत सुरू करायचा प्रयत्न केला होता. तेव्हा बऱ्याच लोकांनी त्याला विरोध केला होता आणि तो अभ्यासक्रम सुरू व्हायच्या आधीच बंद करण्यात आला. काही वर्षांनी मात्र असे अभ्यासक्रम अनेक ठिकाणी सुरू झाले – ग्वाल्हेर, दिल्ली, रामटेक, बनारस वगैरे. नुकताच जाहीर केलेला हा नवा अभ्यासक्रम ऑनलाईन असल्यामुळे आता अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकणार आहे. IGNOU ने जरी तो कलाविभागात घातला असला तरी अभ्यासक्रमाच्या वर्णनाप्रमाणे विद्यार्थ्यांना ग्रहांचे ज्ञान आणि त्यांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम काय हे शिकवले जाईल आणि नंतर तेच ज्ञान ते स्वत:च्या उपजीविकेकरता वापरू शकतील असे म्हटले आहे. 

पुढे वाचा

मनोगत

‘आजचा सुधारक’चा एप्रिल अंक माध्यमस्वातंत्र्याविषयी असणार असे आवाहन केले तेव्हा ओघानेच आपल्याकडील लोकशाहीवर जे अनेक प्रश्न सतत उभे राहतात, ते पुढे येणार हे निश्चित झाले होते. सदर अंकासाठी अनेकांनी त्या विषयावर आपले साहित्य पाठवले. ते आपण ह्या अंकात समाविष्ट केले आहे.
या अंकात दोन चित्रकारांचेदेखील योगदान आहे. व्यंगचित्रे ही तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर नेमके भाष्य करणारी एक अद्भुत कला आहे. प्रभाकर पाचपुते ह्यांच्या व्यंगचित्रांतून दोन दशकांपूर्वीची सामाजिक स्थिती लक्षात येऊ शकेल. तर मिलिंद क्षीरसागर ह्यांनी आजच्या सामाजिक स्थितीचे अचूक वर्णन आपल्या चित्रांमध्ये केले आहे.

पुढे वाचा

मनोगत

जानेवारी २०२१ च्या ह्या अंकाबरोबर ‘आजचा सुधारक’ने आपल्या नव्या स्वरूपातील दोन वर्षे पूर्ण केली आहेत. ‘आजचा सुधारक’च्या सर्व वाचकांना आणि शुभचिंतकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

जानेवारीचा शेतीविषयक अंक विशेषतः नव्याने घोषित केलेल्या तीन कायद्यांविषयी आणि त्याविरोधात शेतकर्‍यांनी उभारलेल्या आंदोलनाविषयी आहे. कोणताही कायदा बनवताना त्याचा थेट परिणाम ज्यांच्यावर होणार त्या समुहाला विश्वासात घेणे हे सुदृढ सहभागी लोकशाहीचे लक्षण असते. सद्य सरकार तेथे कमी पडले आणि त्यामुळे जनमानसात नवीन कायद्यांविषयी शंका निर्माण झाल्या.

‘आजचा सुधारक’च्या शेतीविषयक अंकासाठी आवाहन करताना शेती हा ‘सतत’ लाभ देणारा व्यवसाय नाही असे विधान आम्ही केले होते.

पुढे वाचा

मनोगत

‘आजचा सुधारक’च्या माध्यमातून वेगवेगेळे सामाजिक विषय आपण हाताळत असतो. ह्या सर्वांच्या मुळाशी तर्क आणि विवेकवाद असावा अशी ‘सुधारक’ची आग्रही मागणी असते. एप्रिल २०१० मध्ये ‘आजचा सुधारक’चा ‘अंधश्रद्धा विशेषांक’ प्रकाशित झाला होता. आज तब्बल १० वर्षांनी साधारण त्याच अंगाने जाणारा विषय आपण घेतो आहोत, हे खरेतर मरगळलेल्या समाजाचे लक्षण आहे. तरी असे विषय घेतल्यानेच वाद-संवाद घडतात, विचारचक्र सुरू राहते. अंकाचा मूळ विषय जरी नास्तिकेशी जोडलेला असला तरी त्या अनुषंगाने काही इतर आजूबाजूचे विषय आणि काही वेगळ्या बाजूच्या मतांनासुद्धा ह्यात समाविष्ट केले आहे.

पुढे वाचा

मनोगत

आजचे वर्तमान उद्याचा इतिहास असतो असे जेव्हा जेव्हा म्हटले जाते तेव्हा इतिहासाचे सामान्यीकरण होते असे नाही. तसेही इतिहास हा कधीच खूप भव्य-दिव्य किंवा काळवंडलेला नसतो. तथ्यांचे तपशील, (मग ती तथ्ये कधी उजळवून टाकणारी, आशादायी किंवा कधी उदासीन करणारी, हिंसक अशी असू शकतात) त्यांचे दस्तावेजीकरण हे इतिहासाचे महत्त्वाचे अंग आहे.

कोरोनाची नोंद उद्याच्या इतिहासात होईल. आजवर असे अनेक साथीचे रोग इतिहासजमा झाले आहेत. त्या त्या वेळी ह्या रोगांनी केवळ शरीरालाच नव्हे तर समाजमनांनाही पोखरले. तसेच त्या आपत्तीने अनेक संधीही दिल्या. आरोग्यशास्त्रात नवनवीन शोध लागले.

पुढे वाचा

पत्रोत्तरे

‘सुधारक’च्या कोरोना विशेषांकातील लेखांवर आलेल्या प्रतिक्रियांवर मूळ लेखकांनी पाठवलेली पत्रोत्तरे तसेच इतरांचे अभिप्राय प्रकाशित करीत आहोत.

सकारात्मक बदल घडवून आणण्यात वैचारिक द्वंद्वांची महत्त्वाची भूमिका असते. आपले विचार परत परत तपासून घेऊन त्यास अधिक धारदार करणे वा विरूद्ध विचार पटल्यास त्यांना आत्मसात करणे असे सतत होत राहिले पाहिजे.

सुधारकच्या माध्यमातून असे होत असलेले बघून आनंद वाटतो.

समन्वयक – प्राजक्ता अतुल
09372204641
aajacha.sudharak@gmail.com

मनोगत

‘सुधारक’च्या कोरोना विशेषांकातील लेखांवर अनेक वाचकांच्या प्रतिक्रिया आल्या. त्यांपैकी काही नवे मुद्दे, प्रश्न व विचार व्यक्त करणार्‍या प्रतिक्रिया संबंधित लेखांच्या खाली प्रकाशित केल्या आहेतच.

ह्या विशेषांकात इतर लेखांव्यतिरिक्त ‘सुधारक’च्या ऑक्टोबर २०१९ च्या अंकात प्रकाशित झालेल्या डॉ. सुभाष आठले ह्यांच्या ‘मेकॉले, जी एम फूड्स आणि कॅन्सर एक्सप्रेस’ ह्या  लेखावरील प्राची माहूरकर ह्यांची प्रतिक्रिया प्रकाशित केली. त्यावरही अनेकांचे अभिप्राय आले. त्यांपैकी निवडक लेखाखाली प्रकाशित केले आहेतच.

‘सुधारक’च्या कोरोना विशेषांकात डॉ. शंतनू अभ्यंकर ह्यांच्या “या मार्गानेच जाऊया” या लेखाच्या पुन:प्रसिद्धीनिमित्ताने अंबुजा साळगांवकर आणि परीक्षित शेवडे ह्यांनी आपली प्रतिक्रिया पाठवली.

पुढे वाचा

मनोगत

जगातील आजची परिस्थिती अभूतपूर्व म्हणावी लागेल. ह्याचा अर्थ असा नव्हे की आजवर साथीचे रोग आलेच नाहीत. आले, परंतु त्यावरील उपाय म्हणून जागतिक संचारबंदी लादावी लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. अश्या संचारबंदीचे परिणाम काय होत आहेत आणि काय होणार आहेत, ह्यांचा विचार सर्वप्रथम करणे क्रमप्राप्त आहे.

अगदी अलीकडेपर्यंत सुरू असलेले जातीय, धार्मिक, राजकीय ध्रुवीकरणाचे प्रयत्न ह्या एकाच समस्येमुळे तूर्तास कालबाह्य झाले आहेत. सरकार पूर्ण शक्तीनिशी ह्या समस्येशी झुंजण्यात लागले आहे. हा विषाणू चीनमधून भारतात संक्रमित होण्याचे मुख्य कारण म्हणजे जगभरात प्रवास करणारे उच्चवर्गीय आणि उच्चमध्यमवर्गीय प्रवासी.

पुढे वाचा