पुस्तक परामर्श लोकमान्य ते महात्माः लेखक – सदानंद मोरे,

राजहंस प्रकाशन पुणे यांनी “लोकमान्य ते महात्मा या शीर्षकाचा डॉ. सदानंद मोरेलिखित एक ग्रंथ दोन खंडात प्रकाशित केला आहे. या ग्रंथाचे स्वरूप “स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सत्ताकारणाचा घेतलेला वेध’, अशा प्रकारचे असल्याची भूमिका लेखकाने प्रारंभीच ठळकपणे नमूद केली आहे. पन्नास साठ वर्षांपूर्वी भारतात झालेल्या या अभूतपूर्व, ऐतिहासिक स्वातंत्र्यलढ्यावर आतापर्यंत अनेक ग्रंथ लिहिले गेले. त्यातून लोकमान्य टिळक व महात्मा गांधी याच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय काँग्रेसने या लढ्यात केलेल्या महनीय कामगिरीविषयी साधारणतः गौरवात्मक विवेचन आलेले आहे. तद्वतच या दोन राष्ट्रीय नेत्याच्या व विशेषतः महात्मा गांधी यांच्या त्यातील कर्तृत्वाबद्दल महाराष्ट्रात तरी भरपूर प्रतिकूल, असद्हेतूनी भरलेली जहरी टीका मोठ्या प्रमाणात केली गेली आहे.

पुढे वाचा

पुस्तक परामर्श गांधीनंतरचा भारत

रामचंद्र गुहा यांच्या गांधीनंतरचा भारत या पुस्तकासंबंधी त्यांची एक मुलाखत अंजली पुरी यांनी घेतली. ती ७ मे २००७ च्या आउटलूक मध्ये प्रकाशित झाली आहे. ह्या मुलाखतीत अनेक धक्कादायक गोष्टी पुढे आल्या. त्यांचा अल्पसा आढावा पुढे सादर केला आहे.
खरे तर गांधीनंतरचा भारत म्हणजे स्वातंत्र्योत्तरकालीन भारताचा इतिहास असेच त्याचे स्वरूप ठरते. विषयाची कथावस्तू एवढी मोठी असल्यामुळे श्री. गुहा यांना त्याची तयारी करताना आठ वर्षे लागली. त्यांनी जुन्या दप्तरखाने व त्यांमधील कागदपत्रांचे ७० संग्रह तपासले. आपल्या पुस्तकाचा आराखडा आणि ग्रंथातील प्रकरणांची मांडणी कशी करावी हे ठरवायलाच त्यांना दोन वर्षे लागली १०० कोटी लोकसंख्या असलेला भारत, त्यात ५०० जातिजमाती आणि २३ राजमान्य भाषा हे सगळे कसे कवेत घ्यायचे ?

पुढे वाचा

लिओनार्डो डा व्हिन्ची

सध्या लिओनार्डो डा विंची ह्याचे नाव, डॅन ब्राऊन या अमेरिकन लेखकाने लिहिलेल्या, “डा व्हिन्ची कोड’ या कादंबरीवर निर्मित त्याच नावाच्या चित्रपटातील वादग्रस्त विषयामुळे, बरेच चर्चेत आलेले आहे. लिओनार्डो या इटालियन चित्रकाराची, येशूख्रिस्ताच्या जीवनातील एका प्रसंगावर आधारित “दि लास्ट सपर’ आणि ‘मोना लिसा’ ही चित्रे इतर चित्रांबरोबर जगभर अतिशय गाजली. परंतु तो जगद्विख्यात चित्रकार होता तसा एक थोर शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ होता हे किती जणांना माहीत असेल?
सर्वांत प्रसिद्ध असतील तर त्याची शास्त्रीय संशोधने! त्याच्या चित्रांच्या पसाऱ्यात, अनेक यंत्रांच्या, काही नुसत्या यंत्राच्या प्रयोगात्मक कल्पना तर काही पूर्णपणे विकसित केलेल्या यंत्रांचे आराखडे आणि नोंदी सापडतात.

पुढे वाचा

करुणानिधी आणि रॅशनॅलिझम

रॅशनॅलिझमचा कडवा पुरस्कार करणारे व त्याप्रमाणे वागणारे तामिळनाडूचे मुख्यमंत्री मुभूवेल करुणानिधी ह्यांनी सत्यसाईबाबाला आपल्या घरी बोलावून व त्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून rationalism च्या तत्त्वांला तिलांजली दिली, रॅशनॅलिझमच्या तत्त्वांचा करुणानिधींनी आयुष्यभर पुरस्कार केला व डीएमके पक्षासाठी आपल्या कार्यकर्त्यांनाही त्या तत्त्वानुसार आचरण करायला भाग पाडले. आयुष्यभर लोकांसमोर ते नास्तिक व एक कडवे रीिंळेपरश्रळीीं म्हणून आले. त्यापूर्वी एकदा आपल्या पक्ष कार्यकर्त्यांनी कपाळाला टिळा लावला म्हणून त्यांचा खरपूस समाचार त्यांनी घेतला होता. ‘धार्मिकतेची खूण असणारा टिळा कपाळाला लावून आपण पेरियारच्या (१८७९-१९७३) विचारसरणीस मूठमाती देत आहोत; पक्षाच्या मूलभूत तत्त्वांपासून आपण ढळत आहोत’ असे त्यांनी पक्ष-कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणात म्हटले होते.

पुढे वाचा

‘गुजराथ्यांचे (गुरु)महाराज’

कोणाचेहि वास्तविक दोष काढून दाखविणे म्हटले म्हणजे मोठे कठीण काम होय. जरी आपण त्यांचे हित इच्छून प्रीतीने उपेदश केला तरी तो त्यांस कडू लागेलच. तथापि परस्परांस सन्मार्गास लावण्यास प्रयत्न करीतच असावें; हा आपला धर्म आहे, असें जाणून कोणाची भीड न धरितां आपलें काम बजवावें. या मुंबईत गुजराथी लोकांचे गुरु जांस साधारण शब्दकरून महाराज असी संज्ञा आहे, त्यांचे महात्म फार वाढले आहे. युरोप खंडांत रोमन क्याथोलीक पंथाचा मुख्य गुरु जो पोप त्याचप्रमाणे एथें चारपांच पोप आहेत. यांचा लोकांचे मन, बुद्धी, विचार, आत्मा यांवर इतका अधिकार आहे, की ते सर्वस्वी त्यांचे दासानुदास किंकर होऊन बसले आहेत.

पुढे वाचा

इमान

पाकिस्तानात १९५३ साली अहमदिया पंथाविरुद्ध धर्मवादी गटाने आंदोलन केले. या आंदोलनाचे पर्यवसान लाहोर येथे अहमदियाविरोधी क्रूर दंगली होण्यात झाले. या दंगलींची चौकशी करण्यासाठी पाकिस्तान सरकारने न्या.मू. महंमद मुनीर आणि न्या.मू. कयानी यांची नियुक्ती केली. पाकिस्तानातील धार्मिक नेत्यांना श्री. मुनीर यांनी भारतीय मुसलमानांसंबंधी एक प्रश्न विचारला. भारत-पाकिस्तान युद्ध झाले तर भारतीय मुसलमानांनी कसे वागावे ? सर्वांनी भारतीय मुसलमानांनी पाकिस्तानच्या हिताच्या विरुद्ध वागता कामा नये असे उत्तर दिलेले आहे. मौ. मौदुदी म्हणाले, भारतीय मुसलमानांनी कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानच्या विरुद्ध वर्तन करता कामा नये. त्यांची निष्ठा पाकिस्तानलाच असली पाहिजे.

पुढे वाचा

पत्रचर्चा

कार्यकारणभाव
श्री देवीदास तुळजापूरकर (आसु जून २००७) यांनी दाखवून दिले आहे की कर्ज-ठेवी प्रमाण मराठवाडा, विदर्भ, खानदेश, कोकण या भागात ५७ ते ६४% आहे. ते असेही दाखवून देतात की महानगरे व शहरे यांत शाखा व कर्जे केंद्रित होत आहेत. असे होण्याच्या कारणांची चिकित्सा न करता त्यांनी हेत्वारोप व दोषारोप केले आहेत. उदा. वित्तव्यवस्था गडचिरोली जिल्ह्यातील लोकांच्या जीवनाला स्पर्श करीत नाही ही अत्यंत क्रूर चेष्टा आहे, नवीन आर्थिक धोरणामुळे १९९१ ९२ सालानंतर ही ‘विकृती’ अधिकच वाढली आहे, हा जागतिक व्यूहरचनेचा भाग आहे काय ?

पुढे वाचा

संपादकीय

प्रिय वाचक
पुनश्च हरि:ओम्

हे टिळकांनी म्हणणे ठीक आहे, पण सुधारकाला ही शब्दावली घेण्याचा अधिकार आहे का, असा विचार क्षणभर मनात चमकून गेला. सुधारकाला ‘श्री’वरही हक्क नाही असे बऱ्याच मंडळींना वाटते. ते पत्राच्या अग्रभागी ‘श्री’कार घालत नाहीत. पण लिखाणात ‘अथश्री’, ‘इतिश्री’चा प्रयोग वा मानत नसतील अशी आशा आहे.
‘भाषा बहता नीर है’ हा मुखपृष्ठावरचा विचार कसा वाटतो?
श्री. नंदा खरे ह्यांना काही एका अत्यावश्यक कामासाठी निदान वर्षभर सुटी हवी आहे त्यामुळे मला पुनश्च हरि:ओम् म्हणावे लागले आहे.
संपादकाच्या व्यक्तित्वातले उणेअधिक नियतकालिक उतरणे स्वाभाविक आहे.

पुढे वाचा

ठिकऱ्याः एक प्रतिक्रिया

[लेखक भारतीय राजस्व सेवा (खठड)च्या १९९४ च्या बॅचचा अधिकारी आहे आणि सध्या धारवाड, कर्नाटक येथे Joint Commission of Incom Tax म्हणून काम करतो.]
आ.सु.च्या फेब्रुवारी २००७ च्या अंकातील “ठिकऱ्याः बदलती जातिव्यवस्था’ या नावाचा सत्यजित भटकळ आणि नॅन्सी फर्नाडिस यांच्या पुस्तकाचा सुलभीकृत संक्षेप वाचला. जातिव्यवस्थेबद्दल मुळातून आणि सविस्तर चर्चा त्यात आढळली. लेखावर प्रतिक्रिया खालीलप्रमाणे:
१.एकंदर मांडणी; जातिव्यवस्था हा least count गृहीत धरून केलेली दिसते. त्यामुळे अनेक दुखण्यांचे मूळ जातिव्यवस्थेमध्ये शोधलेले दिसते. तसेच उपायही जातिव्यवस्थेभोवती फिरताना दिसतात. लेखकाचे ‘जातिव्यवस्था ही सभ्यता आहे आणि हिंदूंची शास्त्रे आणि मिथ्यकथांबद्दलच्या श्रद्धा ह्या जातिसंस्थेचा परिणाम आहेत’ हे विधानही न पटणारे आहे.

पुढे वाचा

पुस्तक परीक्षण – कोऽहम्

कादंबऱ्या सामाजिक असतात. ऐतिहासिक-राजकीय पौराणिक अशा विषयांवरून त्यांचे आणखीही प्रकार करता येतात. ह्या कादंबऱ्या कथानकाच्या बळावर लोकप्रिय होतात. लेखकाचे निवेदनकौशल्य, कथावस्तूतील नाट्य, चित्रित झालेले जीवनदर्शन वाचकाला मनोहारी वाटते. परंतु वामन मल्हार जोश्यांची रागिणी ह्या सर्वांपेक्षा वेगळ्या कारणाने आपल्या लक्षात राहिलेली असते. तिच्यातील तत्त्वचर्चा वाचकाला विविध विचारव्यूहांमधून फिरवीत राहते. रागिणी, सुशीलेचा देव ह्या कादंबऱ्या तुम्हाला नुसती कथा सांगत नाहीत, विचारात गुरफटत नेतात अन् शेवटी अशा बिंदूवर आणून सोडतात की तुम्हीच तुमचा निर्णय घ्यायला मोकळे असता.

सुरेश द्वादशीवारांची कोऽहम् ही लघुकादंबरी तशी आहे.

पुढे वाचा