मासिक संग्रह: ऑक्टोबर , २०१२

पत्रसंवाद

प्रमोद सहस्रबुद्धे, बी 4/1101 विकास कॉम्प्लेक्स, कॅसल मिल कम्पाउंड, ठाणे (पश्चिम) 400 607
मेंदू-विज्ञान विशेषांक : एक प्रतिक्रिया
मेंदू-विज्ञान विशेषांक (खरे तर मेंदू-विज्ञान-तत्त्वज्ञान विशेषांक म्हणायला हवे.) हा अंक वाचताना एक उत्सुकता होती. मेंदूविज्ञानातील प्रगती अजूनही तत्त्वज्ञानातील प्रश्न सोडवण्या इतपत झालेली नाही असे माझे एक मत होते. त्यामुळे हे दोन विषय संलग्न नाहीत असे मला वाटत असे. हा अंक वाचताना माझ्या मताविषयी काही मजकूर येऊन माझे मतपरिवर्तन होईल अशी एक शक्यता वाटत होती आणि म्हणून त्याबद्दल उत्सुकता होती.
अंक वाचताना आणि तयार होताना असे जाणवले की संपादकांनी बरीच मेहनत घेऊन अंक तयार केला आहे.

पुढे वाचा

‘दोन टिपणे

दुष्काळाशी दोन हात
दुष्काळाची चर्चा सुरू झाली की विरोधी पक्षांचे नेते म्हणतात, सरकारने रोजगार हमीची कामे काढावीत, गुरांच्या छावण्या उघडाव्यात, पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावेत. फार फार तर कर्जाची वसुली थांबवावी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे. सरकार म्हणते, दुष्काळ निवारणासाठी आम्ही इतकी रक्कम मंजूर केली, अमुक इतकी कामे सुरू केली, एवढ्या छावण्यांना एवढी मदत केली, इतके टँकर सुरू केले, फी माफ, कर्ज वसुली स्थगित.. झाले. बघता बघता दिवस निघून जातात. पुन्हा दुष्काळाची परिस्थिती येते. विरोधी पक्षवाले पुन्हा मोर्चे काढतात. सत्ताधारी बैठका घेतात.

पुढे वाचा

सुखाकडे जाणारी वाट

गेल्या दोन हजार वर्षांपासून प्रामाणिक नीतिवाद्यांमध्ये सुखाला, आनंदाला तुच्छ लेखण्याची, दूर ठेवण्याची (त्यापासून दूर पळण्याची म्हणाना!) चाल आहे. ‘सहनं परमो धर्मः’ मानणाऱ्या तितिक्षावादी (स्टोईक) लोकांनी सुखाचा उपदेश करणाऱ्या एपिक्युरसवर ‘हल्लाबोल’ केला. त्याच्या उपदेशाला ‘फालतू तत्त्वज्ञान’ म्हणून हिणवले आणि त्याच्याबद्दल नाही नाही त्या वंदता पसरवून आपला ‘वरचढपणा’ सिद्ध केला. ही तर प्राचीन गोष्ट म्हणून सोडून देऊ. त्याच्या २००० वर्षांनंतर काय झाले? जर्मन प्राध्यापकांनी असे काही सिद्धान्त शोधून काढले, की ज्यामुळे जर्मनीचे तर अधःपतन झालेच, परंतु संपूर्ण जगावरच ही आजची अवकळा आली. ह्या सर्व लोकांना सुखाचा तिटकारा होता.

पुढे वाचा

विज्ञान, तंत्रज्ञान व गांधीजी

“यंत्रसामुग्री हे आधुनिक समाजाचे मुख्य प्रतीक आहे. ते खूप मोठे पाप आहे.”
“नई तालीम ह्या माझ्या योजनेमध्ये अधिक चांगली ग्रंथालये, प्रयोगशाळा आणि संशोधन संस्था असतील. रसायनशास्त्रज्ञ, अभियंता आणि इतर तज्ज्ञ ह्यांची फौज असेल. हे लोक राष्ट्राचे खरे सेवक असतील आणि आपले हक्क व गरजा ह्यांच्याबाबत सजग झालेल्या जनतेच्या विविध आणि वाढत्या गरजांना ते पुरे पडतील. हे तज्ज्ञ जेव्हा परकीय भाषा न बोलता लोकांची भाषा बोलतील, त्यांनी संपादन केलेले ज्ञान ही जनतेची सामाईक मालमत्ता मानली जाईल, तेव्हाच निव्वळ नक्कल न होता खरे मूलभूत स्वरूपाचे काम होईल आणि त्याचे मूल्य समान व न्यायी पद्धतीने सर्वांमध्ये विभागले जाईल.”

पुढे वाचा

कोरडवाहू शेतकऱ्यांच्या आजच्या हलाखीच्या स्थितीवर उपाय

मी ह्या विषयातला तज्ज्ञ नाही; फक्त माझ्या मनात विचार, त्यावर चर्चा सुरू व्हावी ह्यासाठी, पुढे मांडत आहे.
महाराष्ट्रातील किंबहुना भारतातील कोरडवाहू शेतकरी आज मरणासन्न स्थितीत आहे. त्याच्या करुण अवस्थेची वर्णने सर्वत्र वाचायला मिळतात. त्यातल्या त्यात कापूस पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या हालांना तर सीमाच नाही, त्यांचे हाल कुत्रादेखील खात नाही.
त्यांच्या परिस्थितीचे सविस्तर वर्णन करण्याची गरज नाही.
पन्नास वर्षांपूर्वी त्यांची स्थिती इतकी वाईट नव्हती. ते कर्जबाजारी होते; पण त्यांच्यावर आत्महत्या करण्याचा प्रसंग क्वचित् येत होता. मग आताच स्थितीत असा कोणता फरक पडला की ज्यामुळे त्यांची स्थिती मरणासन्न झाली?

पुढे वाचा

लोकनेता: शाहणा

मे महिन्यातली सकाळ! कडक उन्हाळा! सकाळचे नऊ-साडेनऊ वाजलेले! काल संध्याकाळी गावाशेजारच्या मोठ्या गावात मोर्चा निघालेला होता, व शेवटी मोर्चा सरकारी धान्याच्या गोडाउनवर गेला. नंतर पोलिसांच्या लाऊडस्पीकरवरून कडक सूचना. शेवटी मोर्चेकऱ्यांनी न ऐकल्याने लाठीमार, अश्रुधूर व गोळीबाराचे आदेश. सात-आठ लोकांचा गोळ्या लागल्याने जागेवरच मृत्यू व अनेक जखमी. बाकीचे हौशे-नवशे आपापल्या गावांकडे पळाले.

अर्थातच रात्री व रात्रभर याची चर्चा गावागावांत चालू होती. पोलिसांच्या समोर सरकारी गोडाऊन फोडण्याच्या घटनेमुळे लोकांना एकप्रकारचा आत्मविश्वास आलेला होता. आपल्याला हवी असलेली वस्तू सरकारी मालकीची व सरकारी बंदोबस्तात असली तरी ती हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो!

पुढे वाचा

मानवी अस्तित्व (५)

मी होलोग्रामसदृश प्रतिमा असेन का?

आपल्या अवतीभोवती असलेल्या वस्तूंकडे नजर टाकल्यास समोरची भिंत, बसलेली खुर्ची, बाहेरचे झाड, तुम्ही स्वत: हे सर्व खरेखुरे असून त्या अस्तित्वात आहेत याबद्दल तुमच्या मनात अजिबात शंका असणार नाही. परंतु जगातील या गोष्टी, तुम्ही आम्ही सर्व, व हे जग एखाद्या होलोग्राम आकृतीप्रमाणे त्रिमितीतील प्रतिमा तर नाहीत ना? काही तरी विचित्र विधान असे वाटत असले तरी जगन्मिथ्या, हे जग मायावी आहे. असे आपले भारतीय तत्त्वज्ञ फार पूर्वीपासून सांगत आले आहेत, हे आपण विसरू शकत नाही. आपल्या सर्वसामान्य समजुतीलाच धक्का देणारे व आपल्या अस्तित्वाच्या मुळावरच घाव घालणारे हे विधान असेल, यात शंका नाही.

पुढे वाचा

सत्य

बरोबर असल्याबद्दल खेद कशाला वाटून घेता? तसे करायचे काहीच कारण नाही. अनेक लोक, विशेषतः अजाण लोक, तुम्हाला खरे बोलल्याबद्दल, बरोबर असल्याबद्दल, तुम्ही तुम्ही असल्याबद्दलच त्रास देऊ इच्छितात.
बरोबर असल्याबद्दल किंवा तुमच्या काळाच्या पुढे असल्याबद्दल खेद कशाला वाटून घेता? तुम्ही बरोबर असल्याचे जर तुम्हाला माहीत आहे, तर मनातले बोलून टाका ना!
मनातले बोलून टाका. तुम्ही अल्पसंख्याक असलात काय, किंवा अगदी एकटे असलात काय, सत्य हे शेवटी सत्यच असते.
– मोहनदास गांधी