Author archives

स्त्रियांवरील अत्याचार

गेल्या वर्षाच्या उत्तरार्धात बंगलोरमधील एका महिला संघटनेने स्त्री-सखी मेळावा आयोजित केला होता. मेळाव्यात अनेक स्त्री-पुरुषांनी महिलाविषयक प्रश्नांवर चर्चा केली, अनेक नवीन प्रश्नांना वाचा फोडली. या मेळाव्यातील श्रोत्यांच्या सहभागासाठी एक नावीन्यपूर्ण उपक्रम योजला होता. आयोजकांनी काही महत्त्वाच्या प्रश्नांना वाचा फुटावी म्हणून असे प्रश्न वेगवेगळ्या चिठ्यांवर लिहून ते श्रोत्यांमध्ये सोडत पद्धतीने वाटले. नंतर त्या श्रोत्यांनी या प्रश्नांना यथायोग्य उत्तरे दिली. त्यातल्या एका प्रश्नाला एका प्रथितयश श्रोत्याने दिलेले उत्तर ऐकून मी पुष्कळ अस्वस्थ झालो. शिवाय त्या उत्तरावर काहीच प्रतिक्रिया किंवा आक्षेप, विशेषतः सहभागी स्त्रियांकडून, न आल्याने मनात खंत निर्माण झाली.

पुढे वाचा

नागरीकरण विशेषांकातील पत्रांना उत्तरे

विशेषांकाचे बहसंख्य वाचकांनी स्वागत केले. काहींनी पत्रे पाठवून तर काहींनी प्रत्यक्ष भेटीत प्रतिक्रिया दिल्या. नागरीकरणाचा विषय सर्वांनाच महत्त्वाचा वाटला हे विशेष. अपवाद फक्त श्री प्रभाकर करंबेळकर यांचा. खरे म्हणजे नागरीकरण आणि नागरीकरणाच्या अभावाचे परिणाम हे जगातील सर्वांनाच स्पर्श करणारे आहेत. नागरीकरण काही फक्त आधुनिक काळाचा विषय नाही. ती एक अत्यंत सावकाशीने, हजारो वर्ष उत्क्रांत होत गेलेली प्रक्रिया आहे. नगरांकडे भौतिक रचना म्हणून किंवा एक सातत्याची प्रक्रिया म्हणून बघता येते. नगरांच्या प्रक्रिया-स्वरूपाला उठावदार करण्याचा प्रयत्न विशेषांकात केला होता.
पाटणकर यांनी लोथल वा दिल्लीसारख्या शहरांची व्याप्ती किती होती हा प्रश्न उपस्थित केला आणि आधुनिकपूर्व काळात शहरे फार काही मोठी नसावीत असे मत मांडले.

पुढे वाचा

सिंहस्थ कुंभमेळा: शोध आणि बोध

दर बारा वर्षांनी महाराष्ट्रात, त्र्यंबकेश्वर व नाशिक येथे एकाच वेळी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. ऑगस्ट २००३ ते ऑगस्ट २००४ ह्या मागील वर्षात हा धार्मिक सोहळा येथे पार पडला. सदर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शोध घेण्याचा हा छोटेखानी प्रयत्न.
कुंभमेळा भरण्याबाबत काही कथा ‘कुंभमेळा’ ह्या उत्तम कांबळे लिखित पुस्तकात आहेत. पैकी पुढे दिलेली कथा ही चारही (प्रयाग, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक) कुंभमेळ्यांना लागू पडते. ‘खूपखूप वर्षांपूर्वी देवांनी समुद्रमंथन सुरू केले. दानवही त्यांच्या मदतीला होते. बराच काळ मंथन झाल्यावर अमृत बाहेर आले. इंद्राचा पुत्र जयंत याने हा अमृतकुंभ घेतला व तो स्वर्गाच्या दिशेने म्हणजे आपल्या निवासस्थानाकडे जाऊ लागला.

पुढे वाचा

चोम्स्कींची रसेल-भाषणे

प्रा. नोम चोम्स्की (जन्म १९२८) हे अमेरिकन भाषावैज्ञानिक दोन कारणांसाठी जगप्रसिद्ध आहेत. भाषाविषयक त्यांच्या संशोधनाने या क्षेत्रात क्रांतिकारक पॅरॅडाइम बदल घडवून आणला, तसेच १९६०-७० च्या दशकात व्हिएतनाम युद्धकाळात अमेरिकेतील विद्यार्थ्यांनी आपल्या सरकारच्या विरोधात जो उठाव केला त्याला मार्गदर्शन करण्यासाठीही ते उभे राहिले. तेव्हापासून सातत्याने त्यांनी उदारमतवादी, लोकशाहीवादी भूमिकेतून डाव्या चळवळीचे वैचारिक प्रवक्ते म्हणून कामगिरी बजावली आहे. आदर्श अर्थाने आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकशाहीवर आधारित समाजवादी समाजरचना उभारण्याचे ध्येय ते वयाची पंचाहत्तरी ओलांडल्यावरही बाळगून आहेत, आणि तशी मांडणी करत आहेत.

जानेवारी १९७१ मध्ये चोम्स्कींना ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिज, इंग्लड येथे ‘बर्हाड रसेल स्मृती व्याख्यानां’साठी आमंत्रित केले गेले.

पुढे वाचा

आधुनिक मननशीलता

माणसे विचार कोणत्या अवयवाने करतात? माणसांच्या भावना कुठे उद्भवतात? माणसांच्या विचारांमध्ये कधीकधी ‘तर्कापलिकडे’ असाव्या अशा ज्या अंतःप्रेरणा येतात, त्या कोणत्या जागेतून येतात ? तीन्ही प्रश्नांचे उत्तर मेंदू’ हे आहे.
एखादी व्यक्ती विचार करते आहे, तिच्यात काही भावना उपजल्या आहेत किंवा त्या व्यक्तीची अंतःप्रेरणा तिला काही सांगते आहे हे सारे आपण अखेर त्या व्यक्तीच्या वागणुकीच्या निरीक्षणांमधूनच ठरवतो. जर अशा निरीक्षणांमध्ये व्यक्तीची स्थिती ‘जैसे थे’ असल्याचे दिसले तर आपण विचार/भावना अंतःप्रेरणा ओळखणार तरी कश्या ? स्थितीतले बदल उर्फ ‘वागणे’ यातूनच विचारासारख्या गोष्टींची चाहूल लागणार ना ?

पुढे वाचा

ठोक राष्ट्रीय उत्पादनवाढीचे तेजाब

उदारीकरणाने ठोक राष्ट्रीय उत्पाद वाढण्याची गती वाढते, हा देसाईंच्या युक्तिवादाचा गाभा आहे. आणि हे गती वाढणे कार्यकारणाच्या तर्कावर नव्हे तर निरीक्षणावर आधारित आहे. १९९१ नंतर वाढीचा दर ५.२% झाला, तर आधीच्या चाळीस वर्षांत तो ३.७% होता.

पण केवळ राष्ट्रीय उत्पादाच्या वाढीने काय घडते, त्याची गुणवत्ता काय, परिणाम काय, यावर देसाई कुठेच काही म्हणत नाहीत. गेल्या काही वर्षांतील वाढीमुळे बेरोजगारीही वाढली आहे, विषमताही वाढली आहे, असल्या काळजीत पाडणाऱ्या अंगांबद्दलही देसाई प्रश्न विचारत नाहीत. भारताची सर्वांत मोठी, महत्त्वाची उपलब्धी जी लोकशाही, तिच्यावर या वाढीचे तेजाबासारखे होणारे परिणामही देसाईंना शंकास्पद वाटत नाहीत.

पुढे वाचा

पत्रसंवाद

खांदेवाले यांनी एका अहवालाचा परिचय वाचकांना करून दिला आहे तेव्हा काय टीका करायची असेल ती माझ्यावर नको हे खांदेवाल्यांचे म्हणणे बरोबर आहे. अहवालात समस्यांची सोडवणूक सुचवली असती तर टीका किंवा समर्थन करता आले असते. पण अहवालात नुसते भाराभर प्रश्न आहेत. पुष्कळशा “विद्वत्तापूर्ण’ लिखाणाची हीच गत असते. एका अहवालाचा आधार घेऊन दुसरा कोणी एक प्रबंध लिहितो. मग तिसरा कोणी एक ‘शोध-प्रबंध’ लिहितो. अशा त-हेने अहवालांचे आणि प्रश्नांचे ‘पीक’ निघत जाते. उपाय कोणी सुचवत नाही. प्रश्न खूप विचारले की दुसरा मनुष्य नालायक आहे असे सूचित होते.

पुढे वाचा

विवेकवाद – भाग ६ : सत्य, सत् आणि साधु (प्रथम प्रकाशन सप्टेंबर १९९० अंक १.६, लेखक – दि. य. देशपांडे)

या लेखमालेच्या पहिल्या लेखांकात आपण सत्य म्हणजे काय ? या प्रश्नाचा विचार केला. आपण असे म्हणालो की ‘सत्य’ हे विशेषण फक्त विधानांनाच लागू पडू शकते. विधान म्हणजे स्थूलमानाने बोलायचे तर एखाद्या गोष्टीचे वर्णन. वर्णन हे यथार्थ किंवा अयथार्थ असते; म्हणजे वर्ण्य वस्तूचे स्वरूप जसे असेल तसे विधानात सांगितलेले असते, किंवा ते जसे नाही तसे सांगितलेले असते. जेव्हा विधानातील वर्णन यथार्थ असते तेव्हा ते सत्य असते, आणि अयथार्थ असते तेव्हा ते असत्य असते.
उदा. ‘पृथ्वी गोल आहे’ हे विधान सत्य आहे, कारण त्यात पृथ्वीच्या आकाराचे वर्णन तो जसा आहे तसे केले आहे ; उलट “पृथ्वी सपाट आहे’ हे विधान असत्य आहे कारण त्यात पृथ्वीचा आकार जसा नाही तसा असल्याचे सांगितले आहे.

पुढे वाचा

अमेरिकेला ‘घरचा आहेर’

बिोलिंग फॉर कोलंबाइन या वृत्तपटाद्वारे मूर अमेरिकेच्या शस्त्रनियंत्रण कायद्यातील त्रुटी दाखवून गिल्या. स्टुपिड व्हाईट मेन आणि एडन्साईज धिस या पुस्तकांद्वारे अमेरिकेच्या धोरणांमधला वंशवाद आणि कामगारविरोध उघडा पाडला. फॅरनहाइट ९-११ या वृत्तपटातून अमेरिकेच्या इराकबाबतच्या धोरणातील खोटारडेपणा ‘बाहेर’ काढला. हा आहे मायकेल मूर, अमेरिकेतील ‘बुशबाबा’चा आणि रिपब्लिकन स्थितिवादीवृत्तीचा सर्वांत उपरोधिक आणि निर्भीड टीकाकार. काही अंशी तो ‘गावरान नोम चोम्स्की’ आहे.तर मायकेल मूरच्या ड्यूड, व्हेअर्स माय कंट्री या (वार्नर बुक्स २००३) पुस्तकातील हाऊ टु स्टॉप टेररिझम ? स्टॉप बीइंग टेररिस्ट्स!’, या प्रकरणाचा हा संक्षेप
आजी आणि भावी दहशतवादी हल्ले कसे थांबवावे यावरच्या माझ्या सोप्या आणि झटपट अभ्यासक्रमात तुमचे स्वागत !

पुढे वाचा

अर्थसृष्टी-भाव आणि स्वभाव : परिचय

(लेखिका – सुलक्षणा महाजन, ग्रंथाली, मुंबई-२. प्रथमावृत्ती २००४)

‘अर्थसृष्टी भाव आणि स्वभाव’ हे पुस्तक जेन जेकब्स या अमेरिकन लेखिकेच्या मूळ पुस्तकावर (Nature of Economies) नेचर ऑफ इकानॉमीज आधारित आहे. मूळ पुस्तकातील विचार व प्रस्तुती लेखिकेची खरी प्रेरक शक्ती आहे. मनुष्यसमाजाच्या अर्थव्यवहारांचे गर्भित माणसाच्या उपजिविकेच्या प्रयत्नात निसर्ग आणि मानव यांच्यातील परस्परावलंबी संबंधात कसे आहे याची यात उकल आहे. मानवप्राणी एकंदर निसर्ग-व्यवस्थेचा एक अविभाज्य घटक आहे ही प्राथमिकता मान्य करून लेखिका अर्थसृष्टी व निसर्ग यांच्या विकासाचे गतिनियम सारखे कसे आहेत हे दाखविण्याचा प्रयत्न करते.

पुढे वाचा