मासिक संग्रह: जानेवारी, २०११

भाषा वाहते आहे !

भाषा वाहते आहे ! एका नदीच्या प्रवाहाच्या दोन काठांवर दोन माणसे उभी होती. पल्याडच्या काठावरील माणसानं ओरडून सांगितले, “भाषा वाहते आहे!” प्रवाहाच्या खळखळाटामुळे अल्याडच्या माणसाला काही नीट ऐकू आलं नाही. त्यानं हातवारे करून तसं सांगितलं. पल्याडच्या माणसानं पुन्हा ओरडून सांगितलं. अल्याडच्या माणसाला संदेश समजला. काठावरून मागे वळून त्यानं गावाकडे धाव ठोकली. गावकऱ्यांसाठी त्यानं हाकाटी पिटली, “धावा रे धावा ! भाषा वहावते आहे!”

अंधश्रद्धानिर्मूलनार्थ (भाग २)

[ श्री सीताराम दातारांचे अन्धश्रद्धाविनाशाय हे विवेकवादी भूमिकेचे पद्यरूप आपण गेल्या अंकापणून क्रमशः देत आहोत. पहिल्या भागात 56 कडव्यांमधून (1) मानवाची वैशिष्ट्ये, (2) मानवांपुढील समस्या, (3) मानवाची उपाययोजना, (4) मानवाने कल्पिलेले ईश्वराचे स्वरूप, (5) ईश्वरविषयक सत्याची विस्मृती, (6) जनमानसावर ईश्वरकल्पनेचा प्रभाव, (7) सत्यवाद्यांचा पक्ष, (8) नास्तिकांच्या मतें सृष्टीतील विषमतेचे स्पष्टीकरण, (१) आस्तिकांचे कर्मसिद्धान्ताद्वारे स्पष्टीकरण, (10) नास्तिकांचा आक्षेप, (11) आस्तिकांचे उत्तर, (12) यावर नास्तिकांची प्रतिक्रिया. (अंक 21.9, डिसेंबर 2010.) आता वेगवेगळी प्रमाणे तपासून दातार अंधश्रद्धा या मुख्य विषयाकडे वळत आहेत. – संपादक ]

13) प्रत्यक्षप्रमाण व अनुमानप्रमाण इंद्रियें वस्तुजाताचा बोध प्रत्यक्ष होत जो पुरावा अन्य ना लागे त्याते सिद्ध करावया ॥57 असे प्रमाण प्रत्यक्ष, सर्वां प्राप्य, अजोडही मुख्य साऱ्या प्रमाणांत मान्य सर्वांस सर्वथा ॥58 साऱ्या वस्तू न कळती इंद्रियांनीच सर्वदा अनुमानप्रमाणें त्यां जाणे मानव तेधवा ॥59 गोलाकार ग्रहांचा वा त्यांची सूर्यप्रदक्षिणा जाणिती अनुमानें त्यां ‘पर्वतीं अग्निला’ जसे ॥60

14) प्रत्यक्षप्रमाणाविषयी शंका ज्ञानेंद्रियेही सर्वांची कार्यक्षम न सारखी इंद्रियज्ञान कोणाचे समजावे प्रमाणवत् ?

पुढे वाचा

मराठीच्या प्रमाणभाषेच्या लेखनाविषयीची माझी संकल्पना विदर्भ साहित्य संघात ‘शुद्धलेखनाचे सुलभीकरण’ ह्या विषयावर घडलेल्या चर्चासत्रात वाचलेला निबंध

( या निबंधाचे लेखन शासनमान्य नियमांनुसार केले आहे. कारण शासनाचे नियम वापरणे बंधनकारक (mandatory) आहे.) मराठीची प्रमाणभाषा, बोलण्याची नव्हे तर लिहिण्याची, कशी असावी तर तीमध्ये कोणताही विषय मांडता यावा. शास्त्र किंवा विज्ञान यांची सतत वाढ होत असते. म्हणजे त्यांचा परिघ वाढत जातो; त्याचप्रमाणे त्या विषयांची खोली देखील वाढत जाते. असे सतत वाढत जाणारे विषय आमच्या भाषेला पेलता यावे आणि तीमध्ये केलेले लेखन निःसंदिग्ध आणि अल्पाक्षर असावे अशी गरज आहे. ही गरज असताना त्याचवेळी लेखननियमांच्या सुलभीकरणाची मागणी होत आहे. सुलभीकरणाची गरज आहे असे मानून मी लेखनाच्या विषयात प्रवेश केला.

पुढे वाचा

गावची जत्रा

प्रत्येक गावाला यात्रा किंवा उरूस दरवर्षी असतो. आपल्याकडे मुसलमान राज्यकर्त्यांचा अंमल सुमारे 1000-1200 वर्षे तरी होता. तेव्हा बऱ्याच ठिकाणी राज्यकर्त्यांचा धर्म पाळण्याच्या इच्छेने तेथे देवळांच्या ऐवजी दर्गे वगैरे झाले असतील. अगदी देवळांचेच दगड वापरून दर्गे बांधले, अशा कडवेपणाने नसले तरी नवीन दर्गे झाले असतील. मुस्लिम राजवटीने त्यांना वतने दिली असतील, व मग देवाचा उरूस करणे ओघाने आलेच! नंतर जरी इतर धर्मांच्या राजवटी आल्या तरी सहिष्णुतेच्या मानसिकतेतून त्या राजांनी ती धर्मस्थळे व त्यांची वतने तशीच ठेवली असतील. नंतर ब्रिटिशांच्या 150 वर्षांच्या राजवटीत तर धर्मस्थळांचे नीट जतन करून, समाज एकसंध राहू नये या धोरणामुळे सर्व धर्मस्थळे सांभाळली गेली असतील.

पुढे वाचा

पत्रसंवाद

राजीव साने, 2, स्नेह क्लासिक्स्, 7/1 एरंडवणे, पाडळे पॅलेससमोरील रस्ता, पुणे 411004 चौसाळकरांना उमजलेला मार्क्स : काही प्रश्न आजचा सुधारकच्या नोव्हेंबर 2010 च्या अंकात सुधीर बेडेकर यांनी लिहिलेले परीक्षण (मार्क्सवाद-उत्तरमार्क्सवाद ले. प्रा. अशोक चौसाळकर) वाचले. त्यातून बऱ्याच आशा पल्लवित झाल्या. परंतु पुस्तक वाचल्यावर मात्र निराशा झाली. पहिली दोन प्रकरणे खुद्द मार्क्सवर आहेत. या दोन प्रकरणात इतक्या घसरड्या जागा निघाल्या की त्यावर प्रश्न उपस्थित करण्यातच प्रस्तुत लेख खर्ची पाडावा लागला. पुस्तकाच्या पुढील भागातही आक्षेपार्ह असे बरेच काही आहे पण ते या लेखाच्या मर्यादेत घेणे शक्य नाही.

पुढे वाचा