मासिक संग्रह: नोव्हेंबर, २०१६

फेअर अँड लव्हली

फेअर अँड लव्हलीची वार्षिक विक्री आहे आठ हजार कोटी
कवितेच्या पुस्तकाच्या छापल्या जातात फक्त तीनशे प्रती

फेअर अँड लव्हली = गोरा रंग
गोरा रंग = सुंदर दिसणे
सुंदर दिसणे = स्त्री होणे

स्त्री जी कविता लिहिते
स्त्री जी कविता वाचते
ती या फॉर्म्युल्याच्या बाहेर आहे

कविता
जोडलेल्या असतात एकत्र मुंग्यांसारख्या
समाजाची रचना बदलण्यासाठी
फेअर अँड लव्हली
दाखवत असते अंगठा त्या श्रमाला !

– निर्मला गर्ग

‘पिंक’च्या निमित्ताने

चित्रपट, पिंक, बलात्कार, हिंसा, नकाराचा अधिकार, योनिशुचिता
—————————————————————————–

लैंगिक संबंधांना नकार देण्याचा स्त्रीचा अधिकार हा तिच्या स्वतःच्या शरीरावर असणाऱ्या मुलभूत अधिकाराचा भाग आहे, हे वास्तव व्यावसायिक चित्रपटाच्या माध्यमातून जोरकसपणे मांडणाऱ्या ‘पिंक’ ह्या चित्रपटाच्या निमित्ताने आजच्या आधुनिक स्त्रीच्या विचारपटाचा हा आलेख.

—————————————————————————–

शुजित सरकार यांचा ‘पिंक’ हा अलीकडच्या काळातील एक महत्वाचा चित्रपट आहे. सिनेमा ही केवळ वैचारिक नाही तर भावनिक अनुभूतीही असते. त्यामुळे मला (किंवा इतर कुणाला) या सिनेमाचे (किंवा कोणत्याही कलाकृतीचे) भावणे हे अतिशयोक्त आणि सापेक्ष असू शकते. थेट सामाजिक संदर्भ असलेला एक महत्त्वाचा विषय हाताळल्याबद्दल आणि या विषयातले वैचारिक बारकावे टिपण्याचा पुरेपूर प्रयत्न केल्याबद्दल, तसेच अभिव्यक्तीतील ठाशीवपणा आणि साधेपणा यांसाठी ‘पिंक’ मला खूप आवडला.

पुढे वाचा

अनुभव : मी मराठा ?

मराठा, जातीय अस्मिता
—————————————————————————–
मराठा मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाने नव्हे, तर शिक्षण व स्वतंत्र व्यवसाय उभारण्यातून मराठा युवकांचे प्रश्न सुटू शकतील असे मांडणारा हा स्वानुभव
—————————————————————————–
मराठा जातीत जन्माला आल्याचा मला जराही अभिमान नाही, असण्याची आवश्यकता अजिबात नाही, यात माझं काहीही कर्तृत्व नाही. याउलट याची लाज वाटावी अशाच काही घटना घडल्या आहेत. आरक्षणाचा मला वैयक्तिक काहीच तोटा झाला नाही. मला दहावीला ८४% मार्क्स मिळाले, बारावीला ७८%. देशातल्या सर्वोत्तम कॉलेजेसपैकी एक असणाऱ्या रुईया कॉलेजमध्ये मला अॅडमिशन मिळाली, कोणत्याही अडचणीशिवाय. गावाकडे अगदीच थोडीशी कोरडवाहू शेती असल्याने त्याचा तसा कधीच काही फायदा झाला नाही.

पुढे वाचा

पुस्तक परिचय : द सर्कल

कादंबरी, तंत्रज्ञानाचा सामाजिक परिणाम, मानवी स्वातंत्र्य
——————————————————————————–
1984 हे वर्ष उलटून गेले, पण जॉर्ज ऑर्वेलने दाखविलेला एकाधिकारशाहीचा धोका अजून टळला नाही. उलट तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे व सोयीसाठी आपले स्वातंत्र्य गहाण टाकण्याच्या वाढत्या मनोवृत्तीमुळे तो धोका अधिकच गडद होत आहे. तंत्रज्ञान व विकास हे परवलीचे शब्द मानणाऱ्या आपल्या आधुनिक समाजाला धोक्याचा लाल कंदील दाखविणाऱ्या एका आशयघन कादंबरीचा हा संक्षिप्त परिचय.
—————————————————————————–

‘द सर्कल’ या कंपनीची सुरुवात ‘टाय’ने (तिच्या तीन संचालकांपैकी एक) लावलेल्या ‘ट्रू यू’या सॉफ्टवेअरच्या शोधापासून होते. ह्या सॉफ्टवेअरमुळे ग्राहकांना फक्त एका अकाऊन्ट आणि पासवर्डमार्फत त्यांच्या संपूर्ण सामाजिक आणि खाजगी आयुष्याचे व्यवस्थापन करण्याची सोय उपलब्ध होते.

पुढे वाचा

भक्ति – सूफीसमन्वय

भक्ति, सूफी, हिंदू-मुस्लीम समन्वय
—————————————————————————–
इस्लाममधील वाहिबी (मूलतत्त्ववादी) वि. अन्य विचारधारा हा संघर्ष जगभरात पेटून उठला आहे. त्याच बरोबर इस्लामचे एकसाची आक्रमक स्वरूप जनमानसावर ठसविण्याचे कामही जोरात सुरू आहे. ह्या पार्श्वभूमीवर हिंदूंमधील अद्वैत दर्शनाशी नाते सांगणाऱ्या,गेली अनेक शतके हिंदू-मुस्लीम समन्वय साधणाऱ्या सूफी पंथाचा परिचय करून देणारा हा लेख.
—————————————————————————–

सूफी संत हे इस्लामचे शांतिदूत म्हणून ओळखले जातात. अकराव्या शतकात अरबस्थानात सूफी संप्रदायाचा विकास घडून आला. अल गझाली या प्रसिद्ध सूफीच्या काळात सूफी संप्रदायात नवीन बदल झाला. येथूनच भारतातसुद्धा सूफींचे आगमन होऊन बाराव्या-तेराव्या शतकात सूफी संप्रदायाचा विस्तार भारतभर झाला.

पुढे वाचा

मराठा मोर्चे : एक आकलन

मराठा, अस्मिता, सामाजिक लढा, सत्याग्रह
—————————————————————————–
महाराष्ट्रात अलीकडच्या काळात निघालेल्या विराट् मराठा मोर्च्यांनी अनेक नवे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामागील समूहमानस समजून घेण्याचा हा एक प्रयत्न. ह्या विषयावर व्यापक चर्चा घडावी ह्या अपेक्षेने तोप्रकाशित करीत आहोत.
—————————————————————————–

कोपर्डी, जिल्हा – अहमदनगर येथे मराठा समाजातील एका गरीब आणि अल्पवयीन मुलीवर चार दलित तरुणांनी बलात्कार करून तिचा खून केला. या घटनेने महाराष्ट्रातील समस्त मराठा समाज अतिशय क्षुब्ध झाला. आपण राज्यकर्ता समाज असल्याचे भान असल्यामुळे सगळ्या महाराष्ट्रात जिल्ह्याच्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने मूक मोर्चे काढून त्याने अत्यंत संयत प्रतिक्रिया देत, त्या घटनेचा निषेध करायला सुरुवात केली आहे.

पुढे वाचा

भारतीय चर्चापद्धती (भाग ३)

आन्वीक्षिकी

चर्चापद्धती, वाद, आन्वीक्षिकी
—————————————————————————–
‘भारतीय चर्चा पद्धती’ च्या पहिल्या भागात आपण ‘वाद’ या संकल्पनेचे आणि पद्धतीचे स्वरूप पहिले. दुसऱ्या भागात ‘वाद’शी समांतर इतरही काही संकल्पनांचा थोडक्यात परिचय करून घेतला. भारतीय वादपद्धतीचा संबंध ‘आन्वीक्षिकी’ या विद्येशी जोडला जातो. या विद्येच्या स्वरूपात प्राचीन इहवाद आढळतो. आजच्या इहवादाशी हा इहवाद जुळणारा आहे. वादाचे प्रमेय व विषय अध्यात्मवादी न ठेवता इहवादी असले तर सामाजिक जीवनाचे प्रश्न अधिक काटेकोरपणे सुटू शकतात. त्या विद्येचा हा अल्पपरिचय.
—————————————————————————–
प्रचलित ‘आन्वीक्षिकी’चा शाब्दिकअर्थ ‘अन्वेषण-विद्या’ असा आहे.अन्वेषण म्हणजे शोध घेणे.

पुढे वाचा

समान नागरी कायद्याचा मसुदा : एक चिकित्सा – स्त्रीमुक्तीच्या अंगाने

समान नागरी कायदा, स्त्रीमुक्ती
—————————————————————————–
समान नागरी कायद्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे व त्या निमित्ताने नव्या तिकिटावर जुना खेळ सुरू झाला आहे. ह्या पार्श्वभूमीवर ह्या संदर्भातील महत्वाचे मुद्दे रेखांकित करणारा ‘आजचा सुधारक’च्या जानेवारी व फेब्रुवारी १९९७च्या अंकात प्रकशित झालेला हा लेख आम्ही मुद्दाम पुनर्मुद्रित करीत आहोत.
—————————————————————————–
स्त्रीमुक्तीच्या आंदोलनाची उद्दिष्टे दोन आहेत. स्त्रीपुरुषांच्या सामाजिक दर्जांमध्ये समानता आणणे व त्याचबरोबर सर्व स्त्रियांच्या एकमेकींच्या दर्जामध्ये समानता आणणे. सधवा/ विधवा, पतिव्रता/ व्यभिचारिणी ह्यांमध्ये आज जो फरक केला जातो तो आपल्या समाजाच्या  पुरुषप्रधान विचारसरणीमुळे आणि स्त्रियांच्या पुरुषसापेक्ष स्थानामुळे होतो.

पुढे वाचा

पत्रसंवाद

‘आजचा सुधारक’च्या जुलै 2016च्या अंकामध्ये डॉ. रवीन्द्रनाथ टोणगावकर यांच्या आध्यात्मिक साधनेमधील वैज्ञानिक सत्य सांगणाऱ्या लेखाचा उत्तरार्ध आलेला आहे. या लेखात विपश्यना साधनेविषयी जी विधाने केलेली आहेत ती वस्तुस्थितीनुसार दिसत नाहीत. वास्तविक डॉ. टोणगावकर यांनी स्वतःच इगतपुरी येथील दहा दिवसांचे शिबिर पूर्ण केलेले असल्यामुळे त्यांच्या लेखात अशी विधाने यावीत याचे सखेद आश्चर्य वाटते. मी स्वतः इगतपुरी येथे दहा दिवसांची विपश्यना शिबिरे अनेकदा केलेली आहेत. विपश्यनेचा अभ्यास सुरू करतानाच श्री. गोएंका गुरुजी हे स्पष्ट करत असत की त्या साधनेमध्ये स्वतःच्या नैसर्गिक श्वासोच्छ्वासावर लक्ष ठेवावयाचे आहे, ‘कोणत्याही प्रकारचा प्राणायाम करावयाचा नाही’.

पुढे वाचा