मागच्या आठवड्यात बेंगळुरूमधील आयआयएसच्या पदवीदान समारंभात इन्फोसिसचे एक संस्थापक नारायण मूर्ती यांनी सर्वोत्तम शिक्षणाचा दावा करणाऱ्या आयआयटी व आयआयएम या शिक्षणसंस्थांमधून बाहेर पडणारे विद्यार्थी काय संशोधन करतात, यावर नेमकेपणाने बोट ठेवलं आहे. एकप्रकारे त्यांनी उच्चशिक्षणाचं ऑडिटच केलं आहे. नारायण मूर्ती यांचं म्हणणं बरोबर आहे. त्याची कारणं माझ्या दृष्टिकोनातून अशी आहेत की, आयआयटीमधून बाहेर पडलेले बहुसंख्य विद्यार्थी परदेशात गेले. तिथे त्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये ज्या नोकऱ्या स्वीकारल्या, त्या सगळ्या रुटीन स्वरूपाच्या होत्या. त्यात स्वतंत्र संशोधनाला फारसा वाव नव्हता. तिथेसुद्धा विद्यापीठांमध्ये फार कमी जण गेले.
प्रतिसाद
1. मराठी नियतकालिकांची हतबलता
राम जगताप यांचा आजचा सुधारकात पुन:र्मुद्रीत लेख वाचला. मराठी नियतकालीकांची परवड होत असल्याचे वाचून वाईटही वाटते. पण याला जबाबदार संपादकांची वृत्तीही कारणीभूत असावी असे वाटते. उदाहरण द्यायचे झाल्यास शरद जोशींचा शेतकरी संघटक मोठ्या आवडीने वाचत असूं पण जोशींना सत्तेचे डोहाळे लागून संसदेत स्थिरावले. शिवार नावांच्या कंपनीसाठी शेअर गोळा केले. त्याचे पुढे काय झाले. कळलेच नाही.
साधना साप्ताहिकाने तहहयात वर्गणीची मागणी ग्राहकांकडून केली. यदुनाथजी गेल्यावर काहीकाळ मा. प्रधानसरांकडे त्याच संपादकत्व आलं त्यानी वर्गणी वाढवून फरकाची रक्कम भरा नाही तर अंक बंद केला जाईल असा दम दिला.
पत्रसंवाद
प्रिय मिलिंद,
कसा आहेस? आज फार अस्वस्थ व्हायला झालं म्हणून तुझ्याशी बोलावस वाटलं…
काल कर्नाटकात डॉ.कलबुर्गी सरांचा खून केला दोघाजणांनी सकाळीच. अगदी डॉ. दाभोलकर आणि पानसरे यांना मारलं ना तसच… काही लोक आता त्यांना बदनाम करणारे मेसेज फिरवत आहेत. तुला खर वाटेल त्यांनी संगितलेसं… डॉ. कलबुर्गी हे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक तर होते पण त्या पलीकडे अनेक चांगले विद्यार्थी घडवणारे शिक्षक होते. ते मुलांना विचार करायला, प्रश्न विचारायला आणि समाज चांगला कसा होईल यासाठी कृती करायला शिकवत होते. अगदी डॉ.दाभोलकर
स्वातंत्र्य म्हणजे काय?
“स्वातंत्र्य म्हणजे काय? ते इतके मोलाचे का वाटते? स्वातंत्र्याची ओढ मानवी स्वभावांत उपजतच आहे, कीं विशेष परिस्थितीमुळे घडणारा तो एक संस्कार आहे? स्वातंत्र्य हे अंतिम साध्य आहे कीं दुसरे काही संपादन करण्याचे ते एक साधन आहे – स्वातंत्र्याबरोबरच काही जबाबदाऱ्या अपरिहार्य ठरतात काय? आणि अधिक स्वास्थ्य मिळविण्यासाठी एकादा समाजचा समाज स्वातंत्र्यावर पाणी सोडायला सहज राजी व्हावा इतक्या त्या जबाबदाऱ्या अवजड असतात काय? स्वातंत्र्यसंपादन आणि स्वातंत्र्यरक्षण यासाठी करावयाचे प्रयत्न टाळण्याकडे बहुसंख्य माणसांचा कल सहज व्हावा, इतके स्वातंत्र्यासाठी झगडणे हे सायासाचे असते काय – अन्न, वस्त्र, निवारा अथवा चैनही, यांचे म्हणजेच चरितार्थाच्या हमीचे जितके महत्व वाटते तितकेच स्वातंत्र्याचे आणि त्याच्या अनुषंगाने लाभणाऱ्या गोष्टींचे महत्त्व वाटते काय ?….
आमच्या देशाची स्थिती
असा सार्वत्रिक समज आहे की, आपल्या देशातल्या ब्राह्मणांनी अन्य जातीयांना शिक्षणापासून वंचित ठेवले. आणि हे कार्य त्यांनी हेतुपुरस्सर केले ते अशासाठी, की त्यांना (ब्राह्मणांना) समाजातील विषमता कायम ठेवायची होती, आणि त्यायोगे त्यांना अन्य जातीयांचे शोषण करायचे होते. उच्चवर्णीयांवरचा हा आरोप कितपत खरा आहे, हे तटस्थपणे तपासण्यासाठी आपल्याला आपल्या देशाची तत्कालीन स्थिती समजून घ्यावी लागेल व अंदाजे दोनशे वर्षे मागे जावे लागेल. इंग्रजांचे राज्य भारतात येण्यापूर्वीची समाजस्थिती आपल्याला तपासावी लागेल. प्रतिपादनाच्या सोयीसाठी काही जुन्या, स्त्री-शूद्र अशा संज्ञांचा वापर करण्याची देखील गरज पडेल.
निधर्मीपणा – धर्मनिरपेक्षता – सर्वधर्मसमभाव – इहवाद (पूर्वार्ध)
आजकाल सेक्युलॅरिझम व सेक्युलर ह्यांबद्दल बरेच बोलले जाते. ज्येष्ठांच्या बैठकीत यावर चर्चा होणे स्वाभाविक होते. ज्यांना जशी माहिती तशी त्यांनी सांगितली. यांतून कांही गोष्टी जाणवल्या त्या अशा.
• सेक्युलर हा भारतीय शब्द नसून पाश्चात्य देशाकडून आपल्याकडे आला आहे. व हा शब्द जीवनशैलीबरोबरच राज्यशासनव्यवस्थेशी जोडला गेला आहे.
• या शब्दाला बरेच अर्थ आहेत. जसे, इहवाद येथपासून ते कांही सामाजिक तुष्टीकरणाबरोबर याचा संबंध जोडला जातो.
• पाश्चात्य व भारतीय विचारसरणी सेक्युलरबाबत भिन्न आहे. पण आपल्याला भारतीय संविधानाने यासाठी मान्य केलेला सर्वधर्मसमभाव हा शब्दच मान्य करावा लागतो.
मेंदू प्रदूषण….
“दूषित करणे” म्हणजे बिघडविणे, वापरण्यास अयोग्य बनविणे. “प्र” उपसर्ग प्रकर्ष, आधिक्य (अधिक प्रमाण) दर्शवितो. यावरून प्रदूषण म्हणजे मोठ्या प्रमाणात बिघडविण्याची क्रिया. जलप्रदूषण, वायुप्रदूषण, नदीप्रदूषण, भूमीप्रदूषण इत्यादि शब्द सुपरिचित आहेत.”मेंदुप्रदूषण” हा शब्द तसा प्रचलित झालेला नाही. पण त्याचा अर्थ स्वयंस्पष्ट आहे. इंग्रजीत ब्रेन वॉशिंग असा शब्द आहे. त्याचे मराठीकरण मेंदूची धुलाई असे करतात. परंतु धुतल्यामुळे वस्तू स्वच्छ होते. तो अर्थ इथे अभिप्रत नाही. मेंदुप्रदूषण हा शब्द मला अधिक समर्पक वाटतो. तुम्ही म्हणाल हे मेंदुप्रदूषण करणारे कोण ? ते कोणाच्या मेंदूचे प्रदूषण करतात ?
सूफी परंपरा
वर्तमान काळात धार्मिक समूहभानाचा उपयोग राजकीय उद्देश साध्य करण्यासाठी केला जात आहे. मग मुद्दा दहशतवादी हिंसेचा असो वा संकीर्ण राष्ट्रवादाचा, जगाच्या सर्व भागांमध्ये धर्माच्या मुखवट्यांआडून राजकारण केले जाते. काही वर्षांपूर्वीपर्यंत धर्माला राजकारणापासून वेगळे करण्याच्या, ठेवण्याच्या आवश्यकतेवर भर दिला जात होता. पण आता अगदी उलट झाले आहे. धर्म आणि राजकारणाची सरमिसळ वाढतच गेली. या संदर्भात दक्षिण आशियात फार गंभीर स्थिती आहे. एप्रिल 2015 मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षांनी अजमेरच्या गरीब नवाझ ख्वाजा मोइनुद्दिन चिश्तीच्या दर्ग्यावर ठेवण्यासाठी चादर पाठविली. गेल्या 22 एप्रिलच्या वर्तमानपत्रांतील वृत्तानुसार सोनिया गांधी, अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदींनीही दर्ग्यावर चादर चढविली आहे.
विकास साधू या विवेकानं!
विकास आज देशाच्या राजकारणात, अर्थकारणात, समाजकारणात विकास हा कळीचा मुद्दा बनला आहे. भरघोस बहुमतानं निवडून आल्यावर घेतलेल्या पहिल्याच सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते: ‘सरकार विकासाचं जनांदोलन उभारेल.’ खूष झालो. विचार केला की, आधीच्या सरकारनं विपर्यास केलेल्या आमच्या पश्चिम घाट परिसरतज्ज्ञ गटाच्या शिफारशींना आता न्याय दिला जाईल, कारण हा अहवाल म्हणजे सर्व सह्यप्रदेशात विकासाचं जनांदोलन कसं उभारावं, याचा उत्तम आरखडा आहे. मात्र, जरी विकासाच्या जनांदोलनाबद्दल बोललं गेलं, तरी ते प्रत्यक्षात आणणं हे मर्यादित हितसंबंधांना जपण्यासाठी झटणाऱ्यांना बोचतं आणि म्हणून गेली साडेतीन वर्षं या अहवालाविरुद्ध आधी दडपादडपी आणि मग ‘आमच्या अहवालानुसार कोकणात एका विटेवर दुसरी वीटही ठेवता येणार नाही,’ अशा पठडीचा धादांत अपप्रचार यांचा गदारोळ चालला आहे.
‘शेती हटाव’ अभियान
‘कुठल्याही पद्धतीची शेती करणे हे आरोग्यास अतिशय घातक आहे. त्यामुळे असंख्य प्रकारचे शारीरिक व मानसिक विकार जडतात. कर्करोगापेक्षा कैकपटीने अधिक वेदना सहन कराव्या लागतात. अखेरीस प्राणास मुकावे लागते..’ सर्व प्रकारची सरकारे, सर्व जाती-धर्माचे, स्तरांतील लोकप्रतिनिधी आणि शाही नोकर हा (अवैधानिक) इशारा वर्षांनुवर्षे देत आले आहेत. या व्यसनामुळे वाढत जाणाऱ्या यातनांतून मुक्त होण्यासाठी कित्येकांना आत्महत्या कराव्या लागत आहेत. 1995 ते 2014 या काळात महाराष्ट्रात 60,365 तर देशात 2,96,438 जणांनी हा मार्ग पत्करला. 2015 साल उगवल्यापासून राज्यात सुमारे 601 जण या वाटेने गेले आहेत.