भारतीय वैदिक तत्त्वज्ञानात सहा प्रमुख दर्शने मानली आहेत. ती अशी :
(१) सांख्य, (२) वैषेशिक, (३) पूर्वमीमांसा, (४) न्याय, (५) योग आणि (६)वेदान्त (उत्तरमीमांसा हा वेदान्ताचाच भाग आहे.)
त्यांपैकी पहिली तीन संपूर्णपणे निरीश्वरवादी असून त्यांचे प्रणेते अनुक्रमे कपिल महामुनी, महर्षी कणाद, आणि आचार्य जेमिनी हे तिघेही महान तत्त्ववेत्ते आणि विचारवंत म्हणून गणले जातात. न्याय आणि योग ह्या दर्शनांचेविषय वेगळे असून “ईश्वर” हा त्यांच्या चर्चेचा विषय नाही. काही अनुषंगाने ईश्वराचा उल्लेख आला असेल तेवढाच. एका परीने न्याय आणि योग ही दोन्ही दर्शने ईश्वराच्या बाबतीत “उदासीन” आहेत.