विषय «पत्र-पत्रोत्तरे»

पत्रसंवाद

मेंदूतील देव वरील चर्चा (जुलै, ऑक्टो.व नोव्हें.०६), याबद्दल पर्सिंगर ह्यांचे पूर्वीचेही एक संशोधन पाहिले तर त्यांच्या मेंदूतील धार्मिक स्थानाच्या प्रयोगाबद्दल संशय घेण्यासारखीच स्थिती आहे. परामानसशास्त्रज्ञ विल्यम रोल ह्यांच्याबरोबर पर्सिंगर ह्यांनी २००१ मध्ये एक शोधनिबंध प्रसिद्ध केला होता. त्याचे नाव होते : पिशाच्च आणि पिशाच्चाने झपाटलेल्या जागेविषयीचे संशोधन पुनर्तपासणी आणि अर्थान्तरण. त्यामध्ये त्यांनी काढलेले निष्कर्ष गूढ भाषेत लिहिलेले होते व ते बुद्धिवादी संशोधकांना पटलेले नव्हते.
आपल्या निष्कर्षात पर्सिंगर व रोल ह्यांनी, “काही पिशाचे ‘सायकोएनर्जीटिक फोर्स’ मुळे शांतताभंग (भानामतीसारख्या गोष्टी) करतात.” “मेंदूतील विद्युत्-चुंबकीयच अवस्था वातावरणातील विद्युत्-चुंबकीय शक्तींवर परिणाम करून घटना घडवत असावी,” ह्यासारखे निष्कर्ष काढले होते.

पुढे वाचा

पत्रसंवाद

आसु च्या नोव्हें.०६ च्या पत्रसंवादातील प्रदीप पाटील यांचे पत्रातील शेवटच्या परिच्छेदांत माझ्या नावाचा उल्लेख व उल्लेखाचे कारण वाचून मी आश्चर्यचकित झालो. प्रदीप पाटील लिहितात की “डॉ.देशकर यांना धर्म म्हणजे नीती या अर्थाने त्यांचे विवेचन अभिप्रेत असेल तर मी (प्रदीप पाटील) आस मध्ये पूर्वीच लिहिले आहे. आणि धर्माविषयी आस ने दि.य.देशपांडेंचे अनेक लेख छापले आहेत तीच माझी भूमिका आहे.” माझी प्रदीप पाटलांच्या मेंदूतील देव’ ह्या मूळ (जुलै ०६) लेखावर प्रतिक्रिया ऑक्टो.०६ च्या पत्रसंवादात प्रसिद्ध झाली होती. त्यात कुठेही मी नीती हा शब्द वापरला नव्हता.

पुढे वाचा

पत्रसंवाद

अंक १७.७ मधील मॅक्स प्लँकचा (भाषांतरित) आपल्या अस्तित्वाचे गूढ रहस्य शीर्षक असणारा लेख प्रकाशित झाला आहे. असला लेख आजचा सुधारक सारख्या विवेकवादाला समर्पित मासिकात का छापला जावा हे मला पडलेले गूढ आहे. कदाचित संपादकांची ही मनीषा असेल की बुद्धिवाद्यांना विरोधी पक्ष माहीत असावा. आरंभीच मला एक गोष्ट म्हणायची आहे ती ही की कोणी एक व्यक्ती एखाद्या क्षेत्रात अधिकारी जरी असेल तरी जीवनाच्या अन्य क्षेत्रात तिचे म्हणणे तितकेच अधिकारी असते असे नसते. उदा. लता मंगेशकर आर्थिक किंवा कृषिक्षेत्रात अधिकारी नाहीत. त्याचप्रमाणे मॅक्स प्लँक हे भौतिकशास्त्राच्या क्षेत्रात अधिकारी वैज्ञानक आहेत म्हणून आध्यात्मिक क्षेत्रातही त्यांच्या मतांना तितकेच महत्त्व दिले जावे असे मला वाटत नाही.

पुढे वाचा

पत्रसंवाद

राजीव जोशींनी दोन कात्रणे व एक पत्र पाठवले आहे. मुद्दे महत्त्वाचे आहेत, पण एक कात्रण व पत्र इंग्रजीत आहेत. सारांशच देत आहोत.]
क)(लोकसत्ता, ३१ ऑगस्ट २००६, हज यात्रेचे अनुदान: आता लक्ष मुंबईतील याचिकेकडे, या बातमीवरून.) मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेली एक जनहितयाचिका सर्व प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रूपांनी धार्मिक कार्यांसाठी दिली जाणारी सरकारी मदत थांबवू पाहते. या याचिकेतील मागण्यांचा तपशील बातमीत आहे.
ख) (टाईम्स ऑफ इंडिया, ३१ ऑगस्ट २००६, युअर ब्रेन डझन्ट हॅव अ गॉड स्पॉट, या लेखावरून)
एक नवा अभ्यास दाखवतो की गूढवादी व धार्मिक अनुभवांसाठी मेंदूत एक ‘देव-स्थान’ नसते.

पुढे वाचा

पत्रसंवाद/चर्चात्मक लेख

व्यावसायिक शेती [जयंत वैद्य यांनी दहा गुंठे प्रयोग व अशोक बंगांचे प्रतिमान यापेक्षा वेगळे एक प्रतिमान तपशिलात सुचविले आहे. या प्रतिमानाचे वैशिष्ट्य असे की ते सुट्या शेतकऱ्याऐवजी संपूर्ण खेड्याचा विचार करते. वैद्यांनी शेतीसोबत करावयाच्या इतर अनेक गोष्टींचे तपशीलवार विश्लेषण करून आकडेवारी प्रस्थापित केली आहे. आम्ही मात्र या पत्र-लेखात केवळ शेवटची गोषवारा देणारी आकडेवारी देत आहोत. तपशील हवा असणाऱ्यांनी वैद्यांशी थेट संपर्क साधावा, ही विनंती. सं.]
एखादी वस्तू खरेदी करणे व ती कमी जास्त भावात विकणे याला व्यापार म्हणतात. एखाद्या वस्तूचा उत्पादनखर्च कमीत कमी ठेवत, दर्जेदार व सुबक वस्तू तयार करून त्या वाजवी भावाने विकणे याला व्यवसाय म्हणतात.

पुढे वाचा

पत्रसंवाद

‘आर्यांचे निसर्गगीत’
वाहोत हे झुळूझुळू मधु मंद वात
राहो वहात जल गोडचि या नद्यांत
देवोत दुग्ध मधु गोऽऽडचि नित्य गाई, रात्रि-प्रभातही असो,
मधु सौख्यकारी वर्तात गोड जन पार्थिव ते आम्हास
वृष्टीमुळे नभ करो, जग रक्षणास
झाडातुनि मधुरचि रस पाझरोत आरोग्यदायक असो रविची ही ज्योत
वरील निसर्गगीत ऋग्वेदातल्या ऋचा/सूक्ताचा अनुवाद आहे. आर्य (भारतार्य) निरीश्वरवादी होते आणि निसर्गोपासक.
माझ्या सनातनी कुटुंबातून आलेल्या आईने (स्मृतिरूप लीला मोडक यांनी) आमच्या प्रार्थनासमाजी पार्श्वभूमीला सुसंगत म्हणून ही ईश्वररहित ‘प्रार्थना’ आम्हा दोन भावंडांसाठी परवचांबरोबर म्हणण्यासाठी मिळविली होती व आम्हाला गोड चालीवर म्हणायला शिकवली होती.

पुढे वाचा

पत्रसंवाद

आजचा सुधारक चा अंक आला. “दि.य. देशपांडे ह्यांची तत्त्वज्ञानात्मक भूमिका’ हा जोगिन्दर कौर महाजन यांचा लेख अप्रतिम आहे. तो लेख मी दोनदा वाचला आणि मला नानांची भूमिका बढेशाने समजली. शुभंकरणाचे तत्त्व यावर लिहिताना त्यांनी, प्रा. दि.य. देशपांडे यांनी कांटचे मत आणि उपयोगितावादी मत यांची सांगड घालण्याचा जो प्रयत्न केला आहे, त्याचे स्वरूप माझ्यासारख्या सामान्य वाचकाला समजेल अशा रीतीने स्पष्ट केले आहे. श्रीमती महाजन यांना माझे मनःपूर्वक धन्यवाद.
जॉन स्टुअर्ट मिलच्या Utlitarianism चे प्रा. दि.य. देशपांडे यांनी केलेले भाषांतर याच अंकात प्रसिद्ध करण्यात मोठेच औचित्य साधले आहे.

पुढे वाचा

पत्रसंवाद

आपल्या फेब्रुवारी ०६ च्या अंकातील श्री दिवाकर मोहनी यांचा लेख वाचला. आपल्या देशात बेरोजगार हमीचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करीत असल्याचा तसेच इंग्रजी राजवट येण्यापूर्वी तो प्रश्न नसल्याचाही उल्लेख त्यात आहे. हा विषय गेली शतक दीड शतक बराच चर्चिला गेलेला आहे. अर्थात लोकशाहीत आपली मते मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे हे सर्वमान्य आहेच.
मी आजच्या रोजगार हमीची प्रशंसा करणे अत्यंत कठीण समजते. परंतु इंग्रजांचे राज्य येण्यापूर्वी आमच्याकडे रोजगाराचा प्रश्न अजिबात नव्हता, कोणी बेरोजगार नव्हतेच, त्या वेळी पैशाला महत्त्व नव्हते वगैरे उल्लेख मोहनींच्या लेखात आहेत.

पुढे वाचा

पत्रसंवाद

डिसें. २००५ (अंक १६.९) मध्ये प्रा. कुमदिनी दांडेकरांची प्रतिक्रिया महत्त्वाची वाटली. माझ्या लेखनाचा पहिलाच खर्डी मला पाठवावा लागला. इतर सर्व व्याप, जबाबदाऱ्या सांभाळून दिलेल्या वेळात लेख देताना मलाही असमाधान वाटत होते. विशेषतः माझ्या लेखातील स्त्री-अभ्यासाच्या ज्ञानशाखेने स्त्रियांच्या साहित्याकडे कसे पाहिले हे जे लिहिले आहे त्याचे विभावरीच्या लेखनाशी नेमके काय नाते हे स्पष्ट करायला हवे होते. माझी धडपड अशी होती की एकीकडे ‘विभावरी’च्या लेखनाला त्या काळात मिळालेले महत्त्व समजावून घ्यावे आणि दुसरीकडे एकूणच महाराष्ट्रातील मराठी समाजाने १९५० नंतर ज्या प्रकारे एकूणच साहित्याचे क्षेत्र, विषय मर्यादित केले त्याकडे लक्ष वेधून स्त्रियांच्या लेखनाचाही कोंडवाडा का झाला ह्या प्रश्नाला तोंड फोडावे.

पुढे वाचा

पत्रसंवाद

मी एक सामान्य वाचक आहे. साहित्याशी माझा दूरान्वयानेही संबंध नाही. परंतु माझी पंधरा वर्षांनी मोठी असलेली बहीण एक ऑक्टोबर २००५ ला शंभर वर्षांची झाली असती त्यानिमित्ताने आजचा सुधारक ने एक विशेषांक काढला, कारण एके काळची ती सुप्रसिद्ध लेखिका होती. हा अंक वाचण्याची मला उत्सुकता होती.बाळुताईंची शंभरी! आज तिच्या साहित्याच्या क्षेत्रात (समाजशास्त्रात नव्हे) काय बदल झाले असतील हे जाणून घेण्याची इच्छा होती. सुदैवाने तीन उच्चशिक्षित मराठीच्या प्राध्यापिकांनी लेख लिहायचे कबूल केल्याचे ऐकले आणि माझी उत्सुकता वाढली. या तीनही प्राध्यापिकांचे लेख मी वाचले.

पुढे वाचा