विषय «माध्यम»

भव्यतेच्या वेडाने पछाडलेले दशक

इंग्रजी भाषेत मेगॅलोमानियाक (megalomaniac) असे एक व्यक्तिविशेषण आहे. त्याचा अर्थ सत्तेचा, संपत्तीचा किंवा भव्य योजनांचा हव्यास असणारे व्यक्तिमत्व. एक प्रकारचे मानसिक वेड. अशा व्यक्ती स्वतःची प्रतिमा मोठी करून दाखविण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न करतात. अहंकारोन्मादी असे त्याचे मराठी भाषांतर वाचण्यात आले. ते समर्पक आहे की नाही माहीत नाही. मात्र भव्यतेचे आकर्षण हे मानवी मनाचे लक्षण आहे. शिवाय मोठेपणाची मानसिकता कुटुंबांच्या, व्यावसायिकांच्या आणि संस्थांच्या प्रवर्तकांमध्ये, शासनातील अधिकारी वर्गात आणि राजकारणी नेत्यांमध्ये कमी-जास्त प्रमाणात असते. त्याची आवश्यकताही असते. जेव्हा मोठेपणाच्या स्वभावात निर्मळता, निरपेक्षता असते तेव्हा स्वतःसाठीच्या आणि देशासाठीच्या महत्त्वाकांक्षेचे लाभ आणि आनंद सर्वांना मिळतो.

पुढे वाचा

नास्तिकतेचे सामर्थ्य आणि मर्यादा आणि प्रसारमाध्यमांतील नास्तिक्याची भूमिका

शिवप्रसाद महाजन : नास्तिक कायमच गंभीर असतो असा आपल्याकडे साधारणपणे बऱ्याचजणांचा समज असतो. किंवा बरेचजण तसे जाहीरपणे बोलतदेखील असतात. आपले सकाळपासूनचे कार्यक्रम बघितले तर त्यामध्ये चर्चासत्रं झालीत, परिसंवाद होतोय, काही गाण्यांचे कार्यक्रम झाले, नंतर एकांकिका आहे, रात्री पुन्हा गाण्याचे कार्यक्रम आहेत. तर असं काही नसतं की नास्तिक नेहमी गंभीरच असतो. तो सर्व क्षेत्रात आपापल्या परीनं आपापली भूमिका बजावत असतो. बरेचजण त्यापैकी यशस्वीपण झालेले आहेत. नास्तिक यशस्वी झालेला आहे असं म्हटलं की समोरून एक प्रश्न हमखास येतो, त्यांची नावे सांगा. आणि मग इथे आपली जरा पंचाईत होते.

पुढे वाचा

चिथावणीला बळी पडू नका

नमस्कार. मला प्रथम माझी एक आठवण सांगायची आहे. आमच्याकडे एकदा पाहुणे येणार होते. तर त्यांना चहाबरोबर काहीतरी खायला द्यावे लागणार! संध्याकाळची वेळ होती, त्यामुळे कशासोबत हे सांगायची गरज नाहीये. काहीतरी मागवायचं होतं खायला. तर आईने मला सांगितलं, “अरे, घरातले काजू आणि बदाम संपले आहेत तर पटकन् जाऊन घेऊन ये.” मी गेलो तर दुकानात काजू-बदाम नव्हते, संपले होते. मी तिथून फोन केला माझ्या भावाला आणि म्हणालो, “आईला विचार की तिथे काजू-बदाम नाहीयेत. तर काय करू?” आईने झटकन् सांगितलं, “दाणे असतील तर दाणे तरी घेऊन ये.”

पुढे वाचा

परिसंवाद – माझा नास्तिकतेचा प्रवास

नास्तिकतेचा प्रवास करावा लागला नाही

नमस्कार.

आज या सगळ्यांची मनोगतं ऐकली. मागे मी एका दुसऱ्या मेळाव्याला गेले होते, भगतसिंग विचारांच्या. तिथंही अनेक जणांचा नास्तिकतेचा प्रवास मी ऐकला. तेव्हा मला माझ्या नशिबातून आलेलं वेगळेपण असं जाणवलं की, मला हा प्रवास कधी करावाच लागला नाही. 

मी आजी-आजोबांकडे वाढले, माझ्या आईच्या आई-वडिलांकडे! ते त्या काळामध्येसुद्धा कट्टर नास्तिक होते. माझ्या आजी-आजोबांच्या घरामध्ये देव्हारा नव्हता. माझी आजी कुठलेही उपवास करत नसे आणि विशेष म्हणजे ती माझ्या आजोबांना त्या काळामध्येदेखील ‘ए अप्पा’ अशी नावाने हाक मारत असे. त्या काळामध्ये हा विचार केवढा बंडखोर होता.

पुढे वाचा

न्यायासाठी संवाद आवश्यक

काही दिवसांपूर्वी क्षमावाणी दिवस होता. दरवर्षी या दिवशी जैन लोक त्यांनी कळत नकळत केलेल्या दुष्कृत्यांबद्दल क्षमायाचना करतात. कॉलेजच्या वेळेच्या मित्रमैत्रिणींच्या एका व्हॉट्सअप ग्रुपवर त्यादिवशी क्षमायाचनेचा असा एक संदेश एका जैन मैत्रिणीकडून आला. आम्ही सर्व गेल्या काही दशकांपासून एकमेकांचे चांगले मित्र आहोत. यातील बहुतांश भारतात आहेत. अधूनमधून थट्टामस्करी, सठी-सहामाशी भेटीगाठी होत असतात. तो संदेश दिसल्यावर अनेक लोकांचे जोडलेल्या हातांचे ईमोजी आले. एकाने मिच्छामी दुक्क्डम हा त्या दिवसाशी संबंधित प्राकृत वाक्यांश लिहिला. मी लिहिले ‘यु आर फरगिव्हन’. आता मागितली कोणी क्षमा तर आपणही करावं ना मन मोठं.

पुढे वाचा

कलाकृतीमधील ‘ती’चं अस्तित्व

वकिलीचे शिक्षण घेताना मला प्रकर्षाने असे जाणवायचे की, समोर आलेल्या पुराव्यावरून निकाल तर दिला जातो. पण तो न्याय्य असतोच असे आपण ठामपणे म्हणू शकत नाही. ‘कुसुम मनोहर लेले’सारखी नाटके आपल्या समाजातील स्थितीला दर्शवतात. वास्तवातही कुसुमला न्याय मिळाला नाहीच. नाटकात शेवट गोड करता येतो पण समाजात केवळ ठोस पुराव्याअभावी कितीतरी अपराधी आपल्या आजूबाजूला दिसत असतात. किंवा निरपराध लोक कायद्याच्या चकाट्यात अडकलेले दिसतात. कायदा आहे, तशा त्याला पळवाटाही आहेत आणि सद्य:स्थितीत या पळवाटा अधिराज्य करताना दिसतात. समाजात एखादा गुन्हा पुन्हा होऊ नये यासाठी एक प्रकारची भीती बसावी या उद्देशाने शिक्षेचे स्वरूप ठरवलेले असते.

पुढे वाचा

देशहित की अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला?

समाजमाध्यमे, प्रसारमाध्यमे, नव्याने प्रकाशझोतात येणारी, निरपेक्ष पद्धतीने बातम्या प्रसारण करणाऱ्या डिजिटल मीडिया, स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स (उदा: नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईम, हॉटस्टार सारखी ओ.टी.टी (ओवर द टॉप प्लॅटफॉर्म्स)) यांसारखी माध्यमे लोकशाहीचा एक अमूल्य भाग आहेत. मागील काही वर्षांपासून प्रसारमाध्यमांची होणारी गळचेपी सगळ्यांच्या परिचयाचा विषय आहे. आज तर काही प्रसारमाध्यमे अगदी स्वत्व हरवून बसलेली पाहायला मिळतात. अश्या परिस्थितीत वास्तवाचे दर्शन इतर माध्यमांद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचणे गरजेचे ठरते. 

आतापर्यंत डिजिटल मीडिया (उदा: द प्रिंट, द वायर, न्यूज लॉंड्री, स्क्रोल, द देशभक्त), बातम्या प्रसारित करणारी समाजमाध्यमे (उदा: फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्वीटर, यूट्यूब), तसेच ओ.टी.टी

पुढे वाचा

गडबड-घोटाळे (व्यंगचित्रे)

चित्रकार प्रभाकर पाचपुते ह्यांच्या खालील चित्रांना आधार आहे तो माध्यमांच्या बेजबाबदार वर्तणुकीचा. प्रसार व प्रचारमाध्यमे ज्या पद्धतीने लोकांच्या मनात अवाजवी भीती पसरवत आहे, त्याचे हे बोलके चित्रण आहे.

दोन दशकांपूर्वी Y2K Bug मुळे (वर्ष २००० मुळे संगणकीय व्यवहारांत आलेला अडथळा) लोकांच्या मनात संभ्रम आणि भीती पसरवण्याचे काम तेव्हाच्या प्रसार आणि प्रचारमाध्यमांनी केले. ३१ डिसेंबर १९९९ च्या मध्यरात्रीपासून संपूर्ण विश्वातील संगणक प्रणाली ढेपाळल्याने आर्थिक जगतात काय हाहाकार माजू शकतो – जणू जगबुडी होऊ घातली आहे – हे मांडून सामान्य लोकांत असमंजस्य निर्माण करण्यात माध्यमांची असलेली भूमिका ह्या चित्रांतून स्पष्ट होते.

पुढे वाचा

अभिव्यक्तिस्वातंत्र्य? की हक्कांची पायमल्ली?

चित्रकार मिलिंद क्षीरसागर ह्यांनी रेखाटलेली काही चित्रे:

स्त्रीला मिळाली आहें शक्ती सारी
तरी का समजता तिला बिचारी?

फाईन आर्टिस्ट, होली क्रॉस स्पेशल स्कूल आर्ट येथे शिक्षक (स्पेशल मुलांचे कलाशिक्षक) ठाणे.
गेल्या ११ वर्षांपासून शिक्षक म्हणून काम करत आहेत. वेगवेगळ्या शाळेतल्या मुलांसोबत कलाक्षेत्रात विविध कार्यक्रम करत असतात.

आमच्यासाठी? आमच्या सहभागाशिवाय?

आमच्यासाठी? आमच्या सहभागाशिवाय?

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश यांच्या सीमेवर असणार्‍या मध्यप्रदेशातील पारडसिंगा गावातील शेतकर्‍यांनी हा प्रश्न उभा केला आहे. थेट शेतकर्‍यांच्या तोंडून आलेल्या ह्या प्रश्नांना धोरणे बनवणार्‍या राज्यकर्त्यांसमोर आणण्यासाठी आंदोलकांनी निवडलेले हे एक वेगळेच माध्यम!

नवीन तीन कायदे आमच्या हिताचे आहेत असे आम्हांला सांगण्यात येते आहे. पण कायदे पारित करण्यापूर्वी आमच्यापैकी कोणालाच विश्वासात घेतले नव्हते. मग आमच्या सहभागाशिवाय आमच्या हितासंबंधी निर्णय घेणं लोकशाहीच्या संकल्पनेच्या विरोधात नाही का? कायद्यांना विरोध असण्यामागे हेच आमचे मुख्य कारण आहे. आम्ही हा विरोध करीत राहू. वाईट एकच वाटते की स्वतःची ‘मन की बात’ सांगणारे हे सरकार आमची ‘मन की बात’ ऐकायलाच तयार नाही आहे.

पुढे वाचा