मासिक संग्रह: मार्च, १९९४

पत्रव्यवहार

संपादक आजचा सुधारक यांस, स. न. वि. वि.
श्री. प्रमोद सहस्रबुद्धे यांनी ‘मनस्मृती व विवेक’ (आजचा सुधारक, फेब्रु. ९४) या लेखात म्हटले आहे त्याप्रमाणे मनुस्मृतीचा त्याग करणे जेवढे महत्त्वाचे तेवढेच तिचा विसर न पडू देणे हेही महत्त्वाचे, कारण तिच्यासंबधीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन पुनरुज्जीवनवादी शक्ती तिच्या समर्थनार्थ पुढे येत राहतात. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, पण त्याकडे बऱ्याच सुधारणावादी लोकांचे पुरेसे लक्ष जात नाही. हिटलरच्या जर्मनीचा विसर पडू न देण्याचा इझराएल व अनेक यहुदी संस्था यांचा जसा सारखा प्रयत्न असतो तसा काही प्रमाणात तरी आपणही मनुस्मृतीबाबत दृष्टिकोन ठेवायला हरकत नाही.

पुढे वाचा

तत्त्वज्ञानाची ओळख (भाग १२)

बाक्र्लीचा आयडियलिझम

गेल्या लेखांकात आपण idea’ या शब्दाचे दोन अगदी भिन्न आणि स्वतंत्र अर्थ पाहिले. आधुनिक भाषाशास्त्रज्ञांच्या मताने idea’ हा शब्द एक नसून दोन आहेत. एक, प्लेटोचा ‘आकार’ या अर्थाचा ग्रीक शब्द, आणि दुसरा, अर्वाचीन तत्त्वज्ञानात रूढ असलेला ‘कल्पना या अर्थाचा इंग्लिश शब्द. त्यामुळे idealism’ या शब्दालाही दोन अगदी भिन्न आणि स्वतंत्र अर्थ आहेत. एक, प्लेटोच्या idea’पासून आलेला आदर्शवाद किंवा ध्येयवाद, आणि दुसरा इंग्लिश idea’ पासून आलेला कल्पनावाद. बार्लीला हा दुसरा idealism अभिप्रेत होता. या मतानुसार विश्वात फक्त दोनच प्रकारचे पदार्थ आहेत, आत्मे किंवा मने आणि त्यांच्या कल्पना.

पुढे वाचा

गोमंतकातील रसोत्सव

गर्दीचा निकष लावला तर गेल्या महिन्यात गोव्याला झाले तसे साहित्य संमेलन आधी कधी झाले नाही. या गर्दीचे मानकरी तिघे. साहित्य, सृष्टिसौंदर्य आणि शेवाळकर. वहाड आणि मराठवाड्यातले जुने प्रियजन कितीतरी वर्षांनी तिथे भेटले. शेवाळकरांचे अध्यक्षपद आपल्याच माणसाचा बहुमान समजून आलेले.
खुद्द गोंयकराची तर सत्त्वपरीक्षेची वेळ होती. कोंकणी ही तिथली बोलभाषा, ती राजभाषा झाली आणि मराठीला मात्र मज्जाव. सर्वोच्च न्यायालयाने भलेही न्याय दिला, तरी सरकार दाद देत नाही. त्यामुळे तो चिडलेला. मराठीभाषिकांचे विराट शक्तिप्रदर्शन करून झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला हा शेवटचा धक्का द्यायचा असा निर्धार केलेला.

पुढे वाचा

स्त्री-पुरुष विषम प्रमाण

दिवाकर मोहनी (आ. सु. ऑगस्ट १९९३) व श्रीनिवास दीक्षित (आ. सु. जानेवारी १९९४) यांमधील चर्चेच्या संदर्भात पुढील माहिती उपयुक्त ठरेल.
१) कुपोषण
कुटुंबातल्या कुटुंबात अन्नाचे जे वाटप होते त्यात स्त्रीला पुरुषापेक्षा कमी हिस्सा मिळतो याबद्दल काही माहिती उपलब्ध आहे. मैत्रेयी कृष्ण राज यांनी दिल्लीतील सफदरजंग इस्पितळातून घेतलेली आकडेवारी पुढे दिली आहे. हीत सर्व वयांच्या स्त्रीपुरुषांचा समावेश आहे.
पोषणाची पातळी पुरुष (टक्के) स्त्रिया (टक्के)
तीव्र कुपोषण २८.५७ ७१.४३
मध्यम कुपोषण ४३.०७ ५६.९३
सौम्य कुपोषण ५६.४० ४३.६०
योग्य पोषण ६१.२० ३०.३०
तीव्र व मध्यम कुपोषणाचा असर पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त आहे असे या सारणीवरून दिसते.

पुढे वाचा

राष्ट्रवाद की संस्कृतिसंघर्ष ?

शीतयुद्धाची अखेर झाल्यानंतर जगातील राजकीय सत्तासमतोल बदलला त्याचबरोबर अर्थकारणातही स्थित्यंतरास सुरुवात झाली. जागतिक व्यापार खुला करण्याच्या प्रक्रियेने जोर धरला. या पार्श्वभूमीवर आर्थिक सिद्धांतांची पुनर्तपासणी करण्यात येऊ लागली आहे. त्याचप्रमाणे राजकीय तत्त्वज्ञानांचीही फेरमांडणी करण्याचे प्रयत्न होऊ लागले आहेत. सोव्हिएत संघराज्याचा अस्त, त्यानंतर येल्त्सिन यांनी पाश्चिमात्यांकडे केलेली आर्थिक मदतीची मागणी, शस्त्रास्त्रकपातीचे करार, ‘गॅट’ करारावर झालेल्या स्वाक्षऱ्या -या घडामोडींनंतर अमेरिकेतील राजकीय पंडित राष्ट्रवादाचा अस्त होत असल्याचा निर्वाळा देऊ लागले आहेत. वाढत्या आर्थिक परस्परावलंबित्वामुळे शुद्ध राष्ट्रीय सार्वभौमत्वही लोप पावत असून, देशांच्या भौगोलिक सीमा पुसट होत आहेत, असे या अभ्यासकांचे मत आहे.

पुढे वाचा

विज्ञानानंतरचा समाज – उत्तर

काही महिन्यांपूर्वी आजच्या सुधारकात निसर्ग आणि मानव या विषयावर एक चर्चा झाली. मथळ्यात स्थान नसूनही विज्ञानाला चर्चेत महत्त्वाचे स्थान होते. त्याच चर्चेचा भाग असावा असा एक नुकताच प्रकाशित झालेला लेख भाषांतररूपात सोबत दिला आहे.
लेखकाला विज्ञानात जाणवलेल्या काही विशिष्ट गुणधर्मांची यादी अशी :- (क) विज्ञान चंचल आहे. त्यात ठाम मते नसतात. (ख) विज्ञानातील प्रत्येक बदल आधीच्या जवळपास सर्व ज्ञानाला खोटे पाडू शकतो. (ग) विज्ञान स्वतःला सर्वज्ञ समजते, आणि म्हणून ते इतर श्रद्धा-प्रणालींबद्दल कमालीचे असहिष्णु असते. (घ) विज्ञानाकडे मानवी जीवनाचा अंतिम अर्थ किंवा अंतिम कारणे समजण्याची क्षमताच नाही.

पुढे वाचा

विज्ञानानंतरचा समाज

[टाइम्स ऑफ इंडियाच्या १२ डिसेंबर १९९३च्या अंकात Brian Appleyard या अमेरिकन लेखकाचा ‘Post-Scientific Society’ या शीर्षकाचा एक लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यात विज्ञानाचे स्वरूप आणि अधिकार यांविषयी अनेक चुकीचे व अनर्थावह पूर्वग्रह व्यक्त झाले असून त्यामुळे वाचकांची दिशाभूल होण्याचा संभव असल्यामुळे त्याला समर्पक उत्तर देणे अवश्य होते. येथे श्री. नंदा खरे यांनी केलेला या लेखाचा अनुवाद आणि त्यांनीच दिलेले उत्तर छापले आहे. ते वाचकांना उद्बोधक वाटेल.]
विज्ञान ही एखाद्या समाजाला पाश्चिमात्य समाजांच्या भौतिक सामर्थ्यात वाटा मिळवून देणारी निरागस (innocent) गोष्ट नाही.

पुढे वाचा

सर्व धर्मशास्त्र पुरुषी आहे

सर्व धर्मशास्त्र पुरुषी आहे
सर्व धर्मशास्त्र पुरुषी आहे आणि ते मुख्यतः समाजातील ज्या वर्गात पुरुष बायकांना पोसतात अशा वर्गाने बनविले आहे आणि ते सर्व समाजाच्या माथी मारले आहे. हिंदुस्थानात ज्या स्त्रिया कुटुंबपोषणासाठी बाहेर जाऊन काम करतात अशाच स्त्रिया तीन चतुर्थांश आहेत. असे असता पुरुषांनी पोसलेल्या एक चतुर्थांश स्त्रियांना लागू पडणारे नियम सर्व समाजावर लादणे हा अन्याय आहे…… आणखी असे की राष्ट्र म्हणजे बायका, पुरुष नव्हेत. समाजातले तीन चतुर्थांश पुरुष मरून गेले व बायकाच उरल्या तरी पुढची पिढी अनेकपत्नीपद्धतीचा अवलंब करून भरून काढता येईल; पण बायकाच जर मेल्या आणि पुरुष सपाटून उरले, तर राष्ट्रसंवर्धन होणार नाही.

पुढे वाचा