मासिक संग्रह: डिसेंबर, २०१६

भारतीय चर्चापद्धती (भाग ४)

चरकसंहिता : वादविद्येचे प्रात्यक्षिक

चर्चापद्धती, चरकसंहिता, वादविद्या

——————————————————————————–

         ‘भारतीय चर्चापद्धती’चा इतिहास सांगणाऱ्या ह्या लेखमालेच्या ह्यापूर्वीच्या भागात आपण आन्वीक्षिकीचा परिचय करून घेतला. आयुर्वेदाने ह्या पद्धतीचे उपयोजन तज्ज्ञ मंडळींमध्ये मानवी आरोग्यविषयक चर्चा घडविताना अतिशय प्रभावी पद्धतीने केले. चरकसंहितेच्या आधाराने लिहिलेल्या ह्या लेखातील विद्वज्जनांच्या परिषदांबद्दलची अनेक निरीक्षणे आजही प्रासंगिक ठरू शकतील.

——————————————————————————–

         आन्वीक्षिकीचा एक मुख्य विषय बनलेली हेतुविद्या (तार्किक कारणांचा सिद्धान्त) ही तर्कविद्या (वादकला) आणि वादविद्या(चर्चाकला) या नावांनीही ओळखली जात असे. विद्वान लोकांच्या परिषदांमधून तिचा विकास संथगतीने अनेक शतके होत गेला. या परिषदांना संसद, समिती, सभा, परिषद अथवा पार्षद असे म्हटले जात असे.

पुढे वाचा

चलनबंदी : एक अर्थाभ्यासीय दृष्टिकोन (भाग-१)

चलनबंदी, पैसा, अर्थव्यवस्था, विनिमय

——————————————————————————–

मोदीसरकारने घेतलेल्या चलनबंदीच्या निर्णयाचे हादरे समाजातील प्रत्येक वर्गाला बसले. ह्या कृतीचे राजकीय विश्लेषण अनेक माध्यमांतून होत आहे व ह्यापुढेही होत राहील. मात्र अर्थाभ्यासाच्या दृष्टिकोनातून लिहिलेला हा लेख वाचकांना विषयाशी संबंधित काही मूलभूत संकल्पनांचा परिचय करून देईल, त्यासोबतच ‘पैसा म्हणजे काय?’ ह्या विषयावरील ‘आ.सु’तल्या चर्चेला पुढे नेईल.

——————————————————————————–

प्रस्तावना

सरकारने डिमॉनेटायझेशनचा निर्णय जाहीर केला आणि एक दोन मित्रांनी मला या संकल्पनेबद्दल माहिती विचारली. म्हणून हे लेखन केले आहे. यात डिमॉनेटायझेशनचा भारत सरकारचा निर्णय योग्य अथवा अयोग्य याची चर्चा केलेली नाही.

पुढे वाचा

सावरकर हे नवभारताचे राष्ट्रपिता, गांधी सावत्रपिता

सावरकर, गांधी, हिंदुत्ववाद, हिंदुधर्म, जागतिकीकरण

——————————————————————————–

         प्रख्यात मनोविश्लेषक-राजकीय भाष्यकार आशिष नंदी ह्यांची ही ताजी मुलाखत त्यांची मार्मिक निरीक्षणे, वादग्रस्त विधाने ह्यांनी भरलेली आहे. पण त्यापलीकडे जाऊन विचार केला तर तीतून आपल्याला परंपरा व भविष्य ह्यांच्याकडे बघण्याची मर्मदृष्टी सापडू शकते. वाचक ही चर्चा पुढे नेतील अशी अपेक्षा आहे.

——————————————————————————–

अश्रफ : आपले पुस्तक ‘Regions of Naricism, Regions of Despair’ याची सुरुवातच अशी आहे की, ‘या निबंधामध्ये मी अशा भारताबद्दल लिहिलेले आहे, जो 40 वर्षांपूर्वी मी ज्या भारताबद्दल लिहायचो त्याच्याहून खूप भिन्न आहे’.

पुढे वाचा

काश्मीरचे वर्तमान (भाग १)

काश्मीर, हिंसा, काश्मिरी पंडित, मुस्लिमप्रश्न

—————————————————————————–

       भारत-पाक फाळणीला आता 70 वर्षे होतील. पण काश्मीरमधील पेचप्रसंगाने ही जखम अजूनही भळभळती ठेवली आहे. गेले सहा महिने तर तेथे कर्फ्युच लागलेला होता. लष्करी बळावर आपण काश्मीर भारतात भौगोलिक दृष्ट्या राखू शकू. पण त्यातून उद्भवणारे राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक प्रश्न आपली पाठ सोडणार नाहीत. थेट काश्मीरला जाऊन तेथील विविध जनसमुहांशी थेट संवाद करून तेथील परिस्थितीचा एका पुरोगामी कार्यकर्त्याच्या दृष्टीने धांडोळा घेणाऱ्या रिपोर्ताजचा हा पूर्वार्ध.

—————————————————————————–

1 ऑक्टोबर 2016

         राष्ट्र सेवा दलाच्या ट्रस्टीमंडळाने गुजरातमधील उना व काश्मिरमधील सध्याच्या परिस्थितीचे अवलोकन करण्यासाठी मला पाठविण्याचा निर्णय घेतला म्हणून मी 1 ऑक्टोबर रोजी नागपूर-दिल्ली-जम्मू विमानाने सकाळी 11 वाजेपर्यंत जम्मूला पोहोचलो.

पुढे वाचा

लॉन्सचा छोटासा इतिहास

ज्ञानाचा विरोधाभास

—————————————————————————–

         काही व्यवस्था किंवा रचना गुंतागुंतीच्या असतात. त्या व्यवस्थांच्या भविष्यातील स्थितीबद्दल आपण काही अंदाज (predictions) बांधतो. काही व्यवस्थांवरती आपण करत असलेल्या अंदाजांचा किंवा भाकितांचा अजिबात परिणाम होत नाही. उदाहरणार्थ, हवामान ही व्यवस्था. उद्याच्या हवामानाचे भाकीत केल्याने हवामान बदलते असे होत नाही. मानवी व्यवस्था मात्र गुंतागुंतीच्या असतात आणि त्या व्यवस्थेसंबंधी केलेल्या भाकितांचा त्या व्यवस्थेवरती परिणाम होतो. जेवढी भाकिते जास्त चांगली, तेवढी ती व्यवस्था भाकितांना जास्त प्रतिसाद देते. त्यामुळे मानवी व्यवस्था समजून घेण्यासाठी आपण जसजशी जास्त माहिती गोळा करत आहोत, ती माहिती ‘प्रोसेस’ करण्यासाठी आपली संगणन-क्षमता वाढवत आहोत, तसतशा व्यवस्थेतील घटना अधिकाधिक अकल्पनीय आणि अनाकलनीय होत जात आहेत असा विरोधाभास दिसतो.

पुढे वाचा

ध्यान-मीमांसा

विपश्यना, साक्षात्कार, वैज्ञानिक आकलन, मेंदूविज्ञान

——————————————————————————

       ‘आजचा सुधारक’च्या जून व जुलै 2016च्या भागामध्ये ‘साक्षात्कारामागील वैज्ञानिक सत्य’ व ‘साक्षात्कार : वैज्ञानिक स्पष्टीकरण’ ह्या दोन लेखांमधून डॉ. रवीन्द्र टोणगावकरांनी ‘साक्षात्कार’ची ह्या संकल्पनेचे वैज्ञानिक विश्लेषण केले होते. त्याच विषयाची दुसरी बाजू मांडणारा व त्याचबरोबर ध्यान, ईश्वर, भक्ती ह्या संकल्पनांचा गांधी-विनोबा परंपरेतला अर्थ विशद करून सांगणारा आणखी एका डॉक्टरांचा हा लेख, आजचा सुधारकची संवादाची परंपरा नक्कीच पुढे नेईल.

——————————————————————————

        आपल्यालेखनात डॉ. रवीन्द्र टोणगावकरांनी साक्षात्काराची वैज्ञानिक विश्लेषणात्मक बाजू मांडताना खालील विधाने केली आहेत: ‘‘ध्यानावस्थेत देवांच्या विचाराचा कैफ चढल्यामुळे किंवा त्या विचारांनी आलेली उन्मादावस्था, झिंग (God Intoxication) या अवस्थेत स्वतःच्या अंतर्मनातून आलेले जे विचार असतात, त्यांनाच अंतिमसत्य मानून, त्यावर भाबडा विश्वास ठेवून, त्यांना साक्षात्कार किंवा दैवी संदेश म्हटले जाते.’’

पुढे वाचा

विळा लावणारा जन्म

मांडवावर पसरलेली वेल
बुडापासून कापून घ्यावी विळ्यानं
सपकन
तसा
आईवडिलांच्या
मुलगा होण्याच्या प्रार्थनेला
विळा लावणारा तिचा जन्म
तिचा जन्म
तिच्या आईच्या स्तनांना
दुधाऐवजी भय फोडणारा …

ती जन्मली
अन् तिच्या आईच्या पाठीवर
मागच्या बाळंतपणातले
काळेनिळे वळ
पुन्हा जिवंत झाले

ती जन्मली
अन् कोपऱ्यात निपचित पडलेल्या
हिंस्र दुःखाने
पुन्हा डोळे उघडले …

पूर्वप्रसिद्धी : मीडिया वॉच  दिवाळी २०१६
संपर्क : ईमेल : vaibhav.rain@gmail.com