विषय «आरोग्य»

भारताचे मानसिक आरोग्य: आज आणि उद्या

भारतात जन्मलेल्या आणि भारतात कार्यरत असलेल्या मनोरोग-तज्ज्ञाच्या भूमिकेत एक महत्त्वाचा प्रश्न माझ्यासमोर उभा राहतो तो असा की एका सर्वसाधारण भारतीयाचे व्यक्तिमत्त्व त्याच्या परदेशी बांधवांपासून कोणत्या दृष्टीने भिन्न असते व ह्या विशिष्ट ‘भारतीय व्यक्तिमत्त्वाचा’ परिणाम त्याच्या मानसिक आरोग्यावर व मानसिक रोगांवर कशा प्रकारे पडतो? आपली ‘भारतीयता’ आपल्याला मानसिक आरोग्याकडे नेते किंवा नाही हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

“निरोगी मानसिकता” म्हणजे काय ? निरोगी मानसिकता म्हणजे नेमके काय व आपल्या भारतीय विचारसरणीचा त्यावर काय प्रभाव पडतो हे सर्वप्रथम आपण समजायचा प्रयत्न करू या.

मानसशास्त्रीय विश्लेषणानुसार निरोगी मानसिकतेचे खालीलप्रमाणे दहा पैलू आहेत.

पुढे वाचा

नैराश्यग्रस्तता आघाडी घेत आहे !

जागतिकीकरणाबरोबर माणूस बदलतो आहे. नातेसंबंध बदलत आहेत. माणूस जास्त आत्मकेंद्री होतो आहे. हिशोबी होतो आहे. पैसा खूप मिळतोय पण त्याचबरोबर वेळेचा बळी – सामाजिकीकरणाचा बळी व माणुसकीचाही बळी जातो आहे. कामाचे तास वाटेल तसे वाढताहेत. आरामाला वेळ नाही. खुल्या बाजारपद्धतीमुळे वाढती स्पर्धा, विदेशी उत्पादनाची आयात, यामुळे वाढती महागाई होणार. गरीब-श्रीमंतांमधली दरी वाढते आहे. मुलांना लहान वयात जीवघेण्या स्पर्धेत उतरावे लागते आहे. त्यामुळे ताण वाढताहेत. त्याचबरोबर निराशाही वाढते आहे. आत्मकेंद्री विचार करण्याची पद्धत, वाढत्या गरजा, छानछोकी-मौजमजा यांच्याशी संबंधित. यातून ताण-तणाव वाढायलाच मदत होते.

पुढे वाचा

स्वेच्छामरण : राष्ट्रव्यापी मोहीम सुरू करण्याची गरज

‘मृत्यू’ शब्दाला बहुतेक सर्वजण फार घाबरतात. “जातस्य हि ध्रुवो मृत्युः” किंवा “मरणं प्रकृतिः शरीरिणाम्’ ही सुभाषिते जरी पाठ असली, तसेच केव्हा ना केव्हा प्रत्येकाला मृत्यूयेणारच हे जरी सर्वांना माहीत असले, तरीही कोणाच्याही मृत्यूची चर्चा करणे अशिष्टपणाचे मानले जाते. शुभअशुभाच्या कल्पनांचाही आपल्या समाजावर जबरदस्त पगडा आहे. त्यामुळे कोणाच्याही मृत्यूबद्दल बोलणे अशुभ, अयोग्य मानले जाते. स्वतःच्या मृत्यूविषयीसुद्धा कोणाला आपले विचार मोकळेपणाने मांडता येत नाहीत. कोणी बोलूच देत नाहीत. अलीकडे मात्र, निदान वयोवृद्धांमध्ये तरी या विषयावर थोडीबहुत चर्चा होऊ लागली आहे.
“आत्महत्या” करणार्याू व्यक्तीबद्दल आपल्याकडे तरी अजूनही कोणी मोकळ्या मनाने विचार करीत नाहीत.

पुढे वाचा

निसर्ग, मानव आणि आनुवंशिक अभियांत्रिकी

मानव हा जीवसृष्टीतील सर्वात बुद्धिमान जीव आहे त्यामुळे मानवाने अनुभवांचे, विचारांचे आणि ज्ञानाचे प्रचंड संचय निर्माण केले आहेत. १८ ते २० लक्ष वर्षांपूर्वी आफ्रिकेतील रिफ्ट व्हॅलीमध्ये व इंडोनेशिया आणि चीनमध्ये सरळ ताठ चालू लागल्यापासून माणूस सतत चालतोच आहे, शिकतोच आहे आणि बुद्धीला सुचेल ते करून पाहून पुढेच चालला आहे. वैयक्तिक आणि गटाधीन विचारमंथन सतत चालूच असून नवनवीन कल्पना, विचार व ज्ञान वृद्धिंगत होतच राहणार. यामध्ये संचारमाध्यमांचा मोठाच वाटा आहे. गलबते, रेल्वे, विमाने, पोस्ट व तार यामुळे भारतीयांना जगाचे दरवाजे उघडून दिले.

पुढे वाचा

विवाहयोग्य वय- वास्तव व प्रचार

मुलींच्या विवाहाचे योग्य वय १८ च्या वर व मुलांचे २१ च्या वर असा दूरदर्शनवर अनेक वर्षांपासून प्रचार करण्यात येत आहे. या वयांच्या आधी विवाह करणे हा कायद्याप्रमाणे गुन्हादेखील आहे. १८ वर्षांच्या खाली मूल झाल्याने स्त्रीच्या व अपत्यांच्या स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतो हा या कायद्याच्या समर्थनासाठी मुख्य मुद्दा मांडण्यात येतो.

दोन तोटकी विधाने
आश्चर्याची गोष्ट अशी की वरील ठाम विधाने कशाच्या आधारावर केली आहेत हे कधीच सांगण्यात येत नाही. दूरदर्शनाकडे याबद्दल चौकशी करणारे एक पत्र पाठविले पण त्याचे उत्तर मिळाले नाही. तेव्हा मी स्वतःच या विषयीचे वाङ्मय धुंडाळले.

पुढे वाचा