संपूर्ण भारतातील आदिवासी समाजाच्या सुमारे १०% लोकसंख्या असलेल्या, १५%, दलित, ५०% महिला आणि १५% अल्पसंख्याक मिळून ९०% समाजघटकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठीच्या गेल्या ५५ वर्षांच्या सामाजिक जीवनात विविध अनुभव गोळा झाले आहेत. त्या अनुभवांच्या आधारे केलेल्या अभ्यासाकडे मी वाचकांचे लक्ष वेधू इच्छितो. आपल्या देशात सुरू असलेल्या आदिवासी असंतोषाकडे भारतसरकारने केवळ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून पाहणे बरोबर होणार नाही. ह्या असंतोषाच्या परिस्थितीचा मुळापासून अभ्यास करणे, हाच ह्या प्रश्नाला सोडविण्यासाठी योग्य उपाय होऊ शकतो.
भारतीय कम्युनिस्ट चळवळीचा इतिहास
भारतात कम्युनिस्ट पक्षाची अधिकृत स्थापना कानपूर येथे काही कम्युनिस्टांनी डिसेंबर १९२५ मध्ये केली असून सांप्रत वर्ष कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेचे शताब्दी वर्ष आहे.