अति शहाणा, त्याचा बैल रिकामा” अशी एक जुनी म्हण प्रचलित आहे. या म्हणीची पाश्र्वभूमी ग्रामीण महाराष्ट्र ही असली तरी तिचा वापर ग्रामीण तसेच नागरी संदर्भात होत आलेला आहे. एक शेतकरी फार बुद्धिमान होता व आपण आपल्या शेतीची दैनंदिन कामे फार हुशारीने करतो अशी त्याची समजूत होती. शेतीच्या मशागतीसाठी त्याच्याजवळ एक बैल होता. पण इतर सामान्य शेतकर्यांप्रमाणे औताला बैल जुंपण्यापूर्वी हा बुद्धिमान शेतकरी खूप सूक्ष्म विचार करी. त्यामुळे रोज त्याचे काम लांबणीवर पडत जाई व बैल रिकामाच राही. असे होता होता शेतीच्या कामाची वेळ टळल्याने या बुद्धिमान शेतकर्याकची अतोनात हानी झाली आणि बैल मात्र सदैव रिकामाच राहिला!
कुटुंब : आजचे आणि उद्याचे (भाग ३)
आपल्या भारतीय नागरित समाजामध्ये कुटुंबाची किंवा कुटुंबप्रमुखाची मुख्य जबाबदारी त्रिविध आहे हे आपण जाणतो. ती म्हणजे (१) मुलांचे आणि नातवंडांचे शिक्षण करणे, (२) त्यांना नोकरी लावून देणे व (३) त्यांची शक्य तितक्या थाटामाटात लग्ने लावून देणे ही होय. बाकीच्या सगळ्या जबाबदार्या( ह्यांच्यापुढे गौण किंवा तुच्छ मानल्या जातात. त्या जबाबदार्यांसमुळे पर्यायाने त्यांसाठी बसविलेल्या आपल्या समाजाच्या घडीमुळे आपल्या शिक्षणक्षेत्रावर जे अनेक परिणाम होतात त्यांपैकी काही आपण आतापर्यंत पाहिले. तसेच ते मुलांना नोकरी लावून देण्याच्या आणि त्यांची लग्ने लावून देण्याच्या बाबतींतही अधिक सविस्तरपणे पाहता येतील, पण मला त्याची गरज वाटत नाही.
नियमबद्धतानियमाच्या मर्यादा
मला विश्वातील सर्व रचनांची या क्षणीची स्थाने आणि गती सांगा, म्हणजे मी आत्तापासून अनंत काळापर्यंतच्या त्यांच्या (सर्व रचनांच्या) स्थानांचे आणि गतींचे भाकित वर्तवून दाखवीन” – हे लाप्लासचे वाक्य म्हणजे वैज्ञानिक नियमबद्धतावादाचे ब्रीदवाक्य मानले जाते. खरे तर “मानले जात असे” असे म्हणणे जास्त योग्य.
लाप्लासने हे विधान केले तेव्हा न्यूटन नुकताच “होऊन गेला होता. गुरुत्वाकर्षणाने आणि गतीच्या नियमांनी विश्वातील सर्व रचनांबाबतच्या भविष्यकथनांची शक्यता निर्माण झाली, असे भासत होते. एक अंतिम, मूलभूत निसर्ग-नियम सापडला आहे, आणि यापुढे फक्त तपशील भरून काढायचे काम उरले आहे, अशी जबर आत्मविश्वासाची भावना काही वैज्ञानिकांमध्ये बळावली होती.
धर्म, सुधारणा आणि विवेक
हे धर्मसुधारणेचे युग आहे. अनेक शतके स्थाणुवत् अपरिवर्तमान राहिलेल्या हिंदुधर्मामध्ये गेल्या शतकापासून तो आजपर्यंत अनेक सुधारणांचा पुरस्कार करण्यात आला आहे. रानडे, टिळक, गांधी, कर्मवीर शिंदे इत्यादि धर्मसुधारकांनी आपापल्या परींनी ग्रंथनिविष्ट हिंदू धार्मिक परंपरेचे नवीन अर्थ लावले आहेत. सावरकर, गोळवलकर गुरुजी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बौद्धिक प्रमुख नवनवीन बदल सुचवीत आहेत. काही बाबतींत तर हिंदुधर्म टाकून वेगळ्या धर्मात एक नवा पंथ स्थापण्यापर्यंत सुधारणेने मजल मारली आहे. या सर्व विविध धर्ममंथनांसंबंधी विचार करू लागल्यावर एक गोष्ट मनात उभी राहते ती ही की धर्मसुधारणा या संकल्पनेत काही तरी विपरीत अभिप्रेत नाही काय ही शंका.
आमचा धर्म
आमचा धर्म इतरांहून श्रेष्ठ आमचा धर्म इतरांच्या धर्माहून श्रेष्ठ आहे, व त्यांचे रहस्य स्पष्टपणे कोणास कधींही कळावयाचे नाही असे म्हणणे म्हणजे कित्येक अशक्य गोष्टी कबूल करण्यासारखे आहे.
सर्व दृश्य विश्वाचे आदिकारण; काल आणि स्थल यांनी मर्यादित होत नाही म्हणून ज्याला अनादि आणि अनंत असे म्हणतात; आपली प्रचंड सूर्यमालासुद्धा ज्याच्या अचिंत्य सामर्थ्याचे अत्यंत सूक्ष्म निदर्शन आहे असे म्हटले तरी चालेल – अशा सर्वव्यापी परब्रह्माने मत्स्य-कूर्म-वराह-नारसिंहादि दशावताराच्या फेर्यात सांपडून युगेंच्या युगें भ्रमण करतां करतां एकदां आमच्या कल्याणासाठी गोकुळांतील एका गवळणीच्या पोटीं यावें; शुद्ध शैशवावस्थेत पूतनेसारख्या प्रचंड राक्षसिणीचे, स्तनपानाच्या मिषानें, चैतन्यशोषण करावे, चालता बोलतां येऊ लागलें नाहीं तों लोकांच्या दुभत्यावर दरोडे घालण्यास आरंभ करून आपल्या सहकार्यांस यथेच्छ गोरस चारावे, आणि त्यांसह रानांत गुरे घेऊन जाऊन तेथे पोरकटपणास शोभणारे असे खेळ खेळावे; पुढे तारुण्याचा प्रादुर्भाव झाला नाहीं तों कामवासना प्रज्वलित होऊन कधीं मुरलीच्या मधुर स्वराने वृंदावनांतील तरुणांगनांना वेड्या करून आपापल्या घरांतून काढून आणाव्या आणि त्यांबरोबर रासादि क्रीडा कराव्या, किंवा यमुनेत त्या स्नानास उतरल्या असतांना त्यांचीं वसने कळंबाच्या झाडावर पळवून नेऊन तेथून त्यांशीं बीभत्स विनोद करावा; नंतर सोळा सहस्र गोपींचें पतित्व पत्करून फक्त दोघींसच पट्टराणीत्व द्यावे, पण त्यांतल्या त्यांतही पक्षपात केल्याशिवाय राहूं नये; पराक्रमाचे दिवस आले असतां स्वतः शस्र हातीं न धरतां दुसर्याचे सारथ्य स्वीकारून प्रसंगविशेष सल्लामसलत मात्र द्यावी; व घरच्या घरी यादवी माजून राहून कुलक्षय होण्याचा प्रसंग आला असतांही, ब्रह्मज्ञानाचा उपदेश देण्याच्या मिषाने युद्ध करण्यास उत्तेजन द्यावे – हे सारे शक्य, संभवनीय, व विश्वसनीय आहे असे मानिले पाहिजे.
चर्चा
श्री. संपादक,
आजचा सुधारक यांस,
डॉ. र. वि. पंडित ह्यांच्या सप्टेंबर ९५ च्या पत्राला हे प्रत्युत्तर.
डॉ. पंडित लिहितात की त्यांच्या मूळ लेखात (मे ९५) भारतीयांच्या लैंगिकतेचा उल्लेख नव्हता.
त्यांची मे ९५ च्या लेखातली पुढील विधाने मला भारतीयांच्या लैंगिकतेबद्दलची वाटली.“थायलंड वगळता सर्व आशिया व चीन यामध्ये लैंगिक स्वातंत्र्य बरेच मर्यादित आहे.”“लैंगिक सुख हवे तेवढे हव्या त्या प्रमाणात उपलब्ध झाले पाहिजे असा विचारप्रवाह अमेरिकेत निर्माण झाला आहे. भारतात आज जरी अशा प्रवृत्तीकडे तिरस्काराने व तुच्छतेने पाहिले जात असले तरी…”
थोडक्यात डॉ. पंडितांचे म्हणणे भारतात अमेरिकेसारखा स्वैराचार सध्या नाही.
दिवाळीतला आनंद (भाग १)
माझी जॉर्ज गिसिंगशी ओळख झाली त्याला पुष्कळ वर्षे लोटली. नतर तो कुठेच भेटला नाही. इंटरच्या ‘हायरोड्स आफ इंग्लिश प्रोज मध्ये ‘माय बुक्स च्या रूपने झालेली पहिली अन् शेवटची भेट. पण काही ओळखी जन्मभर लक्षात राहतात तशी ही राहिली. एखाद्या आईने ‘माय चिल्ड्रेन या विषयावर जितक्या ममतेने बोलावे तितक्या जिव्हाळ्याने त्याने ‘माय बुक्स ची ‘कवतुकें सांगितली होती. माणूस अर्धबेकार-फटिचर पण ऐट अशी की पुस्तक वाचायचे ते विकत घेऊनच. धंदा लेखनाचा. नियमित उत्पन्न नाही. आहे ते अपुरे अशा स्थितीत पठ्ठा मैलोगणती अंतर पायी तुडवायचा.
खरंच, पुनर्जन्म आहे? (उत्तरार्ध)
शारदेच्या माहेरच्या माणसांची तिने सांगितलेली नावे
शारदेने तिच्या खापरपणजोबा, पणजोबा, आजोबा, वडील, दोन काका आणि दोन सावत्रभाऊ यांची नावे सांगितली आणि त्याप्रमाणेच (पणजोबा सोडून) नावे असणारी वंशावळ प्रा. अकोलकरांनी सादर केली आहे. या महत्त्वाच्या मुद्द्याची नीट छाननी होणे जरूर आहे. याबाबत प्रा. अकोलकरांना श्री. आर. के. सिन्हा यांच्याकडून त्यांनी मिळविलेली वंशावळ मिळाली आहे. याशिवाय डॉ. स्टीव्हन्सनना प्रो. पॉल यांच्याकडून वंशावळ मिळाली. श्री. सिन्हा व प्रो. पॉल यांचा शारदा केसशी कसा संबंध आला, ही माणसे कोण, त्यांनी कोणत्या प्रकारे आणि कोणत्या माहितीच्या आधारे तपास केला, अशा प्रकारच्या संशोधनात तपास करताना ज्या काळज्या घ्याव्या लागतात त्याची त्यांना जाण होती का, याची काहीच माहिती प्रा.
हिन्दुत्व-अन्वेषण (उत्तरार्ध)
आजचा सुधारक मासिकाच्या ऑक्टो. ९५ च्या अंकातील लेखातून हिंदुत्व या धार्मिक संज्ञेचा ऐतिहासिक शोध निष्फळ ठरतो याविषयीचा विचार मांडला आहे. राजकीय स्वार्थासाठी हिन्दुत्वाचा जयकार केला जात असेल तर प्रस्तुत लेखकाला या । विषयाची चर्चा करण्याची गरज नाही. पण ज्यावेळी जनजागृतीसाठी धर्मप्रचाराचा अभिनिवेश असतो त्यावेळी असे जाणवते की प्रचाराची माध्यमे ज्यांच्याजवळ आहेत ते कर्मठ आहेत, आणि या कर्मठांनी कोणत्याच समस्येचा अभ्यास केला नसतो. विचारही केला नसतो. कारण धर्मप्रचाराचे नाटक वठविण्यात ते स्वतःला धन्य समजतात. त्यांना मंदिरांविषयी आस्था नसते. कीर्तन-प्रवचनांचा त्यांना कंटाळा असतो.
नियति, दैव, विधिलिखित, नशीब, प्रारब्ध, इत्यादि
नियति, विधिलिखित, दैव, नशीब, प्रारब्ध या सर्व गोष्टी एकाच कुटुंबातील आहेत. पण त्यांपैकी काहींचे संदर्भ आणि अर्थ काहीसे भिन्न आहेत.
नियति (Fate). भविष्यात केव्हा काय घडणार आहे हे पूर्णपणे पूर्वनिश्चित आहे. मनुष्याने काहीही केले त्यापासून त्याची सुटका नाही. उदाहरण म्हणून पुढील गोष्ट देता येईल.
एका मनुष्याला दुपारी बाजारात मृत्यू भेटला आणि म्हणाला : ‘आज रात्री बारा वाजता येतो आणि तो नाहीसा झाला. तो मनुष्य स्वाभाविकच घाबरला, पण काहीतरी हातपाय हलवायचे म्हणून त्याने आपले घोडे काढले आणि त्यावर बसून तो भरधाव वाट फुटेल तिकडे जात राहिला.