‘शिक्षणाची गुणवत्ता’ याची नेमकी व्याख्या करणे अवघड असले तरी गुणवत्तेची एक ढोबळ कल्पना आपल्या सर्वांच्याच मनात असते. त्या कल्पनेत शाळेतील भौतिक सविधांपासून ते मुलांच्या यशापयशापर्यंतच्या अनेक बाबींचा समावेश असतो. आपल्या जनातल्या कल्पनेच्या आधारेच आपण शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत, समाधान, असमाधान, चता वगैरे व्यक्त करत असतो. गणवत्तेच्या या आपल्या कल्पनेत मुलांना कसे शिकवले जावे, वर्गातले वातावरण कसे असावे, शिक्षक आणि विद्यार्थी यांचे सबंध कसे असावेत याबाबतच्या धारणांचाही समावेश असतो. या मांडणीपुरते आपण या सगळ्या धारणांना एकत्रितपणे वर्गांतर्गत प्रक्रिया असे म्हणूया आणि गुणवत्तापूर्ण वर्गांतर्गत प्रक्रियेची काही ढोबळ लक्षणे काय असू शकतील याचा शोध घेऊया.
Author archives
गुणवत्तापूर्ण शिक्षण : शिक्षण हक्क अधिनियम व भारतीय समाजापुढील आह्वाने
शिक्षण कशासाठी या प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या गुंतागुंतीच्या समाजजीवनात शोधतो तेव्हा शिक्षणाच्या गुणवत्तेचाही शोध घेण्याची दिशा आपल्याला सापडते. या ठिकाणी आपण बालकांच्या शिक्षण हक्काच्या संदर्भात गुणवत्तेचा अर्थ शोधणार आहोत. मानवप्राण्याचे वैशिष्ट्य, त्याच्या सर्जनशीलतेत आणि अर्थपूर्णरीत्या जगता यावे आणि असे जगता येण्यासाठी आवश्यक असा समाज देशाच्याच नव्हे तर जगाच्या पाठीवर घडावा यासाठी आपण प्रयत्नशील असणे हे शिक्षणाचे व्यापक उद्दिष्ट आपल्याला मानता येईल. प्रत्येक माणसाला जगण्याचा, शिकण्याचा हक्क आहे ही भूमिका, आणि एक बालक म्हणून त्याची वैशिष्ट्ये ह्या दोन्ही संदर्भाना गृहीत धरून त्याच्या शिक्षणाचा विचार करावा लागणार आहे.
समारोप
सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण संमेलन मुळातच एका अस्वस्थतेतून जन्माला आले. कोठारी आयोग आला-गेला. यशपाल समिती आली-गेली. सर्वशिक्षा अभियान आले गेले. तसेच आता सर्वांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क अभियानाचे होणार का? असा प्रश्न महाराष्ट्रातील शिक्षकांच्या मनात आल्याशिवाय राहिला नाही. महाराष्ट्राची परिस्थितीच तशी होती. शिक्षण हक्क अधिनियम राष्ट्रीय पातळीवर पारित केला गेला 2010 च्या एप्रिलमध्ये. त्यानंतर दीड वर्षांनी म्हणजे 2011 च्या सप्टेंबरमध्ये महाराष्ट्राने आपले नियम पारित केले. शिक्षकांना धारेवर धरण्यापलीकडे या अधिनियमामुळे नवीन काही झाले नाही. अशी प्रतिक्रिया सर्व शिक्षकांच्यात उमटलेली दिसत होती.
पत्रसंवाद :
श्री. दाभोलकरांच्या पत्रांच्या निमित्ताने
श्री दत्तप्रसाद दाभोलकर ह्यांची तीन पत्रे गेल्या दोन अंकांत प्रसिद्ध झाली आहेत. त्याचप्रमाणे गेल्या अंकाबरोबर आपल्या मासिकाची बावीस वर्षे पूर्ण झाली आहेत.
1990 मध्ये नवा सुधारक सुरू झाला तेव्हापासूनच ह्या मासिकात जाहिराती कधीही घ्यायच्या नाहीत आणि हे मासिक एका ‘रिसर्च जर्नल’सारखे चालवावयाचे असे संपादकांच्या मनात होते. इतकेच नव्हे तर विवेकवादाविषयी ज्यांना जिज्ञासा असेल त्यांच्यात बंधुभाव निर्माण होईल आणि त्या मंडळींकडूनच हे मासिक पुढे चालवले जाईल असेही संपादकांना वाटत होते. पहिली दोन वर्षे आजीव वर्गणी स्वीकारण्यात आली नाही.
पत्रसंवाद
दत्तप्रसाद दाभोळकर, ‘या’ सदर बझार, सातारा. स्थिरध्वनी (02162)239195), भ्रमणध्वनी : 9822503656 id : dabholkard@dataone.in .
सूर्यापोटी शनैश्वर…? पण कोण…?
आजीव वर्गणीदारांची व्यथा मांडणाऱ्या माझ्या पत्राची खिल्ली उडवीत मला तर्कट तिरकस भाषेत दिलेले आपले उत्तर (आ.सु.494, फेब्रुवारी 2012) वाचले. आम्ही संपादक आहोत. मासीक आमचे आहे. तुमचे पैसे बुडवून वर आम्ही, तुमचीच आमच्या मासीकात खिल्ली उडव शकतो हा तमचा अहंकार मी समजू शकतो. पण रस्त्यावरचे गंड ज्याप्रमाणे आई, वडील, जात यांचा उद्धार करीत एखाद्यावर हल्ला करतात. त्याप्रमाणे माझे कुटुंब, परिवार यांचा उद्धार आपण करावयास नको होता.
हिंदुधर्म आणि हिंदुत्व
(सेक्युलॅरिझम (धर्मनिरपेक्षता) हे विसाव्या शतकाने जगाला दिलेले मूल्य. ‘आम्ही भारतीय लोक भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करीत आहोत’ असे संविधानाच्या उद्देशिकेत नमूद केले आहे. इहवाद हा सेक्युलॅरिझमचा एक अर्थ असला, तरी, सामाजिक जीवनात धर्म न आणणे, सामाजिक व वैयक्तिक जीवन त्या अर्थाने परस्परमुक्त ठेवणे हा त्याचा खरा अर्थ होता. धर्मनिरपेक्षता ही आतापर्यंत पुरोगामित्व व विवेकवाद ह्यांची खूण समजली जात असे. धर्मचिकित्सेपासूनच सर्व चिकित्सांची सुरुवात होते असे मानण्यातून ह्या संकल्पनेची सुरुवात झाली. आता मात्र त्याच्याही पलीकडे जाऊन, त्या शब्दाचा आजचा अर्थ, व्यक्तिगत जीवनातही धर्माचे पालन न करणे असा झाला आहे, कारण, पुरोगाम्यांच्या मते धर्मापासून मुक्ती ही सामाजिक जीवनाची पूर्वअट मानली जाते.
पुस्तकपरिचय पंडित-सुधारक : श्री. म. माटे (1006-1957)
प्रोफेसर माटे यांचा जन्म १८८६ साली दिगंबर-श्वेतांबरी जैन यांचे तीर्थक्षेत्र असलेलया वाशिम जिल्ह्यातील शिरपर (जैन) येथे व्हावा हा विलक्षण योगायोग मानला पाहिजे. कारण जैन तत्त्वज्ञान तत्त्वतः वर्णव्यवस्थेविरुद्ध असलेले वेदांचे प्रामाण्य नाकारणारे नास्तिकदर्शन. प्रोफेसर माटे यांचे जीवितकार्य अस्पृश्योद्धार. त्यांनी अस्पृश्य-दलितांसाठी शाळा चालविल्या; त्यांना आरोग्याचे धडे दिले; त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची प्रसंगी व्यवस्था केली. त्यांच्या व्यथेला वाचा फोडणारे उपेक्षितांचे अंतरंग ही व्यक्तिचित्रे सादर केली. त्यामध्ये ‘बन्सीधरा तू कोठे जाशील’ यासारखी हृदयद्रावक कथा लिहिली. बहुतांची अंतरे राखून अस्पृश्योद्धाराचे कार्य केले म्हणून त्यांना बहुधा सनातनी सुधारक म्हणत असावेत.
साहित्यातून विवेकवाद (२) – जॉर्ज ऑर्वेल
स्टाईनबेकसारखाच 1902 साली जन्मलेला एरिक ब्लेअर. वडील बंगालात एक्साईज खात्यात होते. स्पष्ट सांगायचे तर अफूचे पीक नियंत्रित करणाऱ्या खात्यात होते. मुलगा शाळेत जायच्या वयाचा झाल्यावर इंग्लंडमध्ये निवासी शाळा शोधल्या गेल्या. त्या काळची इंग्रजी शिक्षणव्यवस्था ग्रामर म्हणजे प्राथमिक शाळा, प्रेपरेटरी किंवा प्रेप शाळा या माध्यमिक, आणि चांगल्या उच्चशिक्षणासाठी पब्लिक स्कूल्स. खरे तर पब्लिक स्कूल्स अत्यंत प्रायव्हेट आणि महाग असायची. त्यातूनही जरा चांगल्या, ख्यातनाम पब्लिक स्कूल्समध्ये प्रवेश कठीण असायचा, आणि शिष्यवृत्त्या आणिकच अवघड. मध्यम दर्जाच्या सनदी अधिकाऱ्याच्या मुलाला शिष्यवृत्ती नसली तर सामान्य, अनिवासी प्रायव्हेट शाळा हाच पर्याय; अत्यंत असमाधानकारक, पण एरिक हुषार होता.
ही स्त्री कोण? (भाग १)
[ बाईचे बाईपण, तिचे भोग, दुःख ह्या सर्वांचे मूळ शोधण्याच्या उद्देशाने त्या अर्थाच्या मराठी, संस्कृत व इंग्रजी शब्दांच्या व्युत्पत्ती शोधण्याचा हा प्रयत्न. – संपादक ]
माझं सुख माझं सुख हंड्या झुंबर टांगलं
माझं दुःख माझं दुःख तळघरात कोंडलं
– बहिणाबाई (1880-1951)
स्त्री-पुरुष हे शब्द नेहमीच फारच सैलसर अर्थाने वापरले जातात. ते जरा नीटस अर्थाने वापरले गेले तर त्यांच्या उपयोजनातील संकल्पनात्मक गोंधळ संपण्याची शक्यता असतेच पण जरा शिस्तबद्धताही येते.
‘स्त्री’ला मराठीत पर्यायी शब्द आहे महिला, वनिता, बाई, इ. अनेकवचन बायका, बाया. हिन्दी/उर्दूमध्ये औरत, लौंडी इ.
मानवी अस्तित्व (२)
मुळात हे विश्व अस्तित्वात का आहे?
प्रसिद्ध विज्ञानकथालेखक डोग्लास एडम्स यांच्या मते या विश्वाचा आकार प्रचंड, अतिप्रचंड आहे. तरीसुद्धा महास्फोट सिद्धान्तानुसार (big bang theory) हिशोब केल्यास एके काळी हे विश्व आकाराने फारच लहान होते, असे म्हणता येईल. 1370 कोटी वर्षापूर्वी काळ व अवकाश शून्यातून बाहेर पडले, असा दावा हा सिद्धान्त करतो. हे कसे शक्य झाले? हाच प्रश्न अजून एका प्रकारे विचारता येईल. या जगात कशाचेही अस्तित्व का आहे? प्रश्न फार मोठा आहे. अनाकलनीय आहे. शून्यातून विश्वाची उत्पत्ती, किंवा कुठल्याही वस्तूची उत्पत्ती होऊ शकते याचीच कल्पना करणे अवघड ठरत आहे.